Tuesday, April 30, 2024

Latest Posts

राज ठाकरेंचा फोन आला म्हणून मी शांत बसलो

| TOR News Network | Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election : शिवसेनेला कोकणाची जागा मिळेल अशी अपेक्षा होती.मात्र ती जागा भाजपला गेली.काही हरकत नाही ती कसर आम्ही विधानसभेत भरुन काढू. सध्या दुधाची तहान ताकावर भगवतोय. नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी आम्हा सर्वांचे प्रयत्न, आम्हांला नारायण राणे (Ramdas Kadam on narayan rane) नाही तर नरेंद्र मोदी (Pm Narendra modi) महत्त्वाचे असे शिवसेना नेते रामदास कदम यांनी स्पष्ट केले. दरम्यान विधानसभेत शिवसेनेचा झंझावात दिसून येईल असेही रामदास कदम यांनी नमूद केले.

रत्नागिरी सिंधुदूर्ग मतदारसंघात महायुतीकडून नारायण राणे यांना भाजपची उमेदवारी मिळाली. त्यानंतर रामदास कदम यांनी माध्यमांशी बोलताना ही जागा शिवसेनेला मिळेल अशी अपेक्षा होती असे नमूद केले.

दरम्यान भाजपचे स्थानिक नेते माझ्यावर टीका करत आहेत. भाजपाने माझ्या विरोधात काम केले तर त्याचे परिणाम राज्यात दिसतील असा इशारा देखील रामदास कदम यांनी भाजपाला दिला आहे.(Ramdas kadam Warn Bjp)

कदम यांनी मनसेचे नेते वैभव खेडेकर (Vaibhav khedekar) यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले खेडेकर हा महाराष्ट्रातला सर्वात भ्रष्ट नगराध्यक्ष आहे. राज ठाकरेंचा फोन आला म्हणून मी शांत बसलो. (Raj thackeray call to me)अन्यथा अजून सात आठ गुन्हे दाखल झाले असते. मला संपवायला निघाला तर मी सोडेन का ? असा सवाल करत रामदास कदम यांनी वैभव खेडेकर यांना थेट इशारा दिला आहे.(Kadam warned vaibhav khedekar)

वैभव खेडेकर हा नावाला मनसेत, प्रत्यक्षात मात्र शिवसेनेचे अनिल परब, सदानंद कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत काम करतो असा गंभीर आरोपही रामदास कदम यांनी वैभव खेडेकर यांच्यावर केला.

Latest Posts

Don't Miss