
       <rss version="2.0" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"> 
        <channel>
        <title>ऑनलाईन रिपोर्टर....नातं विश्वासाचं...!</title>
        <atom:link href="http://theonlinereporter.com/RSS/UttarMaharashtraNews" rel="self" type="application/rss+xml"/>
        <link>http://theonlinereporter.com</link>
        <description>The Online Reporter, a national news platform of India aimed at disseminating latest updates and information regarding crime, politics, lifestyle, entertainment, society etc. With Online Reporter you can catch up with the latest news, ताज्या मराठी बातम्या , online Live News, Daily News, local news, दैनिक बातम्या , स्थानिक बातम्या , News about India and more. Get latest news headings from Mumbai, Pashchim Maharashtra, Vidarbha, and the nation only at theonlinereporter.com</description>
        <lastBuildDate>Sat, 18 Apr 2026 08:49:12 GMT</lastBuildDate>
        <language>mr-IN</language>
    
        <item>
            <pubDate>Thu, 01 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अहमदनगरचे नाव आता अहिल्यादेवीनगर होणार; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/UttarMaharashtra/Chief-Minister-Shindes-announcement-Ahmednagar-will-now-be-named-Ahilya-Devinagar</link>
            <description>पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी उत्तम राज्य कारभाराचा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी भारताला प्रशासकीय संरचनेची मोठी देणगी दिली आहे. अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केली. त्यांच्या नावामुळे जिल्ह्याचा मान मोठा होणार असल्याचेही ते म्हणाले.

चौंडी, ता.जामखेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मुख्यमंत्री  शिंदे बोलत होते.

व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार प्रा.राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुरेश धस, माजी खासदार विकास महात्मे, माजी आमदार भीमराव धोंडे, अण्णासाहेब डांगे, बाळासाहेब मुरकुटे, लक्ष्मणराव ढोबळे, </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/UttarMaharashtra/2023-06-01/image (76).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी उत्तम राज्य कारभाराचा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी भारताला प्रशासकीय संरचनेची मोठी देणगी दिली आहे. अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केली. त्यांच्या नावामुळे जिल्ह्याचा मान मोठा होणार असल्याचेही ते म्हणाले.

चौंडी, ता.जामखेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मुख्यमंत्री  शिंदे बोलत होते.

व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार प्रा.राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुरेश धस, माजी खासदार विकास महात्मे, माजी आमदार भीमराव धोंडे, अण्णासाहेब डांगे, बाळासाहेब मुरकुटे, लक्ष्मणराव ढोबळे, पोपटराव गावडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेले आपले राज्य असून या भूमीचा वसा आणि वारसा वाहणाऱ्यांची मोठी मांदियाळी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे काम आणि कर्तृत्व खूप मोठे होते. सर्वसामान्यांसाठी त्यांनी केलेला त्याग सर्वश्रुत आहे. त्या काळात जमीन महसूल, शेतसारा, चलन व्यवस्था, डाकसेवा यासारख्या व्यवस्था त्यांनी उभारल्या. शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या हितासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांनी जन्म घेतलेल्या या मातीचे आपल्यावर खूप मोठे ऋण असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

सर्वसामान्यांना न्याय देणारे हे सरकार असल्याचे सांगत मुख्यमंत्री  शिंदे म्हणाले की, सर्वसामान्यांच्या हितासाठी शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य शासनाने “नमो शेतकरी सन्मान योजना” सुरू केली असून केंद्र सरकारचे सहा हजार व राज्य शासनाचे सहा हजार असे 12 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी तत्वावरील महामंडळासाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

अहिल्यादेवी होळकरांनी न्यायप्रिय शासन व्यवस्था निर्माण केली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची ज्योत पेटवली. आपला आत्मभिमान, आत्मविश्वास व आत्मसन्मान जागृत करून हिंदवी स्वराज वाढवले. पुण्यश्लोक अहिल्यादेवीनी आपल्या कार्याच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याचा विस्तार संपूर्ण देशभर केला. न्यायप्रिय शासन व्यवस्था उभारून सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचे काम केले. अहिल्यादेवी होळकर यांचे राज्य परिवर्तनवादी व पुरोगामी होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी त्या काळात न्यायप्रिय शासन व्यवस्था निर्माण केली.त्यांनी राज्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच हुंडाबंदी, मद्यबंदी बाबत जागृतीचे काम केले. देशभरातील विविध मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी केला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्य शासनाने मेंढपाळांसाठी कर्ज योजना मंजूर करत त्यांच्यासाठी  पावसाळ्यात चराई रान राखून ठेवण्याचा निर्णय घेतला.राज्यातील धनगर वाड्यांना मुख्य रस्त्यांशी जोडण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली. धनगर समाजातील व्यक्तींसाठी दरवर्षी 25 हजार घरे बांधण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पालकमंत्री  विखे पाटील, आमदार पडळकर यांचीही समयोचित भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार प्रा. शिंदे यांनी केले. यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील पुरस्कार विजेत्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

सर्वप्रथम मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच मान्यवरांनी परिसरात उभारण्यात आलेल्या शिल्पसृष्टीची पाहणीही केली.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/UttarMaharashtra/Chief-Minister-Shindes-announcement-Ahmednagar-will-now-be-named-Ahilya-Devinagar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 31 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पर्यटन व्यवसायात महिलांना अधिक वाव देण्यासाठी “आई” पर्यटन धोरण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/UttarMaharashtra/Aai-tourism-policy-to-give-more-scope-to-women-in-the-tourism-business</link>
            <description>महिलांना पर्यटन व्यवसायात अधिकाधिक वाव मिळावा आणि त्यांचे सक्षमीकरण व्हावे म्हणून “आजादी का अमृत महोत्सव” अंतर्गत “आई” हे महिला केंद्रित (Gender Inclusive) पर्यटन धोरण राबविण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

त्याचप्रमाणे काही पर्यटन स्थळी महिला बाईक-टॅक्सी सेवा सुरु करण्यास सुद्धा यावेळी मान्यता देण्यात आली. हे धोरण पर्यटन संचालनालय व महाराष</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/UttarMaharashtra/2023-05-31/image (75).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[महिलांना पर्यटन व्यवसायात अधिकाधिक वाव मिळावा आणि त्यांचे सक्षमीकरण व्हावे म्हणून “आजादी का अमृत महोत्सव” अंतर्गत “आई” हे महिला केंद्रित (Gender Inclusive) पर्यटन धोरण राबविण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

त्याचप्रमाणे काही पर्यटन स्थळी महिला बाईक-टॅक्सी सेवा सुरु करण्यास सुद्धा यावेळी मान्यता देण्यात आली. हे धोरण पर्यटन संचालनालय व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यामार्फत सर्व संबंधित विभागांच्या विविध योजनांशी समन्वय साधून राबविण्यात येईल. याकरीता पर्यटन संचालनालयामध्ये महिला पर्यटन धोरण कक्ष तयार करण्यात येईल.

या धोरणात महिला उद्योजगता विकास, महिलांकरीता पायाभुत सुविधा, महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे, महिला पर्यटकांसाठी कस्टमाईज्ड उत्पादने, सवलती व प्रवास आणि पर्यटन विकास या पंचसुत्रीचा अवलंब करण्यात येणार आहे. महिलांना पर्यटन क्षेत्रात व्यवसाय व रोजगाराच्या संधी तसेच महिला पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचा लाभ घेता यावा याकरीता विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता पर्यटन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यदलाची स्थापना करण्यात येणार आहे.

यामध्ये राज्यातील प्रत्येक तालुक्यामधील पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालविलेल्या 10 पर्यटन व्यवसायांना (होमस्टे, हॉटेल / रेस्टॉरंट, टूर ॲन्ड ट्रॅव्हल एजन्सी इ.) पर्यटन व्यवसाय उभारणीसाठी सहाय्य करण्यात येणार आहे. या महिलांना बँकांमार्फत घेतलेल्या कर्जाच्या रक्कमेवरील व्याजाची 15 लाखापर्यंतच्या मर्यादेत व 7 वर्षे किंवा 4.5 लाखापर्यंतची मर्यादा यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत प्रतिपूर्ती करण्याकरीता योजना असेल. तसेच, पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत महिला टूर ऑपरेटरर्स यांचा वार्षिक विमा हप्ता पहिली 05 वर्षे शासनामार्फत भरण्यात येणार आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/UttarMaharashtra/Aai-tourism-policy-to-give-more-scope-to-women-in-the-tourism-business</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 24 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महिला अत्याचाराच्या सर्वाधिक तक्रारी मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातून: रुपाली चाकणकर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/UttarMaharashtra/Most-complaints-of-women-abuse-from-Chief-Minister-Thane-district-Rupali-Chakankar</link>
            <description>गेल्या काही दिवसांत राज्यात महिला अत्याचाराच्या घटना सतत समोर येत आहे. अशातच राज्यातील सर्वाधिक महिला अत्याचाराच्या तक्रारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातून आल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. महिला आयोगाकडून ठाणे जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी जनसुनावणी देखील आयोजित करण्यात आली होती. ज्यात एकूण 174 महिलांनी आपल्या तक्रारी नोंदवल्या असून ठाण्यातून आलेल्या तक्रारी राज्यातील सर्वाधिक तक्रारी असल्याचं चाकणकरांनी म्हटले आहे.


राज्य महिला आयोगाच्या 'महिला आयोग आपल्या दारी' उपक्रमांतर्गत मंगळवारी ठाणे जिल्ह्यात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा र</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/UttarMaharashtra/2023-05-24/rupali-chakankar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[गेल्या काही दिवसांत राज्यात महिला अत्याचाराच्या घटना सतत समोर येत आहे. अशातच राज्यातील सर्वाधिक महिला अत्याचाराच्या तक्रारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातून आल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. महिला आयोगाकडून ठाणे जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी जनसुनावणी देखील आयोजित करण्यात आली होती. ज्यात एकूण 174 महिलांनी आपल्या तक्रारी नोंदवल्या असून ठाण्यातून आलेल्या तक्रारी राज्यातील सर्वाधिक तक्रारी असल्याचं चाकणकरांनी म्हटले आहे.


राज्य महिला आयोगाच्या 'महिला आयोग आपल्या दारी' उपक्रमांतर्गत मंगळवारी ठाणे जिल्ह्यात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली जनसुनावणी पार पडली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ही सुनावणी झाली. दरम्यान, यावेळी समुपदेशक, पोलीस, विधी अधिकारी यांचा सहभाग असलेले 5 पॅनल तयार करून एकाच वेळी एकुण 174 तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली.


या सुनावणीनंतर माध्यमांना माहिती देताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की, महिला आयोगाच्या वतीने ठाणे शहर आणि ग्रामीण भागाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती. या जनसुनावणीच्या निमित्ताने एकूण 174 तक्रारदार आपल्या तक्रारी घेऊन आल्या होत्या. यामध्ये सर्वाधिक 116 कौटुंबिक समस्या असल्याच्या तक्रारी होत्या. सामजिक समस्या 18, मालमत्ता संबधीत 09, कामाच्या ठिकाणी होणारे अत्याचार 05 आणि इतर 26 अशा एकूण 174  तक्रारी आल्या होत्या. राज्यात फिरताना आढाव घेणारा हा माझा 24 वा जिल्हा असून, या 24 जिल्ह्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक तक्रारी ठाणे जिल्ह्यातून आल्याचं चाकणकर यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, यात कौटुंबिक समस्यांच्या सर्वाधिक तक्रारी असल्याचं देखील चाकणकर म्हणाल्या.


वेगवेगळ्या विभागाचा देखील आढावा घेण्यात आला


पुढे बोलताना त्या म्हणाल्यात की, जनसुनावणीवेळी आलेल्या तक्रारीचं जागच्या जागी नीपटारा करण्यासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी महिला आयोगाच्या वतीने प्रयत्न केले जात आहे. आज झालेल्या जनसुनावणीवेळी 5 पॅनल तयार करून एकाच वेळी एकुण 174 तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली. तसेच यावेळी वेगवेगळ्या विभागाचा देखील आढावा घेण्यात आला आल्याचं देखील चाकणकर म्हणाल्या.


महिलांसाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध...


दरम्यान, यावेळी बोलताना, फक्त पुणे जिल्हाच नव्हे तर राज्यातच गेल्या काही दिवसांत महिला अत्याचाराच्या घटना वाढताना पाहायला मिळत आहे. यासाठी आपण टोल फ्री क्रमांकाची सोय केली आहे. ज्यात 112, 110 आणि 191 टोल क्रमांकांचा समावेश आहे. मात्र याबाबत मोठ्याप्रमाणावर जनजागृती झालेली नाही. तर महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलीस, प्रशासनासह नागरिक म्हणून आपली सर्वांची देखील तेवढीच जबाबदारी असल्याचं चाकणकर म्हणाल्यात.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/UttarMaharashtra/Most-complaints-of-women-abuse-from-Chief-Minister-Thane-district-Rupali-Chakankar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 01 Feb 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शेती पंपाला पुरेशी वीज मिळावी यासाठी सौर ऊर्जेला प्राधान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/UttarMaharashtra/Preference-for-solar-energy-to-ensure-adequate-power-supply-to-agricultural-pumps-</link>
            <description>शिर्डी :- सौर ऊर्जा पर्यावरणपूरक आहे. त्यामधून हानिकारक कार्बन डाय ऑक्साईड वायूचे उत्सर्जन होत नाही. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही तसेच सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतीला दिवसा वीज पुरवठा करता येत असल्याने सौर ऊर्जेला प्राधान्य देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राहूरी येथे केले.

एकात्मिक ऊर्जा विकास-1 अंतर्गत राहूरी खुर्द येथील 33/11 उपकेंद्र येथील पाच एमव्हीए ट्रान्सफॉर्मरचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी ऊर्जा व नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम जगताप, आमदार लहू कानडे, आमदार आशुतोष काळे, माजी खासदार प्रसाद तनपुरे, राहूरीच्या नगराध्यक्षा अनिता पोपळघट, श्रीरामपूर च्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-02-01/solarpump.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[शिर्डी :- सौर ऊर्जा पर्यावरणपूरक आहे. त्यामधून हानिकारक कार्बन डाय ऑक्साईड वायूचे उत्सर्जन होत नाही. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही तसेच सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतीला दिवसा वीज पुरवठा करता येत असल्याने सौर ऊर्जेला प्राधान्य देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राहूरी येथे केले.

एकात्मिक ऊर्जा विकास-1 अंतर्गत राहूरी खुर्द येथील 33/11 उपकेंद्र येथील पाच एमव्हीए ट्रान्सफॉर्मरचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी ऊर्जा व नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम जगताप, आमदार लहू कानडे, आमदार आशुतोष काळे, माजी खासदार प्रसाद तनपुरे, राहूरीच्या नगराध्यक्षा अनिता पोपळघट, श्रीरामपूर च्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मागील काळात कोरोना प्रादुर्भावामुळे विकास कामे थांबली होती. शासनाने कोरोना नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना राबविल्या. गोरगरिबांना मोफत धान्य पुरवठा केला, आरोग्य सेवा दिली. जनतेच्या आरोग्य सेवेला सर्वोच्च प्राधान्य दिले. लॉकडाऊनमुळे शासनाला अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. केंद्र शासनाकडून अद्यापही राज्याच्या वाट्याचे जीएसटीचे सुमारे पंचवीस हजार कोटी रुपये येणे बाकी आहे. असे असले तरीही जिल्ह्याच्या विकास योजनेमध्ये कोणतीही कपात केलेली नाही. आमदारांना त्यांचा स्थानिक विकास निधी उपलब्ध करून दिला.

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. विकास कामांना सुरुवात झाली असून कार्यक्रम आयोजित करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र नागरिकांनी कोरोना प्रतिबंधासाठी जारी केलेले निर्बंध कटाक्षाने पाळणे आवश्यक आहे. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. ऊर्जा राज्यमंत्री राहूरी परिसराचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे येथील विकास कामांना निधी अपुरा पडणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. शेतकरी मोडला तर राज्य मोडते. शेतकरी जगाचा पोशिंदा असल्याने त्याची काळजी महाविकास आघाडी शासन घेत असल्याची माहिती त्यांनी दिली. शेतीच्या थकीत वीज बीलासाठी सवलत योजना शासनाने जाहीर केली आहे. राज्यातील 44 लाख शेती पंप ग्राहकांची सुमार 45 हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. शासनाने शेती पंपाच्या बिलांवर सवलतीची योजना जाहीर केली आहे. शेतकऱ्यांनी शेती पंपाचे सवलतीच्या दरातील वीज बिल भरण्यासाठी पुढाकार घेण्याचे व शासनास सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. सौर ऊर्जा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या तीन एचपी क्षमतेच्या मोटारी चालणे शक्य होणार आहे. मात्र सौर ऊर्जा प्रकल्पाच्या आजूबाजूला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची स्थानिकांनी काळजी घ्यावी. वांबोरी चारी प्रकल्प, ग्रामीण रुग्णालयासाठी इमारत बाधणे, राहूरी बसस्थानक नुतनीकरणाच्या बांधकामासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी त्यांच्या भाषणात राहूरी परिसरातील नियोजित ऊर्जा प्रकल्पांची माहिती दिली. यामुळे शेतीला वीजेचा तुटवडा भासणार नाही असे सांगितले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी जमीन उपलब्ध करून देणाऱ्या शेतकऱ्यांना महामंडळाकडून भाडे अदा करण्यात येणार असल्याची माहिती दिली. शेती पंपाच्या थकीत बिलावरील दंड माफ करुन व्याजात सवलत देण्यात आली असल्याने वीज देयक भरण्याचे त्यांनी आवाहन केले.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत राहूरी तालुक्यातील बाभूळगाव, वांबोरी, गणेगाव, आरडगांव, ताहाराबाद व शिरापूर येथील सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले. कार्यक्रमाला परिसरातील पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/UttarMaharashtra/Preference-for-solar-energy-to-ensure-adequate-power-supply-to-agricultural-pumps-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 01 Feb 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ साहित्य संमेलन यशस्वी करण्याची जबाबदारी आपण सर्व नाशिककरांची : पालकमंत्री छगन भुजबळ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/UttarMaharashtra/We-all-Nashikites-have-a-responsibility-to-make-Sahitya-Sammelan-a-success</link>
            <description>नाशिक: नाशिकमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात देशभरातून येणाऱ्या प्रत्येकाचा यथोचित सन्मान व्हावा; नाशिकचे साहित्य संमेलन संस्मरणीय व्हावे यासाठी माझ्यासह नाशिकच्या प्रत्येक नागरीकाने स्वागताध्यक्षाच्या भूमिकेतून संमेलन यशस्वी करण्याची जबाबदारी खांद्यावर घ्यावी, असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजनाच्या अनुषंगाने गोखले एज्युकेशन सोसायटी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ बोलत होते. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार जयंत जाधव, महापालिकेचे अपर आयुक्त सुरेश खाडे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, उपायुक्त मनोज घोडे पाटील, डॉ.मो.सो.गोसावी, च</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2021-02-01/sahityasameelan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नाशिक: नाशिकमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात देशभरातून येणाऱ्या प्रत्येकाचा यथोचित सन्मान व्हावा; नाशिकचे साहित्य संमेलन संस्मरणीय व्हावे यासाठी माझ्यासह नाशिकच्या प्रत्येक नागरीकाने स्वागताध्यक्षाच्या भूमिकेतून संमेलन यशस्वी करण्याची जबाबदारी खांद्यावर घ्यावी, असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजनाच्या अनुषंगाने गोखले एज्युकेशन सोसायटी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ बोलत होते. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार जयंत जाधव, महापालिकेचे अपर आयुक्त सुरेश खाडे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, उपायुक्त मनोज घोडे पाटील, डॉ.मो.सो.गोसावी, चंद्रकांत महामीने, जयप्रकाश जतेगावकर, शंकर बोऱ्हाडे, डॉ.कैलास कमोद, वसंत खैरनार, श्रीकांत बेनी,दत्ता पाटील, विनायक रानडे, नगरसेवक शाहू खैरे, गजानन शेलार, रंजन ठाकरे, लक्ष्मण सावजी, दिलीप खैरे यांच्यासह नाशिक शहरातील मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला देशभरातून साहित्यिक येणार आहेत. याचे सगळे नियोजन करण्याची जबाबदारी स्वागतध्यक्ष म्हणून व एक नाशिककर म्हणून मी पार पाडणार आहे. तसेच नाशिकमध्ये होणाऱ्या संमेलनस्थळाला ‘कुसुमाग्रज नगरी’ म्हणून नामकरण केले असल्याचे, पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी जाहीर केले.

घरोघरी उभारा सहभागाची, सन्मानाची गुढी
संमेलनाचा उत्साह आणि आनंद हा केवळ साहित्य संमेलनाचे आयोजन असलेल्या वास्तूभोवती न राहता संपूर्ण शहरात त्याचे प्रतिबिंब उमटायला हवे. यासाठी प्रत्येक नाशिककराने संमेलन काळात आपल्या घरावर या सन्मानाची आणि साहित्य सोहळ्याची गुढी उभारावी. जेणेकरून या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या शहरात आलेल्या साहित्यिक आणि मान्यवरांच्या मनावर प्रभाव पडेल की, प्रत्येक नाशिककर या सोहळ्यात तितक्यात तन्मयतेने सहभागी झाला आहे, असेही पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी सांगितले.

या संमेलनास शासनामार्फत 50 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून, आमदार निधी मधूनही मदत दिली जाणार आहे. येत्या 50 दिवसांत सूक्ष्म नियोजन करुन संमेलनाची परिपूर्ण नियोजन करण्यात यावे. तसेच संमेलनासाठी आवश्यक असलेल्या सर्व समित्या लवकरात लवकर गठीत करण्याची सूचनाही पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी आयोजकांना केली.

संमेलनाच्या काटेकोर नियोजनासाठी पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, महानगरपालिका, महावितरण आदी विभागांतील अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच संमेलनाच्या अनुषंगाने आलेल्या सूचनावंरही योग्य ती अंमलबजावणी करण्यात येईल, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

नाशिकमध्ये होणारे संमेलन वर्षानुवर्ष लोकांच्या लक्षात राहील यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येईल. तसेच यासाठी प्रत्येकाचे सहकार्य अपेक्षित असल्याचे  आवाहनही पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी केले.  माध्यमांनी देखील संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य व योगदान देण्याचे आवाहन पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी केले.

कोरोनाचा प्रादुर्भाव अजून संपलेला नसल्याने संमेलन काळात कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जावे. तसेच त्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्याची सूचना पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी केली.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी नाशिक महानगरपालिकेच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन महापौर सतीष कुलकर्णी यांनी या बैठकीत दिले.

संमेलनाच्या निमित्ताने नाशिकची संस्कृती जगासमोर यावी तसेच आरोग्य विषयक परिसंवाद व्हावा, अशी अपेक्षा डॉ.मो.स.गोसावी यांनी व्यक्त केली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/UttarMaharashtra/We-all-Nashikites-have-a-responsibility-to-make-Sahitya-Sammelan-a-success</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 23 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ खानदेशातील भाजपाचा बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर : राष्ट्रवादीच्या गोटात खलबतं  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/UttarMaharashtra/BJP-big-leader-in-Khandesh-on-the-path-of-NCP</link>
            <description>मुंबई : खानदेशातील भाजपाचा बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. यामध्ये विशेषतः भाजपाच्या नेतृत्वावर टीका करणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव पुढे येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात बैठक सुरू असून स्थानिक पातळीवरील नेत्यांशी चर्चा करू</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/UttarMaharashtra/2020-09-23/l_eknath-khadse-1465208837_835x547.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : खानदेशातील भाजपाचा बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. यामध्ये विशेषतः भाजपाच्या नेतृत्वावर टीका करणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव पुढे येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात बैठक सुरू असून स्थानिक पातळीवरील नेत्यांशी चर्चा करून पुढील दिशा ठरविणार असल्याचे बोलले जात आहे. 
भाजपमध्ये गेल्या बऱ्याच काळापासून नाराज असणारे खडसे आता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असणाऱ्या बैठकीमध्ये या मुद्द्यावर चर्चा होणार असून, त्याबाबतचा निर्णयही होणार असल्याचं म्हटलं जात आहे. जळगावमध्ये राष्ट्रवादीची कमी होणारी ताकद वाढवण्यासाठी खडसेंपुढे प्रस्ताव मांडणं हे राष्ट्रवादीच्या दृष्टीनं फायद्याचं ठरु शकतं ही बाबही तितकीच महत्त्वाची आहे. 
 सध्याच्या घडीला जळगावमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांसमवेत खुद्द शरद पवार आणि अजित पवार बैठक घेत आहेत. या बैठकीला जळगावमधील माजी आमदार गुलाबराव देवकर, सतीश पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील यांची उपस्थिती असल्याचं कळत आहे.  
जवळपास ४५ वर्षांहून अधिक काळ भाजपमध्ये सक्रीय असलेले एकनाथ खडसे गेल्या काही काळापासून पक्षावर नाराज आहेत. पक्ष नेतृत्वाकडून आपल्याला डावललं जात असल्याची खंत त्यांनी अनेकदा बोलून दाखवली होती. त्यामुळं नाराज एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार का? अशा चर्चेनं जोर धरला आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/UttarMaharashtra/BJP-big-leader-in-Khandesh-on-the-path-of-NCP</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 07 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पंधराव्या वित्त आयोगातंर्गत ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या निधीतून गावातील घरांना मिळणार घरगुती नळजोडणी – गुलाबराव पाटील ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/UttarMaharashtra/Villages-in-the-village-will-get-domestic-plumbing-from-the-funds-received-by-the-Gram-Panchayats-under-the-15th-Finance-Commission---Gulabrao-Patil</link>
            <description>जळगाव  : केंद्र शासनाने 15 व्या वित्त आयोगातंर्गत ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या निधीमधील बंधीत स्वरूपातील निधी हा सद्यस्थितीत पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी प्राधान्याने वापरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने हा निधी ग्रामीण पाणीपुरवठा योजना कार्यक्रमांसाठी वापरण्याचा निर्णय पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने घेतला आहे. त्यामुळे या निधीतून गावांमधील सर्व घरांना घरगुती नळजोडणी मिळणार असल्याची माहिती, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

मंत्री पाटील पुढे म्हणाले, 15 व्या वित्त आयोगातंर्गत ग्रामपंचायतींना देण्यात येणारा निधी ५०% बंधीत स्वरुपात ठेवला असून त्याचा वापर मुख्यत: पिण्याच्या पाण्याच्या व स्वच्छतेच्या योजनांसाठी करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. त्यानुसार हा निधी पुढील आदेशापर्यंत संबंधित ग्रामपंचायतीने १००% कार्यात्मक घरगुती नळजोडणी देण्यासाठीच वापरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/UttarMaharashtra/2020-08-07/gulabpatil.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[जळगाव  : केंद्र शासनाने 15 व्या वित्त आयोगातंर्गत ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या निधीमधील बंधीत स्वरूपातील निधी हा सद्यस्थितीत पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी प्राधान्याने वापरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने हा निधी ग्रामीण पाणीपुरवठा योजना कार्यक्रमांसाठी वापरण्याचा निर्णय पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने घेतला आहे. त्यामुळे या निधीतून गावांमधील सर्व घरांना घरगुती नळजोडणी मिळणार असल्याची माहिती, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

मंत्री पाटील पुढे म्हणाले, 15 व्या वित्त आयोगातंर्गत ग्रामपंचायतींना देण्यात येणारा निधी ५०% बंधीत स्वरुपात ठेवला असून त्याचा वापर मुख्यत: पिण्याच्या पाण्याच्या व स्वच्छतेच्या योजनांसाठी करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. त्यानुसार हा निधी पुढील आदेशापर्यंत संबंधित ग्रामपंचायतीने १००% कार्यात्मक घरगुती नळजोडणी देण्यासाठीच वापरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील गावांमध्ये घरगुती नळ जोडणीची कामे पूर्ण होणार असून यामुळे नागरिकांना घरापर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी करताना जी गावे जल जीवन मिशन अंतर्गत निवडण्यात आली आहेत त्यांची कार्यात्मक घरगुती नळ जोडणीची कामे ग्रामपंचायत पातळीवर पूर्ण करावी. यासाठी ग्रामविकास विभागाने दिलेला वित्त आयोगाचा निधी वापरासंबंधीचे प्रशासकीय अधिकार ग्रामपंचायतीस आहे त्या मर्यादित प्रशासकीय मान्यता ग्रामपंचायतीस देता येणार आहे. मात्र, अशा कामांना तांत्रिक मान्यता देण्यास उपअभियंता, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद हे सक्षम राहतील. तसेच यापूर्वी ज्या गावांमध्ये स्रोत विकास, नवीन स्रोतांचा शोध, ऊर्ध्व वाहिन्या, पाण्याची टाकी बांधणी ही कामे करण्याचे निश्चित झाले आहे ती कामे करून कार्यात्मक घरगुती नळ    जोडण्याची कामे करावयाची आहेत. अशा गावांनी 15 व्या वित्त आयोगातून प्रथम 100 टक्के घरांना नळजोडणीची कामे पूर्ण करावी. ग्रामपंचायतींनी कार्यात्मकता साध्य करण्यासाठी नळजोडणी व्यतिरिक्त इतर आवश्यक कामाचे स्वतंत्र अंदाजपत्रक तयार करावे, अशा कामांना पंधरा लाख रुपये पर्यंतच्या कामांना प्रशासकीय मान्यता ग्रामपंचायतीला देता येईल. मात्र या सर्व प्रस्तावांना तांत्रिक मान्यता कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद यांची घ्यावी लागणार आहे असे पाणीपुरवठा मंत्र्यांनी सांगितले.

पाणीपुरवठा मंत्री पाटील पुढे म्हणाले, ही कामे करताना वित्त आयोगाचा निधी कमी पडल्यास त्या प्रमाणात जल जीवन मिशनचा निधी जिल्हास्तरावरून ग्रामपंचायतीच्या खात्यात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जमा करतील. ही सर्व कामे ग्रामपंचायत स्तरावर ग्रामविकास विभागाने वित्त आयोगाच्या निधीसाठी घालून दिलेल्या प्रक्रियांचे पालन करून करावी लागणार  आहेत. यासाठी तांत्रिक मान्यता देणाऱ्या सक्षम अधिकाऱ्याने प्रत्येक अंदाज पत्रकांना मान्यता देताना  गावातील ज्या घरांना जल जीवन मिशनच्या निकषानुसार कार्यात्मक नळजोडणी मिळेल त्याचे निकषानुसार मूल्यमापन करून घेण्यात येईल. वित्त आयोगाच्या निधी अंतर्गत मंजूर करण्यात आलेले अंदाजपत्रकातील समाविष्ट कामांचा जल जीवन मिशन अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या अंदाजपत्रकात समावेश करण्यात येऊ नये, वित्त आयोग अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांसाठी जिल्हा परिषद तांत्रिक मंजुरीसाठी कोणतीही प्रशासकीय फी आकारणार नाही. जल जीवन मिशन अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या अंदाजपत्रकाबाबत प्रचलित पद्धतीनुसार कार्यवाही करावी लागेल.  वित्त आयोग अंतर्गत ग्रामपंचायतीने केलेल्या कामांचा अहवाल जिल्हा परिषदेस द्यावा लागेल. शिवाय 15 लक्ष किमतीपेक्षा जास्त किमतीच्या सुधारात्मक पूनर्जोडणीची कामे प्रचलित पद्धतीने करावी लागतील असेही पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/UttarMaharashtra/Villages-in-the-village-will-get-domestic-plumbing-from-the-funds-received-by-the-Gram-Panchayats-under-the-15th-Finance-Commission---Gulabrao-Patil</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 31 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ तापी नदीवरील खेडी भोकर पुलाचा प्रश्न मार्गी लागणार:  गुलाबराव पाटील ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/UttarMaharashtra/The-problem-of-village-Bhokar-bridge-on-Tapi-river-will-be-solved-Gulabrao-Patil</link>
            <description>जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील निम्न तापी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या चोपडा- भोकर -जळगाव रस्ता राज्य मार्ग  40 या रस्त्यावरील खेडी भोकर पुलाच्या बांधकामास तत्वतः मान्यता मिळाली असून जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रत्येकी 50 टक्के निधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
खेडी भोकर फुलाच्या बांधकामासंदर्भात गुरुवारी मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बैठ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/UttarMaharashtra/2020-07-31/gulabpatil.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील निम्न तापी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या चोपडा- भोकर -जळगाव रस्ता राज्य मार्ग  40 या रस्त्यावरील खेडी भोकर पुलाच्या बांधकामास तत्वतः मान्यता मिळाली असून जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रत्येकी 50 टक्के निधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
खेडी भोकर फुलाच्या बांधकामासंदर्भात गुरुवारी मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या पुलाच्या बांधकामासाठी जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रत्येकी 50 टक्के निधी उपलब्ध करून देण्याचे मान्य केले. या पुलाच्या बांधकामासाठी पुरवणी अंदाजपत्रकात खर्चाची तरतूद करावी. तसेच पुलाच्या बांधकामाच्या कामाला तातडीने प्रशासकीय मान्यता देवून  कामाला गती देण्याचे निर्देशही मंत्री जयंत पाटील व मंत्री चव्हाण यांनी यावेळी दिले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार लताताई सोनवणे, आमदार अनिल पाटील, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव, तापी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री.कांबळे, नदीजोड प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार व्ही. डी. पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यातील जळगावसह भुसावळ, यावल, चोपडा या चार तालुक्यातील शेतकरी व नागरिकांच्या दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या खेडी-भोकर पुलाचा वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला प्रश्न जळगाव पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांमुळे मार्गी लागणार आहे.
खेडी- भोकर ते चोपडा हे अंतर फक्‍त 15 किलोमीटरचे आहे. मात्र, तात्पुरता पूल बंद झाल्यास हे अंतर 70 किलोमीटरचे होते. परिणामी शेतकऱ्यांना व नागरिकांचा वेळ व पैसा देखील खर्च होतो. शिवाय खेडी  भोकर, भादली, कठोरा, किनोद, गोरगावले, गाढोदे, करंज, सावखेडा आदी गावातील शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी या पुलाचा मोठा फायदा  होणार आहे. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांसह वाहनधारकांनी याठिकाणी कायमस्वरूपी पूल बांधण्यात यावा, अशी  नागरिकांची  मागणीची दखल घेऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्राधान्याने हे काम हाती घेतले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/UttarMaharashtra/The-problem-of-village-Bhokar-bridge-on-Tapi-river-will-be-solved-Gulabrao-Patil</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 31 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पाणीपुरवठा विभागातील तालुका स्तरावरील समूह व गट समूह समन्वयकांच्या सेवा ३० सप्टेंबरपर्यंत सुरु ठेवण्यास मुदतवाढ : गुलाबराव पाटील ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/UttarMaharashtra/roup-coordinators-in-water-supply-department-till-SExtension-to-continue-services-of-taluka-level-group-and-geptember-30-Gulabrao-Patil</link>
            <description>जळगाव :  पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन येथील कंत्राटी सल्लागार कर्मचारी तसेच तालुका स्तरावरील समूह समन्वयक व गट समूह समन्वयकांच्या सेवा 30 सप्टेंबरपर्यंत सुरु ठेवण्यास मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/UttarMaharashtra/2020-07-31/gulabpatil.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[जळगाव :  पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन येथील कंत्राटी सल्लागार कर्मचारी तसेच तालुका स्तरावरील समूह समन्वयक व गट समूह समन्वयकांच्या सेवा 30 सप्टेंबरपर्यंत सुरु ठेवण्यास मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. या निर्णयाचा राज्यातील तालुका पातळीवरील 351 गट समन्वयक व 899 समूह समन्वयकांना लाभ होणार असल्याचे  पाटील यांनी सांगितले.
मंत्री पाटील म्हणाले , जल जीवन मिशन अंतर्गत तालुका पातळीवर 351 गट समन्वयक व 899  समूह समन्वयकांची पदे स्वच्छ भारत मिशनच्या कामासाठी 6 जुलै, 2011 च्या शासन निर्णयान्वये निर्माण करण्यात आली होती. या पदांचे मानधन व भत्ते राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या सहाय्य निधीमधून देण्यात येत आहेत. तथापी, जल जीवन मिशनच्या मार्गदर्शक सुचनांनुसार गट समन्वयक व समूह समन्वयक या पदांसाठी निधीची उपलब्धता नसल्याने या पदांच्या सेवा 31 जुलै, 2020 रोजी समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
परंतु ग्रामीण भागासाठी या पदांची आवश्यकता लक्षात घेऊन या पदांना मुदतवाढ मिळावी, याकरिता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करुन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पाटील यांनी पदांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही  यावेळी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/UttarMaharashtra/roup-coordinators-in-water-supply-department-till-SExtension-to-continue-services-of-taluka-level-group-and-geptember-30-Gulabrao-Patil</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 06 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जळगाव जिल्ह्यात आणखी एकोणीस कोरोना बाधित रूग्ण आढळले ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/UttarMaharashtra/Nineteen-more-corona-infected-patients-were-found-in-Jalgaon-district</link>
            <description>जळगाव :  जिल्ह्यातील स्वॅब घेतलेल्या 84 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 65 व्यक्तीचे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/UttarMaharashtra/2020-05-06/corona-2.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[जळगाव :  जिल्ह्यातील स्वॅब घेतलेल्या 84 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 65 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून एकोणीस व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भुसावळ येथील एका व्यक्तीचा तर अमळनेर येथील अठरा व्यक्तींचा समावेश आहे.जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 85 इतकी झाली असून त्यापैकी तेरा रूग्णांचा मृत्यू झाला आहे तर दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ नागोराव चव्हाण यांनी दिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/UttarMaharashtra/Nineteen-more-corona-infected-patients-were-found-in-Jalgaon-district</guid>
        </item>
    
     </channel>
    </rss>
     