
       <rss version="2.0" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"> 
        <channel>
        <title>ऑनलाईन रिपोर्टर....नातं विश्वासाचं...!</title>
        <atom:link href="http://theonlinereporter.com/RSS/PashchimMaharashtraNews" rel="self" type="application/rss+xml"/>
        <link>http://theonlinereporter.com</link>
        <description>The Online Reporter, a national news platform of India aimed at disseminating latest updates and information regarding crime, politics, lifestyle, entertainment, society etc. With Online Reporter you can catch up with the latest news, ताज्या मराठी बातम्या , online Live News, Daily News, local news, दैनिक बातम्या , स्थानिक बातम्या , News about India and more. Get latest news headings from Mumbai, Pashchim Maharashtra, Vidarbha, and the nation only at theonlinereporter.com</description>
        <lastBuildDate>Sat, 18 Apr 2026 08:49:13 GMT</lastBuildDate>
        <language>mr-IN</language>
    
        <item>
            <pubDate>Thu, 22 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दर्शनाच्या हत्येचे कारण स्पष्ट; पोलिसांनी मित्र राहुलला केली अटक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Friend-Rahul-killed-Darshana-Pawar-caught-by-the-pune-police</link>
            <description>मागील आठवडल्यात राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवलेल्या दर्शना पवार हिचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. त्यानंतर दर्शना हिचा बेपत्ता मित्र राहुल हंडोरे याच्याकडे संशय होता. दरम्यान, या प्रकरणी आरोपी राहुल हंडोरेला मुंबई येथून अटक करण्यात आली आहे.


दर्शना हिचा मृतदेह आढळल्यापासून राहुल बेपत्ता होता. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. दर्शनाच्या डोक्यात आणि शरीरावर गंभीर जखमा झ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2023-06-22/image - 2023-06-22T161847.192.png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मागील आठवडल्यात राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवलेल्या दर्शना पवार हिचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. त्यानंतर दर्शना हिचा बेपत्ता मित्र राहुल हंडोरे याच्याकडे संशय होता. दरम्यान, या प्रकरणी आरोपी राहुल हंडोरेला मुंबई येथून अटक करण्यात आली आहे.


दर्शना हिचा मृतदेह आढळल्यापासून राहुल बेपत्ता होता. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. दर्शनाच्या डोक्यात आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले होते. त्यामुळे तिची हत्या राहुल याने केली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पोलिसांच्या तपासानुसार, राहुल हांडोरेचं शेवटचं लोकेशन कात्रज होतं. त्यानंतर दोन दिवसांनी तो गायब झाला होता. पुण्यातून गायब झाल्यानंतर दोन दिवसांनी नवी दिल्लीतील एटीएम सेंटरवरुन त्याच्या एटीएम कार्डवरुन पैसे काढण्यात आले. रविवारी रात्री उशिरा त्यानं त्याच्या एका नातेवाईकाशी फोनवरुन संवाद साधला होता. एका मित्राशी वाद झाल्याने पुणे सोडलं असल्याचं तो म्हणाले. त्यानंतर त्याने फोन बंद केला आणि त्याच्या फोनचं लोकेशन ट्रेस केलं असता ते कोलकाता होतं. त्यानंतर पोलिसांनी राहुलला मुंबईतून अटक केली आहे.


दर्शना आणि राहुल एकमेकांचे नातेवाईक होते. दर्शनासोबत लग्न करण्याची राहुलची इच्छा होती. दोघेही एमपीएससीची परीक्षा देत होते. दर्शना आधी एमपीएससी उत्तार्ण होऊन ती लवकरच वन विभागात रुजू होणार होती. त्यानंतर दर्शनाच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसर्‍या मुलासोबत जमवले आणि लग्नाच्या हालचाली सुरु केल्या. त्यामुळे राहुल हंडोरे अस्वस्थ होता. त्याने त्याला एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा, असा आग्रह धरला. तो देखील परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनेल, असे दर्शना आणि तिच्या कुटुंबियांना सांगितले. मात्र, त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने राहुलने राजगडाच्या पायथ्याशी दर्शनाची हत्या केली.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Friend-Rahul-killed-Darshana-Pawar-caught-by-the-pune-police</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 24 Sep 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ प्रदूषण मुक्त पुण्यासाठी इथेनॉल प्लॅन, या दृतगती मार्गाची गडकरी यांची घोषणा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Union-Minister-Nitin-Gadkari-announces-ethanol-plan-for-pollution-free-Pune</link>
            <description>पुणे : केंद्रीय रस्ते व अवजड वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी (ता. २४) पुण्यात नव्या पुणे-बेंगळरु द्रुतगती मार्गाची घोषणा करीत पुणेकरांना नवी भेट दिली आहे. यासोबतच वाघोली ते शिरुर महामार्गही तीन मजली करणार असल्याचे त्यांनी सांगितले. . पुण्यात आज नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यातल्या उड्डाण पुलाचे भूमीपूजन पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.  

प्रदूषण मुक्त पुण्यासाठी केंद्रीय रस्ते व अवजड वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी इथेनॉल प्लॅन (ethanol plan) घोषित केला आहे. ते म्हणाले, पुणे मेट्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2021-09-24/UnionMinister-Nitin-Gadari.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे : केंद्रीय रस्ते व अवजड वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी (ता. २४) पुण्यात नव्या पुणे-बेंगळरु द्रुतगती मार्गाची घोषणा करीत पुणेकरांना नवी भेट दिली आहे. यासोबतच वाघोली ते शिरुर महामार्गही तीन मजली करणार असल्याचे त्यांनी सांगितले. . पुण्यात आज नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यातल्या उड्डाण पुलाचे भूमीपूजन पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.  

प्रदूषण मुक्त पुण्यासाठी केंद्रीय रस्ते व अवजड वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी इथेनॉल प्लॅन (ethanol plan) घोषित केला आहे. ते म्हणाले, पुणे मेट्रो कामाच्यावेळी लोकांनी माझ्यावर बरीच टीका केली. पुणे मेट्रोचं काम सुरू झालं नाही आणि नागपूरचे काम बरंच पुढे गेले. तेव्हा पुण्यातल्या लोकांनी माझ्यावर आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर बरीच टीका केली. त्यावेळी मी पुण्यात आलो होतो. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली. पुण्यात मेट्रो अंडरग्राऊंड किंवा वरून करायची यावर चर्चा झाली. तेव्हा मी म्हटले जेवढा खर्च जास्त करू तेवढे तिकिटाचे दर वाढतील. त्यामुळे मेट्रो वरूनच करण्याचा निर्णय झाला, असे गडकरी म्हणाले.

दरम्यान, मेट्रो प्रवासामुळे वेळ, पैशांची बचत होऊ शकते. त्यामुळे एसटीच्या तिकिट दरात पुणे ते कोल्हापूर मेट्रो प्रवास शक्य आहे. पुढील काळात हा मेट्रो मार्ग होऊ शकेल, असे प्रतिपादन नितीन गडकरी  यांनी केले. आपल्याला पर्यावरण रक्षणासाठी मेट्रो हाच आपल्याकडे पर्याय आहे. त्यामुळे पुण्याला जोडणारी शहरे मेट्रोच्या जाळ्याने जोडली पाहिजेत, असे ते म्हणाले. 

नदी विकास प्रकल्पाच्या कामाबद्दल गडकरी यांनी एक आठवण सांगितली. पुण्यातील नदी विकास प्रकल्प जवळपास 1400 कोटींचा आहे. ( Pune River Linkage Project) त्या प्रकल्पावर दिल्लीत चर्चा झाली. पण तो अडकून पडला होता. तेव्हा शेतकरी जसे बैलांच्या मागे तुतारी घेऊन लागतात, तसे सरकारमध्ये प्रशासनाच्या मागे तुतारी घेऊन राहिले, तर त्याचंच काम होते. बाकीच्यांचं होत नाही. त्या वेळी मी सचिवांना या कामाचे तातडीने कंत्राट काढण्याचे निर्देश दिले. आता जायकाचे 1400 कोटींचे टेंडर निघाले आहेत आणि काम देखील सुरू झाले आहे.  

राज्यातल्या प्रलंबित प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक होणार आहे, असे अजित पवार यांनी जाहीर केले आहे. सिंहगड रोडवरील पूल खरंतर 18 लेनचा व्हायला हवा होता मात्र ते शक्य नाही, अशी कोपरखळी गडकरी यांनी मारली. मात्र नगररोडवरील वाघोली ते शिरूर रस्ता तीन मजली करणार आहोत, असे गडकरी यांनी जाहीर केले आहे. तळेगाव ते नगर रस्ताही तीन मजली बनवण्याचे ते म्हणाले. मात्र राज्य सरकारने जीएसटी माफ करावा, अशी विनंती त्यांनी अजित पवार यांना केली. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Union-Minister-Nitin-Gadkari-announces-ethanol-plan-for-pollution-free-Pune</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 27 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अणुऊर्जेवर आधारित नाशवंत शेतीमालावर प्रक्रिया करणारा पकल्प क्रांतिकारी – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Atomic-energy-based-perishable-agricultural-processing-project-revolutionary</link>
            <description>शिर्डी :- अणुऊर्जेवर आधारित कृषी मालावर प्रक्रिया करणारा हिन्दुस्थान अॅग्रो कोऑपरेटिव्ह सोसायटीचा भारतामधील पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये विकीकरणातून कृषी व कृषिपूरक मालावर प्रक्रिया करण्यात येत आहे. यामुळे नाशवंत शेतीमालाचे जतन करून बाजारात योग्य भाव मिळाल्यावर शेतकऱ्याला तो विकता येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडून येणार असल्याने  हा प्रकल्प क्रांतिकारक आहे, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे केले.

हिन्दुस्थान अॅग्रो को ऑपरेटीव्ह सोसायटीच्या राहूरी तालुक्यातील अणुशक्त</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2021-01-27/hasanmushrif.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[शिर्डी :- अणुऊर्जेवर आधारित कृषी मालावर प्रक्रिया करणारा हिन्दुस्थान अॅग्रो कोऑपरेटिव्ह सोसायटीचा भारतामधील पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये विकीकरणातून कृषी व कृषिपूरक मालावर प्रक्रिया करण्यात येत आहे. यामुळे नाशवंत शेतीमालाचे जतन करून बाजारात योग्य भाव मिळाल्यावर शेतकऱ्याला तो विकता येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडून येणार असल्याने  हा प्रकल्प क्रांतिकारक आहे, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे केले.

हिन्दुस्थान अॅग्रो को ऑपरेटीव्ह सोसायटीच्या राहूरी तालुक्यातील अणुशक्तीनगर, वरवंडी येथील प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर उपस्थितांशी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुजय विखे, संस्थेचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) राजेंद्र निंभोरकर, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, प्रकल्पाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.भारत ढोकणे, डॉ.नामदेव ढोकणे, विनायक देशमुख, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार फसीयोद्दीन शेख उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, हा प्रकल्प पाहण्याची माझी खुप दिवसांची इच्छा होती. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारे असे आधुनिक प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. आज प्रकल्पाची पाहणी केली आणि प्रकल्पाची उभारणी उच्च दर्जाची झाली आहे असे सांगितले. एमआरटीपी कायद्यातील तरतुदी आणि विद्युत जोडणीसंदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. प्रकल्पाच्या विस्तारीकरणास शुभेच्छा देऊन लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांचा सैन्यातील सेवेचा अनुभव प्रकल्पाच्या प्रगतीसाठी उपयोगी ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली.

खासदार सुजय विखे यांनी प्रकल्पाच्या उभारणीबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.  जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी विस्तारीकरणास आवश्यक सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल असे सांगितले. प्रकल्पाला उत्तुंग यश लाभो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी प्रकल्प उभारणीची माहिती दिली प्रकल्पातील उत्पादनांचा शेतकऱ्यांपासून ते सैनिकांपर्यंत सर्वांना फायदा होणार असल्याची माहिती दिली. रशियन संस्थेसोबत देशात आणि परदेशात नाशवंत शेतीमालावर पक्रिया करणारे वीस विकीरण प्रक्रिया प्रकल्प उभारणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमाला प्रकल्पाचे संचालक, सभासद, तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Atomic-energy-based-perishable-agricultural-processing-project-revolutionary</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 27 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सोलापूर जिल्ह्यातील बंधाऱ्यांच्या दुरूस्तीसाठी १३.१० कोटींच्या निधीला तत्वत: मान्यता  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Approval-in-principle-of-Rs1310-crore-for-repair-of-dams-in-Solapur-district</link>
            <description>सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बंधाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नादुरूस्त बंधाऱ्यांना दुरूस्त करण्यासाठी राज्य शासनाकडून 13.10 कोटींचा निधी दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सांगितले.

जिल्हा नियोजन समितीमध्ये झालेल्या चर्चेनु</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2021-01-27/solapur.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बंधाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नादुरूस्त बंधाऱ्यांना दुरूस्त करण्यासाठी राज्य शासनाकडून 13.10 कोटींचा निधी दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सांगितले.

जिल्हा नियोजन समितीमध्ये झालेल्या चर्चेनुसार अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बंधारे दुरूस्तीबाबत बैठक घेण्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले होते. त्यानुसार आज पुणे येथील विधानभवन येथे श्री.पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्ह्यातील नादुरूस्त बंधाऱ्याबाबत बैठक झाली. यावेळी पालकमंत्री श्री.भरणे, आमदार शहाजीबापू पाटील, प्रशांत परिचारक, माजी आमदार दिपक साळुंखे-पाटील, जलसंपदाचे कार्यकारी संचालक टी.एन. मुंडे, सोलापूरचे अधीक्षक अभियंता धीरज साळे उपस्थित होते.

बंधारे दुरूस्तीसाठी 13.10 कोटींचा प्रस्ताव पालकमंत्री श्री. भरणे यांनी सादर केला. उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी प्रस्तावाला तत्वता मान्यता दिली आहे. याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी देऊन नादुरूस्त बंधारे दुरूस्त करण्याचे आदेश दिले.

श्री.भरणे यांनी नादुरूस्त बंधारे पावसाळ्यापूर्वी दुरूस्त न झाल्यास सर्व पाणी वाहून जाईल. शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पाणी राहणार नाही, असे श्री.पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Approval-in-principle-of-Rs1310-crore-for-repair-of-dams-in-Solapur-district</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 27 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कारागृह हे जबाबदार नागरिक घडवणारे संस्‍कार केंद्र व्‍हावे – मुख्‍यमंत्री ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Prisons-should-be-a-culture-center-for-responsible-citizens</link>
            <description>पुणे:- तुरुंगात असणारे हे कैदी एक मोठे मनुष्यबळ आहे. काहींच्या आयुष्याची गाडी भरकटते आणि ते येथे येतात. यातील काहींची गाडी रुळावर कशी आणता येईल यासाठी तसेच दिशा भरकटलेली माणसे, योग्य मार्गावर आणण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. येरवडा कारागृह हे जबाबदार नागरिक घडवणारे संस्‍कार केंद्र व्‍हावे, अशी अपेक्षाही त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

राज्यात ‘कारागृह पर्यटन’ ही अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहे. या पर्यटनाचा शुभारंभ आज प्रजासत्‍ताक दिनाच्‍या शुभमुहूर्तावर पुण्यातील १५० वर्षे जुन्या येरवडा कारागृहातून करण्यात आला. त्‍यावेळी दृकश्राव्‍यप्रणालीद्वारे ते बोलत होते. पुण्‍यातून उपमुख्‍यमंत्री तथा पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री, आमदार सुनील टिंगरे, पोलीस आयुक्‍त अमिताभ गुप्‍ता, जिल्‍हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अपर पोलीस महासंचालक सुनिल रामानंद, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई उपस्थित होते. गोंदिया येथून गृहमंत्री अनिल देशमुख हे दृरदृश्‍य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मुख्‍यमंत्री श्री. ठाकरे म्‍हणाले, आपल्याकडे पूर्वी जेल भरो आंदोलन असायचे. लोक आंदोलनाला तयारीने यायचे. पोलीस त्यांना अटक करायचे. मग नंतर सोडून द्यायचे. पण आता ‘जेल यात्रा’  हा नवीन प्रकार येईल. त्याला मी ‘जेल फिरो’ असे म्हणेन. आता हा नवीन प्रकार आहे, लोक महाबळेश्वरला, लोणावळ्याला जाऊन आलो, असे सांगतानाच जेलमध्ये जा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2021-01-27/kara.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे:- तुरुंगात असणारे हे कैदी एक मोठे मनुष्यबळ आहे. काहींच्या आयुष्याची गाडी भरकटते आणि ते येथे येतात. यातील काहींची गाडी रुळावर कशी आणता येईल यासाठी तसेच दिशा भरकटलेली माणसे, योग्य मार्गावर आणण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. येरवडा कारागृह हे जबाबदार नागरिक घडवणारे संस्‍कार केंद्र व्‍हावे, अशी अपेक्षाही त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

राज्यात ‘कारागृह पर्यटन’ ही अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहे. या पर्यटनाचा शुभारंभ आज प्रजासत्‍ताक दिनाच्‍या शुभमुहूर्तावर पुण्यातील १५० वर्षे जुन्या येरवडा कारागृहातून करण्यात आला. त्‍यावेळी दृकश्राव्‍यप्रणालीद्वारे ते बोलत होते. पुण्‍यातून उपमुख्‍यमंत्री तथा पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री, आमदार सुनील टिंगरे, पोलीस आयुक्‍त अमिताभ गुप्‍ता, जिल्‍हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अपर पोलीस महासंचालक सुनिल रामानंद, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई उपस्थित होते. गोंदिया येथून गृहमंत्री अनिल देशमुख हे दृरदृश्‍य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मुख्‍यमंत्री श्री. ठाकरे म्‍हणाले, आपल्याकडे पूर्वी जेल भरो आंदोलन असायचे. लोक आंदोलनाला तयारीने यायचे. पोलीस त्यांना अटक करायचे. मग नंतर सोडून द्यायचे. पण आता ‘जेल यात्रा’  हा नवीन प्रकार येईल. त्याला मी ‘जेल फिरो’ असे म्हणेन. आता हा नवीन प्रकार आहे, लोक महाबळेश्वरला, लोणावळ्याला जाऊन आलो, असे सांगतानाच जेलमध्ये जाऊन आलो, असे सांगतील. पण जेलमध्ये जाऊन येतो, म्हणजे गुन्हा करण्याची गरज नाही. आपण ‘जेलयात्रा’ हा पर्यटनाचा एक नवीन मार्ग दाखवला आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या येरवडा तुरुंगातील दिवसांबाबतच्या आठवणींना उजाळा दिला. या दिवसांबाबत त्यांनी लिहिलेल्या ‘गजाआडचे दिवस’ या पुस्तकातील उताराही त्यांनी उद्धृत केला. मुख्‍यमंत्री म्‍हणाले, येरवड्यामध्ये शिवसेनाप्रमुखांना भेटण्यासाठी येत होतो. त्‍याकाळी ते पत्र पाठवत असत, पण शिवसेनाप्रमुखांनी पत्रात आम्‍हाला कधी निराश करणारी भाषा वापरली नाही. निराश होऊ दिले नाही. ‘गजाआडचे दिवस’ या पुस्‍तकात प्रत्येक दिवसात काय काय झाले याची तपशीलवार माहिती शिवसेनाप्रमुखांनी दिली आहे. क्रांतीकारक चाफेकर बंधू यांचा तुरुंगवास, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अंदमानातील काळ्या पाण्याची शिक्षा आणि त्यांना भोगाव्‍या लागलेल्या यातनांचाही मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला. या वीर क्रांतीकारकांच्या त्यागामुळेच आपल्याला स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक राष्ट्राचे ध्येय प्राप्त करता आल्याचेही त्यांनी गौरवाने नमूद केले.

मुख्‍यमंत्री म्‍हणाले, या कोठड्या ज्याला आपण तुरुंग म्हणतो, त्या भिंतींमागे क्रांतीच्‍या ठिणग्या टाकणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना ठेवण्यात येत असे. खरे तर ही व्यक्तिमत्त्व धगधगती अग्निकुंड होती. त्यांना अशा रितीने अंधार कोठडीत टाकून, त्यांचे तेज विझून जाईल, असे इंग्रजांना वाटले असेल. पण तसे झाले नाही, त्यांचे हे तेज आणखी उजळले ते उजळलेच. त्यातून स्वातंत्र्याचा प्रकाश दिसला. त्या सगळ्यांनी त्या काळात काय काय कष्ट केले आहे, हे आपल्या लक्षात येईल. किंबहुना हे स्वातंत्र्य आपल्याला आंदण म्हणून मिळालेले नाही. त्यांनी हाल-अपेष्टा भोगल्या म्हणून हे स्वातंत्र्य मिळाले, याची जाणीव जागृत रहावी यासाठी या कोठड्या पाहाव्या लागतील, असेही ते म्‍हणाले. स्वातंत्र्यासाठी, आपल्यासाठी त्यांनी काय काय केले. काय भोगले याबाबत या कोठड्यांच्या भिंती बोलू लागतील. इतके सारे त्या भिंतींनी अनुभवले आहे. त्यादृष्टीने हा प्रयोग अभिनव असाच आहे.  मुख्‍यमंत्री श्री. ठाकरे यांनी या अनोख्या प्रयोगाबद्दल गृहमंत्री, गृह विभाग, पोलिस बांधव, माता-भगिनींचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्‍या.

उपमुख्‍यमंत्री तथा पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही  ‘कारागृह पर्यटन’ या अभिनव  उपक्रमाचे कौतुक केले. येरवडा कारागृहात कैद्यांची मानसिकता बदलण्‍यासाठी विविध उपक्रमांद्वारे प्रयत्‍न केले जातात याबद्दल गौरवोद्गार काढून त्‍यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या कारागृहातून मीनाताई ठाकरे यांना लिहिलेल्‍या पत्राचे वाचन केले. ते म्‍हणाले, भारताच्या स्वातंत्र्य इतिहासात कारागृहांचे विशेष महत्त्व आहे. या कारागृहात स्वातंत्र्य संग्रामातील थोर नेते महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू यांच्यासह इतर नेते बंदिस्त होते. या कारागृहांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता ‘कारागृह पर्यटन’ ही वेगळी संकल्‍पना आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख म्‍हणाले, येरवडा तुरुंगात अनेक थोर स्वातंत्र्यसैनिक बंदी होते. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील महत्त्वाचा ‘पुणे करार’ येरवडा तुरुंगातील आंब्याच्या झाडाखाली झाला होता. याशिवाय स्वातंत्र्य संग्रामातील चाफेकर बंधू हे देशासाठी याच ठिकाणी शहीद झाले. जनतेला हा इतिहास समजावा, या उद्देशाने पहिल्या टप्प्यात येरवडा तुरुंगातून कारागृह पर्यटन सुरू करण्यात आले आहे.  दुसऱ्या टप्प्यात नाशिक, ठाणे, रत्नागिरी या इतर ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कारागृहातदेखील ही संकल्पना राबविली जाईल. या कारागृह पर्यटनातून शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, इतिहास अभ्यासक आणि नागरिकांना आपल्या इतिहासातील क्षणांची अनुभूती मिळेल, असा विश्‍वास व्‍यक्‍त केला.

 यावेळी कारागृहाच्या माहितीबाबत चित्रफीत दाखवण्यात आली. गांधी यार्ड, टिळक यार्ड, फाशी यार्ड आदी ठिकाणांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली.

अपर पोलीस महासंचालक सुनिल रामानंद यांनी प्रास्ताविकातून कारागृहात राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांची माहिती दिली. कारागृह अधीक्षक यु.टी.पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमास अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, तहसीलदार तृप्ती पाटील तसेच कारागृहाचे अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Prisons-should-be-a-culture-center-for-responsible-citizens</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 27 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शिवाजीनगर  येथील पोलीस मनोरंजन केंद्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Dedication-of-Police-Entertainment-Center-at-Shivajinagar</link>
            <description>पुणे: शिवाजीनगर येथील पोलीस मनोरंजन केंद्राचे व पोलीस विभागासाठीच्या नऊ वाहनांचे लोकार्पण आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अनुक्रमे डॉ. जालिदंर सुपेकर, डॉ.संजय शिंदे, अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त अनुक्रमे बच्चन सिंग, प्रियंका नारनवरे, भाग्यश्री नवटके, स्वप्ना गोरे, पोर्णिमा गायकवाड, स</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2021-01-27/punepolice.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे: शिवाजीनगर येथील पोलीस मनोरंजन केंद्राचे व पोलीस विभागासाठीच्या नऊ वाहनांचे लोकार्पण आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अनुक्रमे डॉ. जालिदंर सुपेकर, डॉ.संजय शिंदे, अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त अनुक्रमे बच्चन सिंग, प्रियंका नारनवरे, भाग्यश्री नवटके, स्वप्ना गोरे, पोर्णिमा गायकवाड, सहा. पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, आबा चेमटे आदी उपस्थित होते. तसेच सायबेज कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष अमित गुजवानी, व्यवस्थापक प्रिया पारनेकर उपस्थित होते.

पुणे शहर पोलीस दलाचे सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीकडून एक कोटी रुपयांचा निधी तसेच महिंद्रा कंपनीची नवीन नऊ स्कॉर्पिओ वाहने प्राप्त करुन दिली. ही वाहने एस्कॉर्ट व पायलट ड्युटीकरिता वापरण्यात येणार आहेत.

पुणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्य, पाल्य यांना त्यांच्या कलागुणांना वाव देता यावा, कुटुंबातील सांस्कृतिक कार्यक्रम, लग्न समारंभ, वाढदिवस इत्यादी कार्यक्रमाकरिता पोलीस दलाची “पोलीस मनोरंजन केंद्र” ही इमारत 15 ऑगस्ट 1959 रोजी पूर्णत्वाला आली. त्यानंतर सन 2005 मध्ये इमारतीचे पहिल्या मजल्यावर वरिष्ठ अधिकारी यांच्याकरिता  एकूण 6 विश्रांतीकक्ष तयार करण्यात आले.

सन 2020 रोजी तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम व सध्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पोलीस मनोरंजन केंद्राच्या इमारतीचे आधुनिक पद्धतीने नूतनीकरण व विस्तारीकरण करुन घेणे तसेच या वास्तूच्या बाजूला एक प्रशस्त हॉल तयार करण्याची संकल्पना मांडून ती पूर्णत्वास नेली. यासाठी विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक रमेश साहेबराव साठे यांनी विशेष प्रयत्न केले. सायबेज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अरुण नथानी व संचालक रितु नथानी यांनी सामाजिक बांधिलकीतून स्वेच्छेने  “पोलीस मनोरंजन केंद्र” इमारतीचे वातानुकुलित यंत्रणेसह सर्व सोयीसुविधांनी युक्त नूतनीकरणासह विस्तारीकरण करण्यासाठी विशेष सहाय्य केले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Dedication-of-Police-Entertainment-Center-at-Shivajinagar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 27 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ प्रबोधनकारां’चा पुरोगामित्वाचा विचार आजही महाराष्ट्राला आवश्यक – उपमुख्यमंत्री अजित पवार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Maharashtra-still-needs-Prabodhankar-idea-of-progress-</link>
            <description>पुणे : ‘प्रबोधनकारांचा पुरोगामित्वाचा विचार आजही महाराष्ट्राला आवश्यक आहे. त्यांनी दिलेल्या स्वाभिमानावरच महाराष्ट्राची वाटचाल सुरु आहे. ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या माध्यमातून वैचारिक आणि सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी नव्या पिढीला प्रेरणा देण्याचे कार्य केले असल्याचे मत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

बालगंधर्व रंगमंदीर येथे प्रबोधन शताब्दी सोहळ्याचा समारोप उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खा. गिरीष बापट, आ. संजय शिंदे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, संवाद संस्थेचे सुनील महाजन, हरिष केंची, किरण साळी, सचिन विटकर उपस्थित होते.

‘संवाद-पुणे’ संस्थेने आयोजित केलेल्या, प्रबोधनकार केशव सीता</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2021-01-27/prabodhan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे : ‘प्रबोधनकारांचा पुरोगामित्वाचा विचार आजही महाराष्ट्राला आवश्यक आहे. त्यांनी दिलेल्या स्वाभिमानावरच महाराष्ट्राची वाटचाल सुरु आहे. ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या माध्यमातून वैचारिक आणि सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी नव्या पिढीला प्रेरणा देण्याचे कार्य केले असल्याचे मत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

बालगंधर्व रंगमंदीर येथे प्रबोधन शताब्दी सोहळ्याचा समारोप उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खा. गिरीष बापट, आ. संजय शिंदे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, संवाद संस्थेचे सुनील महाजन, हरिष केंची, किरण साळी, सचिन विटकर उपस्थित होते.

‘संवाद-पुणे’ संस्थेने आयोजित केलेल्या, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या संपादकात्वाखालील ‘प्रबोधन’ पाक्षिकाचा शतकोत्सव सोहळयासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्राची जडणघडण करण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने ‘प्रबोधन’ च्या शतकमहोत्सवी वाटचाल, त्यांची पत्रकारिता अभिनंदनीय आहे. प्रबोधनकार प्रभावी वक्ते, व्यंगचित्रकार, छायाचित्रकार, साहित्यिक, तैलचित्रकार बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाचे वैचारिक प्रबोधन करण्यासाठी त्यांनी ‘प्रबोधन’ पाक्षिक सुरू केले. नियतकालिक सुरु करुन चालवणे मोठे कठीण असणाऱ्या काळात त्यांनी ते धाडस केले आणि यशस्वी करुन दाखविले. ‘प्रबोधन’ पाक्षिकाने महाराष्ट्राला वैचारिक समृद्धी दिली, नव्या विचाराची पिढी घडविण्यात सिंहाचा वाटा उचलला. ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या माध्यमातून वैचारिक आणि सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी नव्या पिढीला प्रेरणा देण्याचे कार्य केल्याचेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या, पुणे शहरात प्रबोधनाचा विचार मांडण्याचे कार्य प्रबोधनकार ठाकरे यांनी केले आहे. प्रबोधनच्या शतकोत्सव कार्यक्रमामध्ये सर्वच विषयांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. संवादच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करून साहित्य आणि संस्कृती संवर्धनाचे कार्य होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

खा. गिरीष बापट म्हणाले, प्रबोधनकार ठाकरे यांनी समाजामध्ये बदल करण्यासाठी अनेक उपक्रमात सहभाग घेतला असून समाजामध्ये विचारांची क्रांती केल्याचे सांगितले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे म्हणाले,        स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाचे वैचारिक प्रबोधन करण्यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांनी ‘प्रबोधन’ पाक्षिक सुरू केले. नियतकालिक सुरु करुन चालवणे मोठे कठीण असणाऱ्या काळात त्यांनी ते धाडस केले आणि यशस्वी करुन दाखविले. प्रबोधनकरांचे विचार पुरोगामी होते, प्रबोधनकारांच्या विचारांची आजही गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नागरिक उपस्थित होते.

कविसंमेलनाचा उस्फूर्त प्रतिसाद
संवाद संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आयोजित करण्यात आलेल्या कविसंमेलनाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. सामाजिक, प्रबोधनपर तसेच विविध विषयावरील कवितांना रसिकांनी उस्फूर्त दाद दिली. ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, डॉ. दिलीप पांढरपट्टे, भरत दौंडकर, अरूण पवार, तुकाराम धांडे, बंडा जोशी यांनी संमेलनात सहभाग घेतला. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Maharashtra-still-needs-Prabodhankar-idea-of-progress-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 23 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सिरमची कोरोना लस सुरक्षित, आगीमुळे लस उत्पादनाला फटका नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Serum-corona-vaccine-safe</link>
            <description>पुणे : सिरमची कोरोना लस सुरक्षित आहे. कोव्हिशिल्ड लस उत्पादनाला फटका नाही. आग प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.

सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागलेल्या आगीची  पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. दुर्घटनेबाबतची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. तसेच सिरम इन्स्टिट्यूटच्या टीमशी त्यांनी संवाद साधला.

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, प</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2021-01-23/sirumvisit.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे : सिरमची कोरोना लस सुरक्षित आहे. कोव्हिशिल्ड लस उत्पादनाला फटका नाही. आग प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.

सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागलेल्या आगीची  पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. दुर्घटनेबाबतची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. तसेच सिरम इन्स्टिट्यूटच्या टीमशी त्यांनी संवाद साधला.

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, खा. गिरीश बापट, आ. चेतन तुपे,

सिरमचे अदर पूनावाला,  विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, मुख्यमंत्री यांचे प्रमुख सल्लागार अजोय मेहता, आरोग्य सल्लागार डॉ.दीपक म्हैसेकर, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, संपूर्ण जगात कोविडचे संकट अद्याप संपलेले नाही. गेल्या आठवड्यात सिरमच्या लसीमुळे आशेचा किरण निर्माण झाला. लस बनवणाऱ्या केंद्रात आग लागली ही बातमी आली. दुर्दैवाने या दुर्घटनेत पाच कामगार मृत्युमुखी पडले. लस बनवली जाते ते केंद्र, साठा संपूर्णपणे सुरक्षित आहे. काल आगीचे वृत्त समजताच तातडीने संपर्क करून याबाबतची माहिती घेतली. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या इमारतीमधील पहिले दोन मजले वापरात आहेत, वरील दोन मजले जिथे नवे केंद्र सुरू केले जाणार होते, त्या ठिकाणी ही दुर्घटना घडली. मात्र, सिरमची कोरोना लस सुरक्षित आहे. कोव्हिशिल्ड लस उत्पादनाला फटका नाही. आग प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशी पूर्ण होऊन अहवाल प्राप्त झाल्यानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल. मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाची जबाबदारी सिरम कंपनीने घेतली आहे. त्याशिवाय काही आवश्यकता असेल तर शासन निश्चित मदत करेल, असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.

सिरमचे अदर पुनावाला म्हणाले, कोरोना लसीच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम नाही. बीसीजी आणि इतर लसीचे नुकसान झाले आहे. कोव्हिशिल्ड लसीचा पुरवठा सुरळीत असून लसीवर परिणाम नाही, मात्र आर्थिक नुकसान मोठे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Serum-corona-vaccine-safe</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 23 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांची कामे ३१ मार्च अखेर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे‍ निर्देश ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Ajit-Pawars-instructions-to-complete-the-work-of-Sant-Dnyaneshwar-and-Sant-Tukaram-Maharaj-Palkhi</link>
            <description>पुणे: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांची कामे 31 मार्चअखेर पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

येथील ‘व्हीव्हीआयपी’ सर्किट हाऊस येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग आणि संत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2021-01-23/palkhi.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांची कामे 31 मार्चअखेर पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

येथील ‘व्हीव्हीआयपी’ सर्किट हाऊस येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या कामासंदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सातारा जिल्हाधिकारी  शेखर सिंह आणि सोलापूर जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर (व्हिसीद्वारे), जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव तसेच पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन्ही मार्गांची कामे 31 मार्चपर्यंत पूर्ण होतील, असे नियोजन करावे. एखादा प्रकल्प काही कारणांमुळे लांबला तर खर्चात वाढ होते. या दोन्ही मार्गांचे भूसंपादन आणि मावेजा वाटप करण्यात यावे. आवश्यकता भासल्यास विभागीय आयुक्त राव यांनी वेगळी बैठक घेऊन विषय मार्गी लावावा, असे आदेशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले.

बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Ajit-Pawars-instructions-to-complete-the-work-of-Sant-Dnyaneshwar-and-Sant-Tukaram-Maharaj-Palkhi</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 22 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पुणे विभागातील म्हाडाच्या घरांचा ऑनलाईन निकाल घरबसल्या इथे पहा! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/See-online-results-of-MHADA-houses-in-Pune-division-here</link>
            <description>पुणे विभाग गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ अर्थात म्हाडाच्या (MHADA Pune Division)  पुणे, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्हांत 5647 घरांसाठी आज (22 जानेवारी) नेहरू मेमोरियल सभागृह मध्ये ऑनलाइन लॉटरी जाहीर होणार आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज नागरिकांना नेहरू मेमोरियल मध्ये गर्दी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2021-01-22/mahadaonline-ghar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे विभाग गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ अर्थात म्हाडाच्या (MHADA Pune Division)  पुणे, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्हांत 5647 घरांसाठी आज (22 जानेवारी) नेहरू मेमोरियल सभागृह मध्ये ऑनलाइन लॉटरी जाहीर होणार आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज नागरिकांना नेहरू मेमोरियल मध्ये गर्दी न करता लाईव्ह वेब कास्टिंग द्वारा सोडत पहावी असं आवाहन करण्यात आले अअहे. सकाळी 9 च्या सुमारास उद्घाटन कार्यक्रमाला सुरूवात तर नंतर 10.30 पासून सोडत जाहीर करण्यास सुरूवात होणार आहे. 

दरम्यान म्हाडाच्या पुणे विभागातील भाग्यवान विजेत्यांची संपूर्ण यादी आज संध्याकाळी 6 नंतर म्हाडाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध होणार आहे. तसेच ज्यांना घर लागले आहे अशांना एसएमएस पाठवले जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही देखील यासाठी अर्ज दाखल केला असेल आज्चा म्हाडाचा घरांसाठीचा ऑनलाईन निकाल घरबसल्या पाहण्यासाठी खालील युट्युब लिंकला नक्की भेट द्या.
नेहरू मेमोरियल सभागृहामध्ये आज पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. तसेच जितेंद्र आव्हाड, नीलम गोर्‍हे या देखील या कार्यक्रमाला उपस्थित असतील. यंदा कोविड संकटकाळात म्हाडाची लॉटरी जाहीर झाली असली तरीही नागरिकांना त्याला तुफान प्रतिसाद दिला आहे. 5647 घरांसाठी 90 हजाराहून अधिक अर्ज आले आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/See-online-results-of-MHADA-houses-in-Pune-division-here</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 22 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आग लागलेल्या सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Deputy-CM-Ajit-Pawar-inspects-the-building-of-Serum-Institute-which-caught-fire</link>
            <description>मुंबई :- पुण्यातील सिरम इन्स्ट्यिट्यूट इमारतीला लागलेली आग आटोक्यात आली असून आगीत ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोविडप्रतिबंधक लसनिर्मिती आणि लससाठ्यांचा आग लागलेल्या इमारतीशी कोणताही संबंध नाही. कोविड लस कार्यक्रम पूर्णपणे सुरक्षित आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून उद्या तज्ज्ञांच्या पथकांकडून पाहणी केल्यानंतरच आगीचे कारण स्पष्ट होऊ शकेल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

पुण्यातील सिरम इन्स्ट्यिट्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2021-01-22/seraum-aag-pahani.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :- पुण्यातील सिरम इन्स्ट्यिट्यूट इमारतीला लागलेली आग आटोक्यात आली असून आगीत ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोविडप्रतिबंधक लसनिर्मिती आणि लससाठ्यांचा आग लागलेल्या इमारतीशी कोणताही संबंध नाही. कोविड लस कार्यक्रम पूर्णपणे सुरक्षित आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून उद्या तज्ज्ञांच्या पथकांकडून पाहणी केल्यानंतरच आगीचे कारण स्पष्ट होऊ शकेल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

पुण्यातील सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागेल्या आगीची  पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संध्याकाळी दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. दुर्घटनास्थळी उपस्थित पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, आमदार चेतन तुपे, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच सिरम इन्स्ट्यिट्यूटच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यांनी माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोरोनाप्रतिबंधक लसीमुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नकाशावर स्थान मिळवलेल्या सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागलेली आग व आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. आगीत मृत्युमुखी पडलेल्या कामागारांना श्रद्धांजली वाहून उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या.

आग लागलेल्या इमारतीत अंधार असल्याने रात्री तपासणी करणे शक्य नाही. त्यामुळे उद्या सकाळी संबंधित तज्ञांच्या पथकांकडून दुर्घटनेतील प्रत्येक मजल्याची तपासणी करण्यात येईल. त्यातून आगीचे कारण स्पष्ट होण्यास मदत होईल, मृतांच्या संख्येबाबत निश्चितपणे सांगता येईल. सदर इन्स्ट्यिट्यूट ‘एसईझेड’ क्षेत्रात असून इन्स्ट्यिट्यूट इमारतीचे फायर ऑडीट, एनर्जी ऑडीट तसेच इतर आवश्यक तपासण्यांची पुर्तता करण्यात आली होती का, याचीही चौकशी करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखिल उद्या सिरम इन्स्ट्यिट्यूटला भेट देणार असल्याची माहिती उपमख्यमंत्र्यांनी दिली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अधिकारी-जवानांनी उत्तम कामगिरी केल्याचे सांगून उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Deputy-CM-Ajit-Pawar-inspects-the-building-of-Serum-Institute-which-caught-fire</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 21 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सीरम इन्स्टिट्यूट इमारतीला आग, अग्निशमन दलाचे 10 बंब घटनास्थळी दाखल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Fire-at-Serum-Institute-building</link>
            <description>पुणे : कोरोना व्हायरस लस निर्मिती करणाऱ्या पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट (Serum Institute) इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग भडकली आहे. आग ( लागलेल्या इमारतीत सीरम इन्स्टिट्यूट कार्यालय आहे. कोरोना लस निर्मिती केली जाते त्या ठिकाणाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. ही लस आणि ती निर्मिती करणारा प्लांट पूर्णपणे सुरक्षीत असल्याची प्राथमिक माहिती इन्स्टिट्यूट ने प्रसारमाध्यमांना दिली आहे.

कोरोना व्हायरस (Coronavirus) लस निर्मिती करणाऱ्या पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट (Serum Institute) इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग भडकली आहे. पुणे येथील मांजरी परिसरात सुमारे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2021-01-21/seraum-aag.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे : कोरोना व्हायरस लस निर्मिती करणाऱ्या पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट (Serum Institute) इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग भडकली आहे. आग ( लागलेल्या इमारतीत सीरम इन्स्टिट्यूट कार्यालय आहे. कोरोना लस निर्मिती केली जाते त्या ठिकाणाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. ही लस आणि ती निर्मिती करणारा प्लांट पूर्णपणे सुरक्षीत असल्याची प्राथमिक माहिती इन्स्टिट्यूट ने प्रसारमाध्यमांना दिली आहे.

कोरोना व्हायरस (Coronavirus) लस निर्मिती करणाऱ्या पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट (Serum Institute) इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग भडकली आहे. पुणे येथील मांजरी परिसरात सुमारे 100 किंवा त्याहून अधिक एकर जागेवर सीरमचा पसारा आहे. याच ठिकाणी आज (गुरुवार, 21 जानेवारी 2021) दुपारी एक वाजणेच्या सुमारास आग भडकली. आग (Serum Institute Building Fire in Pune) लागलेल्या इमारतीत सीरम इन्स्टिट्यूट कार्यालय आहे. अग्निशमन दलाला घटनेची माहिती तातडीने देण्यात आली आहे. अग्निशमन दलाचे 10 बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. सीरमच्या नवीन प्लांटमध्ये ही आग भडकली आहे. जुना प्लांट पूर्णपणे सुरक्षीत आहे. सीरम हे केवळ कोरोना लसीचे उत्पादन करत नाही तर त्याशिवायही इतर अनेक लसींची निर्मिती या संस्थेकडून केली जाते.

कोरोना लस निर्मिती केली जाते त्या ठिकाणाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. ही लस आणि ती निर्मिती करणारा प्लांट पूर्णपणे सुरक्षीत असल्याची प्राथमिक माहिती इन्स्टिट्यूट ने प्रसारमाध्यमांना दिली आहे.  ज्या ठिकाणी आग लागली आहे त्या ठिकाणी बीसीची लस निर्मिती केली जाते. ही लस रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वापरली जाते. या विभागात काम करत असताना अचानक एका जागेहून धूर येत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाजूला करण्यात आले.

पुणे अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आग लागलेल्या परिसरात प्रचंड धूर आहे. जोपर्यंत धुर कमी होत नाही तोपर्यंत आग निश्चित किती प्रमाणावर आहे हे निटसे समजू शकत नाही. इमारत फारशी मोठी नाही अवघी चार ते पाच मजली इमारत आहे. परंतू, इमारतीत रासायनीक (केमिकल) साठा असण्याची शक्यता आहे. इमारतीत नेमकी कोणत्या प्रकारची रसायनं आहेत याबाबत माहिती मिळू शकली नाही. असे रणपिसे यांनी सांगितले.


प्रशांत रणपिसे यांनी पुढे बोलताना सांगितले की, सुरुवातीला आग लागलेल्या इमारतीत 4 व्यक्ती अडकल्याचे समजले. त्यापैकी 3 व्यक्तींना बाहेर काढण्यात आले आहे. अद्याप एका व्यक्तीला बाहेर काढता आले नाही. त्या व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरु असल्याचे रणपिसे यांनी म्हटले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Fire-at-Serum-Institute-building</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 19 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ उपलब्ध बाजारपेठेनुसार पिके घेऊन शेतीला चांगला दर्जा मिळवून देऊया – ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Lets-get-good-quality-agriculture-by-taking-crops-according-to-the-available-market-</link>
            <description>पुणे:  उपलब्ध बाजारपेठेचा फायदा शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे सांगून उपलब्ध बाजारपेठेनुसार पिके घेऊन शेतीला चांगला दर्जा मिळवून देऊया, असे आवाहन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केले.

बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये दि.18 ते 24 जानेवारी 2021 या कालावधीत “कृषिक” या कृषि तंत्रज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषि तंत्रज्ञान  सप्ताहास आज ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार  व अन्य मंत्री महोदयांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, जलसंपदामंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, भारतीय अनुसंधान परिषदेचे महासंचालक त्रिलोचन मोहपात्रा(ऑनलाईन), राज्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरजकुमार, उपसंचालक सुरेश चौधरी, ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट चे अध्यक्ष राजेंद्र पवार व सुनंदा पवार, बायर कंपनीचे डॉ. सुभाष जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट व सॉलिडारिडार, आशिया या संस्थांमध्ये करण्यात आलेल्या कराराच्या (एमओयु) प्रतीचे हस्तांतरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थेच्या 50 वर्षातील वाटचालीविषयी बनविण्यात आलेल्या चित्रफितीचे ज्येष्ठ नेते खासदार श</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2021-01-19/sheti-darja.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे:  उपलब्ध बाजारपेठेचा फायदा शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे सांगून उपलब्ध बाजारपेठेनुसार पिके घेऊन शेतीला चांगला दर्जा मिळवून देऊया, असे आवाहन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केले.

बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये दि.18 ते 24 जानेवारी 2021 या कालावधीत “कृषिक” या कृषि तंत्रज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषि तंत्रज्ञान  सप्ताहास आज ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार  व अन्य मंत्री महोदयांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, जलसंपदामंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, भारतीय अनुसंधान परिषदेचे महासंचालक त्रिलोचन मोहपात्रा(ऑनलाईन), राज्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरजकुमार, उपसंचालक सुरेश चौधरी, ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट चे अध्यक्ष राजेंद्र पवार व सुनंदा पवार, बायर कंपनीचे डॉ. सुभाष जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट व सॉलिडारिडार, आशिया या संस्थांमध्ये करण्यात आलेल्या कराराच्या (एमओयु) प्रतीचे हस्तांतरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थेच्या 50 वर्षातील वाटचालीविषयी बनविण्यात आलेल्या चित्रफितीचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

खासदार शरद पवार म्हणाले, गहू, तांदळाच्या बाबतीत आपला देश स्वयंपूर्ण झाला आहे. बाजारपेठेनुसार शेती पिके घेतल्यास उत्पादनाला चांगला भाव मिळतो. यासाठी बाजारपेठेच्या मागणीनुसार विविध डाळी व फळपिकांचे उत्पादन देखील शेतकऱ्यांनी घ्यायला हवे.  शेतीसाठी ‘पाणी’ हा घटक महत्त्वाचा आहे. शेतीसाठी किती प्रमाणात आणि कशा प्रकारे पाण्याचा वापर करायचा याची माहिती शेतकऱ्यांना होणे आवश्यक असते. यादृष्टीने दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांवर ‘कृषिक’ सप्ताहाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली, असे सांगून खासदार शरद पवार म्हणाले, ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विस्ताराचे काम दिवंगत आप्पासाहेब पवार यांनी केले, तर संस्थेत आधुनिकता आणण्यासाठी राजेंद्र पवार यांनी परिश्रम घेतले. संस्थेला 50 वर्षे पूर्ण होत असून  संस्थेच्या वाटचालीसाठी अनेक मान्यवरांचे सहकार्य मिळाल्याचेही खासदार श्री. पवार यांनी आवर्जून सांगितले.



शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलविण्यासाठी राज्याचा कृषी विभाग प्रयत्नशील –कृषिमंत्री दादाजी भुसे

कृषिमंत्री दादाजी भुसे म्हणाले, बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राद्वारे शेतकऱ्यांना शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती करुन दिली जात आहे. याच पद्धतीने राज्यातील अन्य भागातील शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती उत्पादन व शेती तंत्रज्ञानाची माहिती करुन देण्यासाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये ‘कृषी तंत्रज्ञान सप्ताह’ सुरु होण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे. शेतकरी बांधवांच्या जीवनात आनंद फुलविण्यासाठी राज्याच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वपूर्ण योजना राबवण्यात येत आहेत. माती परीक्षण करुन त्या-त्या भागातील मातीनुसार शेतीमध्ये खते वापरण्याबाबतचे फलक लावण्यात येत आहेत. यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास निश्चितच मदत होईल. महाडीबीटी पोर्टलवर एकाच अर्जाद्वारे कृषी विभागाच्या अनेक योजनांचा लाभ मिळवून देण्यात येत आहे, असे सांगून कृषिमंत्री दादाजी भुसे म्हणाले, शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या दृष्टीने “विकेल ते पिकेल” ही संकल्पना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून घेऊन ते गतीने सोडवण्यासाठी विविध कक्ष स्थापन करण्यात येत आहेत.

कृषिमंत्री श्री. भुसे म्हणाले, शेतकऱ्यांबरोबरच राज्यातील शेतमजुरांना विविध कौशल्यांची माहिती देऊन कौशल्यावर आधारीत कुशल शेतमजुर बनवण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी सुरुवातीला कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन शेतीविषयक विविध औजारे, तंत्रज्ञान व शेती उत्पादनांच्या प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली. यानंतर डेअरी प्रकल्प केंद्राला भेट देऊन येथील विविध सोयी-सुविधांची पाहणी केली. यानंतर माळेगाव खुर्द येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेला (एनआयएएसएम) भेट देऊन पाहणी केली. यावेळी खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य मान्यवरांनी नियोजित सायन्स पार्कला भेट देऊन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रात्याक्षिकांची पाहणी करुन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

दुष्काळ निवारण यंत्रणेचा आढावा
राज्यात दुष्काळ निवारणाच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजनांबाबत कार्यक्रमात तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. दुष्काळ निवारण यंत्रणेचा आढावा, भारतीय कृषी संशोधन परिषदेची दुष्काळ निवारण यंत्रणेशी प्रतिबद्धता, दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी भात, ऊस पिकांसाठी पाणी वाचवण्याच्या दृष्टीने लागवड तपासणी, दुष्काळ सूचक यंत्रणा, पुणे जिल्ह्यासाठी मृदा सर्वेक्षण व भूमी वापर नियोजन आदी विषयांवर  डॉ. सुहास जोशी, डॉ. हिमांशू पाठक, डॉ. सचिन नांदगुडे, डॉ. सुनील गोरांटीवार, डॉ. विवेक भोईटे, सारंग नेरकर, डॉ. बीएस द्विवेदी आदी तज्ञ मान्यवरांनी सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले.

“कृषिक” कृषी तंत्रज्ञान सप्ताहाला सुरुवात
राष्ट्रीय अजैविक स्ट्रेस प्रबंधक संस्था, अग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि बायर कंपनी यांच्या प्रयत्नातून हा कृषि तंत्रज्ञान सप्ताह  पार पडत आहे. दरवर्षीच्या कृषिक  प्रदर्शनातील प्रक्षेत्र भेटीसह  फूड प्रोसेसिंग, डेअरी टेक्नॉलॉजी, प्रक्रिया उद्योग, मार्केटिंग ब्रँडिंग आदी तंत्रज्ञानाचा यात समावेश आहे. याशिवाय वैशिष्ट्यपूर्ण  खाद्य पदार्थांच्या प्रक्रिया उद्योगांचे लाईव्ह डेमो पाहता येत आहेत. याठिकाणी कृषी तंत्रज्ञानासह  शेतीविषयक विविध प्रयोगांचा समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायझर आदी खबरदारी घेऊन याठिकाणी शेतकऱ्यांना प्रवेश देण्यात येत आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Lets-get-good-quality-agriculture-by-taking-crops-according-to-the-available-market-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 19 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कार्यक्षम पोलीस अधिकारी तयार करणारी महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीमधील व्यवस्था सर्वात चांगली- गृहमंत्री अनिल देशमुख ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Maharashtra-Police-Academy-has-the-best-system-to-produce-efficient-police-officers</link>
            <description>नाशिक दि.  १८ जानेवारी, २०२१ (जिमाका वृत्तसेवा) : नाशिकस्थित महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी मधील व्यवस्था सर्वात चांगली असून येथून कार्यक्षम पोलीस अधिकारी बाहेर पडतात. या ठिकाणी असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी मैदान, अँपिथियेटर, रेन हार्वेस्टिंगचे पर्यावरण पूरक प्रकल्प त्याच प्रमाणे प्रबोधिनीच्या प्रांगणात असलेल्या सर्व सुविधा आणि त्यांची ठेवलेली देखभाल कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.
ते आज नाशिक शहरातील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी येथे आयोजित करण्यात आलेल्या पोलीस विभागाच्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2021-01-19/police-prakshishan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नाशिक दि.  १८ जानेवारी, २०२१ (जिमाका वृत्तसेवा) : नाशिकस्थित महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी मधील व्यवस्था सर्वात चांगली असून येथून कार्यक्षम पोलीस अधिकारी बाहेर पडतात. या ठिकाणी असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी मैदान, अँपिथियेटर, रेन हार्वेस्टिंगचे पर्यावरण पूरक प्रकल्प त्याच प्रमाणे प्रबोधिनीच्या प्रांगणात असलेल्या सर्व सुविधा आणि त्यांची ठेवलेली देखभाल कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.
ते आज नाशिक शहरातील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी येथे आयोजित करण्यात आलेल्या पोलीस विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस महासंचालक संजीवकुमार, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या संचालिका अश्वती दोरजे, पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मालेगांवचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, पोलीस उप आयुक्त अमोल तांबे, संग्राम निशाणदार यांचेसह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, नाशिक रेंज मध्ये पोलीस महानिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे बुडविलेले पैसे परत शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी सुरु केलेली यशस्वी मोहीम राज्यस्तरावर राबण्यासाठी प्रयत्न करू. या मोहिमेंतर्गत जवळपास १५ कोटी रुपये शेतकऱ्यांना परत देण्यात आले असून हा अतिशय स्तुत्य उपक्रम असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
नाशिक शहर पोलिसांनी सतर्क राहून शहरातील गुन्हेगारीविषयक दर कमी राखला आहे. त्याबाबत गृहमंत्री श्री. देशमुख यांनी समाधान व्यक्त केले. त्याचप्रमाणे नाशिक ग्रामीण पोलिसांनी कोरोना काळात मालेगावमध्ये कार्य करत असताना आपले प्राण गमावलेल्या कुटुंबीयांची जबाबदारी घेतली, हा देखील अतिशय संवेदनशील स्तुत्य उपक्रम असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.

बैठकीपूर्वी श्री देशमुख यांनी महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या प्रांगणातील विविध भागांना भेट देऊन त्याबद्दल माहिती घेतली. यात पोलीस कवायत मैदान, प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाऱ्यांसाठी असलेल्या कँटीन, अँम्पीथियेटर, प्रशिक्षणार्थी यांच्या बॅरेक्स  यांचा समावेश होता. प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाऱ्यांना भेट देत श्री. देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या.
बैठकीप्रसंगी पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, पोलीस अधीक्षक सचिन पाटील आणि पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी गृहमंत्री श्री. देशमुख यांना सादरीकरण्याद्वारे माहिती दिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Maharashtra-Police-Academy-has-the-best-system-to-produce-efficient-police-officers</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 13 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णत: सुरक्षित आहे – पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Eating-eggs-and-poultry-meat-is-completely-safe</link>
            <description>पुणे :- बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव हिमाचल प्रदेश, राजस्थान केरळ व मध्यप्रदेश या राज्यांतील स्थलांतरीत पक्षांमध्ये आढळून आला आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये देखील काही ठिकाणी तपासणीचे निष्कर्ष पॉझिटिव्ह आले आहेत. परंतू अंडी व कुक्कूट मांस 70 अंश सेंटीग्रेड तापमानावर 30 मिनीटे शिजवून खाल्ल्यास विषाणू निष्क्रीय होत असल्याने अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णत: सुरक्षित आहे. बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नयेत, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.

येथील पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयात बर्ड फ्लू बाबत पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ.धनंजय परकाळे, सहआयुक्त डॉ.विनायक लिमये, डॉ.राऊतमारे, जिल्हा माहिती अधिकारी तथा उपसंचालक राजेंद्र सरग उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्यातील आतापर्यंत कुक्कुट पक्षांमध्ये यवतमाळ जिल्हयात 200,अमरावती जिल्हयात 11 व अकोला जिल्हयात 3 अशी 214 मरतु</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2021-01-13/andiploti-khane.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे :- बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव हिमाचल प्रदेश, राजस्थान केरळ व मध्यप्रदेश या राज्यांतील स्थलांतरीत पक्षांमध्ये आढळून आला आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये देखील काही ठिकाणी तपासणीचे निष्कर्ष पॉझिटिव्ह आले आहेत. परंतू अंडी व कुक्कूट मांस 70 अंश सेंटीग्रेड तापमानावर 30 मिनीटे शिजवून खाल्ल्यास विषाणू निष्क्रीय होत असल्याने अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णत: सुरक्षित आहे. बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नयेत, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.

येथील पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयात बर्ड फ्लू बाबत पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ.धनंजय परकाळे, सहआयुक्त डॉ.विनायक लिमये, डॉ.राऊतमारे, जिल्हा माहिती अधिकारी तथा उपसंचालक राजेंद्र सरग उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्यातील आतापर्यंत कुक्कुट पक्षांमध्ये यवतमाळ जिल्हयात 200,अमरावती जिल्हयात 11 व अकोला जिल्हयात 3 अशी 214 मरतुक झालेली आहे. तर अकोला जिल्हयात 4 कावळयांमध्ये मरतुक आढळून आली आहे. महाराष्ट्र राज्यातील 12 जानेवारी 2021 पर्यंत एकूण 218 पक्षांमध्ये मरतुक झाली आहेत. हे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत. तपासणीचे निष्कर्ष हाती येण्यास 48 ते 72 तास लागू शकतात. दिनांक 8 जानेवारी 2021 पासून आजतागायत एकूण 1 हजार 839 विविध पक्षांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. पूर्वी पाठवलेल्या नमुन्यांचे तपासणीचे निष्कर्ष  राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था भोपाळ येथून नुकतेच प्राप्त झाले असून, त्यानुसार मुंबई, ठाणे जिल्ह्यातील घोडबंदर व दापोली या ठिकाणांचे कावळे आणि बगळे तसेच परभणी जिल्हयातील मुरुंबा या ठिकाणचे पोल्ट्री फार्म मधील नमुने हायली पॅथोजेनिक एव्हीयन एन्फ्ल्यूएन्झा (एच 5एन 1 या स्ट्रेन) करीता आणि बीड येथील नमूने (एच 5एन 8 या स्ट्रेन) करीता पॉझीटीव्ह आलेले आहेत.

लातूर येथील नमुनेही सकारात्मक आल्यानुसार, या क्षेत्रास “संसर्गग्रस्त क्षेत्र” म्हणून घोषित करण्यात येत असून, तेथे निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. या निर्बंधानुसार परभणी जिल्हयातील मुरुंबा येथील सुमारे 5 हजार 500 व केंद्रेवादी, लातूर जिल्हयातील अहमदपूर तालुक्यातील सुमारे 10 हजार कुक्कुट पक्षी, या ठिकाणच्या ज्या पोल्ट्री फार्म मध्ये बर्ड फ्लू चा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्या  पोल्ट्री फार्मपासून 1 किमी त्रिज्येच्या अंतरामध्ये येणारे सर्व कुक्कुट पक्षी नष्ट करण्यात येतील. तथापि, मुंबई, ठाणे जिल्हयातील घोडबंदर, दापोली व बीड येथे केवळ सर्वेक्षण सुरु ठेवण्यात येईल.

राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणा-या पक्षांमध्ये मर्तूक झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायिक पोल्ट्री फार्म मधील पक्षांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मर्तूक झाल्याचे निदर्शनास आल्यास, तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये याची माहिती द्यावी. तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री दुरध्वनी क्रमांक 18002330418 वर त्वरीत दूरध्वनी करुन त्याची माहिती द्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे. मृत पक्षांना हात लावू नये किंवा शवविच्छेदन करु नये किंवा त्यांची परस्पर विल्हेवाट लावू नये. प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009 च्या कलम 4 (1) अन्वये राज्यातील प्रत्येक पशूपालक अथवा इतर कोणतीही व्यक्ती, शासनेतर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायत, पशुपालक ज्यांना नमूद कायद्याशी संलग्न असणा-या अनुसूचितील रोगाचा संसर्ग झाल्याची शक्यता वाटल्यास त्या वस्तुस्थितीची माहिती नजिकच्या ग्राम अधिकारी किंवा ग्रामपंचायत प्रभारी यांना देणे व त्यांनी ही माहिती नजिकच्या उपलब्ध पशुवैद्यकाला लेखी स्वरुपात काळविणे बंधनकारक असल्याची नोंद घ्यावी. बर्ड फ्लू चा झालेला उद्रेक आहे त्याच ठिकाणी नियंत्रित करण्याकरीता राज्यातील प्रत्येकाने याप्रमाणे दक्षता घेणे आवश्यक असून राज्यातील बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यांत येऊ नयेत, असेही पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Eating-eggs-and-poultry-meat-is-completely-safe</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 08 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी ‘स्मार्ट’ होऊन काम करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Police-should-be-smart---Deputy-Chief-Minister-Ajit-Pawar</link>
            <description>पुणे : महाराष्ट्र पोलिसांना त्यागाची, शौर्याची उज्ज्वल पंरपरा आहे. पोलिसांनी कर्तव्य बजावताना स्वत:च्या तंदुरुस्तीकडे लक्ष देऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी ‘स्मार्ट’ होऊन काम करावे. ‘पिंपरी-चिंचवड’ पोलीस आयुक्तालयाला राज्यातले दर्जेदार पोलीस आयुक्तालय बनविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

पिंपरी-चिंचवड येथील रामकष्ण मोरे सभागृहात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील पोलिसांना प्रातिनिधिक स्वरुपात ‘हेल्थ- ३६५’ स्मार्ट व्हायटल बेल्ट व स्पोर्ट सायकलचे वितरण करण्यात आले. तसेच ग्राम सुरक्षा रक्षक दलाच्या सदस्यांना उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ओळखपत्र प्रदान आले. यावेळी पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, आमदार सुनील शेळके, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयु</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2021-01-08/HEALTH365.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे : महाराष्ट्र पोलिसांना त्यागाची, शौर्याची उज्ज्वल पंरपरा आहे. पोलिसांनी कर्तव्य बजावताना स्वत:च्या तंदुरुस्तीकडे लक्ष देऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी ‘स्मार्ट’ होऊन काम करावे. ‘पिंपरी-चिंचवड’ पोलीस आयुक्तालयाला राज्यातले दर्जेदार पोलीस आयुक्तालय बनविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

पिंपरी-चिंचवड येथील रामकष्ण मोरे सभागृहात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील पोलिसांना प्रातिनिधिक स्वरुपात ‘हेल्थ- ३६५’ स्मार्ट व्हायटल बेल्ट व स्पोर्ट सायकलचे वितरण करण्यात आले. तसेच ग्राम सुरक्षा रक्षक दलाच्या सदस्यांना उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ओळखपत्र प्रदान आले. यावेळी पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, आमदार सुनील शेळके, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोफळे, ‘गोकी’ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल गोंडल उपस्थित होते.



उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्याच्या पोलीस दलाला शौर्याची, त्यागाची मोठी परंपरा आहे. मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद तुकाराम ओंबळे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावले, त्यांच्या त्यागाचे स्मरण ठेऊन प्रत्येक पोलिसांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावावे. ‘कोरोना’ काळात पोलिसांनी रस्त्यावर उतरुन जोखीम पत्करुन चांगल्याप्रकारे सेवा केली आहे. या काळात  पोलिसांनी केलेल्या कामगिरीची नोंद इतिहासात निश्चित घेतली जाईल.

कोरोना काळात जोखीम पत्करुन पोलिसांनी पार पाडलेल्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक करून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पोलिसांनी संतुलित आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम करुन आरोग्यदृष्ट्या तंदुरुस्त राहावे. पोलीस आयुक्तालयाच्यावतीने पोलिसांना स्मार्ट वॉच आणि स्पोर्टस् सायकल देण्याचा उपक्रम कौतुकास्पद असून यामुळे पोलीस दलाचे आरोग्य निश्चितच सुधारेल, त्यांची क्षमता वाढेल. त्याचबरोबर पोलिसांची प्रतिमा अधिक ‘स्मार्ट’ होईल.

पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील पोलीस विभागाच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनाच्यावतीने या विभागातील रिक्त पदांची भरती करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पोलीसांना दर्जेदार निवास व्यवस्था, आवश्यक वाहने व अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. पोलीसांसाठी घरांच्या निर्मितीसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय हे राज्यातील एक दर्जेदार पोलीस आयुक्तालय बनण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने सर्वतोपरी मदत केली जाईल. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या बळकटीकरणासाठी आवश्यक जागा, सोयीसुविधा, मनुष्यबळ, साधन सामग्री उपलब्ध करून दिली जाईल. याबरोबरच पोलीस आयुक्तालयांतर्गत विविध पोलीस स्टेशनसाठी देखील आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली जाईल. तथापि, पोलिसांनी देखील प्रत्येक नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करायला हवी. पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या मनात पोलीस दलाबाबत विश्वास निर्माण करण्याचे काम पोलिसांनी करावे. या ठिकाणी येणारा नागरिक विश्वासाने येऊन समाधानाने बाहेर पडायला हवा. मुली, महिला, अन्य कोणताही नागरिक कुठल्याही भागात सुरक्षितपणे वावरू शकेल, असे वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिसांनी जागरूक राहून काम करावे. गुन्हेगारी मोडून काढून शांतता, कायदा व  सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांच्या मनात विश्वासार्हता वाढवण्यासाठी आपले कर्तव्य चोखपणे पार पाडावे.

प्रास्ताविकात पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने पोलीस आयुक्त कार्यालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

यावेळी ‘सीएसआर’ निधीतून सामाजिक कामासाठी मदत करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. विशाल गोंडल यांनी ‘गोकी’ ‘हेल्थ ३६५’ बाबत माहिती दिली तर आभार अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोफळे यांनी मानले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Police-should-be-smart---Deputy-Chief-Minister-Ajit-Pawar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 05 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  अपहरणप्रकरणी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याविरुद्ध गुन्हा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Former-minister-Girish-Mahajan-and-27-others-booked</link>
            <description>पुणे : एका शिक्षण संस्थाचालकाच्या अपहरणप्रकरणी माजी मंत्री आणि भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यासह २८ जणांवर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोथरूड पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला असून, जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2021-01-05/girishM.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे : एका शिक्षण संस्थाचालकाच्या अपहरणप्रकरणी माजी मंत्री आणि भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यासह २८ जणांवर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोथरूड पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला असून, जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज संस्थेच्या संचालकाशी संबंधित हे प्रकरण आहे. या संचालकाचे अपहरण करून चाकूच्या धाकाने राजीनामे देण्यासाठी दबाव आणल्याच्या आरोप महाजन आणि इतरांवर ठेवण्यात आला आहे.

या संदर्भात जळगाव येथील विजय पाटील यांनी तक्रार दिली आहे. सदर घटना ही जानेवारी २०१८ ते जानेवारी २०२१ या कालावधीत घडली आहे. परंतु, याबाबत आता तक्रार देण्यात आली आहे, हे विशेष.

तक्रारदार विजय पाटील हे वकील असून, ते जळगाव मराठा विद्याप्रसारक सहकारी संस्थेचे संचालकही आहेत. त्यांना एका कारमध्ये जबरदस्तीने बसवून एका फ्लॅटवर नेण्यात आले आणि तेथे मारहाण करीत गळ्याला आणि पोटाला चाकू लावण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपल्याकडून पाच लाख रुपयांची खंडणी घेण्यात आल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Former-minister-Girish-Mahajan-and-27-others-booked</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 04 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ तोपर्यंत भाजपा-मनसे युती नाही: चंद्रकांत पाटील ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/BJP-And-MNS-Alliance-Will-Be-Conditional,-says-Chandrakant-Patil</link>
            <description>पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे आणि भाजपा यांच्यातील संभाव्य युतीबाबत आज सोमवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अतिशय महत्वाची भूमिका मांडली.

पुणे येथे माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, जोपर्यंत मनसे ही परप्रांतियांबद्दल असलेली त्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-04/bjpmns.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे आणि भाजपा यांच्यातील संभाव्य युतीबाबत आज सोमवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अतिशय महत्वाची भूमिका मांडली.

पुणे येथे माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, जोपर्यंत मनसे ही परप्रांतियांबद्दल असलेली त्यांची भूमिका बदलत नाही, तोपर्यंत मनसेसोबत आमची युती होऊ शकत नाही!

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर, भाजपा आणि मनसे एकत्र येणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, दोन्ही पक्षांकडून यावर अधिकृतपणे भूमिका आजपर्यंत मांडण्यात आलेली नव्हती. माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बोलताना आज चंद्रकांत पाटील म्हणाले,

आम्ही स्थानिक लोकांना नोकऱ्या देऊ नका, असे कधीच म्हटलेले नाही, कारण, स्थानिक लोकांना ८० टक्के नोकऱ्या देण्याचा कायदाच आहे. जबलपूर, इंदूरसारख्या ठिकाणी लाखाच्या घरात मराठी मंडळी आहेत.

मनसेचा परप्रांतियांना नेमका विरोध कशाला आहे? टॅक्सी-रिक्षा चालवायला की व्यवसाय करायला? हा देश एक असून, पोट भरण्यासाठी आलेल्यांना विरोध करणे, आमचा राष्ट्रीय पक्ष असल्याने आम्हाला मान्य नाही.

राज ठाकरे आणि मनसे अनेक प्रश्नांची सोडवणूक करतात, पण, त्यांची परप्रांतियांबद्दलची भूमिका बदलत नाही, तोवर त्यांची आमची युती होऊ शकत नाही!
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/BJP-And-MNS-Alliance-Will-Be-Conditional,-says-Chandrakant-Patil</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 29 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पुणे जिल्‍हा कोविड लसीकरण व्‍यवस्‍थापन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Pune-District-covid-Vaccination-Management</link>
            <description>पुणे : कोरोनाची  (कोविड-19) संभाव्‍य दुसरी लाट येण्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर पुणे जिल्‍ह्यात आवश्‍यक ती सर्व खबरदारी व पूर्वतयारी करण्‍यात आली आहे. उपमुख्‍यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही याबाबत आढावा घेवून योग्‍य त्‍या सूचना दिल्‍या आहेत.  रुग्‍णोपचार व्‍यवस्‍थापन, प्रयोगशाळा तपासणी, कोविड सुविधा केंद्र आणि इतर महत्‍त्‍वाच्‍या बाबींवर लक्ष देवून पुणे जिल्‍हा कोरोनाच्‍या संभाव्‍य दुसऱ्या लाटेच्‍या मुकाबल्‍यासाठी सज्‍ज झाला आहे.

कोविड १९ लसीकरणाकरिता जिल्‍हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्‍या अध्‍यक्षतेखाली जिल्हास्तरीय कृती दल समिती स्‍थापन करण्‍यात आली असून त्‍यांच्‍या अध्यक्षतेखाली पहिली बैठक 7 डिसेंबर 2020 आणि दुसरी बैठक 23 डिसेंबर रोजी घेण्‍यात आली. या बैठकीत कोविड १९ च्या लसीकरण  पूर्वतयारीबाबत आढावा व चर्चा करण्यात आली. या मोहिमेत पहिल्या टप्प्यात सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना (शासकीय आरोग्य संस्था, वैद्यकीय म</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-12-29/punee.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे : कोरोनाची  (कोविड-19) संभाव्‍य दुसरी लाट येण्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर पुणे जिल्‍ह्यात आवश्‍यक ती सर्व खबरदारी व पूर्वतयारी करण्‍यात आली आहे. उपमुख्‍यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही याबाबत आढावा घेवून योग्‍य त्‍या सूचना दिल्‍या आहेत.  रुग्‍णोपचार व्‍यवस्‍थापन, प्रयोगशाळा तपासणी, कोविड सुविधा केंद्र आणि इतर महत्‍त्‍वाच्‍या बाबींवर लक्ष देवून पुणे जिल्‍हा कोरोनाच्‍या संभाव्‍य दुसऱ्या लाटेच्‍या मुकाबल्‍यासाठी सज्‍ज झाला आहे.

कोविड १९ लसीकरणाकरिता जिल्‍हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्‍या अध्‍यक्षतेखाली जिल्हास्तरीय कृती दल समिती स्‍थापन करण्‍यात आली असून त्‍यांच्‍या अध्यक्षतेखाली पहिली बैठक 7 डिसेंबर 2020 आणि दुसरी बैठक 23 डिसेंबर रोजी घेण्‍यात आली. या बैठकीत कोविड १९ च्या लसीकरण  पूर्वतयारीबाबत आढावा व चर्चा करण्यात आली. या मोहिमेत पहिल्या टप्प्यात सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना (शासकीय आरोग्य संस्था, वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्‍य केंद्र व उपकेंद्र तसेच खाजगी आरोग्य संस्था) यांना लसीकरण करण्यात येईल. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये इतर संलग्‍न आजार असलेले रुग्ण व वयोवृद्ध यांचा समावेश करण्यात येईल व तिसऱ्या टप्प्यामध्ये सर्वांचा समावेश करण्यात येईल.

कोविड १९ लसीकरणासाठी पुणे जिल्‍ह्याकरिता २ हजार ५४६ लस टोचक नेमण्यात येणार आहेत. लसीकरणामध्ये प्रत्येकी २ डोस २८ दिवसांच्या अंतराने देण्यात येणार आहे. लसीच्या साठवणीसाठी १८५ आय.एल.आर. व १५७ डीफ्रीजर आहेत.

‘कोविन’ या कोविड १९ करिता तयार करण्यात आलेल्या पोर्टलबाबत तालुका आरोग्य अधिकारी तसेच तालुकास्तरीय आरोग्य विस्तार अधिकारी, आरोग्य सेवक आणि सर्व वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचे प्रशिक्षण व्हिडीओ कॉन्‍फरंसिंगद्वारे घेण्यात आलेले आहे.

पुणे जिल्‍ह्यात शासकीय आरोग्‍य संस्‍था 253 व खाजगी आरोग्‍य संस्‍था 8 हजार 89 अशा एकूण 3 हजार 842 आहेत. शासकीय आरोग्‍य कर्मचारी 24 हजार 739 व खाजगी आरोग्‍य कर्मचारी 85 हजार 695 असे एकूण 1 लक्ष 10 हजार 434 आहेत. या सर्व शासकीय व खाजगी संस्‍था तसेच त्‍या अंतर्गत येणाऱ्या आरोग्‍य कर्मचाऱ्यांची  माहिती ‘कोविन’ या पोर्टलवर भरण्‍यात येत आहे.

सध्‍या दैनंदिन 12 हजार ते 13 हजार टेस्‍ट करण्‍याचे उद्दिष्‍ट ठेवण्‍यात येत आहे. तपासणी प्रमाण वाढवण्‍याकरिता नियमित रुग्‍ण सर्वेक्षण, संपर्क व्‍यक्‍ती शोध व अधिक लोकसंपर्क असणाऱ्या व्‍यक्‍तींचे विशेष सर्वेक्षण चालू आहे. सध्‍या पुणे जिल्‍ह्यातील एकूण नमुना तपासणी  18 लक्ष 16 हजार 358 असून बाधित रुग्‍ण दर 19.7 टक्‍के आहे. नोव्‍हेंबर 2020 पासून हा दर 10 टक्‍के प्रतिदिन प्रमाणे कमी झाला आहे. ऑक्‍टोबर महिन्‍याच्‍या पहिल्‍या आठवड्यापासून कोविड 19 रुग्‍णांची संख्‍या कमी होताना दिसत आहे. परंतु, जागतिक स्‍तरावरील अवलोकन केले असता युरोपमधील अनेक देशांमध्‍ये कोविड 19 आजाराची दुसरी लाट दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमीवर पुणे जिल्‍ह्यामध्‍ये पूर्वतयारी करण्‍यात आली आहे.

बिल व्‍यवस्‍थापन- पुणे जिल्‍ह्यात रुग्‍णांच्‍या देयकातून 7 कोटी 86 लक्ष 97 हजार 944 रुपये लेखा परीक्षणांती कमी करण्‍यात आलेले आहे. त्‍यामध्‍ये पुणे मनपा 2 कोटी 58 लक्ष 43 हजार 262, पिंपरी-चिंचवड मनपा 4 कोटी 20 लक्ष 95 हजार 706 तर पुणे ग्रामीण 1 कोटी 86 लक्ष 97 हजार 944 अशी रक्‍कम आहे. पुणे जिल्‍ह्यात लेखा परीक्षण केलेल्‍या देयकांची संख्‍या 4 हजार 709 इतकी आहे. त्‍यामध्‍ये पुणे मनपा 974, पिंपरी-चिंचवड मनपा 2 हजार 743, पुणे ग्रामीण 992 अशी संख्‍या आहे.

अत्‍यंत प्रतिकूल परिस्थितीत आज अखेरच्‍या सर्वाधिक क्रियाशील रुग्‍णसंख्‍येच्‍या अंदाजावरुन 48 हजार 205 पर्यंत रुग्‍णसंख्‍या वाढू शकते. त्‍या परिस्थितीत पुणे जिल्‍ह्यात पुरेसे मनुष्‍यबळ, औषध साठा, इंजेक्‍शन रेमडेसेवीर, बेड संख्‍या, ऑक्सिजन, अतिदक्षता बेड्स,  व व्‍हेंटीलेटर्स उपलब्‍ध आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Pune-District-covid-Vaccination-Management</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 29 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा व परिसर सॅनिटाइज करून घेण्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Before-starting-the-school-the-school-and-the-premises-should-be-sanitized</link>
            <description>पुणे 29 : शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा व परिसर सॅनिटाइज करून घ्याव्यात.  पालक व शिक्षण संस्थांनी शाळा सुरू करण्यासाठी सकारात्मक रहावे व ऑनलाईन शिक्षणाचा फायदा घ्यावा. ज्यांना पुढील शिक्षण घेण्याची इच्छा आहे त्यांनी फॉर्म नंबर १७ भरून परीक्षा द्यावी, असे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.

राज्याच्या बोर्ड परीक्षेला जसे फॉर्म नंबर १७ चालतो तसा तो सीबीएसई, आईसीएससी शाळांबाबत चालेल का याबाबत शिक्षण विभागाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी सूचना देखील डॉ.गोऱ्हे यांनी शिक्षण विभागास केली. ग्रामीण व शहरी भागातील शाळा सुरू करण्यासंदर्भात डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पालक आणि संस्थाचालक यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-12-29/nilamGohre.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे 29 : शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा व परिसर सॅनिटाइज करून घ्याव्यात.  पालक व शिक्षण संस्थांनी शाळा सुरू करण्यासाठी सकारात्मक रहावे व ऑनलाईन शिक्षणाचा फायदा घ्यावा. ज्यांना पुढील शिक्षण घेण्याची इच्छा आहे त्यांनी फॉर्म नंबर १७ भरून परीक्षा द्यावी, असे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.

राज्याच्या बोर्ड परीक्षेला जसे फॉर्म नंबर १७ चालतो तसा तो सीबीएसई, आईसीएससी शाळांबाबत चालेल का याबाबत शिक्षण विभागाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी सूचना देखील डॉ.गोऱ्हे यांनी शिक्षण विभागास केली. ग्रामीण व शहरी भागातील शाळा सुरू करण्यासंदर्भात डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पालक आणि संस्थाचालक यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती.

डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक सोडियम हायपो क्लोराईड खरेदी करावे व त्याचे मिश्रण फवारावे. मान्यता नसलेल्या शाळा सुरू असल्याबाबत पिंपरी चिंचवड येथील पालकांनी मुद्दा उपस्थित केला. त्यावर डॉ गोऱ्हे यांनी मान्यता नसलेल्या शाळा सुरू करणे हा गंभीर गुन्हा असून याबाबत तात्काळ फौजदारी गुन्हा नोंद करावा व शिक्षण विभागाला कळवावे. शिक्षण विभागाने तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश दिले. मुले, शिक्षक व पालक यांचे मानसिक आरोग्य सर्वानी जपावे. शाळांनी तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर, ऑक्सिजन लेवल तपासण्यासाठी ऑक्सिमिटर घ्यावे, असे निर्देश दिले. ज्या शाळांनी शासनाच्या सूचना डावलून फी वाढ केली आहे तेथील पालकांनी शिक्षण विभागास कळवावे. शाळांनी कोरोना काळात फी वाढ करु नये याबाबत उच्च न्यायालयातील चाललेल्या दाव्यात राज्य सरकारने या महागड्या इंग्रजी शाळांची उदाहरणे वापरता येतील का, हे तपासून घ्यावे, असेही उपसभापतींनी शिक्षणविषयक सचिवांना सुचविले.

 

शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती वंदना कृष्णा यांनी १० नोव्हेंबर २०२० चे शिक्षण विभागाचे परिपत्रक स्पष्ट असल्याने आवश्यक काळजी घेऊन शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे सांगितले. ज्या मुलांना ऑनलाईन शिक्षण मिळाले नाही तरीही त्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांनी फॉर्म नंबर १७ भरून द्यावा व परीक्षा द्यावी असे सांगितले. सर्व मुलांना वापरता येईल अशी ऑनलाईन लिंक व परीपत्रकेही त्यांनी दिली.

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व शाळा सुरु करण्यासंदर्भात कोणतीही अडचण नसल्याचे सांगितले. सक्रिय रुग्ण राज्यात फक्त ६ जिल्ह्यात आहेत व त्यांची संख्याही खूपच कमी आहे. तसेच पालक,शिक्षक यांनी काही नियमावली पाळणे गरजेचे आहे असे सांगितले. शिक्षक अथवा विद्यार्थी जर आजारी असल्यास कोणीही शाळेत येऊ नये, शाळेत पुरेशी हवा खेळती राहील हे पाहावे व शाळा सॅनिटाइज करण्यासाठी सोडियम हायपोक्लोराईडचे मिश्रण करून गावात व शाळेत फवारावे, असे सांगितले.

आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक श्री.यावलकर यांनी शिक्षकांनी शिकविताना मास्क वापरावा, वेळोवेळी मुलांची तापमान व ऑक्सिजन तपासणी करावी, पालक व शिक्षकांचे व्हाट्सॲप ग्रुप तयार करून समन्वय साधावा, असे सुचविले.

संस्था संचालक संघटना तसेच पुणे शहरातील पालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपल्या अडचणी तसेच सूचना मांडल्या. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Before-starting-the-school-the-school-and-the-premises-should-be-sanitized</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 21 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन चालूच राहणार : मराठा आंदोलक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/The-agitation-will-continue-till-reservation-is-obtained</link>
            <description>

सोलापूर: 

मराठा आरक्षण स्थगिती विरोधात आज सोलापूर बंदची हाक मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे सोलापुरात आज सकाळपासूनच बंदला सुरुवात झाली आहे. माढ्यात रस्त्यावर टायर जाळून मराठा समाजाच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे. खबरदारी म्हणून सोलापुरात एसटी सेवा बंद ठेवण्यात आली आहे. सोलापुरात</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-09-21/2018_8img01_Aug_2018_PTI8_1_2018_000143B-e1533304760686.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[

सोलापूर: 

मराठा आरक्षण स्थगिती विरोधात आज सोलापूर बंदची हाक मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे सोलापुरात आज सकाळपासूनच बंदला सुरुवात झाली आहे. माढ्यात रस्त्यावर टायर जाळून मराठा समाजाच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे. खबरदारी म्हणून सोलापुरात एसटी सेवा बंद ठेवण्यात आली आहे. सोलापुरात कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे.

तर जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार यांच्या घरासमोर देखील आंदोलनं सुरू आहेत. ग्रामीण भागात माढामध्ये उग्र स्वरूपाच्या निदर्शने करून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. तर शहरात सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख, प्रणिती शिंदे यांच्याघरासमोर आंदोलनसाठी कार्यकर्ते एकत्रित जमले. शहरात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला आहे. तर सोलापुरात काही ठिकाणी मराठा कार्यकर्ते पोलीसांनी ताब्यात घेतले.

सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत मराठा संघटनांचं आंदोलन सुरुच आहे. एक मराठा, लाख मराठाची घोषणा देत, मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मुंबईत एकाच वेळी वेगवेगळ्या 20 ठिकाणी ठिय्या आंदोलन रविवारी झाले. यानंतर सोमवारी राज्यात नांदेड, मुंबई, पंढरपूर यांसह अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहेत. तर मराठा आरक्षण प्रकरणी बाळासाहेब सराटे यांचे शरद पवारांना पत्र पाठवले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/The-agitation-will-continue-till-reservation-is-obtained</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 19 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ट्रेंड झालेल्या हॅशटॅगवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची नाराजी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/MLA-Rohit-Pawars-displeasure-over-the-trending-hashtag</link>
            <description>पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुरूवारी ७० वा वाढदिवस साजरा करण्यात आला. या दरम्यान सोशल मिडियावर ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ हा हॅशटॅग ट्रेंड करण्यात आला होत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-09-19/rohit_pawar_displeasure.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुरूवारी ७० वा वाढदिवस साजरा करण्यात आला. या दरम्यान सोशल मिडियावर ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ हा हॅशटॅग ट्रेंड करण्यात आला होता. तर अनेक मिम्सही यावर पाहायला मिळाले. परंतु लोकांच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधानांच्या वाढदिवशी त्यांच्या विरोधात हॅशटॅग चालवणे हे आपल्या भारतीय संस्कृतीला शोभत नाही. हा पंतप्रधानपदाचा अवमान असल्याचे ते म्हणाले. परंतु यावर नाराजी दर्शवतानाच रोहित पवारांनी बेरोजगारी,नोटबंदी, जीएसटी यांसारखे गंभीर मुद्देही अधोरेखित केले. सोशल मिडियावर त्यांनी यासंदर्भात सविस्तर पोस्ट लिहत आपले मत व्यक्त केले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/MLA-Rohit-Pawars-displeasure-over-the-trending-hashtag</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 19 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ …अन्यथा राजकारणाला रामराम ठोकणार : खा. उदयनराजे भोसलेंचा इशारा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Otherwise-I-will-quits-the-politics-MP-Udayanraje-Bhosale-warns</link>
            <description> मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजीनामा द्यावा लागला तर वाटेल त्या परिस्थितीत देणारच,अशी भ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-09-19/udayanraje-bhosale-warns.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजीनामा द्यावा लागला तर वाटेल त्या परिस्थितीत देणारच,अशी भूमिका भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली आहे.मराठा आरक्षण सरकारने केले तर ठीक आहे, अन्यथा राजकारणाला रामराम करेन आणि राजीनामा देईन, असे मोठे विधान भाजपचे खासदार उदयनराजे  भोसले यांनी केले आहे. कोणाला न्याय देता येत नसले,तर पदावर राहून काय करायचे,असेही ते यावेळी म्हणाले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Otherwise-I-will-quits-the-politics-MP-Udayanraje-Bhosale-warns</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 18 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ `कमवा व शिका` योजनेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्ती आदेश प्रदान ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Selected-Students-provided-appointment-order-Earn-and-Learn-Scheme</link>
            <description>पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय विद्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-09-18/ajit-pawar-appointment-order.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या कमवा व शिका या नाविन्यपूर्ण योजनेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Selected-Students-provided-appointment-order-Earn-and-Learn-Scheme</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 18 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ लोकप्रतिनिधींशी चर्चा करुनच पुणे जिल्ह्यात 'जमावबंदी आदेश' लागू करण्याचा निर्णय घ्या - अजित पवार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Decide-to-implement-Curfew-in-Pune-district-after-discussing-with-representatives</link>
            <description>पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पुणे, पिंपरी-चिंचवड</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-09-18/ajit-pawar-order.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात जमावबंदी आदेश लागू करण्याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसह दोन्ही महापौरांशी चर्चा करुन प्रशासनाने निर्णय घ्यावा अशी सूचना उपमुख्यमंत्री आणि जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिली. 	           

विधानभवन सभागृहात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आढावा घेतला.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Decide-to-implement-Curfew-in-Pune-district-after-discussing-with-representatives</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 18 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रुग्णालयांसाठी ऑक्सिजन पुरवठ्याचे काळजीपूर्वक नियोजन करण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Deputy-CMs-instructions-for-careful-planning-of-oxygen-supply-to-hospitals</link>
            <description> 'कोरोना'च्या संकटकाळात रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा, त्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-09-18/ajit-pawar-instructed.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ 'कोरोना'च्या संकटकाळात रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा, त्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेण्याच्या सूचना देत 'कोरोना'बाधित रुग्णांची वाढती संख्या विचारात घेत उपाययोजना राबविण्याचे  निर्देश उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिले. 
'कोरोना' संसर्ग रोखण्यासाठी तसेच 'कोरोना'बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठीच्या उपाययोजनांमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Deputy-CMs-instructions-for-careful-planning-of-oxygen-supply-to-hospitals</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 15 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मराठा आरक्षण : 23 सप्टेंबर रोजी कोल्हापुरात गोलमेज परिषद  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Maratha-Reservation-Round-Table-Conference-in-Kolhapur-on-23-September</link>
            <description>कोल्हापूर – मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भात पुढील दिशानिर्देश ठरविण्यासाठी २३ सप्टेंबर रोजी कोल्हापुरात गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील मराठा संघटनांचे नेते, याचिकाकर्ते आणि पदाधिकारी या परिषदेत सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-09-15/Maratha Agitation.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कोल्हापूर – मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भात पुढील दिशानिर्देश ठरविण्यासाठी २३ सप्टेंबर रोजी कोल्हापुरात गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील मराठा संघटनांचे नेते, याचिकाकर्ते आणि पदाधिकारी या परिषदेत सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रस्ताव न मांडल्यास राज्यातील ४८ खासदारांचे पुतळे जाळण्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आलेला आहे. 
राज्यातल्या काही मंत्र्यांना मराठा आरक्षणाचा आकस असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. पुण्यातल्या पत्रकार परिषदेत बोलताना मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी हा आरोप केलाय. मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा पुण्यात १७ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे. 
मराठा आरक्षणासाठी आता उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा छावा संघटनेने दिला आहे. छावा संघटनेची मराठवाड्यातील कार्यकर्त्यांची एक बैठक नांदेडमध्ये पार पडली. मराठा समाजातील तरुण आता विष घेऊन मरणार नसून मारणार असे जावळे म्हणाले. आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणार नसल्याचे जावळे यांनी स्पष्ट केले. जबाबदार सत्ताधा-यांना मराठा समाज खाली खेचणार, असा इशारा जावळे यांनी दिला आहे. 

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Maratha-Reservation-Round-Table-Conference-in-Kolhapur-on-23-September</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 14 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ १५ महिन्याच्या ऋतूराजला मिळाले जीवनदान ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/15-month-old-Rituraj-gets-life-donation</link>
            <description>सांगली - 
मिरज येथील रहिवासी असलेल्या शेतकरी कुटुंबातील विजय डांगे यांच्या १५ महिने वयाच्या ऋतूराज या मुलास ह्रदय शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे स्थानिक डॉक्टरांनी सांगितले होते. राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असताना या आजाराकडे दुर्लक्ष करता येणार नव्हता. त्यामुळे डांगे कुटुंबियांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. त्यास</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-09-14/WhatsApp Image 2020-09-14 at 5.30.09 AM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सांगली - 
मिरज येथील रहिवासी असलेल्या शेतकरी कुटुंबातील विजय डांगे यांच्या १५ महिने वयाच्या ऋतूराज या मुलास ह्रदय शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे स्थानिक डॉक्टरांनी सांगितले होते. राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असताना या आजाराकडे दुर्लक्ष करता येणार नव्हता. त्यामुळे डांगे कुटुंबियांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधला. 


ही शस्त्रक्रिया किचकट व खर्चिक असल्याने मुंबई येथील कोकीळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. डांगे कुटुंबियांनी याचवेळी मदतीसाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला होता. मंत्री जयंत पाटील यांनी तात्काळ अंबानी हॉस्पिटल येथे संपर्क साधून त्यांना डॉक्टरांचा वेळ मिळवून दिला. शिवाय जिल्हाबंदी असल्याने त्यांना प्रवासासाठी आवश्यक असणारा  ई - पासही कार्यालयाने त्यांना उपलब्ध करून दिला होता.


माजी नगरसेवक आयुब बारगीर यांच्या पाठपुराव्याने ही शस्त्रक्रिया डॉ. बिपीन राॅय, डॉ. प्रशांत धोपटे यांच्या प्रयत्नाने यशस्वी झाली आहे. ३ लाख २५ हजार रुपयांची शस्त्रक्रिया पुर्णपणे मोफत करणेत आली. त्यानंतर विजय डांगे कुटुंबीय समडोळी येथे परतले.

सोमवारी पालकमंत्री जयंत पाटील यांनी त्यांच्या राहत्या घरी भेट देत ऋतूराजची आस्थेने विचारपूस केली. यावेळी माजी जि. प. सदस्य सुरेश पाटील, बाजार समितीचे माजी सभापती वैभव पाटील, जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, बॅंकेचे संचालक संजयबापू पाटील, आयुब बारगीर, मुन्ना शेख आदी उपस्थित होते.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/15-month-old-Rituraj-gets-life-donation</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 12 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यात ऑक्सीजनची कमकरता भासणार नाही – आरोग्यमंत्री  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/There-will-be-no-shortage-of-oxygen-in-the-state---Health-Minister</link>
            <description>अहमदनगर : महाराष्ट्रात कोरोनाने  अनेकांचा जीव घेतला आहे. त्यात ऑक्सिजन  अभावी अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याचे बोलले जात असतांना आता महाराष्ट्रात ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. अहमदनगरमध्ये आले असता आरोग्य मंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. 
कोरोना संकटापूर्वी आपण मेडिकलला 20% तर इतर उद्योग इंडस्ट्रींना 80</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-09-12/images_1586428595722_rajesh_tope.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अहमदनगर : महाराष्ट्रात कोरोनाने  अनेकांचा जीव घेतला आहे. त्यात ऑक्सिजन  अभावी अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याचे बोलले जात असतांना आता महाराष्ट्रात ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. अहमदनगरमध्ये आले असता आरोग्य मंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. 
कोरोना संकटापूर्वी आपण मेडिकलला 20% तर इतर उद्योग इंडस्ट्रींना 80% ऑक्सिजन देत होतो. मात्र, आता मेडिकलला 80% आणि इतर उद्योगांना 20% ऑक्सिजन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे निर्णय कायद्याने बंधनकारक करून तसं नोटीफीकेशन देखील काढण्यात आलं आहे त्यामुळे ऑक्सिजनचा 100% पुरवठा महाराष्ट्राला होणार आहे. 
राज्यातील सर्व जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी एक वॉर रूम देखील तयार करण्यात आलं आहे. त्याच्या अध्यक्षपदावर अन्न औषध प्रशासनाच्या आयुक्तांना नियुक्त केलं आहे. तसेच आरोग्य विभागाच्या आयुक्तांना देखील या वॉररूमच सदस्य करण्यात आलं आहे. अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्याची ऑक्सिजनची मागणी आणि पुरवठा हे मॉनिटर केलं जात आहे.
आम्ही हे धोरण पटकन केलं असून जिल्ह्यात येणाऱ्या ऑक्सिजनचा इतर उद्योगांसाठी पुरवठा होऊ नये यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी देखील आम्ही अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे असंही आरोग्यमंत्री म्हणाले. 
दरम्यान या पार्श्वभूमीवर पुण्यात येत्या 8 दिवसांत एक प्लांट उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये ऑक्सिजनच्या उत्पादनाची सुरवात होईल त्यामुळे ऑक्सिजनची अजिबात अडचण राहणार नाही. तूर्तास ऑक्सिजन कोणतीही अडचण नसून आपण ऑक्सिजन सगळी स्थिती स्थिर करत आहोत अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/There-will-be-no-shortage-of-oxygen-in-the-state---Health-Minister</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 07 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित : आर्थिक खर्चाच्या धास्तीने वडिलांची आत्महत्या  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/The-whole-family-corona-Positive-</link>
            <description>सांगली : संपूर्ण कुटुंबाला कोरोना लागन झाल्याने हॉस्पिटलचा खर्चचा आर्थिक भार कसा उचलायचा या धास्तीने वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येनंतर काही वेळात कोरोना</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-09-07/images_07_09_2020.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सांगली : संपूर्ण कुटुंबाला कोरोना लागन झाल्याने हॉस्पिटलचा खर्चचा आर्थिक भार कसा उचलायचा या धास्तीने वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येनंतर काही वेळात कोरोना बाधित मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सांगलीच्या दुधगाव मध्ये हा हृदय हेलावून टाकणारा प्रकार घडला आहे.सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या दुधगाव याठिकाणी उपाध्ये कुटुंब राहते. जैन वस्ती या ठिकाणी अशोक उपाध्ये हे पंडित म्हणून काम करतात. काही दिवसांपूर्वी त्यांना व त्यांच्या कुटुंबातील पत्नी, दोन मुले आणि सून यांना कोरोनाची लागण झाली होती.तर कुटुंबातील लहान मुलगी मात्र निगेटिव्ह आली होती. यापैकी मुलगा दीपक उपाध्ये याचे प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/The-whole-family-corona-Positive-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 05 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पुण्यातील लॉकडाऊन हटविण्यामागे व्यापाऱ्यांचा दबाव होता : अजित पवारांचे स्पष्टीकरण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/There-was-pressure-from-traders-to-remove-the-lockdown-in-Pune-Ajit-Pawars-explanation</link>
            <description>पुणे : पुण्यातील लॉकडाऊन हे व्यापाऱ्यांच्या दबावामुळे हटवावा लागला असा खुलासा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी के</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-09-05/Image_2020-09-05_002.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे : पुण्यातील लॉकडाऊन हे व्यापाऱ्यांच्या दबावामुळे हटवावा लागला असा खुलासा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी केला. पुण्यातील लॉकडाऊन तात्काळ हटवू नये अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची इच्छा होती, असं शिवसेनेनं म्हटलं होतं. "आम्ही स्वतः म्हणतोय लॉकडाऊन उठवा, मग तुम्ही का उठवत नाही." अशी मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांकडून मागणी होत होती. तसेच हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती बंद केली तेव्हा भाजीपाला मिळत नाही. अशी ओरड सुरु झाली. त्यावेळी ही आमच्यावर दबाव आला, असं अजित पवारांनी लॉकडाऊन उठवण्यामागचं कारण स्पष्ट केलं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/There-was-pressure-from-traders-to-remove-the-lockdown-in-Pune-Ajit-Pawars-explanation</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 05 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जे भाजपच्या पोटात तेच कंगनाच्या मुखात - थोरातांची टीका ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/What-is-in-the-stomach-of-BJP-is-in-Kangana-mouth</link>
            <description>अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून जे भाजपच्या पोटात आहे ते कंगणाच्या मुखातून आणि ट्वीटमधून बाहेर येत आहे. कंगणाला पुढे करून मुंबई पोलीस, मराठी म</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-09-05/bthorat_0409.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून जे भाजपच्या पोटात आहे ते कंगणाच्या मुखातून आणि ट्वीटमधून बाहेर येत आहे. कंगणाला पुढे करून मुंबई पोलीस, मराठी माणसांचा आणि महाराष्ट्राचा अपमान करणा-या महाराष्ट्र द्रोह्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील जनता कदापी माफ करणार नाही. बिहार विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राच्या बदनामीचा नियोजनबद्ध कट कोणी रचला आहे हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार विरोधात कारस्थाने करणारे आता महाराष्ट्र आणि मराठी माणसांविरोधात कट कारस्थाने करत आहेत असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/What-is-in-the-stomach-of-BJP-is-in-Kangana-mouth</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 31 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मंदिरं खुली करण्यासाठी प्रकाश आंबेडकर पंढरपुरात ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Prakash-Ambedkar-in-Pandharpur-to-open-temples</link>
            <description>पंढरपूर : मंदिरं खुली करण्यासाठी आज विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आज पंढरपुरात आंदोलन करणार आहे. कार्यकर्त्यांनी आज सकाळी सोलापुरातील विठ्ठल मंदिर उघडलं. तर आंदोलनासाठी प्रकाश आंबेडकर सोलापूरहून पंढरपूरला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत चार गाड्यांचा ताफा असून त्यात कार्यकर्ते आहेत. आंदोलनाच्या सुरुवातीला चंद्रभागा स्नान होईल, त्यांनंतर पुंडलिक दर्शन करुन प्रकाश आंबेडकर हे विठ्ठल मंदिरात प्रवेश करतील. या आंदोलनला 200 पेक्षा जास्त संघटनाचा पाठिंबा असल्याची माहिती देखील वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी दिली.

नाकाबंदीमुळे मो</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-08-31/vittaltemple.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पंढरपूर : मंदिरं खुली करण्यासाठी आज विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आज पंढरपुरात आंदोलन करणार आहे. कार्यकर्त्यांनी आज सकाळी सोलापुरातील विठ्ठल मंदिर उघडलं. तर आंदोलनासाठी प्रकाश आंबेडकर सोलापूरहून पंढरपूरला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत चार गाड्यांचा ताफा असून त्यात कार्यकर्ते आहेत. आंदोलनाच्या सुरुवातीला चंद्रभागा स्नान होईल, त्यांनंतर पुंडलिक दर्शन करुन प्रकाश आंबेडकर हे विठ्ठल मंदिरात प्रवेश करतील. या आंदोलनला 200 पेक्षा जास्त संघटनाचा पाठिंबा असल्याची माहिती देखील वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी दिली.

नाकाबंदीमुळे मोजकेच कार्यकर्ते पंढरपुरात
पोलिसांच्या नाकाबंदीमुळे वारकरी आणि वंचित बहुजन आघाडीचे मोजकेच कार्यकर्ते पंढरपूरमध्ये दाखल झाल्याने एक लाख वारकऱ्यांची घोषणा हवेतच विरणार आहे. प्रकाश आंबेडकर काल काहीवेळ माळीनगर इथे थांबून सोलापूरला मुक्कामाला गेले होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी काल त्यांच्यासोबत चर्चा केली होती.
मोजक्या कार्यकर्त्यांसह नामदेव पायरीजवळ भजन करण्याची परवानगी द्यावी किंवा मोजक्या वारकऱ्यांसह मंदिरात सोडण्याची मागणी केली होती. आता यावर मुख्यमंत्री पातळीवर विचार सुरु आहे. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांना मोजक्या वारकऱ्यांसह विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळण्याची शक्यता आहे.

पाच महिन्यांपासून मंदिरांसह धार्मिक स्थळे बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच महिन्यांपासून राज्यातील मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. मात्र भजन-कीर्तनासाठी मंदिर सुरु करण्यात यावे अशी मागणी वारकरी संघटनांमार्फत करण्यात आली होती. याच मागणीला पुढे नेत विठ्ठल मंदिर सुरु करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरी यांनी केली. त्यासाठी 31 ऑगस्ट रोजी पंढरपुरात 1 लाख वारकऱ्यांचा उपस्थितीत आंदोलन करण्याचा इशारा दिला. शासनातर्फे अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आज पंढरपुरात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात मंदिर खुले करण्यासाठी आंदोलन होणार आहे.

वंचितची याधीची आंदोलनं!
याआधी 12 ऑगस्ट रोजी आंबेडकरांनी राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु करण्यासाठी 'डफली बजाओ' आंदोलन केलं होतं. या आंदोलनात नागपूरच्या मध्यवर्ती बस स्थानक चौकात आंबेडकरांनी स्वत: डफली वाजवत आंदोलनात सहभाग नोंदवला. तर लॉकडाऊनमुळे अनेकांची उपासमार होत आहे असे म्हणत नाभिक समाज आणि इतर श्रमिकांच्या मागण्यांसाठी देखील वंचिततर्फे ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. लॉकडाऊनच्या कालावधीत भरमसाठ वीजबिले पाठवण्यात आली आहेत, ही बिले सरसकट माफ करण्यात यावी यासाठी देखील वंचिततर्फे आंदोलन करण्यात आले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Prakash-Ambedkar-in-Pandharpur-to-open-temples</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 30 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मास्क न वापरणारे, सुरक्षित अंतराचे पालन न करणारे, निष्कारण गर्दी करणाऱ्यांवर वेळीच कारवाई करा - अजित पवार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Take-timely-action-against-those-who-do-not-wear-masks-do-not-follow-safe-distances-cause-unwarranted-crowds---Ajit-Pawar</link>
            <description>पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासन विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवित आहे. परंतु, गत काही दिवसांत जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची संख्या वाढलेली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सातत्यपूर्ण स्वच्छता, मास्कचा वापर व सुरक्षित अंतर व शासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले. मास्क न वापरणारे, सुरक्षित अंतराचे पालन न करणारे तसेच निष्कारण गर्दी करणाऱ्यांवर वेळीच कारवाई झाली पाहिजे. अशी कारवाई सतत व नियमितपणे करावी. कुठेही गर्दी होणार नाही आणि व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राहील याबाबत प्रशासनाने खबरदारी घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

‘कोविड-१९’ विषाणू उपाययोजनांबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसमवेत आज उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात बैठक पार पडली. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती हो</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-08-30/ajitpawar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासन विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवित आहे. परंतु, गत काही दिवसांत जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची संख्या वाढलेली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सातत्यपूर्ण स्वच्छता, मास्कचा वापर व सुरक्षित अंतर व शासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले. मास्क न वापरणारे, सुरक्षित अंतराचे पालन न करणारे तसेच निष्कारण गर्दी करणाऱ्यांवर वेळीच कारवाई झाली पाहिजे. अशी कारवाई सतत व नियमितपणे करावी. कुठेही गर्दी होणार नाही आणि व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राहील याबाबत प्रशासनाने खबरदारी घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

‘कोविड-१९’ विषाणू उपाययोजनांबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसमवेत आज उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात बैठक पार पडली. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. विधानपरिषदेच्या माजी उपसभापती आमदार डॉ. नीलम गोऱ्हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सहभागी झाल्या. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीरंग बारणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला पानसरे, आमदार सर्वश्री दिलीप मोहिते, सुनिल शेळके, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी पुणे, पिंपरी चिंचवड महानगरात उभारण्यात आलेल्या जम्बो रुग्णालयामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना निश्चितच दिलासा मिळेल. कोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजना करताना ग्रामीण भागात समन्वयासाठी स्वतंत्रपणे अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, कोरोना प्रतिबंध उपाययोजना व इतरही योजनांच्या अंमलबजावणीबाबत प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन कार्यवाही करावी. सर्वांशी समन्वय ठेवून कार्यवाही होणे अपेक्षित आहे जेणेकरून उपाययोजनेची परिणामकारता वाढेल,असे त्यांनी सांगितले.

कोरोनासोबतच पावसाळ्याच्या कालावधीतील आजाराबाबत अधिक दक्षता घेण्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने गतीने कार्यवाही करावी. ग्रामीण भागातील कोरोनाचा रुग्णदर व मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्वाचे एकत्रित प्रयत्न महत्त्वाचे ठरणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी सांगितले. ग्रामीण भागात प्लाझ्मादानबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, तसेच प्लाझ्मादानसाठी स्वतंत्रपणे ॲप तयार करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील रुग्णालयातील आवश्यक सोई सुविधांची वाढ करावी तसेच ग्रामीण भागातील रुग्णांसाठी खाटांची उपलब्धता असावी, कोरोना प्रतिबंधासोबतच उपचाराच्या सुविधांबाबत दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी सबंधित यंत्रणेला दिल्या.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे व खासदार खासदार श्रीरंग बारणे, आमदार सर्वश्री दिलीप मोहिते, सुनिल शेळके, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक त्या सूचना केल्या.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये उभारण्यात आलेले जम्बो रुग्णालयांमध्ये ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णाला प्राधान्याने उपचार देण्यात येतील, उपचारापासून कोणताही रुग्ण वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जात असल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. देशमुख यांनी जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण, कोरोनामुक्त झालेले रुग्ण तसेच कोरोना संसर्ग विषयक सद्यस्थिती, आरोग्य सुविधा आणि उपलब्ध सामग्रीबाबत माहिती दिली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Take-timely-action-against-those-who-do-not-wear-masks-do-not-follow-safe-distances-cause-unwarranted-crowds---Ajit-Pawar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 30 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘कोरोना’ विरुद्धची लढाई एकजुटीने लढल्यास नक्की जिंकू – अजित पवार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/If-we-fight-the-battle-against-Corona-together-we-will-definitely-win---Ajit-Pawar</link>
            <description>पुणे : कोरोनाच्या संकटकाळात केंद्र सरकार, राज्य सरकार, पुणे जिल्हा प्रशासन तसेच पुणे व पिंपरी महानगरपालिका विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. या संकटकाळात मानवतेच्या दृष्टीने सर्वांनी मिळून कोरोना विषाणूविरुद्धची लढाई एकजुटीने लढल्यास आपण नक्की जिंकू, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने ॲटो क्लस्टर, चिंचवड येथील कोविड-19 रुग्णालयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले‌. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीरंग बारणे, आमदार चंद्रकांत पाटील, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, संग्राम थोपटे, अण्णा बनसोडे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समितीचे सभापती संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेता नामदेव ढाके, विरोधी पक्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-30/ajitp12520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे : कोरोनाच्या संकटकाळात केंद्र सरकार, राज्य सरकार, पुणे जिल्हा प्रशासन तसेच पुणे व पिंपरी महानगरपालिका विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. या संकटकाळात मानवतेच्या दृष्टीने सर्वांनी मिळून कोरोना विषाणूविरुद्धची लढाई एकजुटीने लढल्यास आपण नक्की जिंकू, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने ॲटो क्लस्टर, चिंचवड येथील कोविड-19 रुग्णालयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले‌. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीरंग बारणे, आमदार चंद्रकांत पाटील, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, संग्राम थोपटे, अण्णा बनसोडे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समितीचे सभापती संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेता नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते विठ्ठल काटे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पिंपरी-चिंचवडचे पोलीस अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, पिंपरी-चिंचवडचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रविण तुपे यांच्यासह आजी माजी महापौर, नगरसेवक आणि संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने स्वतः खर्च करुन कोविड रुग्णालयाची उभारणी केल्याबाबत त्यांचे अभिनंदन करतो. पिंपरी-चिंचवड ही कष्टकऱ्यांची नगरी आहे. या नगरीत विविध जाती, धर्माचे नागरिक राहतात. लोकसंख्या जास्त असल्यामुळे कोरोनाच्या काळात नागरिकांना कमी वेळेत, कमी खर्चात उपचार मिळाले पाहिजे, खाटांची कुठेही कमतरता पडणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. कोरोनाच्या संकटकाळात रुग्णांवर उपचारांती जादा देयके आकारणी करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर प्रशासनाची करडी नजर आहे. याकरिता शहरासह ग्रामीण भागात पथके तयार करुन देयकाचे लेखा परीक्षण करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे. कोरोना विरुद्धच्या लसीची भारतातील पहिली मानवी चाचणी सिरम इन्स्टिट्यूटच्यामदतीने भारती रुग्णालयात करण्यात आली आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी लस निर्मिती करण्याच्या दृष्टीने संशोधन सुरु आहे, ही निश्चितच आशादायी बाब आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गणेशोत्सवानिमित नागरिकांना शुभेच्छा दिल्या. नागरिकांनी कोठेही गर्दी न करता, सामाजिक अंतर पाळत, नियमित मास्क वापरुन या वर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन केले. कोरोनाच्या संकटकाळात पोलीस, डॉक्टर, प्रशासन, सेवाभावी संस्था तसेच त्यांचे कार्यकर्ते जीव धोक्यात घालून अतिशय चांगले काम करीत आहे. या लढतीत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना कोरोना विरुद्धची लढाई जिंकून देश, राज्य कोरोनामुक्त झाल्यास त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे  कोविड-१९ रुग्णालय उभारल्याबद्दल समाधानी आहे. नागरिकांच्या मदतीने एकत्रित लढाई लढूनही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात नक्की यश येईल.

महापौर माई ढोरे म्हणाल्या, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात मार्च महिन्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यावेळेपासून आरोग्य यंत्रणा चांगले काम करीत आहे. तसेच त्यांनी महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येणाऱ्या सोई-सुविधांबद्दल माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेव ढाके यांनी तर आभार पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मानले.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/If-we-fight-the-battle-against-Corona-together-we-will-definitely-win---Ajit-Pawar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 29 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कायमस्वरूपी साथरोग नियंत्रण रूग्णालय उभे करण्यासाठी पुढाकार घ्या – मुख्यमंत्री  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Take-initiative-to-set-up-a-permanent-communicable-disease-control-hospital---CM</link>
            <description>कोल्हापूर : कोणत्याही साथीला सामोरे जाण्यासाठी रूग्णालयांची आवश्यकता आहे. यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  कोल्हापूर जिल्ह्यात कायमस्वरूपी साथरोग नियंत्रण रूग्णालय उभे करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.


सक्षम ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील 10 ग्रामीण रूग्णालय व दोन उपजिल्हा रूग्णालयांमध्ये करण्यात आलेल्या अत्याधुनिक आरोग्य सुविधांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून शुक्रवारी झाला.

मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले, खासदार, आमदार अनेकजण होतात. प्रत्येकाला वारसा, परंपरा असते. दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांची परंपरा खासदार संजय मंडलिक पुढे चालवित आहेत. या रुग्णालयांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे मिळणारे आशीर्वाद फार मोलाचे आहेत. दररोज केवळ आरोग्यावरच आपले काम सुरु आहे. विकासाचे मार्गक्रमण करत आहोत. जिल्ह्यासाठी सदृढ आरोग्य सुविधा देणे आवश्यक आहे. त्यासाठी मुंबईसारख्या सेवा ग्रामीण भागात करायच्या आहेत.

आजही आपण फिल्ड, जंबो रुग्णालयांची उभारणी राज्यभर केली आहे. या सुविधा तात्पुरत्या असल्या तरी त्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-08-29/kolhapur.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कोल्हापूर : कोणत्याही साथीला सामोरे जाण्यासाठी रूग्णालयांची आवश्यकता आहे. यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  कोल्हापूर जिल्ह्यात कायमस्वरूपी साथरोग नियंत्रण रूग्णालय उभे करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.


सक्षम ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील 10 ग्रामीण रूग्णालय व दोन उपजिल्हा रूग्णालयांमध्ये करण्यात आलेल्या अत्याधुनिक आरोग्य सुविधांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून शुक्रवारी झाला.

मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले, खासदार, आमदार अनेकजण होतात. प्रत्येकाला वारसा, परंपरा असते. दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांची परंपरा खासदार संजय मंडलिक पुढे चालवित आहेत. या रुग्णालयांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे मिळणारे आशीर्वाद फार मोलाचे आहेत. दररोज केवळ आरोग्यावरच आपले काम सुरु आहे. विकासाचे मार्गक्रमण करत आहोत. जिल्ह्यासाठी सदृढ आरोग्य सुविधा देणे आवश्यक आहे. त्यासाठी मुंबईसारख्या सेवा ग्रामीण भागात करायच्या आहेत.

आजही आपण फिल्ड, जंबो रुग्णालयांची उभारणी राज्यभर केली आहे. या सुविधा तात्पुरत्या असल्या तरी त्यातून आपण दर्जेदार आरोग्य सेवा देत आहोत. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयु कक्षात आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध आहेत. याचा उपयोग कायम स्वरुपी यंत्रणा उभी करताना करता येईल. जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक असलेला प्रस्ताव पाठवावा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दुर्गम भागात सेकंड ओपिनिएन हवे असेल, तज्ज्ञांचा सल्ला हवा असेल तर मुंबई पुण्याचाच नाही तर जगभरातील तज्‌ज्ञांची सेवा टेलीमेडिसिनच्या माध्यमातून उपलब्ध करुन देता येईल.  पुढील महिन्यात चेस द व्हायरसचा संपूर्ण कार्यक्रम महाराष्ट्रभर राबविण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. 55 वर्षावरील सर्व नागरिकांची यात तपासणी करण्यात येणार असून ज्यांना ह्दयरोग, किडनीचे किंवा इतर आजार आहेत त्यांच्यावर या अंतर्गत उपचार करण्यात येईल.

महाराष्ट्र हा लढवय्या आहेच. मनाने आणि विचारांनी सदृढ आहे. या महाराष्ट्राला आपण सर्वजण मिळून आरोग्याच्या दृष्टिने सदृढ महाराष्ट्र घडवूया, स्वयंशिस्तीने एकमेकांची काळजी घेऊन, परस्पर सहकार्याने काम करुन कोरोनाला नक्की हरवू या असा विश्वासही मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला.

सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यावेळी म्हणाले, दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी ग्रामीण भागातील वंचित घटकांना आधार देण्याचे काम केले आहे. तिच परंपरा खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी पुढे जोपासली आहे. चंदगडमध्ये ट्रॉमा सेंटर मंजूर केले आहे. मात्र त्यासाठी लागणाऱ्या जागेचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. तो मार्गी लावावा. एनएचएम मधून प्रस्ताव पाठविला असून त्यासाठी निधी मिळावा आणि फिजीशिएनना कायमस्वरुपी सेवेत घेणेबाबत मार्ग काढवा अशी मागणी त्यांनी केली.

आमदार प्रकाश आबिटकर यावेळी म्हणाले, दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या स्मृती दिनानिमित्त सदाशिवराव मंडलिक इरिगेशन डेव्हलपमेंट रिसर्च फौंडेशन मार्फत देण्यात येणारा स्मृती गौरव पुरस्कार रद्द करुन पुरस्काराची संपूर्ण रक्कम तसेच स्थानिक विकास निधी आणि मित्र परिवार व विविध औद्योगिक संस्थानी केलेली मदत अशा निधीतून ग्रामीण भागातील रुग्णालयांना सुविधा देत सक्षम केले आहे. याचा लाभ सर्वसामान्य जनतेला होणार आहे.

आमदार राजेश पाटील म्हणाले, दुर्गम, डोंगराळ भागात असणाऱ्या चंदगड, आजरा, गडहिंग्लज या तिन्हीसाठी गडहिंग्लज येथील उप जिल्हा रुग्णालयाची क्षमता वाढवावी. ट्रामा केअर सेंटरच्या जागेचा प्रश्नही मार्गी लावावा. माजी आमदार चंद्रदीप नरके यांनीही मनोगत व्यक्त केले.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यावेळी म्हणाले, जिल्ह्यातील कागल, मुरगुड, राधानगरी, गारगोटी, सोळांकूर, आजरा, चंदगड, नेसरी, गगनबावडा व खुपिरे ही दहा ग्रामीण रुग्णालये आणि गडहिंग्लज व वळीवडे या दोन उप जिल्हा रुग्णालयांचा कायापालट करण्याचे काम फौंडेशनने केले आहे. याचा लाभ या भागातील सर्वसामान्य रुग्णांसाठी होणार आहे.

लॉकडाऊन शिथील केल्यानंतर मोठ्या प्रमाणात बाहेरच्या जिल्ह्यातून नागरिक आले. त्यामुळे जिल्ह्यामध्ये रुग्णांची संख्या वाढली.  जिल्ह्यात 45 कोव्हिड काळजी केंद्र आणि 2 समर्पित कोव्हिड आरोग्य केंद्रे उभारण्यात आली असून या ठिकाणी ऑक्सिजनची सुविधा देण्यात आली आहे. खासगी रुग्णालयांमध्ये खाटांची संख्या वाढविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 20 कोटीचा निधी खर्च केला आहे. यात प्रामुख्याने  सर्वात आधी लॅब उभी करण्यात आली आहे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. प्रारंभी सक्षम ग्रामीण आरोग्य अभियानांर्गत 12 रूग्णालयातील अत्याधुनिक आरोग्य सुविधांबाबतची चित्रफित दाखविण्यात आली.

यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अधीष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, प्रांताधिकारी विजया पांगारकर, रामहरी भोसले उपस्थित होते. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांनी आभार मानले.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Take-initiative-to-set-up-a-permanent-communicable-disease-control-hospital---CM</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 27 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ चेस दी व्हायरस’ संकल्पना राज्यभर राबविणार –  मुख्यमंत्री ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Chase-the-virus-concept-to-be-implemented-across-the-state---CM</link>
            <description>पुणे :

 ‘चेस दी व्हायरस’ संकल्पनेप्रमाणे लक्षणे असणाऱ्या व्यक्तीपर्यंत आरोग्य यंत्रणेने पोहोचले पाहिजे. त्यामुळे संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होईल, असे सांगतानाच ‘चेस दी वायरस’ संकल्पना राज्यभर राबविणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या मैदानावर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी ऑनलाईन लोकार्पण झाले. कार्यक्रमास महापौर उषा ढोरे, खा. श्रीरंग बारणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलमताई गोऱ्हे, खा. सुप्रियाताई सुळे, आ. माधुरीताई मिसाळ आदी मान्यवर या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते.

शाब्बास पुणेकर. तुम्ही दिलेल्या वेळेत भव्य असे कोविड रुग्णालय उभारले आहे, असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोरोनाच्या संकटाला न घाबरता आपण सामोरे जात आहोत. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातही अधिकाधिक चाचण्या करून बाधितांवर वेळेत उपचार करा तसेच वयोवृद्ध आणि इतर आजाराने बाधित असलेल्या व्यक्तीवर विशेष लक्ष द्या. ‘चेस दी व्हायरस’ याप्रमाणे लक्षणे असणाऱ्या व</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-27/cm-uddavthakre.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे :

 ‘चेस दी व्हायरस’ संकल्पनेप्रमाणे लक्षणे असणाऱ्या व्यक्तीपर्यंत आरोग्य यंत्रणेने पोहोचले पाहिजे. त्यामुळे संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होईल, असे सांगतानाच ‘चेस दी वायरस’ संकल्पना राज्यभर राबविणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या मैदानावर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी ऑनलाईन लोकार्पण झाले. कार्यक्रमास महापौर उषा ढोरे, खा. श्रीरंग बारणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलमताई गोऱ्हे, खा. सुप्रियाताई सुळे, आ. माधुरीताई मिसाळ आदी मान्यवर या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते.

शाब्बास पुणेकर. तुम्ही दिलेल्या वेळेत भव्य असे कोविड रुग्णालय उभारले आहे, असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोरोनाच्या संकटाला न घाबरता आपण सामोरे जात आहोत. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातही अधिकाधिक चाचण्या करून बाधितांवर वेळेत उपचार करा तसेच वयोवृद्ध आणि इतर आजाराने बाधित असलेल्या व्यक्तीवर विशेष लक्ष द्या. ‘चेस दी व्हायरस’ याप्रमाणे लक्षणे असणाऱ्या व्यक्तीपर्यंत आरोग्य यंत्रणेने पोहोचले पाहिजे. त्यामुळे संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होईल, हीच संकल्पना आपण राज्यभरात राबविणार आहोत, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. मास्कचा नियमित वापर करावा, वारंवार हात धुणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता तसेच सुरक्षित अंतर यावर भर देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, पुण्यासोबतच पिंपरी चिंचवडमध्येही कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी जम्बो रुग्णालयाची अत्यंत कमी कालावधीत उभारणी केली, ही उल्लेखनीय बाब आहे. पुण्यातील या कोविड रुग्णालयामध्ये अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. चाचण्यांची संख्या वाढवून रुग्णांवर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. पावसाळ्याचा कालावधी असल्याने कोरोनासोबतच साथीच्या आजाराची शक्यता विचारात घेत दक्षता घेण्याची गरज आहे. कोरोनाची एक लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट येते हा जगभरातील अनुभव आहे, त्यावरून आपण गाफील राहून चालणार नाही, असे सांगतानाच कोरोनाचे निदान करण्यासाठी आवाजावरून चाचणी मुंबईत सुरू केली आहे, ही चाचणी यशस्वी झाली तर कोरोना निदानाच्या मोहिमेत आपण मोठा टप्पा गाठू शकू, असा विश्वासही मुख्यमंत्री ठाकरे यांनी  व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे. पाऊस सुरू असताना अत्यंत कमी कालावधीत या कोविड रुग्णालयाची उभारणी केली आहे. या रुग्णालयामुळे कोविड रुग्णाला वेळेत उपचार मिळणे सुलभ होणार असून पुणे, पिंपरी चिंचवड तसेच ग्रामीण भागातील रुग्णाला या सुविधेमुळे दिलासा मिळणार आहे. मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी या दोन्ही जम्बो रुग्णालयांची सेवा महत्त्वाची ठरणार आहे. कोरोनविरुद्धची लढाई निर्णायक टप्प्यावर आली आहे, त्यामुळे यापुढेही प्रत्येकाने नियमांचे अत्यंत काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. ‘चेस दी व्हायरस’ मोहीम सुरू केली असून, कोरोना निदानासाठीच्या चाचण्याही वाढविण्यात आल्या आहेत. निदान व उपचार वेळेत होतील याकडे विशेष लक्ष असून लवकरच राज्य कोरोनामुक्त होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, कोरोना प्रतिबंधासाठी महाराष्ट्राने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, महात्मा फुले जन आरोग्य योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी होत आहे. राज्यात कोरोना निदानासाठी सर्वाधिक चाचण्या पुणे जिल्ह्यात होत आहेत, त्यामुळे वेळेत निदान व वेळेत उपचार मिळत असून पुण्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे. कोरोनाबाधित रुग्णावर उपचारासाठी जम्बो रुग्णालय महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महापौर उषा ढोरे यांनी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी जम्बो रुग्णालय निश्चित उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेत पुणे शहरासोबतच पिंपरी-चिंचवडमध्येही जम्बो रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. जम्बो सुविधेमुळे बेड उपलब्धता वाढणार असून कोरोनाबाधित शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील रुग्णाला वेळेत उपचार मिळण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमात जम्बो कोविड रूग्णालयाच्या उभारणीवर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली. आभार सुहास दिवसे यांनी मानले.

रुग्णालयाविषयी – अण्णासाहेब मगर स्टेडियम, पिंपरी येथे 816  खाटांचे स्वतंत्र कोवीड- 19 रुग्णालय उभारण्यात आले आहे. यामध्ये 616  ऑक्सिजन युक्त खाटा व 200  आयसीयू खाटांची सुविधा आहे. रुग्णालयामध्ये कोवीड -19  संबंधी अद्ययावत उपकरणे व सुविधा उपलब्ध आहेत. 3 हजार 900 चौरस मीटर आयसीयू निगेटिव्ह प्रेशर पद्धतीने वातानुकूलित केले आहे. रुग्णालयाचे एकूण क्षेत्रफळ ११ हजार ८०० चौरस मीटर इतके आहे. 20 हजार चौरस मीटर जमिनीचे विकसन करण्यात येत असून या साठी 4 हजार किलो वॅट विद्युत पुरवठा देण्यात आला आहे. 25 हजार लिटर क्षमतेचे लिक्वीड ऑक्सिजन मेडिकल टॅंक आहेत.रुग्णालयाचे काम 6 ऑगस्ट 2020 रोजी चालू झाले. आजच्या तारखेला 200 आयसीयू खाटा व 616  खाटा यांचे काम पूर्ण व टेस्टिंग चालू आहे. हे आयसीयू  महाराष्ट्रातील निगेटिव्ह प्रेशर पद्धतीने वातानुकूलित करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या रुग्णालयांपैकी एक आहे. हे रुग्णालय उभारण्याचा व 6 महिने चालवण्याचा अंदाज खर्च 85 कोटी इतका अपेक्षित आहे. अग्निशमन, पेसो (पेट्रोलियम व स्फोटके सुरक्षा) इत्यादी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत. या रुग्णालयाचा खर्च 50 टक्के राज्य शासन व 50 टक्के पुण्यातील स्थानिक शासकीय संस्थांमार्फत करण्यात येईल. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Chase-the-virus-concept-to-be-implemented-across-the-state---CM</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 25 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कर्मचाऱ्यांनो! आता नवीन वर्षातच लॉग इन करा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Employees-Log-in-now-for-the-new-year</link>
            <description>पुणे : माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपनी किंवा उत्पादन कंपन्यांमधील सेल्ससारख्या विभागातील कर्मचाऱयांनो, तुम्ही आता नवीन वर्षातच ऑफिसमध्ये ‘लॉगइन’ कराल, अशी शक्यता निर्माण होत आहे. त्यामुळे पुढील 128 दिवस घरातूनच काम करण्याची मानसिक तयार करा. 
कोरोना विषाणूंचा जगभरात उद्रेक झाला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून जग याचा मुकाबला करताना दिसते. या संसर्ग रोखण्याचा प्रभावी उपाय म्हणून एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे. ज्याला आता ‘सोशल डिस्टेंसिंग’ असा शब्द र</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-08-25/itemployee.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे : माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपनी किंवा उत्पादन कंपन्यांमधील सेल्ससारख्या विभागातील कर्मचाऱयांनो, तुम्ही आता नवीन वर्षातच ऑफिसमध्ये ‘लॉगइन’ कराल, अशी शक्यता निर्माण होत आहे. त्यामुळे पुढील 128 दिवस घरातूनच काम करण्याची मानसिक तयार करा. 
कोरोना विषाणूंचा जगभरात उद्रेक झाला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून जग याचा मुकाबला करताना दिसते. या संसर्ग रोखण्याचा प्रभावी उपाय म्हणून एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे. ज्याला आता ‘सोशल डिस्टेंसिंग’ असा शब्द रुढ झालायं. अशा ‘सोशल डिस्टेंसिंग’ मोठ्या ‘आयटी’ कंपन्यांमध्ये मर्यादा आहेत. त्यामुळे घरातून काम करणे (वर्क फ्रॉम होम) हा पर्याय बहुतांश कंपन्यांनी स्वीकारलाय.
कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात 9 मार्चला आढळला. त्यानंतर रुग्णसंख्या वाढत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मार्चअखेरपर्यंत बहुतांश कंपन्यांमधील कर्मचारी घरातून काम करत आहेत. प्रत्येक महिन्याला आढावा घेऊन पुढील महिन्याच्या कामाच्या पद्धतीची सूचना कर्मचाऱयांना दिली जाते. गेल्या पाच महिन्यांमध्ये दर महिन्याच्या अखेरीस घरातून काम करण्याची सूचना देणारी ई-मेल कर्मचाऱयांच्या इनबॉक्समध्ये येतात. पण, सध्या पुण्यात आढळणाऱया रुग्णांची संख्या, संसर्गाच्या फैलावाचा दर या आणि याच्याशी संबंधीत सर्व घटकांच्या माहितीची विश्लेशण करून पुढील महिन्याचा निर्णय कंपनी घेते.  
पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या नियंत्रित आणण्याचे आटोकात प्रयत्न सुरू आहेत. पण, त्यानंतरही रोजच्या रुग्णांची संख्या काही शे ते हजारांमध्ये आहे. त्यामुळे आता डिसेंबरपर्यंत घरातून काम करण्याची मानसिक तयारी करा, अशी चर्चा कंपन्यांमध्ये सुरू झाली आहे.
मोठ्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमधून ‘सोशल डिस्टेंसिंग’ पाळणे अवघड आहे. त्यामुळे सध्या 10 ते 20 टक्के कर्मचाऱयांनी आँफिसमध्ये येण्यास परवानगी दिली आहे. मात्र, उर्वरित 80 ते 90 टक्के कर्मचारी घरातूनच काम करत आहेत. चाकणसारख्या औद्योगिक केंद्रांमधील कंपन्यांमधूनही हाच सुर एकू येत आहे. तेथील  कर्मचाऱयांनाही पुढील किमान 128 दिवस आँफिसमध्ये लॉगइंन करता येणार नाही, अशी माहिती पुढे येत आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Employees-Log-in-now-for-the-new-year</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 24 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दगडूशेठ'च्या श्रींसमोर सामूहिक अथर्वशीर्ष पठण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Collective-Atharvashirsha-recitation-in-front-of-Dagdusheth-ganpati</link>
            <description>पुणे : यंदा गणपती उत्सवावर कोरोनाचं संकट असलं तरी भाविकांचा उत्साह, श्रद्धा मात्र कायम आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर दरवर्षी ऋषीपंचमीच्या दिवशी अथर्वशीर्ष पठणाचा सोहळा असतो. यावर्षीही ही प्रथा कायम आहे. यंदाही 'ओम नमस्ते गणपतये...'चे स्वर ऋषीपंचमीच्या निमित्ताने दगडूशेठ गणपतीसमोर निनादले. 

दरवर्षी हजारो महिलांच्या उपस्थितीत होणारा सोहळा, यंदा दगडूशे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-08-24/dagdushathalwai.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे : यंदा गणपती उत्सवावर कोरोनाचं संकट असलं तरी भाविकांचा उत्साह, श्रद्धा मात्र कायम आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर दरवर्षी ऋषीपंचमीच्या दिवशी अथर्वशीर्ष पठणाचा सोहळा असतो. यावर्षीही ही प्रथा कायम आहे. यंदाही 'ओम नमस्ते गणपतये...'चे स्वर ऋषीपंचमीच्या निमित्ताने दगडूशेठ गणपतीसमोर निनादले. 

दरवर्षी हजारो महिलांच्या उपस्थितीत होणारा सोहळा, यंदा दगडूशेठच्या मुख्य मंदिरात अवघ्या 5 महिलांच्या उपस्थितीत पार पडला. तर, हजारो भाविकांनी ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या या सोहळ्यात सहभाग घेतला. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने ट्रस्टच्या 128 व्या वर्षी, ऋषिपंचमीनिमित्त अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदा मुख्य मंदिरात प्रत्यक्षपणे पाच महिलांचीच उपस्थिती होती. शितल तानवडे, सीमा लिमये, विद्या अंबर्डेकर, हेमलता डाबी, सुप्रिया सराफ या 5 महिलांनी मुख्य मंदिरातून प्रत्यक्षपणे सहभाग घेतला. या पाच महिला सलग 10 वर्षे या उपक्रमात सहभाग घेत आहेत. यंदा उपक्रमाचं 34 वं वर्ष आहे. 
अथर्वशीर्ष पठणाचा प्रारंभ सकाळी 6 वाजता शंख वादनाने झाला. ओमकार, गीत, गजर यांसह मंदिरात उपस्थित महिलांनी श्री गणराया चरणी अथर्वशीर्ष पठण केलं. तसंच गणेशाची आरती देखील करण्यात आली. 
उत्सवकाळात मंदिरात केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत धार्मिक विधी होणार आहेत. मंदिरा बाहेरुन दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांकडून हार, फुलं, पेढं, नारळ देखील स्वीकारले जाणार नसून प्रसाद दिला जाणार नाही. त्यामुळे भक्तांनी उत्सकाळात गर्दी करु नये आणि ऑनलाईन दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा, असं आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आलं आहे.   ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Collective-Atharvashirsha-recitation-in-front-of-Dagdusheth-ganpati</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 23 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शिर्डीतील साईबाबांचे मंदिर खुले करा : सुजय विखे पाटील ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Open-Sai-Baba-temple-in-Shirdi-Sujay-Vikhe-Patil</link>
            <description>शिर्डीतील साईबाबांचे मंदिर खुले करा अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा भाजप खासदार सुजय विखे यांनी दिला आहे. सोबतच भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील मंदिरे खुले करण्याच्या मागणीवर जोर दिला आहे.

टाळेबंदीमुळे गेल्या तीन महिन्याहून अधिक काळ झाला तरी राज्यातील मंदिरे खुली करण्याचा निर्णय सरकारने अद्याप घेतलेला नाही.त्यामुळे राज्यातील मंदि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-08-23/sujayvikhe.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[शिर्डीतील साईबाबांचे मंदिर खुले करा अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा भाजप खासदार सुजय विखे यांनी दिला आहे. सोबतच भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील मंदिरे खुले करण्याच्या मागणीवर जोर दिला आहे.

टाळेबंदीमुळे गेल्या तीन महिन्याहून अधिक काळ झाला तरी राज्यातील मंदिरे खुली करण्याचा निर्णय सरकारने अद्याप घेतलेला नाही.त्यामुळे राज्यातील मंदिरे पुन्हा खुली करा,अशी मागणी  विखे पिता-पूत्रांनी केली आहे. प्रवरा कारखाना येथे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सपत्निक गणरायाची विधीवत प्राण प्रतिष्ठापना केली. यावेळी उपस्थित सुजय विखे यांनी मंदिरांसंदर्भातील मुद्दा उपस्थित केला. केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार देशातील वैष्णोदेवी, तिरुपती मंदिरे खुली करण्यात आली आहेत. शिर्डीतील संस्थान आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. शिर्डीचे सर्व अर्थकारण साई मंदिरावर अवलंबून आहे. ग्रामस्थांच्यावतीने मुख्यमंत्र्यांना या संदर्भात निवेदन देणार असल्याचे सुजय विखे यांनी सांगितले. तसेच यावर लवकर निर्णय न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

मंदिरे खुली करण्या संदर्भातील मागणी करत काही दिवसांपूर्वीच त्र्यंबकेश्वर येथील पुजा-यांच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. मंदिरे खुली झाली पाहिजे यावर राज ठाकरेंनी देखील सकारात्मकता दर्शवली होती. योग्य ती काळजी घेऊन मंदिरे खुली झाली पाहिजेत, असे मत राज ठाकरेंनी यावेळी व्यक्त केले होते. मिशन बिगिन अंतर्गत राज्यात मॉल जिम आता सुरू करण्यात आले आहेत. परंतु धार्मिक स्थळांबाबत अद्याप निर्णय न झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Open-Sai-Baba-temple-in-Shirdi-Sujay-Vikhe-Patil</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 23 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ विठ्ठल मंदिर खुले करा अन्यथा एक लाख वारकरी आंदोलन करणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Open-Vitthal-temple-otherwise-one-lakh-Warakari-will-agitate</link>
            <description>पंढरपूर :  टाळेबंदीमुळे गेल्या साडे पाच महिन्यापासून बंद असलेले विठ्ठल मंदिर भाविकांसाठी खुले करा, अन्यथा ३१ ऑगस्टला एक लाख वारक-यांसह आंदोलन करणार, असा इशारा विश्व वारकरी सेनेने दिला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात वारकरी संप्रदाय आंदोलन करणार आहे.

पंढरपूरातील विठ्ठल मंदिर पुन्हा </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-08-23/vittaltemple.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पंढरपूर :  टाळेबंदीमुळे गेल्या साडे पाच महिन्यापासून बंद असलेले विठ्ठल मंदिर भाविकांसाठी खुले करा, अन्यथा ३१ ऑगस्टला एक लाख वारक-यांसह आंदोलन करणार, असा इशारा विश्व वारकरी सेनेने दिला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात वारकरी संप्रदाय आंदोलन करणार आहे.

पंढरपूरातील विठ्ठल मंदिर पुन्हा सुरू करण्याच्या मागणीवरून आता वारकरी संप्रदायाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. विठ्ठल मंदिर पुन्हा सुरू करा, या मागणीवरून वारकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आपली ही मागणी सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी वारक-यांनी शिवसेना, भाजप नव्हे तर थेट वंचितचा पाठिंबा घेतला आहे. यासंदर्भात २४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी, विश्व वारकरी सेना व वंचित पदाधिका-यांसोबत बैठक पार पडणार असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे. परंतु या बैठकीत सकारात्मक तोडगा न निघाल्यास आंदोलनाचा पवित्रा घेण्याची तयारी वारकरी संप्रदायाची आहे.
 
दरम्यान, टाळेबंदीमुळे राज्यातील धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुनःश्च हरी ओम असा नारा देत टाळेबंदी हळूहळू उठवत असल्याचे सांगितले. मात्र आता पाच महिने होत आले तरीही राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत काहीही निर्णय झालेला नाही. लाखोंचे श्रद्धास्थान असलेले पंढरपूरातील विठ्ठल मंदिर आता खुले करण्यात यावे यासाठी वारक-यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सध्या पंढरपूरात देखील दोन हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Open-Vitthal-temple-otherwise-one-lakh-Warakari-will-agitate</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 18 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नदीकाठावर जाऊन पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिला नागरिकांना धीर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Going-to-the-river-bank-Guardian-MinisterJayant-Patil-gave-patience-to-the-citizens</link>
            <description>सांगली : पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत असल्याचे आणि पुराचे संकट घोंगावत आहे याचा अंदाज येताच पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगली जिल्हयातील नदीकाठच्या गावात पोहोचून नागरिकांना धीर दिला आहे.

संभाव्य पूराचा धोका लक्षात घेता सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना बोटी दिल्या जात आहेत. वाळव</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-08-18/jayantpatil.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सांगली : पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत असल्याचे आणि पुराचे संकट घोंगावत आहे याचा अंदाज येताच पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगली जिल्हयातील नदीकाठच्या गावात पोहोचून नागरिकांना धीर दिला आहे.

संभाव्य पूराचा धोका लक्षात घेता सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना बोटी दिल्या जात आहेत. वाळवा तालुक्यातील वाळवा व शिरगाव या गावांना पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते बोटी प्रदान करण्यात आल्या. यावेळी मंत्री जयंत पाटील यांनी नदीकाठच्या गावांना भेट दिली व संभाव्य पूरपरिस्थितीबाबत नागरिकांना माहिती देत धीर दिला.

कोरोना असो वा महापूर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील नेहमीच सांगलीकरांच्या मदतीला धावून आले आहेत. मागील वर्षी याच महिन्यात पश्चिम महाराष्ट्रात महाप्रलयकारी पूर आला होता. त्यावेळीही जयंत पाटील यांनी झोकून देत मदतकार्य केले होते. याशिवाय अन्न वाटप व इतर अत्यावश्यक वस्तूचे वाटप केले होते. 

ज्यावेळी जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला त्यावेळीही पालकमंत्री जयंत पाटील यांनी तात्काळ हालचाली करत प्रशासनाला जनतेच्या सेवेसाठी दाखल करुन घेतले होते. इतकेच नाही जिथे कोरोनाचे रुग्ण आढळले त्या हॉटस्पॉट परिसरातही पालकमंत्री जयंत पाटील ग्राऊंड झिरोवर होते. संभाव्य पूरपरिस्थितीच्या निमित्ताने पुन्हा एकदा जयंत पाटील लोकांच्या खांद्याला खांदा लावून उभे ठाकले आहेत.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Going-to-the-river-bank-Guardian-MinisterJayant-Patil-gave-patience-to-the-citizens</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 18 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ … म्हणून असे हात अजून वाढावेत! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/So-let-such-hands-grow-even-more</link>
            <description>सातारा : कोरोना संसर्गाचे जागतिक संकट आता दारात येऊन थांबलंय..  त्याला परतवून लावायचं असेल तर त्याच्याशी शक्तीने नव्हे तर कृतीने हरवायचे आहे…  जेवढ्या अधिक चाचण्या तेवढी यावर लवकर मात हे या आजाराचे सूत्र आहे. म्हणून आज जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्या वाढविल्यामुळे बाधितांचा आकडा दिवसेंदिवस  वाढतो आहे. यात सर्वात महत्वाचे जे व्याधिग्रस्त लोक आहेत, त्यांना शोधून त्यांच्यावर योग्य ते उपचार वेळीच करणे, त्यांची दक्षता घेणे हे यात खूप महत्त्वाचे आहे. एखाद्या वयस्कर किंवा व्याधिग्रस्त व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली तर ती चिंतेची बाब होते. म्हणून जिल्हा प्रशासन घरोघरी जाऊन व्याधीग्रस्त आणि वयस्कर मंडळी यांचा सर्व्हे करत आहे. हे देशात, राज्यात अनेक संस्था प्रशासनाबरोबर पुढे येऊन काम करीत आहेत. या संस्था आपापल्या परीने मदत करीत आहेत.

अशीच एक खंडाळा तालुक्यातील समीर शिंदे मित्र परिवाराची टीम कोरोना संकटाच्या काळात इतरांना आदर्श घालून देण</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-08-18/rajyatcorona.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सातारा : कोरोना संसर्गाचे जागतिक संकट आता दारात येऊन थांबलंय..  त्याला परतवून लावायचं असेल तर त्याच्याशी शक्तीने नव्हे तर कृतीने हरवायचे आहे…  जेवढ्या अधिक चाचण्या तेवढी यावर लवकर मात हे या आजाराचे सूत्र आहे. म्हणून आज जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्या वाढविल्यामुळे बाधितांचा आकडा दिवसेंदिवस  वाढतो आहे. यात सर्वात महत्वाचे जे व्याधिग्रस्त लोक आहेत, त्यांना शोधून त्यांच्यावर योग्य ते उपचार वेळीच करणे, त्यांची दक्षता घेणे हे यात खूप महत्त्वाचे आहे. एखाद्या वयस्कर किंवा व्याधिग्रस्त व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली तर ती चिंतेची बाब होते. म्हणून जिल्हा प्रशासन घरोघरी जाऊन व्याधीग्रस्त आणि वयस्कर मंडळी यांचा सर्व्हे करत आहे. हे देशात, राज्यात अनेक संस्था प्रशासनाबरोबर पुढे येऊन काम करीत आहेत. या संस्था आपापल्या परीने मदत करीत आहेत.

अशीच एक खंडाळा तालुक्यातील समीर शिंदे मित्र परिवाराची टीम कोरोना संकटाच्या काळात इतरांना आदर्श घालून देण्यासारखे काम करीत आहेत. खंडाळा तालुका हा पुण्याजवळचा तालुका. या तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्या असल्यामुळे पुणे येथून ये-जा करणारे अनेक कर्मचारी आहेत. खंडाळा तालुक्यासह ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळत असले तरी कोपर्डे हे अपवाद आहे. काही प्रमाणात समीर शिंदे मित्र परिवाराला या कामाचे श्रेय जाते. हा शिंदे परिवार करत असलेल्या कामामुळे कापेर्डे गाव व आसपासच्या परिसरातील गावातील नागरिकांच्या आरोग्यासाठी व कोणाला कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून अहोरात्र काम करीत आहे.  त्यांनी त्यांच्या कामाचा इतरांना एक आदर्श घालून दिला आहे.

या परिवारामध्ये समीर शिंदे यांनी हा उपक्रम सुरु केला. या परिवाराचे तेच प्रमुख असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शुभम शिंदे, निलेश बोडरे, विक्रम साळुंखे, अजित बोडरे, अविनाश शिंदे, विशाल बोडरे, रोहित शिंदे, प्रमोद शिंदे यांच्यासह आशा वर्कर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहेत. या परिवाराला खंडाळ्याचे गटविकास अधिकारी माणिकराव बिचुकले यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे.

कोरोना संकटाच्या काळात आपण काही तरी समाजाचे देणे लागतो म्हणून हा परिवार गेल्या 2 महिन्यांपासून अहोरात्र काम करीत आहे. या परिवारातील सदस्य रोज गावातील प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊन आरोग्य तपासणी करतात. कुणाला ताप, जुलाब, उलटी, बी.पी. शुगर यांच्यासह कोणतेही छोटे- मोठे आजार आहेत याची खात्री करुन त्यांना शासकीय रुग्णालयात उपलब्ध असलेली औषधे यांच्याकडून घरपोच केली जात आहेत. जी औषधे शासकीय रुग्णालयात उपलब्ध नाहीत ती औषधे बाहेरच्या मेडिकलमधून आणली जातात.

कापेर्डे गावातील बऱ्यापैकी नागरिकांना बी.पी. आणि शुगरचा त्रास तसेच अंगदुखी थंडी ताप असे किरकोळ आजार असल्याचे घरोघरी सर्व्हेक्षणातून या परिवाराच्या लक्षात आले. खंडाळा तालुक्यातील बऱ्याच ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केला आहे, परंतु समीर शिंदे मित्र परिवाराच्या केलेल्या कामामुळे कोपर्डे गावात एकही कोरोनाचा रुग्ण नाही, हे याच परिवाराचे यश आहे.

या परिवारावाकडून आरोग्य तपासणीच केली जात नाही तर नागरिकांना कोरोना संसर्गापासून बचाव कसा करायचा यासाठी सुरक्षित अंतर, सॅनिटायझरचा वापर, स्वच्छतेचेही  महत्त्व पटवून दिले जाते आहे.

समीर शिंदे मित्र परिवाराच्या कामाची दखल जिल्हा प्रशासनानेही घेतली असून त्यांच्या कामाचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कौतुक केले आहे. अशाप्रकारे जिल्ह्यातील विविध संस्थांनी जिल्हा प्रशासनाबरोबर कोरोना संकटावर मात करण्यासाठी काम केले तर जिल्हा लवकरच कोरोना मुक्त होऊ शकतो यासाठी सामाजिक संस्थांसोबत डॉक्टर यांनीही सामाजिक दायित्व म्हणून पुढाकार घेतला पाहिजे. प्रशासनाच्या हातात हात घालून काम करणाऱ्या अशा धडपडणाऱ्या युवकांची, विविध संघटनांची मोठी गरज आहे. त्यामुळे या जागतिक संकटावर मात करण्यासाठी महत्त्वाचा हातभार लागू शकतो. शिंदे परिवाराचे काम पाहून अनेकांना प्रेरणा देऊन जात आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/So-let-such-hands-grow-even-more</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 17 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यपालांची किल्ले शिवनेरीला भेट; पायी फिरून केली गडाची पाहणी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Governors-visit-to-Shivneri-fort-Walked-and-inspected-the-fort</link>
            <description>राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या किल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-08-17/governor@shineri.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीला भेट देऊन राजमाता जिजाऊ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले. राज्यपालांनी संपूर्ण गडाची पायी फिरून पाहणी केली. गडावरील शिवाई देवतेचे दर्शन घेतले तसेच शिवजन्मस्थळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाळण्याला वंदन केले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Governors-visit-to-Shivneri-fort-Walked-and-inspected-the-fort</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 17 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोल्हापूरकरांची लाख मोलाची साथ -पालकमंत्री सतेज पाटील  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Kolhapurkars-support-worth-lakhs---Guardian-Minister-Satej-Patil</link>
            <description>कोल्हापूर : कोल्हापूरकरांची लाख मोलाची साथ आणि दातृत्वावरच कोरोनावर मात करून कोरोनाचे संकट लवकरच दूर करू, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी  व्यक्त केला आहे. गेल्या साडेपाच महिन्याच्या कालावधीत पालकमंत्री सतेज पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयात तळ ठोकून कोरोनाच्या नियंत्रणाबाबत आणि संभाव्य महापुराबाबत उपाययोजना करत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना रुग्ण डिस्चार्ज होण्याचे प्रमाणही अत्यंत चांगले आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी राज्यातील जनतेच्या सक्रीय पुढाकाराने कोरोना विरुद्धच्या युद्धात निश्चितपणे जिंकू असा आत्मविश्वास बाळगला आहे. त्यांचा हा आत्मविश्वास सार्थ ठरविण्यासाठी ‘आम्ही कोल्हापुरी-जगात भारी’ ही उक्ती कोरोनाच्याबाबतीत खरी ठरविण्यासाठी जनतेने आता प्रतिबंधक उपाययोजना स्वत:हून कठोरपणे अंमलात आणून आपण, आपलं कुटुंब आणि समाजाला कोरोनापासून दूर ठेवण्याची गरज आहे.

प्लाझ्मा थेरेपीने 25 अत्यवस्थांना जीवदान
कोरोना रुग्णावरील प्लाझ्मा थेरेपीत कोल्हापूर जिल्हा आघाडीवर आहे. आजअखेर 60 दात्यांनी प्लाझ्मा दान केला आहे. यामुळे 25 अत्यवस्थ रुग्णांना जीवदान मिळाले आहे. यासाठी सीपीआर, डी.वाय.पाटील हॉस्पिटल, आयसोलेशन, आयजीएम हॉस्पीटल या कोरोना हॉस्पीटलांबरोबरच खासगी हॉस्पिटलमध्येही कोरोना रुग्णांवर उपचाराच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. कोल्हापूर शहरातील खासगी हॉस्पीटलांनीही रुग्णसेवेसाठी योगदान दिले आहे. 

जिल्ह्याचे प्रमुख आरोग्य उपचार केंद्र म्हणून सी.पी.आर.कडे पाहिले जाते. सी.पी.आर. मध्ये सध्या 429 बेड्सची व्यवस्था असून त्यापैकी 222 ऑक्सिजन बेड्स आहेत. आणखी 94 ऑक्सिजन बेड्स वाढविण्याचे काम सुरु आहे. आयसीयू बेड्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-08-17/satejpatil.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कोल्हापूर : कोल्हापूरकरांची लाख मोलाची साथ आणि दातृत्वावरच कोरोनावर मात करून कोरोनाचे संकट लवकरच दूर करू, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी  व्यक्त केला आहे. गेल्या साडेपाच महिन्याच्या कालावधीत पालकमंत्री सतेज पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयात तळ ठोकून कोरोनाच्या नियंत्रणाबाबत आणि संभाव्य महापुराबाबत उपाययोजना करत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना रुग्ण डिस्चार्ज होण्याचे प्रमाणही अत्यंत चांगले आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी राज्यातील जनतेच्या सक्रीय पुढाकाराने कोरोना विरुद्धच्या युद्धात निश्चितपणे जिंकू असा आत्मविश्वास बाळगला आहे. त्यांचा हा आत्मविश्वास सार्थ ठरविण्यासाठी ‘आम्ही कोल्हापुरी-जगात भारी’ ही उक्ती कोरोनाच्याबाबतीत खरी ठरविण्यासाठी जनतेने आता प्रतिबंधक उपाययोजना स्वत:हून कठोरपणे अंमलात आणून आपण, आपलं कुटुंब आणि समाजाला कोरोनापासून दूर ठेवण्याची गरज आहे.

प्लाझ्मा थेरेपीने 25 अत्यवस्थांना जीवदान
कोरोना रुग्णावरील प्लाझ्मा थेरेपीत कोल्हापूर जिल्हा आघाडीवर आहे. आजअखेर 60 दात्यांनी प्लाझ्मा दान केला आहे. यामुळे 25 अत्यवस्थ रुग्णांना जीवदान मिळाले आहे. यासाठी सीपीआर, डी.वाय.पाटील हॉस्पिटल, आयसोलेशन, आयजीएम हॉस्पीटल या कोरोना हॉस्पीटलांबरोबरच खासगी हॉस्पिटलमध्येही कोरोना रुग्णांवर उपचाराच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. कोल्हापूर शहरातील खासगी हॉस्पीटलांनीही रुग्णसेवेसाठी योगदान दिले आहे. 

जिल्ह्याचे प्रमुख आरोग्य उपचार केंद्र म्हणून सी.पी.आर.कडे पाहिले जाते. सी.पी.आर. मध्ये सध्या 429 बेड्सची व्यवस्था असून त्यापैकी 222 ऑक्सिजन बेड्स आहेत. आणखी 94 ऑक्सिजन बेड्स वाढविण्याचे काम सुरु आहे. आयसीयू बेड्स 73 असून आणखी 8 बेड्सची भर घातली जात आहे. त्याचबरोबर 66 व्हेंटिलेटर, 50 एनआयव्ही, 20 हाय फ्लो नेझल ऑक्सीजन या सुविधा उपलब्ध आहेत.  सीपीआरसह समर्पित कोरोना हॉस्पीटल आणि समर्पित कोरोना मदत केंद्र यांना एकूण 12 एक्सरे मशिन देण्यात येत आहेत. जिल्ह्यात दररोज होणारी 2 हजार स्वॅब नमुने तपासणी क्षमता आता 5 हजार पर्यंत करण्यात येत आहे.  प्रत्येक कोव्हिड केअर सेंटरमध्ये ॲन्टीजेन टेस्ट करण्याची सुविधा उपलब्ध आहे. सी.पी.आर. मध्ये 20 किलो लिटर ऑक्सीजन टँक बसविण्यात येणार असून जम्बो सिलेंडर व लिक्वीड ऑक्सीजन प्राधान्याने उपलब्ध केले आहे. सर्व कोरोना काळजी केंद्रे आणि समर्पित कोरोना मदत केंद्राला एकूण 700 आणखी ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 14, दुसऱ्या टप्प्यात 24 कोव्हिड काळजी केंद्रे, समर्पित कोरोना सेवा केंद्र 15, समर्पित कोरोना हॉस्पीटल 4 कार्यान्वित करण्यात आली आहेत. एकूण 7 हजार 332 बेडची उपलब्धता असून यामध्ये 808 ऑक्सिजन बेड व 288 आयसीयू बेड आहेत.

रुग्णांना हॉस्पीटलमधील उपलब्ध बेडची माहिती कळावी तसेच बेड उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यासाठी तीन स्वतंत्र मोबाईल क्रमांक दिले आहेत. दिवसाला सरासरी 400 ते 500 फोन स्वीकारण्यात येत आहेत. कोरोना रुग्णांकडून खासगी हॉस्पीटलमध्ये शासकीय दराने बील आकारणी व्हावी तसेच उपलब्ध बेडची संख्या कळावी यासाठी प्रत्येक हॉस्पीटलसाठी एका शासकीय कर्मचाऱ्याकडे समन्वयक म्हणून जबाबदारी दिली आहे. महापालिकेच्यावतीने खासगी रूग्णालयांना दरफलक लावण्याबाबत कळविण्यात आले असून बिले तपासणीसाठी लेखापरीक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातही हॉस्पीटलांसाठी समन्वय अधिकारी नेमण्यात आले आहेत. 

कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या किंवा लक्षणे नसणाऱ्या पॉझिटिव्ह रूग्णांवर घरी उपचार करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. करवीर तालुक्यातील वडणगे ग्रामपंचायतीने सर्वप्रथम पुढाकार घेऊन हा उपक्रम सुरु करुन तो यशस्वी केला आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी हा उपक्रम सुरु झाला असून यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण निश्चितपणे कमी झालेला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आजअखेर जिह्यात 3 हजारहून अधिक कोरोना बाधित घरी उपचार घेत आहेत. प्रशासनामार्फत या सर्वांना किट दिले असून त्यामध्ये पल्स ऑक्सीमीटर, डिझीटल थर्मामीटर, मास्क इत्यादी वस्तू देण्यात आल्या आहेत. यापैकी 2 हजारहून अधिक आता बरे झाले आहेत.


कोरोनाच्या या संकट काळात अनेक सेवाभावी संस्था, संघटना व व्यक्तींनी कोल्हापूर रिलीफ फंड याला मदत करुन दातृत्वाची परंपरा जपली आहे. रोटरी मुव्हमेंट कोल्हापूर तर्फे 62 लाख रुपये खर्चून 538 बेड्स उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यापैकी 120 बेड्स च्या माध्यमातून महासैनिक दरबार हॉल येथे कोवीड केअर सेंटर सुरु केले आहे. या ठिकाणी क्रिडाई कोल्हापूर तर्फे पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. तसेच शिरोली येथील जैन मंदिरामध्ये जैन समाजातर्फे कोवीड केअर सेंटर सुरु केले आहे. कसबा बावडा, राजोपाध्येनगर, फुलेवाडी या ठिकाणी स्थानिक नगरसेवकांनी कोवीड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. उद्योजक व औद्योगिक संघटना यांनी 20 व्हेंटीलेटर उपलब्ध करुन देण्याचे जाहीर केले असून त्यापैकी 3 व्हेंटीलेटर जिल्हा प्रशासनाकडे सुपुर्द केले आहेत.

घाटगे ग्रुपने शववाहिका उपलब्ध करुन दिली आहे. व्हाईट आर्मी संस्थेने कोवीडच्या काळात लाखो गरजूंना जेवण उपलब्ध करुन दिले आहे. अनेक शैक्षणिक संस्था, साखर कारखाने यांनी सुद्धा आपल्या कडील सुविधा कोरोना केअर सेंटर तयार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. होर्डिंग ॲण्ड आऊट सोर्सींग ॲडव्हर्टायझर्स असोसिएशनच्या माध्यमातून 2 हजार प्रबोधनाचे फलक लावण्यात आले आहेत.


ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टिमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीतूनही जिल्ह्याला सावरता आले. यापुढे पडणारा पाऊस, धरणातील पाणीसाठा, धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन, नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा आणि पूरग्रस्तांसाठी बचाव व मदत कार्य याचे नियोजन सुद्धा केले आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय ठेऊन अलमट्टी धरणातील पाणीसाठा आणि विसर्ग यावर अधिक लक्ष देण्यात येत आहे. संभाव्य पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. 

पूर परिस्थिती उद्भवल्यास एनडीआरएफच्या 4 पथकांसह स्वयंसेवी संस्थांची पथकेही तैनात आहेत. यात जवळपास 808 स्वयंसेवक आहेत. 51 रबर बोट, 700 लाईफ जॅकेट, 400 लाईफ रींग, 18 आस्का लाईट उपलब्ध आहेत. पुढारी रिलिफ फौंडेशनतर्फे दोन यांत्रिकी बोटी महापालिकेला नुकत्याच प्रदान करण्यात आल्या आहेत. यापूर्वीही पाच यांत्रिकी बोटी जिल्हा प्रशासनाला प्रदान करण्यात आल्या आहेत. 

गणेशोत्सव साजरा करताना सोशल डिस्टंसिंगसह स्वत:च्या आणि कुटूंबाच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्लाझ्मा दान सारखे उपक्रम राबवावेत. मोहरमच्या उत्सवात सुद्धा सर्वांनी आपली काळजी घ्यायला हवी असे आवाहन गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील यांनी केले आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Kolhapurkars-support-worth-lakhs---Guardian-Minister-Satej-Patil</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 14 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राष्ट्रवादीच्या नेत्याचा कोरोनामुळे मृत्यू ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/NCP-leader-dies-by-corona</link>
            <description>पंढरपूर : राष्ट्रवादीच्या एका नेत्याची कोरोनीशी झुंज अपयशी ठरली आहे. राष्ट्रवादीचे सोलापुरचे जिल्हा कार्याध्यक्ष राजू बापू पाटील यांचा जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात कोरोनाच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी दुःख व्यक</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-08-14/coronagoa14520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पंढरपूर : राष्ट्रवादीच्या एका नेत्याची कोरोनीशी झुंज अपयशी ठरली आहे. राष्ट्रवादीचे सोलापुरचे जिल्हा कार्याध्यक्ष राजू बापू पाटील यांचा जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात कोरोनाच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी दुःख व्यक्त करत पाटील कुटुंबियांच्या दुःखात आपण सामिल असल्याचे म्हटले आहे.

पंढरपूर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. अशातच बापू पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील दोघांना देखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र बापू पाटील यांचे चुलते आणि धाकटे बंधू यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर बापू पाटील यांना पुढील उपचारासाठी सोलापूरात दाखल करण्यात आले होते. परंतु गुरुवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

राजु बापू पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी समजले जात होते. बापू पाटील यांच्या निधनाने पंढरपूर तालुक्यात शोककळा पसरली आहे. तर सुप्रिया सुळे यांनी देखील त्यांना आदरांजली वाहिली आहे. दरम्यान राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नाही. त्यामुळे सरकारकडून वारंवार खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/NCP-leader-dies-by-corona</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 11 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ग्रामीण भागातील मृत्यूदर वाढू देऊ नका : बाळासाहेब थोरात  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Do-not-let-the-death-rate-in-rural-areas-increase-Balasaheb-Thorat</link>
            <description>सोलापूर  : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व्यापक प्रमाणात प्रयत्न करीत आहे. सोलापूर शहरातील रूग्णसंख्या कमी होत असून ग्रामीण भागात वाढत आहे. ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंटवर भर देऊन ग्रामीण भागातील मृत्यूदर वाढू देऊ नका, असे निर्देश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

जिल्हा नियोजन भवनमध्ये कोरोना विषाणूच्या आढावा बैठकीत थोरात बोलत होते. यावेळी महिला व बाल विकासमंत्री ॲड.यशोमती ठाकूर, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ आदी उपस्थित होते.

शिवशंकर यांनी शहरातील तर शंभरकर यांनी ग्रामीण भागातील कोरोना स्थितीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. जिल्ह्यात रूग्णसंख्या वाढत असली तर सर्व प्रकारच्या उपचारासाठीचे नियोजन केले असून 23 हजार रॅ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-08-11/bthorat.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सोलापूर  : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व्यापक प्रमाणात प्रयत्न करीत आहे. सोलापूर शहरातील रूग्णसंख्या कमी होत असून ग्रामीण भागात वाढत आहे. ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंटवर भर देऊन ग्रामीण भागातील मृत्यूदर वाढू देऊ नका, असे निर्देश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

जिल्हा नियोजन भवनमध्ये कोरोना विषाणूच्या आढावा बैठकीत थोरात बोलत होते. यावेळी महिला व बाल विकासमंत्री ॲड.यशोमती ठाकूर, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ आदी उपस्थित होते.

शिवशंकर यांनी शहरातील तर शंभरकर यांनी ग्रामीण भागातील कोरोना स्थितीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. जिल्ह्यात रूग्णसंख्या वाढत असली तर सर्व प्रकारच्या उपचारासाठीचे नियोजन केले असून 23 हजार रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या. 65 कोविड केअर सेंटरमध्ये 8715 ची क्षमता असून 20 डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 1046 तर 11 डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये 1058 रूग्णांची क्षमता आहे. सिव्हील हॉस्पिटलमध्ये आणखी 120 बेडस्ची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती शंभरकर यांनी दिली.

थोरात म्हणाले की, ‘कोरोनाचे संकट ऐतिहासिक आहे. राज्यात परदेशातून आलेल्या नागरिकांमुळे संसर्ग वाढत आहे. मुंबई कंट्रोलमध्ये असले तरी इतर शहरात संसर्ग वाढत आहे. सोलापूर शहरात सध्या रूग्णसंख्या व मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. ही आनंदाची बाब आहे. ग्रामीण भागातील तपासणी चाचण्यांचा वेग वाढविल्याने रूग्णसंख्या वाढत आहे. रूग्ण वाढले तरी नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, जिल्हा प्रशासनाने रूग्णांवर वेळेत उपचार करून मृत्यूदर आटोक्यात ठेवण्यावर भर द्यावा. पुढील 100 दिवसांचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे’.

जिल्हा प्रशासन विविध पातळीवर मृत्यूदर कमी करण्याचे प्रयत्न करीत आहे. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे. बाहेर गावी जाणे, लग्नसमारंभ, भाजी बाजार, वाढदिवस, अंत्यविधी, याठिकाणी होणारी गर्दी टाळा. दंड, लॉकडाऊन कोरोनावर उपाय नाही, प्रत्येकांनी स्वत:ची काळजी घ्यावी. स्वनियंत्रण ठेवून सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि हात साबणाने स्वच्छ धुण्यावर भर दिला तर रूग्णसंख्या आटोक्यात येणार आहे, असेही थोरात यांनी सांगितले.

पुरूष मोठ्या प्रमाणात कामानिमित्त बाहेर जातात. त्यांना संसर्ग झाल्यास घरातील इतरांनाही बाधा होते. महिलांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असल्याने त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याच्या सूचना ॲड. ठाकूर यांनी केल्या. विडी कामगार महिलांचे आधारकार्डसाठी बोटाचे ठसे येत नाहीत. त्यांच्या बायोमेट्रीकच्याही तक्रारीचे निवारण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. पॉस्को, घरगुती हिंसा केसेसबाबत माहिती घेतली. अंगणवाडीसेविका मानधन वाढविणे आणि त्यांना एक तारखेला पगार करणे याबाबतीत प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पॉस्को आणि घरगुती हिंसाच्या केसेसमध्ये घट झाल्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले तर विडी कामगार महिलांना अन्नधान्याचा पुरवठा केला जात असल्याची माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील यांनी दिली.

भरणे यांनी सांगितले की, जिल्ह्यात 10 हजार 209 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. यापैकी 517 मयत झाले असून 6675 रूग्ण बरे होऊन घरी गेले तर 3017 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाला सर्व बाबतीत नागरिकांचे सहकार्य मिळत असून कोविड हॉस्पिटल, आरोग्यातील रिक्त पदे, औषधे, ॲम्ब्युलन्ससाठी सहकार्य करण्याची अपेक्षा थोरात यांच्याकडे केली.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले, सहायक अधिष्ठाता डॉ.श्रीमती जयस्वाल, अग्रजा वनेरकर, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव, डॉ.मंजिरी कुलकर्णी, पोलीस उपायुक्त बापू बांगर, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, स्नेहल भोसले, मोहिनी चव्हाण, दीपक शिंदे आदी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Do-not-let-the-death-rate-in-rural-areas-increase-Balasaheb-Thorat</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 10 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ खासदार शरद पवार यांच्याकडून कोल्हापूर, सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे रेमडेसिवीर इंजेक्शन सुपुर्द ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/MP-Sharad-Pawar-hands-over-Remdesivir-injection-to-Kolhapur,-Satara-District-Collector</link>
            <description>सातारा : सातारा जिल्हा प्रशासनाकडून कोरोना विषाणूसंदर्भात करावयाच्या उपाययोजना व घ्यावयाची काळजी या संदर्भात गृह विलगीकरण पुस्तिका तयार करण्यात आली आहे, या पुस्तिकेचे प्रकाशन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात करण्यात आले.

हा प्रकाशन सोहळा खासदार शरद पवार यांच्या प्र</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-08-10/remedisiver.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सातारा : सातारा जिल्हा प्रशासनाकडून कोरोना विषाणूसंदर्भात करावयाच्या उपाययोजना व घ्यावयाची काळजी या संदर्भात गृह विलगीकरण पुस्तिका तयार करण्यात आली आहे, या पुस्तिकेचे प्रकाशन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात करण्यात आले.

हा प्रकाशन सोहळा खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी पार पडला. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, सहकार मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, ग्रामविकास  मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार संजय मंडलिक,  आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदिप व्यास, सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई, कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके , सातारा जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख आदी उपस्थित होते.

खासदार शरद पवार यांच्या प्रयत्नातून सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील गरीब नागरिकांना रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन मान्यवरांच्या उपस्थितीत सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह व कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/MP-Sharad-Pawar-hands-over-Remdesivir-injection-to-Kolhapur,-Satara-District-Collector</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 09 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सातारा व कोल्हापूरमधील कोरोना परिस्थितीचा शरद पवारांनी घेतला आढावा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Sharad-Pawar-takes-stock-of-Corona-situation-in-Satara-and-Kolhapur</link>
            <description>सातारा : कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन (टाऊन हॉल) येथे सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील कोविड-१९ प्रादुर्भावाच्या सद्यपरिस्थितीचा आढावा व संसर्ग रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजना संबंधीची माहिती राष्ट्रव</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-08-09/coronagoa14520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सातारा : कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन (टाऊन हॉल) येथे सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील कोविड-१९ प्रादुर्भावाच्या सद्यपरिस्थितीचा आढावा व संसर्ग रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजना संबंधीची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजघेतली.

दरम्यान सातारा आणि कोल्हापूर या जिल्हयांतील आरोग्यविषयक समस्यांवर सकारात्मक चर्चा यावेळी करण्यात आली. गंभीर परिस्थितीत गरजू व गरीब बाधितांना विनाशुल्क तातडीचे उपचार मिळावेत या उद्देशाने रेमडेसिवीर या महागड्या इंजेक्शन्सची कुमकही दोन्ही जिल्हयाच्या आरोग्य यंत्रणांना याप्रसंगी देण्यात आली.

रविवारी झालेल्या या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, सातारा पालकमंत्री बाळासाहेब पाटील,कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईकनिंबाळकर, सातारचे खासदार श्रीनिवास पाटील,दोन्ही जिल्ह्यांतील खासदार, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, प्रशासकीय व पोलिस अधिकारी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Sharad-Pawar-takes-stock-of-Corona-situation-in-Satara-and-Kolhapur</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 09 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोना प्रतिबंधक उपाययोजना कडक राबवा : अजित पवार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Strict-implementation-of-corona-prevention-measures--Ajit-Pawar</link>
            <description>बारामती शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना कडक राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.    

'कोरोना' विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली येथील विद्या प्रतिष्ठानच्या 'व्हिआयटी' सभागृहात आढावा बैठक शनिवारी </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-08-09/ajitp12520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[बारामती शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना कडक राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.    

'कोरोना' विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली येथील विद्या प्रतिष्ठानच्या 'व्हिआयटी' सभागृहात आढावा बैठक शनिवारी पार पडली. 

यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, नगरपरिषद मुख्याधिकारी किरणराज यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, जिल्हा परिषदचे माजी बांधकाम सभापती संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, नगरसेवक सचिन सातव  आदी उपस्थित होते.

कोरोनाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी शासन सर्वोतपरी प्रयत्न करीत आहे. भविष्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये, यासाठी नागरिकांनी देखील अधिक दक्ष राहून गर्दी होणार नाही. आणि सुरक्षित अंतर राखले जाईल याची काळजी घ्यावी. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करून कोरोना प्रार्दुभाव टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच या कालावधीमध्ये येणारे सण, उत्सव साधेपणाने व गर्दी न करता साजरे करण्याचे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Strict-implementation-of-corona-prevention-measures--Ajit-Pawar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 08 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो कामाला गती येण्यासाठी त्रिस्तरीय समिती गठीत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Hinjewadi-to-Shivajinagar-Metro-work-to-speed-up-the-formation-of-a-three-tier-committee</link>
            <description>पुणे :

पंचवटी, पाषाण ते पौड रोड भुयारी मार्गाच्या सर्वेक्षणासाठी लागणारी संरक्षण विभागाची परवानगी नुकतीच मिळाली असून पुणे महानगरपालिकेने सर्वेक्षणाचे काम गतीने सुरु करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.  
              

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो आणि पंचवटी, पाषाण ते पौड रोड भुयारी मार्गाच्या कामाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्किट हाऊस येथे आढावा बैठक घेण्यात आली यावेळी त्यांनी या सूचना केल्या. 


बैठकीला आमद</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-08-08/pune-metro.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे :

पंचवटी, पाषाण ते पौड रोड भुयारी मार्गाच्या सर्वेक्षणासाठी लागणारी संरक्षण विभागाची परवानगी नुकतीच मिळाली असून पुणे महानगरपालिकेने सर्वेक्षणाचे काम गतीने सुरु करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.  
              

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो आणि पंचवटी, पाषाण ते पौड रोड भुयारी मार्गाच्या कामाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्किट हाऊस येथे आढावा बैठक घेण्यात आली यावेळी त्यांनी या सूचना केल्या. 


बैठकीला आमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, 'पीएमआरडीए'चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी  राजेंद्र निंबाळकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
            
बैठकीत पुणे मेट्रो मार्गिका - ३ हिंजवडी ते शिवाजीनगर कामकाजाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. मेट्रोचे काम गतीने पूर्ण होण्यासाठी जिल्हाधिकारी,  महापालिका आयुक्त व 'पीएमआरडीए'च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी  एकत्रितपणे कामकाज करावे, असे सांगितले. 


नागरिकांशी संवाद साधून मेट्रोचे काम जलदगतीने होण्यासाठी महापालिका व पीएमआरडीए मधील अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली. या समितीमध्ये माधव जगताप, नितीन उदास व सुनंदा गायकवाड यांचा समावेश करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
             

या बैठकीत  हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील पुणे मेट्रोच्या कामकाजाचा आढावा घेतला. प्रकल्प निश्चिती, मान्यता, कामकाजाची सुरुवात, भूसंपादनाची सद्यस्थिती, केंद्र आणि राज्य शासनाची जागा, पर्यायी रस्ते तसेच अंमलबजावणीतील महत्वाचे टप्पे व प्रकल्प राबवण्यासाठी सुरु असलेल्या कार्यवाहीबाबतचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला.
             

विभागीय आयुक्त सौरभ राव, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे यांनी याविषयी माहिती देऊन कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी नियोजन केल्याचे सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Hinjewadi-to-Shivajinagar-Metro-work-to-speed-up-the-formation-of-a-three-tier-committee</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 07 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 10 ऑगस्टपर्यंत मुदत देतो, सगळं सुरू करा, अन्यथा.....: प्रकाश आंबेडकर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Gives-deadline-till-10th-August-start-everything,-otherwise---Prakash-Ambedkar</link>
            <description>पुणे : 10 ऑगस्टपर्यंतची मुदत देतो, सगळं काही सुरू करा. आमचा अंत पाहू नका, आम्हाला कायदा मोडायला भाग पाडू नका. कधी काय उघडणार याचं शासनाने निश्चित वेळापत्रक सांगावं. रामभरोसे थांबवावं, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू, कोरोना लॉकडाऊनवरुन प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे.

 पुण्यात गेल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-08-07/pambedkar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे : 10 ऑगस्टपर्यंतची मुदत देतो, सगळं काही सुरू करा. आमचा अंत पाहू नका, आम्हाला कायदा मोडायला भाग पाडू नका. कधी काय उघडणार याचं शासनाने निश्चित वेळापत्रक सांगावं. रामभरोसे थांबवावं, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू, कोरोना लॉकडाऊनवरुन प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे.

 पुण्यात गेल्यावर्षी मे महिन्यात 4,007 मृत्यू झाले, यावर्षी मे महिन्यात 1,605 मृत्यू झाले. मुंबईमध्ये मागच्यावर्षी 3,046 मृत्यू झाले, तर यावर्षी 2,860 मृत्यूंची नोंद झाली. केंद्र सरकारच्या विभागाकडून ही माहिती मिळाल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. यावर्षी कोरोनामुळे किती मृत्यू झाले आणि इतर कारणामुळे किती मृत्यू झाले याची आकडेवारी सरकारने द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. कोरोना हॉटस्पॉटमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी मृत्यू झाले आहेत. त्यामुळे कोविडचा परिणाम आहे का नाही, याचा विचार करण्याची गरज आहे.

या परिस्थितीमध्ये लोकांचे हाल कधी थांबणार? दुकाने कधी उघडणार? एसटी बस कधी सुरू होणार? राज्यात महापुराचं संकट येऊ घातलंय, कोविड - कोविड करत बसण्यापेक्षा महापुराच्या प्रश्नाकडे कधी लक्ष देणार? 5 टक्के लोकांना अधिक धोका आहे, असे असताना  95 टक्के लोकांना वेठीला का धरता? असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घ्यायला शिकावं, असा टोलाही प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Gives-deadline-till-10th-August-start-everything,-otherwise---Prakash-Ambedkar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 04 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महसूल विभाग हा शासन व प्रशासनाचा कणा- बाळासाहेब थोरात ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/The-revenue-department-is-the-backbone-of-governance-and-administration---Balasaheb-Thorat</link>
            <description>नाशिक : महसूल विभाग हा शासन व प्रशासनाचा कणा आहे. या महसूल वर्षात ‘आठ अ’ हा ऑनलाईन उतारा देण्याची सुविधादेखील सुरू करण्यात आली असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. ऑनलाईन महसूल दिन कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री  थोरात, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी कौतुकाची थाप दिली. यासोबत नाशिक विभागातील महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांचा सत्कार करून महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता नाशिक विभागात तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑनलाईन महसूल दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत नाशिक विभागातील सर्व जिल्हे व तालुक्यातील कोतवालांपासून ते अपर जिल्हाधिकारी असे सर्व साधारण अडीच ते तीन हजार महसूल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या नाविन्यपूर्ण कार्यक्रमासाठी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे, महसूल राज्यमंत्री अब्दुल नबी सत्तार सर्व मंत्री महोदयांनी महसूल विभागाला कौतुकाची थाप दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन पद्धतीने नाशिक विभागाचा महसूल दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी नागपूर येथून राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नाशिक येथून अन्न, नागर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-08-04/bthorat.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नाशिक : महसूल विभाग हा शासन व प्रशासनाचा कणा आहे. या महसूल वर्षात ‘आठ अ’ हा ऑनलाईन उतारा देण्याची सुविधादेखील सुरू करण्यात आली असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. ऑनलाईन महसूल दिन कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री  थोरात, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी कौतुकाची थाप दिली. यासोबत नाशिक विभागातील महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांचा सत्कार करून महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता नाशिक विभागात तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑनलाईन महसूल दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत नाशिक विभागातील सर्व जिल्हे व तालुक्यातील कोतवालांपासून ते अपर जिल्हाधिकारी असे सर्व साधारण अडीच ते तीन हजार महसूल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या नाविन्यपूर्ण कार्यक्रमासाठी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे, महसूल राज्यमंत्री अब्दुल नबी सत्तार सर्व मंत्री महोदयांनी महसूल विभागाला कौतुकाची थाप दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन पद्धतीने नाशिक विभागाचा महसूल दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी नागपूर येथून राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नाशिक येथून अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, मालेगाव येथून राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून विभागीय आयुक्त राजाराम माने, पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी सर्वश्री सुरज मांढरे, संजय यादव, अभिजीत राऊत, राहुल द्विवेदी, डॉ. राजेंद्र भारूड, उपायुक्त दिलीप स्वामी, रघुनाथ गावडे यांचेसह विभागातील सर्व जिल्ह्यांचे अपर जिल्हाधिकारी यांचेसह सर्व कर्मचारी आदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

 महसूलमंत्री थोरात म्हणाले, शासनाच्या लोकाभिमुख योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम महसूल विभाग करीत आहे. कोरोनाच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता नाशिक विभाग व्हिडिओ  कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून साजरा करत असलेला ऑनलाईन महसूल दिनाचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. कोविडच्या काळात महसूल विभाग आपली भूमिका कार्यक्षमपणे पार पाडत असून राज्याचे आर्थिक व्यवहार सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी देखील प्रयत्न करीत आहे. सर्वसामान्य नागरीकांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी महसूल विभाग पार पाडत असतो. असेही मंत्री थोरात यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्याचे पालकमंत्री भुजबळ म्हणाले, 1 ऑगस्टपासून नवीन महसूल वर्षाला सुरूवात होत असते. या महसूल दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराजस्व अभियानाचा देखील शुभारंभ करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण यावर्षी महसूल दिनाचा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने साजरा करीत आहोत. यामुळे कोरोना आपत्तीच्या काळामधील ही एक इष्टापत्ती आहे. या नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नाशिक विभागातील साधारण 2 हजार 500 अधिकारी कर्मचारी एकत्र येण्यास मदत झाली आहे. महसूल विभाग हा शासनाच्या पाठीचा कणा आहे, हे या विभागाने जमा केलेल्या महसूलातून सिद्ध होत केले आहे, असेही मंत्री भुजबळ यांनी सांगितले.

महसूल विभागाचे काम हे 24 तास व 365 दिवस अविरतपणे सुरू असलेले आहे. कोणतीही परिस्थिती असो महसूल विभागाची जबाबदारी ही अत्यंत महत्वाची असते. याअनुषंगाने केलेल्या कामाची वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन शाबासकीची थाप मिळणे आवश्यक आहे, त्यामुळे काम करताना सकारात्मक उर्जा ही प्रत्येकाला मिळत असते. तंत्रज्ञानामुळे कामाच्या गतीसोबतच त्याचे स्वरूप देखील बदलले आहे. कोविडच्या या परिस्थितीत राज्याचे अर्थचक्र सुरळीतपणे सुरू ठेवण्याची जबाबदारी ही देखील महसूल विभागाची असल्याने येणाऱ्या काळातही या विभागामार्फत तत्परतेने काम होईल. तसेच महसूल विभागाच्या माध्यमातून प्रत्येक खेडे स्वयंपूर्ण झाले तर राज्य आणि देश स्वयंपूर्ण होईल, असेही मंत्री भुजबळ यांनी सांगितले.

 मंत्री दादाजी भुसे म्हणाले, महसूल विभाग हा सर्व विभागांचे प्रतिनिधीत्व करीत असून इतर विभागांवर याविभागाचे नियंत्रण असते. येणाऱ्या काळात सर्वसामान्य नागरिकांना महसूल विभागाच्या माध्यमातून न्याय देण्यात यावा. त्याचप्रमाणे महसूल विभागातील अर्धन्यायिक कामकाजासाठी ठराविक कालावधीचे वेळापत्रक असावे, अशी अपेक्षा कृषिमंत्री भुसे यांनी व्यक्त केली.

विभागीय आयुक्त माने म्हणाले, महसूल विभागाच्या माध्यमातून जमा होणाऱ्या महसूलाचे प्रमाण वाढले असून संगणकीकरणामुळे खटल्यांचे व तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच शेतीच्या अनुषंगाने ई पीक पाहणी हा नवीन प्रयोग दिंडोरी तालुक्यातून सुरू करण्यात आला आहे. कामाची गुणवत्ता टिकून राहण्यासाठी महसूल विभागातील अर्धन्यायिक प्रकरणे हे कायद्याच्या कसोटीवर टिकणारे असावेत, यासाठी महसूल विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत, असे माने यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमादरम्यान महसूल राज्यमंत्री अब्दुल नबी सत्तार यांनी महसूल दिनानिमित्त पाठविलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले.

लोकांच्या दृष्टीने तसेच प्रशासनात काम करीत असलेल्या अधिकाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या अनेक विषयांचे एकत्रीकरण असलेल्या महत्वाकांक्षी महाराजस्व अभियानाचे औपचारिक उद्घाटनदेखील आजपासून करण्यात करण्यात आले. तसेच उपविभागीय अधिकारी, दिंडोरी डॉ. संदिप आहेर, नाशिक तहसिलदार अनिल दौंडे, नायब तहसिलदार डॉ. स्वप्निल सोनवणे, अव्वल कारकून श्रीमती एम.एस. काथेपुरी, लिपीक स्मिता छत्रे, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक राजेंद्र काळे यांचे प्रातिनिधीक स्वरूपात प्रातिनिधीक स्वरूपात यावेळी सत्कार करण्यात आले. उपायुक्त दिलीप स्वामी यांनी या कार्यक्रमाच्या निमीत्ताने प्रत्यक्ष व व्हिडिओ  कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंत्री, अधिकारी, कर्मचारी यांचे आभार मानले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/The-revenue-department-is-the-backbone-of-governance-and-administration---Balasaheb-Thorat</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 31 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोना नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावावी :  उद्धव ठाकरे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/For-corona-control,-peoples-representatives-should-play-a-role-as-a-link-between-the-government-and-the-citizens-Uddhav-Thackeray</link>
            <description>पुणे  :

 कोरोनाचा रुग्ण दर व मृत्यु दर कमी करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोरोना नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

 पुण्यातील विधान भवन सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील कोविड व्यवस्थापन व नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील मंत्री व लोकप्रतिनिधीकडून सूचना जाणून घेतल्या.

या  बैठकीला कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ व पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे,  खासदार सर्वश्री गिरीश बापट, श्रीरंग बारणे, वंदना चव्हाण, डॉ.अमोल कोल्हे, माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.


 यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, कोविड-19 चा संसर्ग जिल्ह्यात किती दिवसात वाढत आहे, हे पाहून त्यादृष्टिने जिल्ह्यात उपाययोजना कराव्यात. शासकीय यंत्रणा प्रभावी होणे आवश्यक असून आरोग्य सुविधा सक्षम करावी. कोरोना रुग्णांसाठी </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-07-31/uudhavt.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे  :

 कोरोनाचा रुग्ण दर व मृत्यु दर कमी करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोरोना नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

 पुण्यातील विधान भवन सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील कोविड व्यवस्थापन व नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील मंत्री व लोकप्रतिनिधीकडून सूचना जाणून घेतल्या.

या  बैठकीला कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ व पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे,  खासदार सर्वश्री गिरीश बापट, श्रीरंग बारणे, वंदना चव्हाण, डॉ.अमोल कोल्हे, माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.


 यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, कोविड-19 चा संसर्ग जिल्ह्यात किती दिवसात वाढत आहे, हे पाहून त्यादृष्टिने जिल्ह्यात उपाययोजना कराव्यात. शासकीय यंत्रणा प्रभावी होणे आवश्यक असून आरोग्य सुविधा सक्षम करावी. कोरोना रुग्णांसाठी अद्याप ठोस औषध अथवा लस उपलब्ध नसल्याचे सांगतानाच अशा परिस्थितीत  प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. वाढता रुग्ण दर व मृत्यू दर कमी करणे हे आव्हान असून यासाठी लोकप्रतिनिधींच्या सहकार्याची गरज आहे, असे सांगून कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या हिताचे निर्णय घेताना सर्वांनी शासनाच्या पाठीशी उभे रहावे असे आवाहनही  मुख्यमंत्री  ठाकरे यांनी केले.

टास्क फोर्समुळे परिणाम

राज्यात व्हेंटिलेटर, पी पी ई किट, एन 95 मास्क पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून गरजेनुसार त्या-त्या भागात पुरवठा करण्यात येत आहे. महापालिकांना कोरोना प्रतिबंधाच्या अनुषंगाने आर्थिक मदत देण्यात आली असून यापुढे ही मदत देण्यात येईल, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स बनविण्याच्या सूचना दिल्या असून त्यानुसार टास्क फोर्स निर्माण होत आहेत. यामुळे कोरोना उपाययोजनामध्ये सुसुत्रता येईल. 

व्हेंटिलेटर, पी पी ई किट, एन 95 मास्कचा पुरवठा 1 सप्टेंबर नंतरही  केंद्राकडून करण्यात यावा, अशी  विनंती प्रधानमंत्री महोदयांना केली असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, सर्व लोकप्रतिनिधींनी देखील आपआपल्या स्तरावर याबाबत विनंती करावी, जेणेकरुन राज्याला याचा लाभ होईल. कोरोना रुग्ण संख्येच्या परिस्थितीनुसार लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात येत आहेत. तथापि, प्रतिबंधित क्षेत्रात नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. 

नियोजनात एकसूत्रीपणा हवा

तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेले रुग्ण बऱ्याचदा रुग्णालयात जायला टाळाटाळ करतात. त्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आढळून येत आहे. असे  होवू नये यासाठी खाजगी प्रयोगशाळांनी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांना परस्पर तपासणी अहवाल न देता संबंधित महापालिका यंत्रणेला द्यावा, जेणेकरुन रुग्णांना वेळेत बेड उपलब्ध होईल. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर व पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग यामध्ये एकसुत्रीपणा आणून सर्वांनी मिळून काम करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पुण्यात वाढत्या रुग्णांवर उपचार होण्याच्या दृष्टिने बेडची संख्या वाढविणे गरजेचे आहे. यामध्ये महानगरपालिकेने पुढाकार घ्यायला हवा. पुण्यासह नाशिक, औरंगाबाद महानगरपालिकांनीही  बेडची संख्या वाढविण्यासाठी नियोजन करुन त्याप्रमाणे अंमलबजावणी करावी यासाठी राज्यशासन महापालिकांना आर्थिक मदत निश्चित देईल, असे ते म्हणाले.

राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेचा सामना करताना सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे असून गाफील राहता कामा नये. यात लोकसहभाग महत्त्वाचा असून मास्कचा वापर, सोशल डिस्टंन्सिंग, स्वच्छतेच्या नियमांचे पालन करण्याबाबत महापालिकेने नागरिकांमध्ये जनजागृती करावी. नागरिकांची गैरसोय होवू नये तसेच उपचारापासून रुग्ण वंचित राहू नये, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावी राबविण्यासाठी  विकेंद्रीकरण करावे अशी सूचना त्यांनी केली.

संस्थात्मक अलगीकरणांवर भर द्यावा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, पुण्यात उभारण्यात येणाऱ्या जम्बो रुग्णालयाचे काम गतीने करावे. संगणकीय प्रणालीमध्ये बेड व्यवस्थापन व अन्य आवश्यक माहिती अद्ययावत ठेवावी. तसेच याचा आढावा वेळोवेळी वरिष्ठ प्रशासकीय यंत्रणेने घ्यावा.  झोपडपट्टी परिसरात छोटी घरे असल्यामुळे याठिकाणी  गृह अलगीकरणापेक्षा संस्थात्मक अलगीकरणांवर भर द्यावा. ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू होवू नये यासाठी ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका तयार ठेवाव्यात. 

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी दर आठवड्याला पुण्यात प्रशासकीय यंत्रणेसोबत बैठका घेवून आढावा घेत असल्याचे सांगितले.  त्याचबरोबर आतापर्यंत पुण्यात राबविण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. भोर तालुक्यातील भूस्खलन होत असणाऱ्या गावांचे माळीणच्या धर्तीवर पुनर्वसन करण्याच्या दृष्टिने सविस्तर प्रस्ताव शासनाकडे सादर  करावा, अशा सूचना दिल्या.

यावेळी खाजगी रुग्णायालयांच्या शुल्क आकारणीवर नियंत्रण ठेवावे,कोरोनाच्या रुग्णांना अतिदक्षता विभागातील खाटा, व्हेटिंलेटरची कमतरता भासू नये यासाठी प्रयत्न करावेत. राज्य शासनाने महापालिकेला अर्थसहाय्य करावे. ससून रुग्णालयात तपासणी  क्षमता वाढवावी अशा सूचना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केल्या. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पिंपरीतील शासकीय रुग्णालयामध्ये चांगल्या सुविधा  मिळत असल्याच्या प्रतिक्रिया रुग्णांकडून आल्याचे सांगितले. 
विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे म्हणाल्या,  कोरोनाच्या रुग्णांना औषधे माफक दरात उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत.  डॅश बोर्डवरील माहिती गतीने उपलब्ध करुन द्यावी. सोसायट्यांनी  कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना चांगली वागणूक द्यावी यावर प्रशासनाने नियंत्रण ठेवावे,अशा सूचना केल्या.
खासदार सर्वश्री  गिरीश बापट, श्रीरंग बारणे, वंदना चव्हाण, डॉ.अमोल कोल्हे यांच्यासह लोकप्रिनिधींनी पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली,  तसेच सूचना केल्या. पुण्यासाठी व्हेंटिलेटर, रुग्णवाहिका, औषधसाठा उपलब्ध करुन द्यावा. खाजगी रुग्णालयांचे बेड उपलब्धतेची माहिती अद्ययावत ठेवावी, कोविड केअर सेंटर मधील भोजनाचा दर्जा चांगला ठेवावा. प्रतिबंधात्मक नियम पाळण्याबाबत जनजागृतीवर भर द्यावा. माहिती, शिक्षण आणि संवाद यावर भर द्यावा.  कोरोना तपासणीसाठी फिरते तपासणी केंद्र सुरु व्हावे, ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक  आरोग्य केंद्रामध्ये अद्ययावत वैद्यकीय उपकरणे व प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे, अशा सूचना उपस्थित लोकप्रतिनधिींनी केल्या.  
प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे जिल्ह्यातील आतापर्यंतची कोरोना बाधित रुग्णांची सद्यस्थिती,  कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या,  बाधित रुग्णांची क्षेत्रनिहाय  माहिती, नमुना तपासणी प्रयोगशाळा आदि विषयी माहिती दिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/For-corona-control,-peoples-representatives-should-play-a-role-as-a-link-between-the-government-and-the-citizens-Uddhav-Thackeray</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 27 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पुण्यातील ज्येष्ठ कसरतपटू शांताबाई पवार यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते मदत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Home-Minister-Anil-Deshmukh-assists-Shantabai-Pawar-a-senior-gymnast-from-Pune</link>
            <description>पुणे :  गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याहस्ते ज्येष्ठ कसरतपटू श्रीमती शांताबाई पवार (वय वर्ष 85) यांना 1 लक्ष रुपये तसेच साडी-चोळी देवून गौरविण्यात आले. पुण्यात त्यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास आमदार </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-07-27/shantabaipawar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे :  गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याहस्ते ज्येष्ठ कसरतपटू श्रीमती शांताबाई पवार (वय वर्ष 85) यांना 1 लक्ष रुपये तसेच साडी-चोळी देवून गौरविण्यात आले. पुण्यात त्यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास आमदार चेतन तुपे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी गृहमंत्री देशमुख म्हणाले, आजी या वयातही परिवार चालविण्यासाठी काम करतात. त्यांना शासकीय योजनेतून योग्य ती मदत दिली जाईल, असेही ते म्हणाले. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या ‘भरोसा सेल’ मार्फत ज्येष्ठ नागरिकांना मदत केली जाते, आतापर्यंत 15 हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारे मदत करण्यात आली आहे. पोलीस विभागामार्फत अधिकाधिक मदत देण्याचाही प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगून जिल्ह्यातील गणेशोत्सव तसेच बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस विभागाचा आढावा घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी शांताबाई पवार यांनी कसरतीचे काही प्रकार करुन आपण या वयातही आरोग्यसंपन्न असल्याचे दाखवून दिले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Home-Minister-Anil-Deshmukh-assists-Shantabai-Pawar-a-senior-gymnast-from-Pune</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 26 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दक्षिण सोलापूरच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचाराचा अनोखा प्रयत्न! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Unique-treatment-attempt-at-Kovid-Care-Center-in-South-Solapur</link>
            <description>सोलापूर : सकस आहार, स्वच्छता, करमणूक, योगासने आणि योग्य उपचार मिळाले तर कोरोनाबाधित रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. याचा अनुभव दक्षिण सोलापूर तालुक्याच्या केटरिंग कॉलेजमधील कोविड केअर सेंटरमध्ये येत आहे. हा पॅटर्न जिल्ह्यातील अन्य कोविड केअर सेंटरमध्येही राबविणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
सोलापुरातील संभाजी तलावाच्या मागील बाजूला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाराष्ट्र इंन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड केटरिंग टेक्नॉलॉजी महाविद्यालय आहे. महाविद्यालय 27 मे 2020 पासून क्वारंटाईनसाठी घेण्यात आले. त्याचे रूपांतर कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आले आहे. 20 जुलै 2020 पासून याठिकाणी प्राणायम, योगासने, करमणुकीसाठी भावगीते, सुगम संगीताचा वापर करण्यात येत आहे. या सेंटरमध्ये 338 रूग्णांची सोय होऊ शकते, मात्र सध्या 178 साध्या पॉझिटिव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने याठिकाणी रवी कंटला आणि शिवानंद पाटील यांची योग प्रशिक्षणासाठी नियुक्ती केली आहे. याठिकाणी बांधकाम विभागातील उपअभियंता शाहीर रमेश खाडे एक दिवसाआड संगीताचा कार्यक्रम घेत आहेत. शिवाय कोविड सेंटरमध्ये एफएम बसविल्याने रूग्णांची करमणूक होत आहे. दिवसातून चारवेळा स्वच्छता केली जात आहे.
या सेंटरमधील 316 कोरोनाबाधित रूग्णांपैकी 138 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दुपारी 1 ते सायंकाळी 4 पर्यंत विश्रांतीसाठी संगीत बंद असते. सकाळी 7 ते 8 या वे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-07-26/solapurcovid.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सोलापूर : सकस आहार, स्वच्छता, करमणूक, योगासने आणि योग्य उपचार मिळाले तर कोरोनाबाधित रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. याचा अनुभव दक्षिण सोलापूर तालुक्याच्या केटरिंग कॉलेजमधील कोविड केअर सेंटरमध्ये येत आहे. हा पॅटर्न जिल्ह्यातील अन्य कोविड केअर सेंटरमध्येही राबविणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
सोलापुरातील संभाजी तलावाच्या मागील बाजूला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाराष्ट्र इंन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड केटरिंग टेक्नॉलॉजी महाविद्यालय आहे. महाविद्यालय 27 मे 2020 पासून क्वारंटाईनसाठी घेण्यात आले. त्याचे रूपांतर कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आले आहे. 20 जुलै 2020 पासून याठिकाणी प्राणायम, योगासने, करमणुकीसाठी भावगीते, सुगम संगीताचा वापर करण्यात येत आहे. या सेंटरमध्ये 338 रूग्णांची सोय होऊ शकते, मात्र सध्या 178 साध्या पॉझिटिव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने याठिकाणी रवी कंटला आणि शिवानंद पाटील यांची योग प्रशिक्षणासाठी नियुक्ती केली आहे. याठिकाणी बांधकाम विभागातील उपअभियंता शाहीर रमेश खाडे एक दिवसाआड संगीताचा कार्यक्रम घेत आहेत. शिवाय कोविड सेंटरमध्ये एफएम बसविल्याने रूग्णांची करमणूक होत आहे. दिवसातून चारवेळा स्वच्छता केली जात आहे.
या सेंटरमधील 316 कोरोनाबाधित रूग्णांपैकी 138 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दुपारी 1 ते सायंकाळी 4 पर्यंत विश्रांतीसाठी संगीत बंद असते. सकाळी 7 ते 8 या वेळात योगासने, प्राणायामचा वर्ग असतो. यामुळे रूग्णांमध्ये असलेली भीती दूर होते. श्वसनक्रिया सुरळित होण्यास मदत होत आहे. बरे झालेले रूग्ण अजून राहण्याची इच्छा व्यक्त करीत असल्याचे डॉ.गायकवाड यांनी सांगितले.
कोरोनाबाधित रूग्णांना सकाळी दूध, दोन अंडी, दुपारी जेवण आणि फळे, सायंकाळी चहा आणि संध्याकाळी सकस जेवण देण्यात येत आहे. यामुळे त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होत आहे. घरच्याप्रमाणे योग्य आहार मिळत असल्याने रूग्णांचे मनोधैर्य उंचावत आहे.
कोरोनाच्या बाबतीत स्वच्छता महत्त्वाचा घटक आहे. कोविड केअर सेंटर आणि कोविड हॉस्पिटलमध्ये वेळेवर साफसफाई केली जात असल्याने इतर आजारांचा फैलाव रोखण्यास मदत होत आहे. यामुळे कोरोना रूग्ण बरे होत आहेत.
कोरोनाग्रस्त अगोदरच गांगरून व घाबरून गेलेला असतो. त्याला मानसिक आधार आणि रोग बरा होत असल्याचा विश्वास द्यायला हवा. शिवाय जोडीला संगीत, गाणी यांची साथ असेल तर रूग्णांना आजारी आहे असे वाटणार नाही. गाण्यांमध्ये गुंतून गेल्याने त्याला झोपही चांगली लागते, परिणामी रोग प्रतिकारशक्ती वाढल्याने कोरोनाशी तो मुकाबला करू शकतो.
संगीताचा योग्य परिणाम कोरोनाग्रस्त रूग्णांवर झाल्याने त्यांना व्यायाम, योगासने, प्राणायाम करायला लावली तर आणखी फायदा होणार आहे. प्राणायामने त्यांच्या श्वसनाच्या त्रासामध्ये 70 टक्के सुधारणा झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. श्वसनक्रिया सक्षमपणे चालण्यासाठी प्राणायाम महत्त्वाची आहेत. यामुळे कोविड केअर सेंटर किंवा हॉस्पिटलमध्ये योग तज्ज्ञांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
सकस आहार, स्वच्छता, संगीत, योगा यानंतर रूग्ण आपोआप योग्य उपचारालाही साथ देतो. मृत्यूदर कमी करण्यास वरील घटक महत्त्वाचे ठरणार आहेत.
रूग्ण बरे होण्यासाठी समुपदेशन महत्त्वाचे आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुक्याची आरोग्य यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टीमवर्कने केलेल्या कामाचे हे फलित आहे. योगासने, प्राणायाम, संगीत हा पॅटर्न जिल्ह्यातील अन्य कोविड केअर सेंटरमध्येही राबविणार असून समुपदेशकांची नियुक्तीही करण्यात येणार आहे.
प्रांताधिकारी ज्योती पाटील म्हणाल्या, दक्षिण तालुका हा सोलापूर शहरानजिकचा तालुका आहे. यामुळे शहराजवळच सुसज्ज अशी केटरिंग कॉलेजची इमारत कोविड केअर सेंटरसाठी घेण्यात आली. तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या टीमने सेंटरमध्ये बदल केले. जेवण, दिवसभर स्वच्छता, सॅनिटायझिंग, योगासन वर्ग आणि म्युझिक सिस्टम यामुळे उपचार घेतलेले रूग्ण बरे होऊन आनंदाने बाहेर पडत आहेत, ही समाधानाची बाब आहे.
दक्षिण सोलापूरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिगंबर गायकवाड म्हणाल्या, कोरोना रूग्णांना प्रथमत: समुपदेशनाची गरज असते. कोरोना फुफ्फुसावर संसर्ग करतो. रूग्णांची श्वसनक्रिया व्यवस्थित चालण्यासाठी प्राणायाम आणि योगासनांची नितांत गरज वाटली. यामुळे त्यांना दवाखान्यात दाखल करण्याची गरज वाटत नाही. रूग्ण कोविड सेंटरमध्येच बरे होत आहेत. संगीताची जोड दिल्याने  त्यांची करमणूकही होत आहे. येत्या काही दिवसात मालेगावमध्ये वापरण्यात आलेला मन्सुरा काढा सुरू करण्याचा मानस आहे.
सोलापुरातील प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रसन्न खटावकर म्हणाले, कोरोना काळात वैयक्तिक स्वच्छता, औषधोपचाराबरोबर तणावरहित राहिले तर सकारात्मक परिणाम दिसतात. मानसिकदृष्ट्या सक्षम राहून कोरोनाचा मुकाबला करायला हवा. करमणूक, योगासने, प्राणायम यांचा रूग्णांना फायदा होतो. मन शांत राहते. अतिचिंता, अतिविचार टाळू शकतो. कोविड केअर सेंटरमध्ये वायफायची सुविधा देणे गरजेचे आहे. पुरेशी झोप, योग्य व ताजा आहाराबरोबर योग्य उपचार रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात. यामुळे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून मृत्यूदर कमी होईल.
केटरिंग कॉलेजच्या कोविड केअर सेंटरचे समन्वयक डॉ.प्रवीण खारे म्हणाले, सहकार्यांच्या मदतीने दिवसातून तीनवेळा राऊंड घेऊन रूग्णांच्या समस्या जाणून घेतो. हृदयाचे ठोके तपासणे, ऑक्सिजन प्रमाण तपासून औषधाबरोबर प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी प्रतिजैविके देण्यात येतात. याबरोबरच सोशल डिस्टन्सिंग पाळून संगीत, योगासने याचाही नियमित वर्ग घेतला जातो.
तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पाच वैद्यकीय अधिकारी, पाच नोडल अधिकारी, सहा आरोग्यसेविका, पाच फार्मासिस्ट, दोन ब्रदर, पाच कक्षसेवक, एक टेक्निशियन, सहा शिपाई, चार होमगार्ड, तीन वॉचमन, बारा सफाई कर्मचारी काम करीत आहेत. जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती सहायक धोंडिराम अर्जुन यांनी माहिती दिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Unique-treatment-attempt-at-Kovid-Care-Center-in-South-Solapur</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 17 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाराष्ट्रात या जिल्ह्यात पुन्हा वाढणार लॉकडाऊन, महत्त्वाची बैठक सुरू ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Lockdown-will-increase-again-in-this-district-in-Maharashtra,-important-meeting-begins</link>
            <description>कोल्हापूर, : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. रोज कोरोनाचे नवे आकडे समोर येत आहेत. अशात कोरोनाचा धोका कायम असल्यानं राज्यात लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 31 जुलैपर्यंत टप्याटप्याने शिथिलता दिली जाणार आहे. मिशन बिगेन अगेन अंतर्गत दिलेल्या शिथिलताही सुरू राहतील. अशात पुण्यानंतर आता कोल्हापूरमध्ये पुन्हा लोकडाऊन हो</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-07-17/lockdown.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कोल्हापूर, : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. रोज कोरोनाचे नवे आकडे समोर येत आहेत. अशात कोरोनाचा धोका कायम असल्यानं राज्यात लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 31 जुलैपर्यंत टप्याटप्याने शिथिलता दिली जाणार आहे. मिशन बिगेन अगेन अंतर्गत दिलेल्या शिथिलताही सुरू राहतील. अशात पुण्यानंतर आता कोल्हापूरमध्ये पुन्हा लोकडाऊन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. थोड्याच वेळात या बाबतचा निर्णय येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडत आहे. बैठकीनंतर पालकमंत्री सतेज पाटील यासंबंधी निर्णय जाहीर करतील. त्यामुळे कोल्हापुरात पुन्हा लोकडाऊन होणार अशा चर्चांना उधाण आलं आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या 640 कोरोना रुग्ण असून कोल्हापुरात 10 दिवसांच्या लोकडाऊनची शक्यता असणार आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोल्हापूरमधील लॉकडाऊन करण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांवर काही निर्बंध घालण्यात येण्याचीही शक्यता आहे.

महाराष्ट्रात कुठल्या भागात आहे कडक लॉकडाऊन?

लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक भागात कोरोनाचा वेगाने फैलाव सुरू झाला. मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांपासून जिथं आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला नव्हता अशा ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केला. त्यामुळे अधिक कोरोना रूग्ण असलेल्या मुंबईसह एमएमआर परिसरात तसंच पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक,धुळे,जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर महापालिका परिसरात अधिक निर्बंध असणार आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Lockdown-will-increase-again-in-this-district-in-Maharashtra,-important-meeting-begins</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 17 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या : उपमुख्यमंत्री अजित पवार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Take-care-that-no-patient-will-be-deprived-of-treatment-Deputy-Chief-Minister-Ajit-Pawar</link>
            <description>पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग सर्वत्र वाढत आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासोबतच कोरोना चाचणी, रुग्णवाहिका व्यवस्थापन, रुग्णालयातील बेड व्यवस्थापन आणि डॉक्टर याबाबतचे  नियोजन संगणकीय प्रणालीव्दारे करा तसेच पुणे व पिंपरी चिंचवड येथे मुंबईच्या धर्तीवर तातडीच्या रुग्णालयांची उभारणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. 
शासकीय विश्रामगृह येथे कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री श्री पवार बोलत होते. बैठकीला  मुंबईचे आयुक्त इकबाल सिंह चहल, विभागीय आयुक्त  डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चो</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-07-17/ajitpawar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग सर्वत्र वाढत आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासोबतच कोरोना चाचणी, रुग्णवाहिका व्यवस्थापन, रुग्णालयातील बेड व्यवस्थापन आणि डॉक्टर याबाबतचे  नियोजन संगणकीय प्रणालीव्दारे करा तसेच पुणे व पिंपरी चिंचवड येथे मुंबईच्या धर्तीवर तातडीच्या रुग्णालयांची उभारणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. 
शासकीय विश्रामगृह येथे कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री श्री पवार बोलत होते. बैठकीला  मुंबईचे आयुक्त इकबाल सिंह चहल, विभागीय आयुक्त  डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,  पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे, कोरोनाच्या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे. नवीन रुग्णांची भर पडणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे, तसेच संस्थात्मक क्वारंटाईन ठिकाणी आवश्यक सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात, असेही श्री पवार यांनी सांगितले. 
 कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात मुंबईत प्रशासनाला यश आले आहे, त्याच धर्तीवर पुण्यात उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले,  कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनासोबतच कोरोना चाचणी, रुग्णवाहिका, हॉस्पीटलचे बेड व्यवस्थापन, डॉक्टरचे नियोजन या सर्व महत्वाच्या उपाययोजनांचे संगणकीय प्रणालीच्या मदतीने नियोजन करा, त्यामुळे नियोजनात आणखी सुसुत्रता येईल. कंटेनमेंट झोननिहाय उपाययोजनांची पाहणी करा तसेच पुणे, पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामिण क्षेत्र  मिळून एकाच पातळीवरून नियोजन करा, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे सांगतानाच कोणत्याही परिस्थितीत उपचाराची गरज असलेल्या नागरिकाना उपचार मिळालेच पाहीजेत, असे स्पष्ट निर्देशही श्री पवार यांनी दिले. 
प्रारंभी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुंबईत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. मुंबईत कोरोना चाचणी, रुग्णवाहिका व्यवस्था, बेड व्यवस्था, तसेच डॉक्टरांचे नियोजन करण्यावर भर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण, कोरोनामुक्त झालेले रुग्ण तसेच कोरोना संसर्ग विषयक सद्यस्थिती, आरोग्य सुविधा आणि उपलब्ध सामग्रीबाबत माहिती दिली. 
पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार व पिंपरी चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिकाक्षेत्रात कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Take-care-that-no-patient-will-be-deprived-of-treatment-Deputy-Chief-Minister-Ajit-Pawar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 08 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पुण्यातील आमदार मुक्ता टिळक व आईला कोरोना विषाणूची लागण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Pune-MLA-Mukta-Tilak-and-mother-infected-with-corona-virus</link>
            <description>पुणे : राज्यात कोरोना व्हायरस संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत. सध्या   अनेक नेते मंडळींनाही या विषाणूने ग्रासले आहे. काही दिवसांपूर्वी पुण्याचे   महापौर मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना कोरोनाची   लागण झाल्याचे वृत्त आले होते. आता पुण्यातील भाजपच्या आमदार व माजी महापौर   मुक्ता टिळक आणि त्यांच्या आईला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. स्वतः   मुक्ता टिळक यांनी सोशल मिडियाद्वारे ही माहिती दिली आहे. त्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-07-08/muktatilak.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे : राज्यात कोरोना व्हायरस संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत. सध्या   अनेक नेते मंडळींनाही या विषाणूने ग्रासले आहे. काही दिवसांपूर्वी पुण्याचे   महापौर मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना कोरोनाची   लागण झाल्याचे वृत्त आले होते. आता पुण्यातील भाजपच्या आमदार व माजी महापौर   मुक्ता टिळक आणि त्यांच्या आईला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. स्वतः   मुक्ता टिळक यांनी सोशल मिडियाद्वारे ही माहिती दिली आहे. त्यांच्या घरातील   इतर सदस्यांची कोरोना चाचणी नकारात्मक आली असल्याची माहितीही मुक्ता टिळक   यांनी दिली आहे.आपल्या ट्वीटमध्ये मुक्ता टिळक म्हणतात, ‘आज माझी आणि   माझ्या आईची कोरोना व्हायरस चाचणी सकारात्मक आली आहे. सध्या तरी आम्हा   दोघींमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. डॉक्टरांनी आम्हाला घरातच वेगळे   राहण्याचा सल्ला दिला आहे. कुटुंबातील इतर सर्व सदस्यांची चाचणी नकारात्मक   आली आहे. घरी रहा, सुरक्षित रहा.’ मुक्ता टिळक या पुण्याच्या माजी महापौर   आहेत. मागच्यावर्षी त्या कसबा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून   आल्या.यापूर्वी महापालिकेचे सहा नगरसेवक कोरोना ने बाधित झालेत तर   आतापर्यंत जवळपास 200 पेक्षा अधिक कर्मचारी हे कोरोनामुळे बाधित आहेत.   महापौर बाधित झाल्यानंतर आता महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासह   अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल आणि शांतनू गोयल हेदेखील होम क्वारंटाईन   आहेत. यासह हडपसरमधील भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर यांना देखील कोरोनाची   लागण झाली आहे. टिळेकर यांनी स्वतः ट्वीट करत माहिती दिली.दरम्यान,   लोणावळ्यात, 130 हून अधिक पर्यटकांवर परमिटशिवाय प्रवास केल्याबद्दल   पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लोणावळ्यात पर्यटन-बंदीच्या आदेशाचा भंग   केल्याबद्दल पोलिसांनी 51 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. लोक सामाजिक   अंतराच्या नियमांचे पालन करीत नसतील, तर नियम अजून कठोर करावे लागतील अशा   इशारा पुणे जिल्हा प्रशासनाने दिला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Pune-MLA-Mukta-Tilak-and-mother-infected-with-corona-virus</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 05 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पुणे महापौरांसह कुटुंबातील आठ जणांना कोरोनाची बाधा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Corona-strikes-eight-members-of-the-family-including-the-Pune-mayor</link>
            <description>पुणे : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना काल कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर आज त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. एक-दोन नव्हे आठ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. काल संध्याकाळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटर हँडलवरुन आपला कोरोनाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जाहीर केले ह</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-07-05/punemahapour.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना काल कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर आज त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. एक-दोन नव्हे आठ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. काल संध्याकाळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटर हँडलवरुन आपला कोरोनाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जाहीर केले होते.महापौरांनी ट्विटवर म्हटले, “थोडासा ताप आल्याने मी कोरोनाची चाचणी करुन घेतली. ही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र, माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील.”दरम्यान, पुण्यातील भाजपाचे माजी आमदार योगेश टिळेकर यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे रविवारी सकाळी स्पष्ट झाले. त्यांनीही ट्विटद्वारे आपला चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जाहीर केले. “दोन दिवसापूर्वी ताप व कणकण आल्याने माझी व मुलाची करोनाची तपासणी करून घेतली असताना हा अहवाल पॉझिटिव्ह आला. माझी प्रकृती स्थिर आहे. तुमच्या आशीर्वादामुळे लवकरच बरा होऊन येईन. आपण सर्वांनी काळजी घ्यावी व सुरक्षित राहावे,” असे ट्विट त्यांनी केले आहे.पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक आणि महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते दत्ता साने यांचादेखिल काल कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पिंपरी-चिंचवडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पहिल्यांदा कोरोना विषाणूची सौम्य लक्षण होती. मात्र, त्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Corona-strikes-eight-members-of-the-family-including-the-Pune-mayor</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 02 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष संवर्धनाची गरज : आदित्य ठाकरे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/The-need-for-tree-conservation-to-protect-the-environment--Aditya-Thackeray</link>
            <description>सोलापूर : प्रत्येक झाड ऑक्सिजन निर्मितीचा कारखाना असते. म्हणून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्ष संवर्धनाची गरज असल्याचे प्रतिपादन पर्यावरण, पर्यटन, राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. दरम्यान, वृक्ष लागवड मोहिमेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.पर्यावरण</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-02/paryavaransanvardhan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सोलापूर : प्रत्येक झाड ऑक्सिजन निर्मितीचा कारखाना असते. म्हणून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्ष संवर्धनाची गरज असल्याचे प्रतिपादन पर्यावरण, पर्यटन, राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. दरम्यान, वृक्ष लागवड मोहिमेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.पर्यावरणमंत्री ठाकरे यांनी पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह आवारात वृक्ष लागवडीचा शुभारंभ केला. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तुळशी वृंदावन येथे वृक्षारोपण केले. यावेळी सामाजिक वनीकरणाचे प्रधान मुख्य वन संरक्षक दिनेशकुमार त्यागी, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, पोलिस अधीक्षक मनोज पाटील आदी उपस्थित होते.यावेळी मंत्री ठाकरे म्हणाले, वृक्ष हे जल व मृद संधारणाचे महत्त्वाचे साधन आहेत. शुद्ध हवा, स्वच्छ पाणी आणि सकस अन्न वृक्ष लागवडीतूनच मिळणार आहे. प्रदूषण नियंत्रणात वृक्षांचे महत्व जाणून शेतकरी, विद्यार्थी, नागरिक आणि शासकीय यंत्रणांनी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी.पालकमंत्री भरणे म्हणाले, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड करून वृक्षांचे संवर्धन करणे महत्वाचे आहे. समाजातील सर्व घटकांनी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हावे. यावेळी त्यांनी वन विभागाने साकारलेल्या तुळशी वृंदावनाची पाहणी करून कामाचे कौतुक केले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/The-need-for-tree-conservation-to-protect-the-environment--Aditya-Thackeray</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 01 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर       ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Ba-Vitthala-Free-Maharashtra-from-Corona</link>
            <description>पंढरपूर :- महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख मिळू दे, समाधान मिळू दे आणि त्याची भरभराट होऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी आज घातले.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची बुधवारी पहाटे आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-07-01/bavittala.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पंढरपूर :- महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख मिळू दे, समाधान मिळू दे आणि त्याची भरभराट होऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी आज घातले.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची बुधवारी पहाटे आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, श्री. तेजस ठाकरे उपस्थित होते. श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पहाटे दोन वाजता सुरू झाली. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा मानाचे वारकरी अहमदनगर जिल्ह्यातील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि सौ. अनुसया बढे (मु.चिंचपूर-पांगुळ, ता. पाथर्डी) या दाम्पत्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनामुळे जग, देश तसेच महाराष्ट्रावर मोठे संकट आले आहे. कोरोनाचे हे संकट लवकरात-लवकर दूर करून महाराष्ट्र आणि अवघा देश कोरोनामुक्त होऊ दे. राज्यातील शेतकरी, वारकरी आणि अवघ्या विठ्ठल भक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी आषाढी एकादशीला माऊलींच्या दर्शनाला आलो. बळीराजाला सुखी करण्याचे आणि राज्यातील सर्व नागरिकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपणास बळ द्यावे, अशी मागणी श्री विठ्ठलाकडे केल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. पंढरपूरच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार आहे. त्यासाठी विकास प्रकल्पांना मंजुरी दिली जाईल. त्याबाबतचे प्रस्ताव सादर करावे, असे त्यांनी सांगितले.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी आणि जनतेने आरोग्याच्या दृष्टीने पंढरपुरात येऊ नये. घरातूनच श्री विठ्ठलाचे नामस्मरण व पूजा करावी, असे आवाहन श्री. ठाकरे यांनी भाविकांना केले. वारकरी सांप्रदायाने शासनाच्या वतीने वेळोवळी करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांनी आभार मानले. यावेळी पंढरपूर नगरपरिषदेस शासनाच्यावतीने पाच कोटी रुपयांचा अनुदानाचा धनादेश नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.यावेळी नगराध्यक्ष साधना भोसले, समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, शिवाजीराव मोरे, माधवी निगडे, अतुलशास्त्री भगरे, शकुंतला नडगिरे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र भोसले, पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आदी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Ba-Vitthala-Free-Maharashtra-from-Corona</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 29 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शहीद सुनील काळे यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/A-government-job-to-one-of-the-family-of-martyr-Sunil-Kale</link>
            <description>सोलापूर : पुलवामा येथील अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेल्या सुनील काळे यांच्या कुटुंबातील एकाला शिक्षणानुसार शासकीय सेवेत घेण्याची ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी दिली.पानगाव (ता. बार्शी) येथे शहीद सुनील काळे यांच्या कुटुंबियांची गृहमंत्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-06-29/sunilkale.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सोलापूर : पुलवामा येथील अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेल्या सुनील काळे यांच्या कुटुंबातील एकाला शिक्षणानुसार शासकीय सेवेत घेण्याची ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी दिली.पानगाव (ता. बार्शी) येथे शहीद सुनील काळे यांच्या कुटुंबियांची गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.शहीद काळे यांची भाची वर्षा काळे यांनी कुटुंबियांच्या स्थितीबद्दल माहिती दिली. काळे कुटुंबिय जिरायती शेतीवर अवलंबून आहे. मामीला आधार देण्यासाठी कोणी नाही, एकाला शासकीय सेवेत घेण्याची तिने यावेळी मागणी केली होती. आम्हाला शहीद सुनील काळे यांचा अभिमान आहे, शासन खंबीरपणे कुटुंबियांच्या पाठिशी असल्याची ग्वाही यावेळी गृहमंत्री देशमुख यांनी दिली. वीर जवानाचा आम्हाला अभिमान असून काळे कुटुंबाला आवश्यक ती सर्व मदत शासन करेल, असे पालकमंत्री भरणे यांनी यावेळी सांगितले. शासकीय मदतीबरोबर खास बाब म्हणून काळे कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत घेण्याचा प्रयत्न शासन करेल. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून निर्णय घेतला जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.यावेळी ‍शहीद जवान सुनील काळे यांच्या आई कुसुम काळे, पत्नी अर्चना, मुले श्री आणि आयुष, भाऊ नंदकुमार आणि किरण काळे उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/A-government-job-to-one-of-the-family-of-martyr-Sunil-Kale</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 29 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोनाच्या काळात पोलिसांनी शासनाची प्रतिमा उंचावली : अनिल देशमुख ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/During-the-Corona-periodthe-police-raised-the-image-of-the-government--Anil-Deshmukh</link>
            <description>सोलापूर : कोरोना विषाणू प्रसाराच्या काळात आघाडीवर राहून काम करून राज्यभरात पोलिस कर्मचारी-अधिकाऱ्यांनी राज्य शासनाची प्रतिमा उंचावण्याचे मोठे काम केले, असे गौरवोद्गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी काढले.सोलापूर येथे कोरोनाने मृत्यू झालेल्या पोलिस कोरोना योद्ध्यांच्या परिवाराला शासनातर्फे सानुग्रह अनुदानाचे धनादेश प्रदान करण्यात आले, त्यावेळी गृहमंत्री देशमुख बोलत होते. सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार सर्वश्री संजय शिंदे, यशवंत माने, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूद्ध कांब</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-06-29/shipaichek.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सोलापूर : कोरोना विषाणू प्रसाराच्या काळात आघाडीवर राहून काम करून राज्यभरात पोलिस कर्मचारी-अधिकाऱ्यांनी राज्य शासनाची प्रतिमा उंचावण्याचे मोठे काम केले, असे गौरवोद्गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी काढले.सोलापूर येथे कोरोनाने मृत्यू झालेल्या पोलिस कोरोना योद्ध्यांच्या परिवाराला शासनातर्फे सानुग्रह अनुदानाचे धनादेश प्रदान करण्यात आले, त्यावेळी गृहमंत्री देशमुख बोलत होते. सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार सर्वश्री संजय शिंदे, यशवंत माने, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी, मृत झालेल्या पोलिसांचे कुटुंबिय उपस्थित होते.कोरोनाविरूद्ध जिल्हा प्रशासन, महापालिका, आरोग्य कर्मचारी यांच्याबरोबरीने पोलिस अधिकारी व कर्मचारी आघाडीवर लढत आहेत. ही अभिमानाची बाब असून तीन महिन्यातील काम सर्वात उत्कृष्ट आहे. राज्यभरात कोरोनाने 58 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या परिवाराला शासनाची मदत मिळावी म्हणून 50 लाखांचे सानुग्रह अनुदान, 10 लाख पोलिस महासंचालक सहायता निधी आणि ज्या बँकेत त्यांचे खाते आहे त्या बँकेकडून काही रक्कम असे 65 लाख रुपये देण्याचे नियोजन केले. जे कर्मचारी मृत्यू पावले त्यांच्या कुटुंबियांना कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीपर्यंत शासकीय निवासस्थानात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले.कोरोनाची लागण झाल्यास पोलिसांना सर्व सोयीसुविधा असणाऱ्या दवाखान्यात उपचारांची सोय करण्यात आली आहे, पोलिस परिवारांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही गृहमंत्र्यांनी यावेळी दिली.यावेळी कोविड-19 बाधित होऊन मृत झालेले सहायक पोलिस उपनिरीक्षक ताजोद्दीन शेख (एमआयडीसी पोलीस ठाणे) यांच्या पत्नी श्रीमती सगीरा शेख यांना 50 लाखांचा धनादेश गृहमंत्री देशमुख यांच्या हस्ते देण्यात आला. यापूर्वी त्यांना पोलिस महासंचालक कार्यालयाचा 10 लाखांचा धनादेश देण्यात आला आहे.पोलिस नाईक महादेव राठोड यांच्या पत्नी श्रीमती जयश्री राठोड यांना 50 लाख आणि 10 लाख असे 60 लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले.पोलिस नाईक झाकीर शेख (शहर वाहतूक शाखा), सोलापूर ग्रामीणचे रामेश्वर परचंडे आणि शिंपी सिद्रामप्पा अंबलगी यांचे प्रस्ताव पाठविण्यात आले असून त्यांनाही लवकरच सानुग्रह अनुदान मिळणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/During-the-Corona-periodthe-police-raised-the-image-of-the-government--Anil-Deshmukh</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 24 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ डॉ.धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे कराड येथे रक्तदान  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Blood-donation-at-Karad-by-Dr-Dharmadhikari-Pratishthan</link>
            <description>सातारा : कोविड 19 या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर रेवदंडा ता.अलिबाग जि.रायगड येथील डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट (कराड ) व उपजिल्हा रुग्णालय (कराड ) यांच्या मागणीनुसार यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन ( नगर परिषद, कराड ) या ठिकाणी प्रतिष्ठानच्या 108 सदस्यांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान केले. तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या रक्तदानाने सुरूवात झाली. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सचिन धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी यांच्या नियोजनातून हे अभियान यापुढेही सुरूच राहणार आहे. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे डॉ.योगेश चव्हाण, कॉटेजचे डॉ.शहाजी शेळके यांनी या रक्तद</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-06-24/raktadanshibir.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सातारा : कोविड 19 या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर रेवदंडा ता.अलिबाग जि.रायगड येथील डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट (कराड ) व उपजिल्हा रुग्णालय (कराड ) यांच्या मागणीनुसार यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन ( नगर परिषद, कराड ) या ठिकाणी प्रतिष्ठानच्या 108 सदस्यांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान केले. तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या रक्तदानाने सुरूवात झाली. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सचिन धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी यांच्या नियोजनातून हे अभियान यापुढेही सुरूच राहणार आहे. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे डॉ.योगेश चव्हाण, कॉटेजचे डॉ.शहाजी शेळके यांनी या रक्तदान शिबीरासंदर्भात मार्गदर्शन केले. दरम्यान त्यांची संपुर्ण टीम यांचे सहकार्य लाभले. प्रतिकुल परिस्थितीतही आयोजित केलेले रक्तदान शिबीर व सदस्यांची शिस्तबध्दता यांचे त्यांनी कौतुक केले. प्रतिष्ठानतर्फे रक्तदानासह विविध समाजहितपयोगी उपक्रम राबवले जात असतात. दरम्यान या शिबीरास कराडच्या नगराध्यक्षा सौ.रोहिणी शिंदे, तहसिलदार अमरदिप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ.आबासाहेब पवार, राज्यसेवा परिक्षेत राज्यात प्रथम क्रमाकांने उत्तीर्ण झालेले उपजिल्हाधिकारी प्रसाद चौगुले यांनी उपस्थित राहून कार्याचे कौतुक केले.  मंगळवार दि. 23 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट व उपजिल्हा रुग्णालय कराडच्या मागणीनुसार 108 सदस्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन रक्तदान केले. यापुढेही गरज भासल्यास व शासनाने मागणी केल्यास प्रतिष्ठानच्या सदस्यांकडून रक्तदान केले जाईल असा विश्वास सदस्यांनी व्यक्त केला. रक्तदात्यांच्या आरोग्याची सर्व प्रकारे विशेष काळजी घेऊन तसेच फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करून हे रक्तदान शिबीर उत्तमरित्या पार पडले. दरम्यान या शिबिरासाठी सदस्यांचा उत्स्फुर्त सहभाग दिसुन येत होता.  कोविड 19 या जागतिक महामारीच्या पाश्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रक्तदानाचे आवाहन करत या आवाहनाला प्रतिसाद देत डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने आवश्यकतेनुसार ठिकठिकाणी रक्तदान उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. सध्या संपुर्ण जगभरात कोरोना महामारीचे संकट असताना रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे. या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपले योगदान देणे अत्यावश्यक आहे.कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट (कराड ) व उपजिल्हा रुग्णालय कराड यांच्या मागणीला प्रतिसाद देत रक्तदान शिबीर यशस्वीरित्या संपन्न झाले.  शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून प्रतिष्ठानच्या श्रीसदस्यांनी 108 रक्त पिशव्यांचे रक्तदान केले. सामाजिक बांधिलकी व समाजाप्रती असलेली कृतज्ञता ओळखून निरपेक्ष भावनेतून डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. श्रीसदस्यांची स्वयंशिस्त, निर्भिडपणा व सामाजिक अंतराचे पालन पाहून या उपक्रमाचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे. रक्तदान शिबिरादरम्यान शासनाच्या सर्व नियमांचे व सुचनांचे पालन करण्यात आले होते.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Blood-donation-at-Karad-by-Dr-Dharmadhikari-Pratishthan</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 12 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ तुकोबा आणि माऊलींची पालखी पंढरपूरकडे जाण्यास सज्ज ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Tukoba-and-Maulis-palkhi-ready-to-go-to-Pandharpur</link>
            <description>पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अखेर पुण्यातून तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखींच्या प्रस्थानास परवानगी मिळाली आहे. जिल्हा प्रशासनाने 50 वारकऱ्यांसह पालखी प्रस्थानास परवानगी दिली आहे. त्यामुळे दरवर्षी दिसणारा पालखी प्रस्थानाचा सोहळा यावेळी पुण्यात पाहायला मिळणार नाही. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी ही माहिती दिली. तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा 12 जूनला आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान 13 जूनला होणार आहे.कोरोनाचा संसर्ग लक्षात घेत प्रशासनाने पालखी प्रस्थानावर का</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-06-12/vitthalrukmini.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अखेर पुण्यातून तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखींच्या प्रस्थानास परवानगी मिळाली आहे. जिल्हा प्रशासनाने 50 वारकऱ्यांसह पालखी प्रस्थानास परवानगी दिली आहे. त्यामुळे दरवर्षी दिसणारा पालखी प्रस्थानाचा सोहळा यावेळी पुण्यात पाहायला मिळणार नाही. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी ही माहिती दिली. तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा 12 जूनला आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान 13 जूनला होणार आहे.कोरोनाचा संसर्ग लक्षात घेत प्रशासनाने पालखी प्रस्थानावर काही निर्बंध घातले आहेत. यानुसार संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला केवळ 50 लोकांच्या उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे. मंदिर परिसरात निर्देशांचे पालन करुन ही परवानगी देण्यात आली आहे. तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यास देहूतून शुक्रवारी (12 जून) पालखी प्रस्थान होईल. तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीतून प्रस्थान करतील. मंदिराला प्रदक्षिणा घालून सायंकाळी पालखी इनामदार वाड्यात जाईल. या सोहळ्यासाठी उपस्थितांच्या संख्येवर 50 वारकऱ्यांची मर्यादा बंधनकारक आहे. दशमीला पुढील निर्णयानुसार पालखी पंढरपूरला प्रस्थान करेल.ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यास आळंदीतून शनिवारी (13 जून) पालखी प्रस्थान होईल. मंदिरातून पादुकांचं पालखीतून प्रस्थान होणार आहे. मंदिराला प्रदक्षिणा घालून पालखी माऊलींच्या आजोळ घरी जाईल. या सोहळ्यास मंदिर परिसरात केवळ 50 वारकऱ्यांची उपस्थिती बंधनकारक असेल. यानंतर दशमीला पुढील निर्णयानुसार पालखी पंढरपूरला प्रस्थान करेल.देहू आणि आळंदी या तीर्थक्षेत्रांचा प्रतिबंधित क्षेत्रात समावेश नाही. या सोहळ्याला कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना बंधनकारक आहेत. उपस्थित सर्व वारकऱ्यांना मास्क स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे.दरम्यान, शेकडो वर्षांच्या दिंडीची परंपरा यावर्षी कोरोना संसर्गाच्या सावटाखाली सुरु राहणार की खंड पडणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, राज्य सरकारच्यावतीने स्वतः अजित पवार यांनी प्रशासनासह वारकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आणि मार्ग काढला. यात संसर्गाचा धोका लक्षात घेऊन सर्व ती खबरदारी घेण्याचं आश्वासन मिळाल्यावर प्रशासनाने वारकऱ्यांना काही अटी आणि शर्तींसह परवानगी दिली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Tukoba-and-Maulis-palkhi-ready-to-go-to-Pandharpur</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 09 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ केंद्रीय पथकाकडून कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Review-of-Corona-Prevention-Measures-by-Central-Squad</link>
            <description>पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनासह सर्वच यंत्रणा समन्वयाने काम करत असल्याचे समाधान व्यक्त करतानाच मृत्यूदर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे तसेच प्रतिबंधित क्षेत्रामधील निर्बंधांची कडक अंमलबजावणी केली जावी, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय पथकाचे प्रमुख केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाचे संयुक्त सचिव कुणाल कुमार यांनी केल्या. कोरोना प्रतिबंधासाठी दाट लोकवस्तीच्या क्षेत्रात स्वयंसेवकांची मदत घेण्याचेही त्यांनी सांगितले. पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी केन्द्रीय स्तरावरील पथक पुणे जिल्ह्यात आज सकाळीच दाखल झाले आहे. या केंद्रीय पथकाने आज पुण्यातील प्रतिबंधित क्षेत्र, हॉस्पिटल तसेच पुणे महानगरपालिका येथे भेट देऊन पाहणी केली तसेच विभागीय आयुक्त कार्यालयात कोविड 19 ची वाढती संख्या, साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना व त्या अनुषंगाने भविष्यात करावयाचे नियोजन याचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत एम्स नागपूर येथील डॉ. अरविंद कुशवाह व डॉ. सिती</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-06-09/kendriyapathak.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनासह सर्वच यंत्रणा समन्वयाने काम करत असल्याचे समाधान व्यक्त करतानाच मृत्यूदर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे तसेच प्रतिबंधित क्षेत्रामधील निर्बंधांची कडक अंमलबजावणी केली जावी, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय पथकाचे प्रमुख केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाचे संयुक्त सचिव कुणाल कुमार यांनी केल्या. कोरोना प्रतिबंधासाठी दाट लोकवस्तीच्या क्षेत्रात स्वयंसेवकांची मदत घेण्याचेही त्यांनी सांगितले. पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी केन्द्रीय स्तरावरील पथक पुणे जिल्ह्यात आज सकाळीच दाखल झाले आहे. या केंद्रीय पथकाने आज पुण्यातील प्रतिबंधित क्षेत्र, हॉस्पिटल तसेच पुणे महानगरपालिका येथे भेट देऊन पाहणी केली तसेच विभागीय आयुक्त कार्यालयात कोविड 19 ची वाढती संख्या, साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना व त्या अनुषंगाने भविष्यात करावयाचे नियोजन याचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत एम्स नागपूर येथील डॉ. अरविंद कुशवाह व डॉ. सितीकांता बॅनर्जी उपस्थित होते. तसेच बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनू गोयल, पिंपरी चिंचवड मनपाचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.सचिव कुणाल कुमार म्हणाले, पुणे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजना समाधानकारक आहेत, झोपडपट्टीच्या अथवा जास्त घरांची गर्दी असलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करावे. जेष्ठ नागरिक तसेच इतर आजार असलेल्या व्यक्तींची तातडीने तपासणी होणे आवश्यक आहे. उच्च रक्तदाब तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य आहे का तसेच त्यांचा औषधोपचार व्यवस्थित सुरू आहे, याबाबतही कायम आढावा घेण्यात यावा, याकामी त्याच परिसरातील वॉर्डनिहाय स्वयंसेवकांची नेमणूक करावी, जेणेकरून या कामात गती येईल व स्वयंसेवक त्याच भागातील असल्याने तातडीने उपाययोजना करणे सुलभ होईल असे सांगतानाच पल्स ऑक्सीमीटरचा वापर करण्यात यावा, संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्याबरोबरच अधिक चाचण्या करण्यावर भर देण्यात यावा. तसेच कोविड आणि नॉन कोविड रुग्णालयांमध्ये रुग्ण तपासणी करण्यात यावी. कोविड व्यतिरिक्त इतर रुग्णांना देखील उपचार मिळावेत यासाठी आवश्यक ते नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी केल्या.पुणे शहरात कोणत्या हॉस्पीटलमध्ये बेड उपलब्ध आहेत, याचे डॅशबोर्ड तयार करण्यात आले आहे, या डॅशबोर्डच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांना बेड उपलब्धतेची माहिती मिळणार आहे. बेड व्यवस्थापन यंत्रणा तसेच रुग्णवाहिका व्यवस्थापन यंत्रणा अत्यंत गतिमान करा असे सांगून पुणे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या, परिसरनिहाय रुग्ण, रुग्णांमध्ये असलेले विविध आजार,रुग्णांचे वर्गीकरण,कोरोनामुळे मृत्यू झालेले रुग्ण त्याची कारणे,प्रतिबंधित क्षेत्राचा तपशील, घरोघरी झालेले सर्व्हेक्षण, कोविड सेंटर, शासकीय तसेच खाजगी रुग्णालय स्थिती आदींचा आढावा घेण्यात आला. एम्स नागपूर येथील डॉ. अरविंद कुशवाह यांनीही सविस्तर माहिती दिली.विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागात तपासणी करण्यात आलेले नागरिक, यापैकी बाधित रुग्ण, मृत्यू झालेल्या नागरिकांची वैद्यकीय पार्श्वभूमी, बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या तसेच शासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्हा प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनेबाबतची माहिती दिली. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेऊन शहरातील सर्व रुग्णालये सक्षम केली आहेत. विविध पथके निर्माण करून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली असून सर्वेक्षण आणि चाचण्या करण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड व अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Review-of-Corona-Prevention-Measures-by-Central-Squad</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 08 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ विशेष पोलिस अधिकाऱ्यांच्या नेमणुकीचा उपक्रम यापुढेही सुरु ठेवण्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निर्देश ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Home-Minister-Anil-Deshmukh-has-directed-to-continue-the-process-of-appointment-of-special-police-officers</link>
            <description>पुणे : लॉकडाऊन कालावधीत पुणे शहर पोलिस आयुक्तालयाने पोलिसांच्या मदतीला 5 हजार 500 विशेष पोलिस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचा उपक्रम उत्कृष्ट असून यापुढेही हा उपक्रम सुरु ठेवावा, अशा सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या.कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊन कालावधीत पुणे, पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण पोलिस विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या व करण्यात येणाऱ्या विविध उपाय योजनांबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नुकतीच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतल्या, यावेळी ते बोलत होते.कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच नागरिकांना उपलब्ध करुन दिलेल्या सोयी – सुविधांबद्दल पुणे, पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण पोलिस विभागाचे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाचे देशमुख यांनी कौतुक केले. यावेळी पुणे पोलिस आयुक्तालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या “लोक भावनांचे सर्वेक्षण” या पुस्तिकेचे प्रकाशन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.बैठकीला पुण</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-06-08/anildeshmukh.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे : लॉकडाऊन कालावधीत पुणे शहर पोलिस आयुक्तालयाने पोलिसांच्या मदतीला 5 हजार 500 विशेष पोलिस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचा उपक्रम उत्कृष्ट असून यापुढेही हा उपक्रम सुरु ठेवावा, अशा सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या.कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊन कालावधीत पुणे, पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण पोलिस विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या व करण्यात येणाऱ्या विविध उपाय योजनांबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नुकतीच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतल्या, यावेळी ते बोलत होते.कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच नागरिकांना उपलब्ध करुन दिलेल्या सोयी – सुविधांबद्दल पुणे, पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण पोलिस विभागाचे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाचे देशमुख यांनी कौतुक केले. यावेळी पुणे पोलिस आयुक्तालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या “लोक भावनांचे सर्वेक्षण” या पुस्तिकेचे प्रकाशन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.बैठकीला पुण्याचे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम्, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई, जिल्हा पोलिस अधीक्षक (ग्रामीण) संदीप पाटील, पोलिस सह आयुक्त (शहर) डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, अपर पोलिस आयुक्त (पश्चिम विभाग) डॉ. संजय शिंदे, अपर पोलिस आयुक्त (पूर्व) सुनील फुलारी तसेच सर्व पोलिस उपायुक्त व पोलिस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.पोलिस आयुक्तालयाच्या वतीने पोलिसांच्या पाल्यांना शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी तांत्रिक सहाय्य करणाऱ्या बिझनेस बायजू एज्युकेशन टेक्नॉलॉजी कंपनीचे सहायक व्हाइस प्रेसिडेंट अरुणेश कुमार यांना प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला. तसेच लॉकडाऊन कालावधीत अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी डिजिटल पास आवश्यक होता. हा पास उपलब्ध करुन देण्यासाठी डिजिटल कार्यप्रणाली विकसित करणाऱ्या सायबेज सॉफ्टवेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण नथानी यांना प्रशस्तीपत्र देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.पुणे पोलिस आयुक्तालयाच्या वतीने निर्जंतुकीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या संजीवनी व्हॅन, तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सेल, मेडिकल मधून औषधे खरेदी करणाऱ्या ग्राहकांची माहिती घेवून याद्वारे कोविड संक्रमित रुग्ण शोधणे व कोरोना प्रतिबंधासाठी केलेल्या विविध उपाययोजनांचे देशमुख यांनी कौतुक केले. ते म्हणाले, पोलिसांनी माणुसकी जपून काम करणे गरजेचे आहे. राज्यात बऱ्याच पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलता दाखवून पोलिस विभागाची प्रतिमा उंचावली आहे, याचा अभिमान वाटतो, असे सांगून राज्यभरात चांगले काम करणाऱ्या पोलिसांची उदाहरणे दिली. तसेच ताडीवाला रोड व अन्य प्रतिबंधित क्षेत्राला भेट देवून नागरिकांशी संवाद साधला असता पोलिसांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यात चांगले काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाची छायाचित्रांसह माहिती संकलित करावी, जेणेकरुन महाराष्ट्र पोलिस विभागाच्या वतीने कॉफी टेबल बुक तयार करता येईल, असे ते म्हणाले. लॉकडाऊन कालावधीत चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, असे सांगून यापुढेही अफवा पसरवून समाजात भय, सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यां विरोधात कडक कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले.यावेळी पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी लॉकडाऊन कालावधीत शहर व ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या उपाययोजना, विद्यार्थी, कामगार व मजुरांच्या स्थलांतरणासाठी केलेल्या कामाची व जनजागृती साठी केलेल्या उपाययोजनांची माहिती सादरीकरणातून दिली.यावेळी उपस्थित वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी तसेच नागरिकांना उपलब्ध करुन दिलेल्या आवश्यक त्या सोयी सुविधा, स्थलांतरीत गरजूंना भोजनाचे व अन्नधान्याचे किट देणे, प्रवासाच्या परवानगीचे पासेस देणे, वाहनांची सुविधा देणे आदी विविध कामांची माहिती गृहमंत्री देशमुख यांना वरिष्ठ पोलिस अधिकारी व उपायुक्त यांनी दिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Home-Minister-Anil-Deshmukh-has-directed-to-continue-the-process-of-appointment-of-special-police-officers</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 07 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ लाॅकडाऊनमुळे मराठी बांधकाम मजुरांना आले 'अच्छे दिन' ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Good-day-for-Marathi-construction-workers-due-to-lockdown</link>
            <description>पुणे : लॉकडाऊनमध्ये अनेक ठिकाणांची बांधकामे बंद असल्याने परप्रांतीय मजूरआपल्या मूळ गावी निघून गेले आहेत. शासनाने निर्बंध उठवल्यानंतर इमारतींच्या बांधकामाला सुरुवात झाल्याने आता मराठी बांधकाम मजुरांना 'अच्छे दिन' आल्याचे दिसत आहे. लॉकडाऊनच्या अगोदर मिळणारी रोजंदारी आणि आता मिळणारी रोजंदारी यामध्ये तब्बल दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ होऊनही मजूर मिळत नसल्याचे चित्र आहे.पावसाळा तोंडावर आल्याने बांधकाम व्यवसाय</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-06-07/clabour.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे : लॉकडाऊनमध्ये अनेक ठिकाणांची बांधकामे बंद असल्याने परप्रांतीय मजूरआपल्या मूळ गावी निघून गेले आहेत. शासनाने निर्बंध उठवल्यानंतर इमारतींच्या बांधकामाला सुरुवात झाल्याने आता मराठी बांधकाम मजुरांना 'अच्छे दिन' आल्याचे दिसत आहे. लॉकडाऊनच्या अगोदर मिळणारी रोजंदारी आणि आता मिळणारी रोजंदारी यामध्ये तब्बल दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ होऊनही मजूर मिळत नसल्याचे चित्र आहे.पावसाळा तोंडावर आल्याने बांधकाम व्यवसायिकांनी वेगाने कामांना सुरुवात केली आहे. पाऊस सुरू झाल्यास पुन्हा कामांमध्ये अडथळा येईल म्हणून बांधकाम व्यवसायिक तातडीच्या कामांना प्राधान्य देत आहेत. त्यातच परप्रांतीय मजूर निघून गेल्याने मजुरांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध असणाऱ्या 'मराठी' बांधकाम मजुरांना बांधकाम व्यावसायिकांकडून प्रतिव्यक्ती दोनशे ते तीनशे रुपये वाढवून रोजंदारी दिली जात आहे. रोजंदारीमध्ये वाढ झाल्याने मजुरांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.वीस मजुरांच्या समूहाला स्लॅब भरण्यासाठी अगोदर 16 ते 18 हजार रुपये दिले जात होते. तेवढ्याच मजुरांच्या समूहाला आता 22 ते 25 हजार रुपये द्यावे लागत आहेत. मजूर मिळत नसल्याने वाढीव दर दिल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. घेतलेली कामं पूर्ण करून देणं आवश्यक आहे, असे पुण्यात एका बांधकामाच्या ठिकाणी सेंट्रींगचे काम करणारे ठेकेदाराने सांगितले.बांधकाम व्यवसाय अगोदरच मंदीच्या संकटात अडकलेला असताना आता पुढील काळात बांधकामासाठी मजूर मिळणं कठीण असणार आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायासमोर हे एक नवीन आव्हान उभं राहिलं आहे. परंतु मराठी कामगारांना बांधकाम व्यवसायामध्ये मोठी संधी निर्माण झाली आहे, असे बांधकाम व्यावसायिक सुभाष कोल्हे यांनी सांगितले.बांधकाम व्यवसायासह इतरही क्षेत्रांमध्ये मराठी कारागीर व इतर मजुरांना संधी निर्माण झाली आहे; ही संधी 'मराठी माणूस' कसा स्विकारतोय हे येणारा काळंच ठरवणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Good-day-for-Marathi-construction-workers-due-to-lockdown</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 07 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पुण्यात मद्यपींचा राडा ; माजी आमदार मेधा कुलकर्णी किरकोळ जखमी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Radha-of-alcoholics-in-Pune</link>
            <description>पुणे: कोथरूडमध्ये दारु पिऊन धिंगाणा घालणाऱ्या तरुणांना जाब विचारायला गेलेल्या भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी धक्काबुक्कीत जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. कुलकर्णी यांच्या हाताला किरकोळ जखम झाली असली तरी यावरुन कोथरुडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.येथील सहजातानंद सोसायटीच्या रोडवर शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजता हा प्रकार घडला. याठि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-06-07/medhak.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे: कोथरूडमध्ये दारु पिऊन धिंगाणा घालणाऱ्या तरुणांना जाब विचारायला गेलेल्या भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी धक्काबुक्कीत जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. कुलकर्णी यांच्या हाताला किरकोळ जखम झाली असली तरी यावरुन कोथरुडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.येथील सहजातानंद सोसायटीच्या रोडवर शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजता हा प्रकार घडला. याठिकाणी एक गृहस्थ आपल्या कुत्र्याला फिरवण्यासाठी घराबाहेर पडले होते. त्यावेळी सोसायटीच्या परिसरात अमर बनसोडे, विनोद गंदे, तेजस कांबळे आणि आणखी एक तरुण दारु पित होते. यावेळी कुत्रा त्यांच्या अंगावर भुंकला. तेव्हा तुम्ही आमच्या अंगावर कुत्रा सोडता काय, असे बोलत हे तरुण आक्रमक झाले. त्यांनी वाद घालायला सुरुवात केली. त्यामुळे संबंधित गृहस्थ घाईघाईने सोसायटीत निघून गेले. मात्र या तरुणांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना बाटली फेकून मारण्याचा प्रयत्न केला. त्यांचा आवाज ऐकून सोसायटीतील राहुल कोल्हे आणि विलास कोल्हे तरुणांना जाब विचारायला गेले. तेव्हा या तरुणांनी या दोघांनाही मारहाण केली. ही आरडाआरोड सुरु असताना मेधा कुलकर्णी त्याठिकाणी पोहोचल्या. त्यांनी आणि इतर लोकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता आम्ही तुमचा मुडदा पाडू, अशी धमकीच या तरुणांनी दिली. नशेत असलेले हे तरुण समोर येईल त्या प्रत्येकाला धक्काबुक्की करत होते. या झटापटीत मेधा कुलकर्णी यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली.यानंतर पोलिसांनी अमर बनसोडे, विनोद गंदे, तेजस कांबळे आणि मिथुन हरगुडे यांच्यावर मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आतापर्यंत दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Radha-of-alcoholics-in-Pune</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 30 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पायी वारी रद्द पण पादुका पोहोचणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Pai-Wari-canceled-but-Paduka-will-reach</link>
            <description>पुणे : कोरोना व्हायरसच्या साथीमुळे यावर्षी पहिल्यांदाच आषाढी वारीचा पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेला हा सो</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-05-30/ajitp12520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे : कोरोना व्हायरसच्या साथीमुळे यावर्षी पहिल्यांदाच आषाढी वारीचा पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेला हा सोहळा इतिसाहासात पहिल्यांदाच रद्द करावा लागतोय. मात्र माऊली आणि इतर संतांच्या पादुका श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी नेण्यात येणार आहेत. त्या कशा न्यायच्या यावर अजून निर्णय झालेला नाही. पादुका पंढरपुरात पोहोचवणं ही माझी जबाबदारी असेल अशी ग्वाही पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.पुण्यात आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वारकरी संप्रदायाच्या वतीने सहभागी झालेल्या सर्वांनी एकमताने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Pai-Wari-canceled-but-Paduka-will-reach</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 15 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत 30 मे नंतर अंतिम निर्णय   ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/-Ashadi-Wari-Palkhi-ceremony</link>
            <description>पुणे : कोरोनाची स्थिती पाहून 30 मे नंतर वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून देहू, आळंदी तसेच आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले. विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला आमदार सुनील शेळके, माजी आमदार उल्हास पवार, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे सदस्य सचिव सल्लागार विठ्ठल जोशी, देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधुकर महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-05-15/aashsadhiyatra.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे : कोरोनाची स्थिती पाहून 30 मे नंतर वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून देहू, आळंदी तसेच आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले. विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला आमदार सुनील शेळके, माजी आमदार उल्हास पवार, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे सदस्य सचिव सल्लागार विठ्ठल जोशी, देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधुकर महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. विकास ढगे पाटील, राजाभाऊ चोपदार, योगेश देसाई, अभय टिळक, विशाल मोरे, माणिक मोरे, संजय मोरे, सोपानदेव देवस्थानचे विश्वस्त तथा अध्यक्ष गोपाळ गोसावी, मनोज रणवरे, श्रीकांत गोसावी आदी उपस्थित होते.उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या आषाढी पायी वारीला वारकरी संप्रदायात ऐतिहासिक महत्त्व आहे. अनेक वर्षाची या वारीला परंपरा आहे. राज्यात कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेत पुढील पंधरा दिवसातील कोरोना स्थिती पाहून पुन्हा वारकरी सांप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून व विश्वासात घेऊनच अंतिम निर्णय घेण्यात येईल. आळंदी ते पंढरपूर व देहू ते पंढरपूर पालखी प्रस्थान स्वरूप कसे असावे, याबाबत आळंदी व देहू या दोन्ही संस्थान प्रमुखांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानुसार लॉकडाऊनचे स्वरूप पाहता श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांची पायी वारी व पालखी सोहळ्याच्या स्वरूपाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सोलापूर, सातारा व पंढरपूर येथील मान्यवरांची आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबतची मते विचारात घेतली जाणार आहेत. राज्य मंत्रिमंडळ बैठकीतही याबाबत चर्चा केली जाणार असून त्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे श्री. पवार यांनी स्पष्ट केले. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाची नियमावली, लॉकडाऊन स्थिती व सार्वजनिक आरोग्याचे रक्षण, दिंडी सोहळ्याचे स्वरूप कशा प्रकारे करावे, या बाबत शासन देत असलेल्या निर्णयानुसारच नियोजन करण्यात येईल, तसेच शासन जो निर्णय घेईल त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करू, असे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे-पाटील व देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधुकर महाराज मोरे यांनी सांगितले. सातारा जिल्हयाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगव्दारे बैठकीत सहभाग घेतला. या बैठकीमध्ये पालखी सोहळ्याचे स्वरूप, सहभागी वारकरी, सोशल डिस्टसिंग, प्रशासकीय यंत्रणेबाबतचे नियोजन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्याच्या आयोजनाबाबतचे पर्याय, पंढरपूर येथील नियोजन तसेच विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली. तसेच संस्थानच्या प्रमुख पदाधिका-यांनी केलेल्या सूचनांवर चर्चा करण्यात आली. यावेळी वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/-Ashadi-Wari-Palkhi-ceremony</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 11 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पुणे विभागात 33 हजार 273  क्विंटल अन्नधान्याची आवक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/33-thousand-273-quintals-of-foodgrains-in-Pune-division</link>
            <description>पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 33 हजार 273 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 109 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 4 हजार 397 क्विंटल फळांची </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-05-11/or115220.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 33 हजार 273 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 109 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 4 हजार 397 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक 18 हजार 869 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे. पुणे विभागात 10 मे रोजी 99.085 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 24.133  लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. उर्वरित दूध सुट्या स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.19 हजार 682 स्थलांतरित मजुरांची सोय लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 136 कॅम्प, कामगार विभागामार्फत 68 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 18 कॅम्प असे पुणे विभागात एकूण 222 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 19 हजार 682 स्थलांतरित मजूर असून 90 हजार 668 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/33-thousand-273-quintals-of-foodgrains-in-Pune-division</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 05 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पुण्यात परप्रांतीय मजुरांची गर्दी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Crowd-of-outside-state-workers-in-Pune</link>
            <description>पुणे : येथील वारजे पुलाखाली परप्रांतीय कामगारांनी गर्दी केली होती. त्यामुळे काहीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. सोशल डिस्टंसिंगला हरताळ फासला गेला होता. परप्रांतीय मजुरांनी नावे नोंदवण्यासाठी एकच गर्दी केली. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-05-05/95590281_105797507794656.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे : येथील वारजे पुलाखाली परप्रांतीय कामगारांनी गर्दी केली होती. त्यामुळे काहीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. सोशल डिस्टंसिंगला हरताळ फासला गेला होता. परप्रांतीय मजुरांनी नावे नोंदवण्यासाठी एकच गर्दी केली. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.परप्रांतीय कामगारांना आपल्या गावी परत जायचे आहे. हे लोक पुलाखाली मजूर अड्ड्यावर एकत्र आले. या कामगारांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळत होती. त्यातून गोंधळ सुरु झाला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून वातावरण शांत केले. उपद्रवी कामगारांना हुसकावून लावण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला.केंद्र सरकारने परराज्यातील नागरिकांना प्रवासासाठी परवानगी दिल्यानंतर उद्योगनगरी अर्थात पिंपरी चिंचवड मध्ये पास मिळवण्यासाठी पोलिस स्थानकाबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगला हरताळ फासला जात आहे. मेडिकल सर्टिफिकेट असूनही पोलिस परवानगी देत नसल्याचे नागरिक सांगत आहेत.दरम्यान, अकोला रेल्वे स्थानकावरुन सोमवारी संध्याकाळी विशेष श्रमिक रेल्वे गाडी लखनौसाठी रवाना झाली. अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिममधले एकूण बाराशे तीस परप्रांतीय मजूर या गाडीतून रवाना झाले. या गाडीतल्या सर्व प्रवाश्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Crowd-of-outside-state-workers-in-Pune</guid>
        </item>
    
     </channel>
    </rss>
     