
       <rss version="2.0" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"> 
        <channel>
        <title>ऑनलाईन रिपोर्टर....नातं विश्वासाचं...!</title>
        <atom:link href="http://theonlinereporter.com/RSS/MarathwadaNews" rel="self" type="application/rss+xml"/>
        <link>http://theonlinereporter.com</link>
        <description>The Online Reporter, a national news platform of India aimed at disseminating latest updates and information regarding crime, politics, lifestyle, entertainment, society etc. With Online Reporter you can catch up with the latest news, ताज्या मराठी बातम्या , online Live News, Daily News, local news, दैनिक बातम्या , स्थानिक बातम्या , News about India and more. Get latest news headings from Mumbai, Pashchim Maharashtra, Vidarbha, and the nation only at theonlinereporter.com</description>
        <lastBuildDate>Sat, 18 Apr 2026 08:48:48 GMT</lastBuildDate>
        <language>mr-IN</language>
    
        <item>
            <pubDate>Tue, 20 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सामान्यांना पिण्याचं पाणी नाही अन् आयुक्तांच्या वाढदिवसावर लाखोंची उधळपट्टी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Marathwada/no-drinking-water-for-common-people-and-extravagance-of-lakhs-on-Commissioners-birthday</link>
            <description>अधिकाऱ्यांचा शाही थाट अनेकदा पाहायला मिळतो. अशा शाही थाटमुळे अनेक अधिकाऱ्यांची अनेकदा चर्चा देखील पाहायला मिळाला आहे. आता अशीच काही चर्चा छत्रपती संभाजीनगरच्या मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांची पाहायला मिळत आहे. कारण छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी कार्यालयात सोमवारी जी श्रीकांत यांचा शाही पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून 2 लाख 43 हजारांची वर्गणी जमा केल्याची देखील चर्चा आहे. एकीकडे शहरातील अनेक भागात आठ ते दहा दिवसाला पिण्याचे पाणी मिळत आहे. त्यामुळे असे असतांना आयुक्तांनी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Marathwada/2023-06-20/CSN.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अधिकाऱ्यांचा शाही थाट अनेकदा पाहायला मिळतो. अशा शाही थाटमुळे अनेक अधिकाऱ्यांची अनेकदा चर्चा देखील पाहायला मिळाला आहे. आता अशीच काही चर्चा छत्रपती संभाजीनगरच्या मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांची पाहायला मिळत आहे. कारण छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी कार्यालयात सोमवारी जी श्रीकांत यांचा शाही पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून 2 लाख 43 हजारांची वर्गणी जमा केल्याची देखील चर्चा आहे. एकीकडे शहरातील अनेक भागात आठ ते दहा दिवसाला पिण्याचे पाणी मिळत आहे. त्यामुळे असे असतांना आयुक्तांनी असा शाही वाढदिवस साजरा करणे कितपत योग्य आहे अशी प्रतिकिया उमटत आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांचा सोमवारी वाढदिवस होता. आता आयुक्तांचाच वाढदिवस आहे म्हटल्यावर अधिकारी आणि कर्मचारी कामाला लागले. यासाठी स्मार्ट सिटी कार्यालयात रेड कार्पेट अथरण्यात आले, विशेष म्हणजे त्यावर गुलाबाच्या फुलांचा सडा टाकण्यात आला. तसेच शानदार फेटे, सुंदर रांगोळी काढण्यात आली. तर जेवणासाठी उत्तम पदार्थ तयार करण्यात आले होते. एवढंच काय तर आयुक्तांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अधिकाऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या. हा सगळा थाट आयुक्तांच्या वाढदिवसानिमित्ताने पाहायला मिळाल्याने अनेकांना धक्काच बसला. शहरात अनेक ठिकाणी विकास कामं ठप्प पडली आहे, शहरातील अनेक भागात आठ ते दहा दिवसाला पाणी मिळत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत लाखो रुपयांची उधळपट्टी करत आयुक्तांनी शाही वाढदिवस साजरा करणं कितपत योग्य आहे अशी चर्चा आता शहरभरात पाहायला मिळते.
छत्रपती संभाजीनगरचे मनपा आयुक्त जी श्रीकांत यांचा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. तर आयुक्तांना शुभेच्छा देण्यासाठी लातूरच्या एका एजन्सीने शहरात होर्डिंग्ज लावल्याचे देखील बोलले जात आहे. सोबतच महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून 2 लाख 43 हजारांची वर्गणी जमा करून आयुक्तांचा हा शाही वाढदिवस साजरा केला असल्याचं बोललं जात आहे.
मनपा आयुक्त जी श्रीकांत यांचा वाढदिवस असल्याने स्मार्ट सिटी आणि महानगरपालिकेची सर्वच यंत्रणा जणू कामाला लागली होती. स्मार्ट सिटी कार्यालयात रांगोळी काढण्यात आली. आयुक्तांसाठी विशेष केकची सोय करण्यात आली. एवढंच काय तर आयुक्त बसतात त्या कार्यालयात फुगे लावण्यात आले, टेबलावर बुके ठेवून कार्यालय सजवण्यात आले. त्यामुळे मनपा आयुक्त यांच्या वाढदिवसाची शहरात दिवसभर चर्चा होती.




 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Marathwada/no-drinking-water-for-common-people-and-extravagance-of-lakhs-on-Commissioners-birthday</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 16 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा : उच्च न्यायालय ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Marathwada/File-a-case-against-Indurikar-Maharaj-High-Court</link>
            <description>प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या अडचणी वाढण्यासाठी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा झटका दिला आहे. पुत्र प्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्याप्रकरणात प्रथम वर्ग न्यायाधीशांचा निकाल खंडपीठाने कायम ठेवला आहे. त्यामुळे आता औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानंतर इंदुरीकरांवर गुन्हा दाखल होणार आहे.

इंदुरीकर महाराज यांनी शिर्डीतील ओझर इथे आपल्या कीर्तनात सम तिथीला स्त्रीसंग </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Marathwada/2023-06-16/download (11).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या अडचणी वाढण्यासाठी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा झटका दिला आहे. पुत्र प्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्याप्रकरणात प्रथम वर्ग न्यायाधीशांचा निकाल खंडपीठाने कायम ठेवला आहे. त्यामुळे आता औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानंतर इंदुरीकरांवर गुन्हा दाखल होणार आहे.

इंदुरीकर महाराज यांनी शिर्डीतील ओझर इथे आपल्या कीर्तनात सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते अस वक्तव्य केलं होत. मात्र त्यांचे हे वक्तव्य गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असून PCPNDT कायद्याच्या कलाम 22 चे उल्लंघन असल्याचा आरोप त्याच्यावर झाला. त्यानुसार PCPNDT सल्लागार समितीने निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना नोटीस पाठवून खुलासा मागितला होता.

त्याच दरम्यान या प्रकरणात गुन्हा दाखल करावा म्हणून प्रथम वर्ग न्यायालयात 156 (3) याचिका करण्यात आली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र सत्र न्यायालयाने हा आदेश रद्द केला होता. या निर्णयाला याचिककर्त्याने औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. त्यावर सुनावणी करताना खंडपीठाने प्रथम वर्ग न्यायालयाचा निकाल कायम ठेवत सत्र न्यायालयाचा निकाल रद्द केला आहे. त्यामुळे आता खंडपीठाच्या आदेशानंतर इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.

स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्रीसंग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब, असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला. तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्षपू नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला, असे इंदुरीकर महाराज यांनी कीर्तनात म्हटले होते.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Marathwada/File-a-case-against-Indurikar-Maharaj-High-Court</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 23 Apr 2022 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ औरंगाबादमध्ये सभा घ्यायची असेल तर… राज ठाकरेंच्या सभेआधीच मनसेला पोलिसांची सूचना ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Marathwada/If-you-want-to-hold-a-meeting-in-Aurangabad-Police-notice-to-MNS-even-before-Raj-Thackeray-meeting</link>
            <description>महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेण्याची घोषणा केल्यानंतर या सभेसंदर्भातील तयारीला मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केलीय. असं असतानाच आता औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरेंच्या या नियोजित सभेची तारीख बदलण्याच्या सूचना केल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं सांगत पोलिसांनी रमझान ईदनंतर म्हणजेच ३ मे नंतर राज यांनी सभा घ्यावी असं सुचवलं आहे.

</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Marathwada/2022-04-23/rajthakre.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेण्याची घोषणा केल्यानंतर या सभेसंदर्भातील तयारीला मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केलीय. असं असतानाच आता औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरेंच्या या नियोजित सभेची तारीख बदलण्याच्या सूचना केल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं सांगत पोलिसांनी रमझान ईदनंतर म्हणजेच ३ मे नंतर राज यांनी सभा घ्यावी असं सुचवलं आहे.

नियोजित जागी सभा घ्यायची असल्यास तारीख बदलण्याची सूचना पोलिसांकडून करण्यात आलीय. रमजानच्या आधी राज यांची सभा झाली आणि त्यांनी काही आवाहन केल्यास तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत ही सभा रमजान ईदनंतर घ्यावी ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, असा पोलिसांचा प्रयत्न आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त औरंगाबादमधील ऐतिहासिक मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर राज यांची सभा घेण्यासाठी मनसेचे पदाधिकारी आग्रही आहेत. या सभेसाठी एका लाखांहून अधिक लोक जमतील अशी अपेक्षा मनसेकडून व्यक्त करण्यात आलीय. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव ही सभा शहरामधील गरवारे स्टेडियमवर घेण्यासंदर्भातील चाचपणी पोलिसांकडून केली जात असल्याची माहिती समोर आलीय. पण मनसेचे पदाधिकारी याच मैदानामध्ये सभा घेण्याबद्दल आग्रही असल्याने तारीख बदलण्याची सूचना पोलिसांनी केलीय.

शहरामधील इतर ठिकाणांचीही चाचपणी केली जात असून पर्यायी ठिकाण शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र राज यांनी घोषणा केल्याप्रमाणा मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरच ही भव्य सभा घेतली जाईल यावर मनसेचे पदाधिकारी आग्रही आहेत. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा विचार करुन ही सभा पुढे ढकलण्याचा किंवा दुसऱ्या ठिकाणी घेण्यात यावी यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. सभा नियोजित ठिकाणीच घ्यायची असेल तर तारीख बदला आणि सभा रमजान ईद नंतर घ्या किंवा सभेचं ठिकाण बदला अशी पोलिसांची भूमिका आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Marathwada/If-you-want-to-hold-a-meeting-in-Aurangabad-Police-notice-to-MNS-even-before-Raj-Thackeray-meeting</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 23 Sep 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शोषित, पीडित, उपेक्षितांवरील अत्याचार सहन करणार नाही बसपा प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांचा महाविआ सरकारला इशारा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Marathwada/-BSP-state-president-Sandeep-Tajne-warns-Mahavikas-Aghadi-government-not-to-tolerate-atrocities-on-exploited,-victims-and-neglected</link>
            <description>गेल्या अनेक दशकांपासून समाजातील प्रस्थांच्या दबावाखाली पिचले गेलेले शोषित,पीडित, उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्याचे मानवतावादी कार्य बहुजन समाज पार्टी करीत आहे. अशात या बांधवांवरील अत्याचार पार्टी कदापिही सहन करणार नाही, असा इशारा बसपाचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी गुरूवारी महाविकास आघाडी सरकारला दिला.परभणी शहरात संवाद यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमातून त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.

परभणी जिल्ह्यात तब्बल १०० हून अधिक अँक्ट्रोसिटी चे गंभीर गुन्हे दाखल आहे. अनेक प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल होवू नये याकरिता पीडितांवर राजकीय तसेच प्रशासकीय स्तरावर दबाव आणला जातो. अशात राजकीय बळावर प्रशासनाच्या वरदहस्ताने होणारे अत्याचार थांबवण्याचे कार्य बसपा करणार आहे, असे अँड.ताजने यांनी स्पष्ट केले. उपेक्षितांना पुन्हा मुख्य प्रवाहाच्या बाहेर लोटणाऱ्यांच्या विरोधात बसपा आक्रमक </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Marathwada/2021-09-23/Adv_Tajne BSP.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[गेल्या अनेक दशकांपासून समाजातील प्रस्थांच्या दबावाखाली पिचले गेलेले शोषित,पीडित, उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्याचे मानवतावादी कार्य बहुजन समाज पार्टी करीत आहे. अशात या बांधवांवरील अत्याचार पार्टी कदापिही सहन करणार नाही, असा इशारा बसपाचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी गुरूवारी महाविकास आघाडी सरकारला दिला.परभणी शहरात संवाद यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमातून त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.

परभणी जिल्ह्यात तब्बल १०० हून अधिक अँक्ट्रोसिटी चे गंभीर गुन्हे दाखल आहे. अनेक प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल होवू नये याकरिता पीडितांवर राजकीय तसेच प्रशासकीय स्तरावर दबाव आणला जातो. अशात राजकीय बळावर प्रशासनाच्या वरदहस्ताने होणारे अत्याचार थांबवण्याचे कार्य बसपा करणार आहे, असे अँड.ताजने यांनी स्पष्ट केले. उपेक्षितांना पुन्हा मुख्य प्रवाहाच्या बाहेर लोटणाऱ्यांच्या विरोधात बसपा आक्रमक भूमिका घेणार आहे. पार्टी शोषित, पीडितांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. जिल्ह्यात कुठल्याही ठिकाणी असे प्रकार घडत असल्याचे समोर आल्यास बसपाचा कार्यकर्ता धावून येईल,असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला.

शोषितांवर होणाऱ्या अत्याचारासह शहर,ग्रामीण भागात पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने सर्वसामान्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे.शहरी भागात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत असल्याने सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आले आहे. दलित वस्त्यांमध्ये पावसाच्या पाण्याचा शिरकाव होत असल्याचे रोगराई पसरण्याची टांगती तलवार त्यांच्यावर लटकत आहे.अशात प्रशासनाने या समस्येची योग्य दखल घेतली नाही, तर बसपाकडून आंदोलन केले जाईल, असे ते म्हणाले. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वीज जोडणीचे काम अपुर्ण आहे. ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी त्यामुळे वीज पोहचलेली नाही, अशी खंत अँड.ताजने यांनी व्यक्त केली.

शहरात वाहतूक सिंग्नलची यंत्रणा कार्यान्वित नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पार्किंगची देखील व्यवस्था नसल्याने वाहतूक कोंडी होत असल्याने सर्वसामान्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. शहरातील सर्व महापुरूषांच्या पुतळ्यांचे सुशोभिकरण करावे, अशी मागणी बसपाकडून करण्यात आली आहे. पोलीस यंत्रणेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ग्रामीण तसेच शहरी भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्या रूग्णालयातील क्ष किरण तसेच इतर महत्वाच्या मशीन बंद असल्यामुळे गरीब, गरजू रूग्णांची हेळसांड होत आहे. खासगी रूग्णालयांमध्ये जादाचे पैसे मोजून या रूग्णांना त्यांचा तपासण्या करून घ्यावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे देखील अँड.ताजने म्हणाले.

कार्यक्रमात प्रदेश प्रभारी मा.प्रमोद रैना साहेब यांच्यासह प्रदेश महासचिव दिगंबर डोले, प्रदेश सचिव गंगाधर पोळ, प्रदेश सदस्य भीमराव जोंधळे, झोन प्रभारी देवराव दादा खंदारे, जिल्हा प्रभारी जाफर खान,युवराज सूर्यतळे,राजेंद्र घनसावंत,जिल्हा अध्यक्ष गौतम उजगरे, जिल्हा उपाध्यक्ष अनंता दिपके,
महासचिव मोबिन खान, सचिव राजेश केंदळे, प्रसेनजीत मस्के तसेच जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित होते.

ओबीसींचे राजकीय हक्क बसपात सुरक्षित-रैना
इतर मागासवर्गीयांच्या राजकीय आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने इम्पेरिकल डेटा केंद्र सरकारकडे मागितला होता. पंरतु, केंद्र सरकारने हा डेटा देण्यास नकार दिला आहे. राज्य आणि केंद्र सरकारमधील भांडणात मात्र ओबीसी बांधव भरडले जात आहे. बहुजन समाज पार्टीतच ओबीसींचे राजकीय तसेच इतर आरक्षण सुरक्षित आहे, असा दावा प्रदेश प्रभारी प्रमोद रैना यांनी केला. केंद्रातील भाजप सरकार तसेच राज्यातील महाविकास आघाडी आरक्षण विरोधी आहे. दोघांची एकमेकांसोबत असलेली छुपी यूती सर्वसमाजाकरीता धोक्याची घंटा आहे. अशात या सरकारला धडा शिकवण्यासाठी ओबीसी बांधवांनी बसपाच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावे,असे आवाहन रैना यांनी यानिमित्त केले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Marathwada/-BSP-state-president-Sandeep-Tajne-warns-Mahavikas-Aghadi-government-not-to-tolerate-atrocities-on-exploited,-victims-and-neglected</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 19 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बिलोली प्रकरणात दोषींवर ॲट्रॉसिटी कलमांतर्गत कठोर कारवाई – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Marathwada/Strict-action-under-Atrocities-Clause-on-convicts-in-Biloli-case</link>
            <description>नांदेड (जिमाका) :- बिलोली येथील मूकबधीर दिव्यांग पीडितेवर झालेला अत्याचार हा मानवतेला काळिमा फासणारा आहे. या पीडितेच्या कुटुंबाला न्याय देण्याबरोबरच दोष</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Marathwada/2021-01-19/ramdasaathvle.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नांदेड (जिमाका) :- बिलोली येथील मूकबधीर दिव्यांग पीडितेवर झालेला अत्याचार हा मानवतेला काळिमा फासणारा आहे. या पीडितेच्या कुटुंबाला न्याय देण्याबरोबरच दोषींविरुद्ध ॲट्रॉसिटी कलमांतर्गत कठोर कारवाई करु अशी नि:संदिग्ध ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.

बिलोलीला रवाना होण्यापूर्वी त्यांनी शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील विविध सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा आढावा घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Marathwada/Strict-action-under-Atrocities-Clause-on-convicts-in-Biloli-case</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 18 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ क्रांती चौक येथील सायकल ट्रॅकचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Marathwada/Tourism-Minister-Aditya-Thackeray-inaugurates-the-cycle-track-at-Kranti-Chowk</link>
            <description>औरंगाबाद: मनपा व स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आलेल्या क्रांती चौक ते गोपाळ टी चौकापर्यंत तयार झालेल्या सायकल ट्रॅकचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्री. ठाकरे यांनी एकनाथ रंग मंदिर रस्त्याचा दर्जा व कामाची पाहणी करत रस्ता नियोजित वेळेत पूर्ण करण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या.

यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खा. इम्तियाज जलील, आ.अंबादास </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-18/athakre.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[औरंगाबाद: मनपा व स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आलेल्या क्रांती चौक ते गोपाळ टी चौकापर्यंत तयार झालेल्या सायकल ट्रॅकचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्री. ठाकरे यांनी एकनाथ रंग मंदिर रस्त्याचा दर्जा व कामाची पाहणी करत रस्ता नियोजित वेळेत पूर्ण करण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या.

यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खा. इम्तियाज जलील, आ.अंबादास दानवे, आ. संजय शिरसाट, माजी खासदार चंद्रकांत खैरे, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच मनपा आयुक्त आणि प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉ. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्यासह सायकल संघटनेचे अध्यक्ष व आयर्नमॅन असलेले नितिन घोरपडे व सायकलपटु यांची उपस्थिती होती.

यावेळी श्री. ठाकरे, श्री. देसाई, श्री. जलील, श्री. पांडेय यांनी सायकल पटूंसह सायकल ट्रॅकरवर सायकल चालविण्याचा आनंद घेतला. यावेळी श्री. घोरपडे यांनी सायकल ट्रॅक बनविल्याबद्दल प्रशासनाचे आभार व्यक्त केले. तसेच सायकल ट्रॅक हा पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा असून जास्तीत-जास्त नागरिकांनी सायकल चालविण्यासाठी या ट्रॅकचा वापर करावा असे आवाहनही केले.


औरंगाबाद शहर आता सी.सी.टि.व्ही.च्या निगराणीखाली

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालयातील Command Control केंद्राचे उद्घाटन पार पडले. या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरात सातशे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्याच्या सहाय्याने शहरातील गुन्हेगारीवर तसेच इतर घटनांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. हे सर्व कॅमेरे अद्ययावत यंत्रणेने सुसज्ज असे आहेत आणि ते स्वयंचलित आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्ण शहराचे नियंत्रण करण्यात येणार असल्याने पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी या केंद्राचे कौतुक देखील केले.

यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आ. अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच मनपा आयुक्त आणि प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉ. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय आदी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Marathwada/Tourism-Minister-Aditya-Thackeray-inaugurates-the-cycle-track-at-Kranti-Chowk</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 02 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ काँग्रेसचा औरंगाबाद नामांतराला विरोधच-अशोक चव्हाण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Marathwada/Congress-firm-on-opposition-of-renaming-Aurangabad-says-Ashok-Chavan</link>
            <description>जालना: काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरुन काँग्रेसची भूमिका आज शनिवारी थेटपणे मांडली. या मुद्यावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये कुठलीही नुरा कुस्ती सुरु नसून, औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसचा विरोधच आहे, अस</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Marathwada/2021-01-02/achavan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[जालना: काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरुन काँग्रेसची भूमिका आज शनिवारी थेटपणे मांडली. या मुद्यावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये कुठलीही नुरा कुस्ती सुरु नसून, औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसचा विरोधच आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
जालना येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, औरंगाबादचे नामांतर करणे, हा महाविकासआघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही.  या नामांतराला आमचा विरोधच आहे. आम्ही या मुद्द्यावरुन भाजपा आणि एमआयएमसोबत थेट कुस्ती खेळायला तयार आहोत!
औरंगाबादचे नामांतर हा केवळ स्थानिक पातळीवरचा मुद्दा असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत कुठलेही वक्तव्य केलेले नाही, असेही यावेळी अशोक चव्हाण म्हणाले.
दरम्यान,  काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या विपरित भूमिका घेतली आहे.
औरंगाबादचे नामांतर करणे, हा शिवसेनेचा जुना अजेंडा आहे, असे निरुपम यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले. राज्यात सध्या तीन पक्षांचे सरकार आहे, हे शिवसेनेने लक्षात ठेवावे, असे निरुपम यावेळी म्हणाले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Marathwada/Congress-firm-on-opposition-of-renaming-Aurangabad-says-Ashok-Chavan</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 19 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्र्यांचा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Marathwada/Minister-of-Medical-Education-and-Cultural-Affairs-interacts-with-affected-farmers</link>
            <description> लातूर : लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात  अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार  यांच्यासह पाहणी केली. </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Marathwada/2020-10-19/nuksangrasta-shetkari.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ लातूर : लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात  अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार  यांच्यासह पाहणी केली. उमरगा तालुक्यातील कवठा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना राज्य शासन आपल्या पाठीशी आहे काळजी करू नका असा धीर दिला.

यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे,माजी मंत्री मधुकरराव चव्हाण,उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,माजी मंत्री बसवराज पाटील,आमदार ज्ञानराज चौगुले,आमदार बाबासाहेब पाटील,माजी आमदार राहुल मोटे, उस्मानाबाद राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे   जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार,बसवराज पाटील नागराळकर, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, लातूरचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत,पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन,किरण रवींद्र गायकवाड,मकरंद सावे,कृषी, महसूल विभागाचे संबंधित अधिकारी सोबत होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Marathwada/Minister-of-Medical-Education-and-Cultural-Affairs-interacts-with-affected-farmers</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 17 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सत्तेत असो किंवा नसो, मी मराठा आरक्षणाच्या कायम बाजूनेच : धनंजय मुंडे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Marathwada/I-am-always-on-the-side-of-Maratha-reservation</link>
            <description>सत्तेत नसताना व असताना देखील मराठा आरक्षण आंदोलनात मी सक्रिय सहभाग घेत कायम आ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Marathwada/2020-09-17/dhananjay_munde_maratha-reservation.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सत्तेत नसताना व असताना देखील मराठा आरक्षण आंदोलनात मी सक्रिय सहभाग घेत कायम आरक्षणाच्या बाजूने राहिलो आहे;  राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूनेच असून मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकावे यासाठी सर्वशक्तीनिशी प्रयत्न केले जातील असे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Marathwada/I-am-always-on-the-side-of-Maratha-reservation</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 14 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  संवर्धनाचे कार्य करणाऱ्या लोकलावंताचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावू : अमित देशमुख ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Marathwada/-Let--solve-all-the-problems-of-the-people-working-for-conservation-immediately--Amit-Deshmukh</link>
            <description>लातूर  :  समाज जागृती आणि संस्कृती संवर्धनाचे कार्य करणाऱ्या लोकलावंताचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील असे आश्वासन अखिल भारतीय मराठी तमाशा परिष</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Marathwada/2020-09-14/WhatsApp Image 2020-09-14 at 5.30.11 AM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[लातूर  :  समाज जागृती आणि संस्कृती संवर्धनाचे कार्य करणाऱ्या लोकलावंताचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील असे आश्वासन अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेच्या शिष्टमंडळाला राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री  तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित  देशमुख यांनी दिले आहे.

कोविड१९ पार्श्वभूमीवर तमाशा (लोकनाट्य) क्षेत्राला विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यासंदर्भात अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेच्या शिष्टमंडळाने सोमवारी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित  देशमुख यांची बाभळगाव निवासस्थानी भेट घेऊन  विविध मागण्यांचे निवेदन दिले.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Marathwada/-Let--solve-all-the-problems-of-the-people-working-for-conservation-immediately--Amit-Deshmukh</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 05 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पंकजाताई मुंडे यांनी स्वहस्ते रेखाटले प्रभू रामचंद्रांचे चित्र ! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Marathwada/Pankajatai-Munde-drawn-sketch-of-Lord-Ramchandra</link>
            <description>बीड : मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांची जन्मभूमी असलेल्या अयोध्या येथे आज  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीराम यांच्या भव्यदिव्य मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक जण या ऐतिहासिक आनंदी क्षणात श्रद्धेने सहभागी होत आहेत. माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी अनोख्या पद्धतीने आपली श्रद्धा प्रकट केली आहे. उपजतच चित्रकले</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Marathwada/2020-08-06/pankajaMdrawing.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[बीड : मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांची जन्मभूमी असलेल्या अयोध्या येथे आज  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीराम यांच्या भव्यदिव्य मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक जण या ऐतिहासिक आनंदी क्षणात श्रद्धेने सहभागी होत आहेत. माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी अनोख्या पद्धतीने आपली श्रद्धा प्रकट केली आहे. उपजतच चित्रकलेची आवड जोपासत त्यांनी प्रभु श्रीरामाचे स्वहस्ते सश्रद्ध  चित्र साकारत त्यांना कलात्मक नमन केले आहे.

अयोध्येत प्रभू श्रीराम यांचे भव्यदिव्य मंदिर असावे ही आस्था आज प्रत्यक्षात साकारली जात आहे. अनेक वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर समस्त देशवासीयांचे स्वप्न या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने पूर्ण होत आहे. राम मंदिर भूमिपूजनाच्या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त सर्वांना  शुभेच्छा व्यक्त करतांना पंकजाताई मुंडे यांनी अनोख्या पद्धतीने आपली श्रद्धा प्रकट केली आहे. नेहमीच काही तरी विशेष व अनोखी संकल्पना मांडणाऱ्या पंकजाताई यांनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊन परिस्थितीत आपला चित्रकलेचा व्यासंग विकसित केला आहे. यापुर्वीही त्यांनी रेखाटन केलेल्या चित्रावरुन मोठी चर्चा घडली होती.श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार्श्वभुमीवर पंकजाताईंच्या भावविश्वातील प्रभु श्रीरामाचे सुरेख व विलोभनीय चित्र साकारले आहे.या माध्यमातून भुमीपुजन सोहळ्याला त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या असून या चित्राखाली त्यांनी “Trying to put my trust through brush to bow down to the maryada purushottam “shree ram”.. big day today ..” असे लिहीत मर्यादापुरुषोत्तम प्रभु श्रीराम चरणी नमन केले आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Marathwada/Pankajatai-Munde-drawn-sketch-of-Lord-Ramchandra</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 26 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ केंद्राने दिलेली मदत अजून राज्यात आलेली दिसत नाही- शरद पवार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Marathwada/The-help-given-by-the-Center-has-not-come-to-the-state-yet--Sharad-Pawar</link>
            <description>औरंगाबाद : केंद्राने दिलेली मदत अजून राज्यात आलेली दिसत नाही तरी देखील आता उद्योगधंदा कसा सुरू होईल याकडे लक्ष द्यायला हवे. जसा आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे तसाच राज्याचा आर्थिक प्रश्नही महत्त्वाचा असून राज्याची आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी औद्योगिक क्षेत्र सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. 
औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाचा पालकमंत्री सुभाष देसाई व आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Marathwada/2020-07-26/shardp.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[औरंगाबाद : केंद्राने दिलेली मदत अजून राज्यात आलेली दिसत नाही तरी देखील आता उद्योगधंदा कसा सुरू होईल याकडे लक्ष द्यायला हवे. जसा आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे तसाच राज्याचा आर्थिक प्रश्नही महत्त्वाचा असून राज्याची आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी औद्योगिक क्षेत्र सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. 
औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाचा पालकमंत्री सुभाष देसाई व आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत शरद पवार यांनी आढावा घेतला.
कोरोना संकटावर मात करायची तर सर्वांनी एकत्र लढले पाहिजे. देशातील साधारण पाच-सहा राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला दिसत आहे त्यापैकी महाराष्ट्र राज्य महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, कल्याण, डोंबिवली, औरंगाबाद या भागातील परिस्थिती काळजी करण्यासारखी आहे असेही शरद पवार म्हणाले. 
कोरोना लॉकडाऊन काळात स्थानिक लोकांनी अनेक सण साधेपणाने साजरे करून सर्व समाजाला एक उत्तम उदाहरण दिले आहे. प्रादुर्भावाचा डबलिंग रेट हा १४ दिवसावरून ३० दिवसावर जाणे ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे इथली परिस्थिती सुधारण्यासाठी स्थानिकांची नक्कीच मदत मिळेल असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.
कोरोना संकटावर मात करण्यासाठी डॉक्टर, जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी इतकेच नाही तर खुद्द मुख्यमंत्र्यांनीही यात जबाबदारीने लक्ष घातले आहे. मात्र लोकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. ज्या सूचना सरकार करत आहे त्याचे काटेकोर पालन जनतेकडून होताना दिसत आहे अशा शब्दात जनतेचे कौतुकही शरद पवार यांनी केले.
खासगी डॉक्टर रुग्णसेवा देण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यासाठी जिल्ह्याच्या यंत्रणेला डिझॅस्टर मॅनेजमेंट कायदा आहे त्यातील अधिकारांचा वापर करून खासगी डॉक्टरांना समन्स पाठवण्याचा विचार करावा लागेल अशी शक्यता शरद पवार यांनी व्यक्त केली. 
मालेगाव, धारावीचे उदाहरण आपल्यासमोर आहे. जे सहकार्य तिथल्या लोकांनी केले तसेच सहकार्य औरंगाबाद शहरातील जनताही करेल आणि संकटावर मात करेल अशी खात्री शरद पवार यांनी व्यक्त केली.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Marathwada/The-help-given-by-the-Center-has-not-come-to-the-state-yet--Sharad-Pawar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 22 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सामान्य शेतकरी बनून कृषिमंत्री जेव्हा कृषि निविष्ठांच्या दुकानात जातात.. ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Marathwada/When-an-agriculture-minister-becomes-an-ordinary-farmer-he-goes-to-the-shop-of-agricultural-inputs</link>
            <description>औरंगाबाद : शेतकऱ्यांना खते, बियाणे मिळताहेत की नाही हे पाहण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे आज स्वत: शेतकरी बनून औरंगाबाद येथील एका दुकानात गेले. खते शिल्लक असतानाही दुकानदाराने देण्यास नकार दिल्यानंतर कृषिमंत्र्यांनी जिल्हा कृषि अधीक्षकांमार्फत त्या दुकानाचा आणि गोदामाचा पंचनामा केला. औरंगाबाद येथील कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे निर्देशही कृषिमंत्र्यांनी दिले.खतांचा साठा मुबलक असतानाही जर दुकानदार शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा देणार नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाईचा इशा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Marathwada/2020-06-22/krushimantri.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[औरंगाबाद : शेतकऱ्यांना खते, बियाणे मिळताहेत की नाही हे पाहण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे आज स्वत: शेतकरी बनून औरंगाबाद येथील एका दुकानात गेले. खते शिल्लक असतानाही दुकानदाराने देण्यास नकार दिल्यानंतर कृषिमंत्र्यांनी जिल्हा कृषि अधीक्षकांमार्फत त्या दुकानाचा आणि गोदामाचा पंचनामा केला. औरंगाबाद येथील कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे निर्देशही कृषिमंत्र्यांनी दिले.खतांचा साठा मुबलक असतानाही जर दुकानदार शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा देणार नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाईचा इशारा देतानाच गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांनी जिल्ह्यांमध्ये अधिक प्रभावीपणे कारवाई करायची गरज असल्याचे कृषिमंत्री श्री.भुसे यांनी सांगितले.औरंगाबाद येथे युरिया मिळत नसल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. त्याची दखल घेत कृषीमंत्री श्री.भुसे यांनी आज दुपारी औरंगाबाद शहराला अचानक भेट दिली. जिल्हा यंत्रणेला न कळवता ते थेट बाजार समितीच्या आवारातील नवभारत फर्टीलायझर या दुकानात स्वत: कृषिमंत्री सामान्य शेतकरी म्हणून गेले. त्यांनी दुकानदाराकडे 10 गोणी युरिया मागितला. त्यावर युरिया शिल्लक नसल्याचे दुकानदाराने सांगितले. 10 ऐवजी पाच गोण्यांची मागणी केल्यावरही दुकानदाराने युरिया दिला नाही.दुकानामध्ये शिल्लक साठ्याच्या फलकावर युरीया शिल्लक असल्याचे निदर्शनास आणून देतानाच स्टॉक रजिस्टरची मागणी कृषिमंत्र्यांनी केली. ते घरी असल्याचे दुकानदाराने सांगितले. त्यानंतर कृषिमंत्र्यांनी जिल्हा कृषि अधीक्षकांना दुकानात बोलावून घेतले. युरिया शिल्लक असतानाही तो शेतकऱ्यांना दिला जात नाही यावर कृषिमंत्री श्री.भुसे यांनी तीव्र नाराजी दर्शविली. दुकानाचा आणि गोदामाचा पंचनामा केल्यानंतर दुकानात युरीयाच्या 1386 पिशव्या शिल्लक असल्याचे आढळून आले. या दुकानदारावर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.या प्रकाराने व्यथीत झालेल्या कृषिमंत्र्यांनी औरंगाबाद येथील गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या सूचना दिल्या आणि दुकानातूनच कृषि विभागाच्या सचिवांना दूरध्वनीकरून यंत्रणांनी अधिक प्रभावी कार्यवाही करण्याची गरज असल्याच्या सूचनाही दिल्या. राज्यभरातील कृषि निविष्ठा दुकानदारांनी शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचीच खते, बियाणे घेण्याची सक्ती करू नये, शिल्लक असतानाही युरिया शेतकऱ्यांना न देणे याबाबी खपवून घेतल्या जाणार नाही, अशा इशाराही कृषिमंत्र्यांनी दिला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Marathwada/When-an-agriculture-minister-becomes-an-ordinary-farmer-he-goes-to-the-shop-of-agricultural-inputs</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 20 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ लातूर येथील शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या अधिष्ठात्यांना कारणे दाखवा नोटीस ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Marathwada/Show-cause-notice-to-the-deans-of-Government-Medical-Sciences-Institute,-Latur</link>
            <description>मुंबई : लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णाला महागडे औषध बाहेरून आणण्याची शिफारस केल्याने वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी वैद्यकीय शिक्षण संचालकांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.राज्यात कोवि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Marathwada/2020-06-20/gmclatur.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णाला महागडे औषध बाहेरून आणण्याची शिफारस केल्याने वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी वैद्यकीय शिक्षण संचालकांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.राज्यात कोविड विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक रुग्ण उपचारासाठी येत आहेत. या सर्व रुग्णांवर शासकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे मात्र असे असूनही कोविड उपचारासाठी आवश्यक असलेले Tossilizumab हे महागडे औषध लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयातून रुग्णास बाजारातून विकत आणण्यास सांगण्यात आले. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी या घटनेची गंभीर दखल घेतल्याने वैद्यकीय शिक्षण संचालकांनी अधिष्ठाता त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.लातूर येथे घडलेली ही बाब अतिशय गंभीर असून शासनाच्या आदेशाचे आणि धोरणाचे उल्लंघन करणारी आहे त्यामुळे अधिष्ठाता यांच्याविरुद्ध साथरोग अधिनियम तसेच महाराष्ट्र नागरी सेवा नियमा नुसार शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये याचे स्पष्टीकरण तीन दिवसात मागितले आहे.या घटनेमुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या संबंधित रुग्णाची गैरसोय झाली असून अशा घटना पुनश्च घडणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले असून या रुग्णावरील उपचाराचा सर्व खर्च शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार शासनामार्फतच करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Marathwada/Show-cause-notice-to-the-deans-of-Government-Medical-Sciences-Institute,-Latur</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 12 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ब्रेकिंग : सामाजिक न्याय मंत्र्यांना कोरोनाची लागण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Marathwada/Breaking-Corona-infection-in-social-justice-ministers</link>
            <description>बीड : कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाचा फटका सरकारमधील मंत्री आणि मंत्रालयाला देखील बसला आहे. आता महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यांच्यासह त्यांच्या पाच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Marathwada/2020-06-12/coronaupdate.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[बीड : कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाचा फटका सरकारमधील मंत्री आणि मंत्रालयाला देखील बसला आहे. आता महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यांच्यासह त्यांच्या पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात त्यांचे दोन स्वीय सहाय्यक, मुंबईतील वाहन चालक, स्वयंपाकी, बीडचा वाहन चालक यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे 'त्या' मंत्र्यासह कोणत्याही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लक्षणं नाहीत. काल रात्री त्यांच्या कोरोना टेस्टचे अहवाल आले.याआधी महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री अशोक चव्हाण आणि जितेंद्र आव्हाड यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. ते दोघेही बरे झाले आहेत. तसंच मंत्रालयातील काही सचिवांसह काही अधिकाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. यातील अनेकजण कोरोनावर मात करुन घरी परतलेत. आता सामाजिक न्याय मंत्री यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे या मंत्र्याने 8 जून रोजी बीड जिल्ह्यातील पहिल्या कोरोना विषाणू थ्रोट स्वॅब तपासणी प्रयोगशाळेचे लोकार्पण देखील केले होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Marathwada/Breaking-Corona-infection-in-social-justice-ministers</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 06 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नांदेडमधून पंजाबमध्ये परतलेल्या यात्रेकरूंपैकी 795 जण निघाले करोना पॉझिटिव्ह ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Marathwada/795-pilgrims-return-to-Punjab-from-Nanded-testes-as-corona-positive</link>
            <description>नांदेड : एक खळबळजनक माहिती नांदेडमधून समोर येत आहे. एका धार्मिक कार्यक्रमासाठी पंजाबमधून आलेले शीख यात्रेकरू लॉकडाउनमुळे नांदेडमध्येच अडकून पडले होते. या यात्रेकरूंना आठ दहा दिवसांपूर्वी विशेष गाड्यांनी परत स्वगृही पाठवण्यात आलं. पण, नांदेडमधून पंजाबमध्ये गेलेल्या यात्रेकरुंपैकी तब्बल 795 जण करोनाग्रस्त निघाले आहेत. त्यामुळे पंजाब सरकारची झोप उडाली असून, नांदेड प्रशासनही हादरलं आहे. कारण हे यात्रेकरू महिनाभर नांदेडमध्ये मुक्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Marathwada/2020-05-06/Kota-bus-lockdown_070520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नांदेड : एक खळबळजनक माहिती नांदेडमधून समोर येत आहे. एका धार्मिक कार्यक्रमासाठी पंजाबमधून आलेले शीख यात्रेकरू लॉकडाउनमुळे नांदेडमध्येच अडकून पडले होते. या यात्रेकरूंना आठ दहा दिवसांपूर्वी विशेष गाड्यांनी परत स्वगृही पाठवण्यात आलं. पण, नांदेडमधून पंजाबमध्ये गेलेल्या यात्रेकरुंपैकी तब्बल 795 जण करोनाग्रस्त निघाले आहेत. त्यामुळे पंजाब सरकारची झोप उडाली असून, नांदेड प्रशासनही हादरलं आहे. कारण हे यात्रेकरू महिनाभर नांदेडमध्ये मुक्काम करून होते.हल्ला महल्लासाठी पंजाबमधून काही भाविक नांदेडमध्ये आले होते. त्यानंतर लॉकडाऊन लागू झाल्यानंतर 40 दिवसांपासून हे भाविक मुक्कामाला होते. त्यांना परत नेण्यासाठी पंजाब सरकारकडून प्रयत्न सुरू होते. महाराष्ट्र सरकार आणि पंजाब सरकारमध्ये झालेल्या चर्चेनंतर केंद्रानं त्यास परवानगी दिली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ट्रॅव्हल्सनं तेरा गाड्यामधून 1700 जणांना घरी सोडण्यात आलं. त्यानंतर टप्याटप्यानं इतरही यात्रेकरूंना पंजाब सरकार परत घेऊन गेलं. पण, या यात्रेकरूंची घेऊन जाण्याआधीच करोना चाचणी न केल्यानं आता ही धक्कादायक आकडेवारी समोर येऊ लागली आहे.पंजाब सरकारनं 80 ट्रॅव्हल्सच्या मदतीनं चार हजार नागरिकांना परत राज्यात नेले. त्याठिकाणी या यात्रेकरूंची तपासणी करण्यात आली. त्यात तब्बल 795 जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले आहेत. 28 एप्रिल रोजी पंजाबमधील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या 510 पर्यंत होती. मात्र, अचानक आठशे रुग्ण वाढल्यानं पंजाबमधील रुग्णांची 1232 वर पोहोचली आहे.नांदेडमधील 20 सेवक, सहा चालकही करोनाग्रस्तपंजाबमधील सुरूवातीची आकडेवारी समोर आल्यानंतर नांदेड जिल्हा प्रशासनानं तातडीनं तपासणी करण्याचं काम हाती घेतलं. या यात्रेकरूंच्या सेवेत असलेल्या सेवेकऱ्यांची चाचणी करण्यात आली. यात 20 जणांना करोना झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर यात्रेकरूंना सोडण्यासाठी गेलेल्या सहा चालकांनाही करोनाची लागण झाली आहे. या सगळ्यांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं असून, उपचार करण्यात येत आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Marathwada/795-pilgrims-return-to-Punjab-from-Nanded-testes-as-corona-positive</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 04 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ धनंजय मुंडेंचे बीड जिल्ह्यासाठी मिशन 100% ग्रीन झोन! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Marathwada/Dhananjay-Mundes-Mission-of--Green-Zone-for-Beed-District</link>
            <description>बीड : बीड जिल्हा केंद्र सरकारच्या निकषानुसार जरी सध्या ‘ऑरेंज झोन’ मध्ये असला तरी लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात कोरोनाला बीड जिल्ह्याच्या हद्दीपासून दूर ठेवण्यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत.जिल्ह्यातील कायदा सुव्यस्थेला मदत करणारा अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या 550 होमगार्ड्सच्या पुनर्नियुक्तीचा प्रश्न श्री. मुंडे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा करून मार्गी लावला. तसेच त्यांच्या वेतनासाठी जिल्हा नियोजन समितीच्या 5 % निधीतून व्यवस्था करण्यात येईल असेही श्री. मुंडे म्हणाले.यावेळी जिल्ह्यात कमी पडणारे सोयाबीनचे बियाणे, लग्न लावण्यासाठी परवानगी, यांसह तूर व हरभरा खरेदीसाठी सध्या कमी असलेल्या ग्रेडरच्या उपलब्धीसंदर्भातही चर्चा झाली. श्री. मुंडे यांनी एफसीआयच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क करून तूर व हरभरा खरेदीसाठी अधिकचे चार ग्रेडर उपलब्ध करून दिले आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात लॉकडाऊन – तीनच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला, यावेळी जिल्ह्याला कोरोना पासून दूर ठेवण्यासाठी लॉकडाऊन चे नियम आणखी कडक करावे लागले तरी हरकत नाही असेही श्री. मुंडे म्हणाले. यावेळी आ. संदीप क्षीरसागर, जिल्हाध</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Marathwada/2020-05-04/95512477_105482977826109.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[बीड : बीड जिल्हा केंद्र सरकारच्या निकषानुसार जरी सध्या ‘ऑरेंज झोन’ मध्ये असला तरी लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात कोरोनाला बीड जिल्ह्याच्या हद्दीपासून दूर ठेवण्यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत.जिल्ह्यातील कायदा सुव्यस्थेला मदत करणारा अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या 550 होमगार्ड्सच्या पुनर्नियुक्तीचा प्रश्न श्री. मुंडे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा करून मार्गी लावला. तसेच त्यांच्या वेतनासाठी जिल्हा नियोजन समितीच्या 5 % निधीतून व्यवस्था करण्यात येईल असेही श्री. मुंडे म्हणाले.यावेळी जिल्ह्यात कमी पडणारे सोयाबीनचे बियाणे, लग्न लावण्यासाठी परवानगी, यांसह तूर व हरभरा खरेदीसाठी सध्या कमी असलेल्या ग्रेडरच्या उपलब्धीसंदर्भातही चर्चा झाली. श्री. मुंडे यांनी एफसीआयच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क करून तूर व हरभरा खरेदीसाठी अधिकचे चार ग्रेडर उपलब्ध करून दिले आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात लॉकडाऊन – तीनच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला, यावेळी जिल्ह्याला कोरोना पासून दूर ठेवण्यासाठी लॉकडाऊन चे नियम आणखी कडक करावे लागले तरी हरकत नाही असेही श्री. मुंडे म्हणाले. यावेळी आ. संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.पालकमंत्री श्री. मुंडे म्हणाले, जिल्ह्यात 17 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. बदलत्या परिस्थितीत सर्व बाबींचा विचार करून पावले टाकली जात आहेत. लोकांच्या अडचणी कमी व्हाव्यात व संसर्ग होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जनतेच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या डॉक्टरांचीदेखील काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी पीपीई किट देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. जिल्ह्यासाठी नऊ हजार पीपीई किट उपलब्ध करून दिले आहेत व्हेंटिलेटर खरेदीतील अडचणी दूर होण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर सूचना देऊन तातडीने कार्यवाही करावी असे सांगितले.याच बरोबर शेतकऱ्यांच्या सोयीच्या दृष्टीने बांधावर डिझेल हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर बीड तालुक्यात सुरू करण्यात येत असून, सुरुवातीस असे एक सुसज्ज वाहन उपलब्ध करून दिले आहे. यावर डिझेल वितरणाची मीटर, किंमत दर्शवणारी यंत्रणा असून इंडियन ऑइल कार्पोरेशनच्या सहकार्याने हे वाहन जिल्ह्यात उपलब्ध झाले आहे. यामुळे बीड तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या डिझेल इंधनाचा प्रश्न त्यांच्या बांधावर सुटेल अशी आशा आहे.बीड मधील इतर जिल्ह्यात अडकलेल्या लोकांना बीडमध्ये येण्यास परवानगी दिली जात असल्याने पोलीस यंत्रणेवरील वाढणारा ताण लक्षात घेता 550 होमगार्ड जवानांची सेवा जिल्ह्यातील पोलीस विभागात मिळाव्या यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न सोडविण्यात आला आहे.बाहेरच्या जिल्ह्यात अडकलेल्या लोकांना जिल्ह्यात येण्यासाठी परवानगी दिली जात असून याचा उपयोग तात्पुरत्या कारणांसाठी बाहेर जिल्ह्यात गेल्यानंतर अडकलेल्या व्यक्तींना व्हावा पण नोकरी व काम धंद्यानिमित्त इतर जिल्हा व शहरात राहणाऱ्यांनी बीड जिल्ह्यात येण्यासाठी याचा वापर करू नये.पालकमंत्री श्री. मुंडे पुढे म्हणाले, संचार बंदीच्या काळात अकरा शहरातील नागरिकांना किराणा उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाने ‘निडली’ ॲप सुरू केले असून पुढे याद्वारे जीवनावश्यक वस्तू देखील लोकांना पोहोचविण्यासाठी सुविधा उपलब्ध केली जाईल.याच बरोबर आढावा बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या कापूस खरेदी साठी जिल्ह्यातील तेरा जिनिंग केंद्र मध्ये सहा ग्रेडर उपलब्ध असल्याने, उद्यापर्यंत आणखी चार ग्रेडर उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. तसेच खरिपाची तयारी करताना जिल्ह्यात 80 हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची कमतरता असल्याने कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याशी चर्चा करून सदर बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे. विवाहाच्या प्रसंगी 20 नातेवाईकांना उपस्थित राहण्यासाठी नियमात शिथिलता देण्यासाठी राज्यस्तरावरून निर्णय व्हावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून ना. मुंडे यांनी येत्या दोन दिवसात याबद्दल निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.यावेळी जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी नागरिकांसाठी पास उपलब्ध होणाऱ्या ऑनलाइन प्रक्रियेद्वारे आतापर्यंत 365 अर्ज प्राप्त झाले असून 45 परवानगी दिली तसेच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसाठी नवीन 30 व्हेंटिलेटर घेण्यात येत असल्याची माहिती दिली गेल्याचे सांगितले .बैठकीतूनच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना फोनपालकमंत्री धनंजय मुंडे हे झटपट व जागच्या जागी निर्णय घेण्यासाठी प्रचंड लोकप्रिय आहेत. जिल्ह्यांमध्ये लग्न लावण्यासाठी परवानगी हा विषय निघताच त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन लावला वीस लोकांच्या उपस्थितीत लग्न लावण्यास परवानगी देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचे समजते.होमगार्डची संख्या तसेच त्यांचे वेतन यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख त्याचबरोबर विविध आर्थिक नियोजनाच्या बाबतीत उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्ह्यातील कमी पडणाऱ्या सोयाबीन बियाण्यांच्या बाबतीत कृषिमंत्री दादाजी भुसे आदी मान्यवरांना श्री. मुंडे यांनी चालू बैठकीतच फोन लावले व विषय मार्गी लावले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Marathwada/Dhananjay-Mundes-Mission-of--Green-Zone-for-Beed-District</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 01 Jan 1900 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शोषित,पीडित,उपेक्षितांवरील अत्याचार सहन करणार नाही बसपा प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांचा महाविआ सरकारला इशारा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Marathwada/-BSP-state-president-Sandeep-Tajne-warns-Mahavikas-government-not-to-tolerate-atrocities-on-exploited,-victims-and-neglected</link>
            <description>गेल्या अनेक दशकांपासून समाजातील प्रस्थांच्या दबावाखाली पिचले गेलेले शोषित,पीडित, उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्याचे मानवतावादी कार्य बहुजन समाज पार्टी करीत आहे. अशात या बांधवांवरील अत्याचार पार्टी कदापिही सहन करणार नाही, असा इशारा बसपाचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी गुरूवारी महाविकास आघाडी सरकारला दिला.परभणी शहरात संवाद यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमातून त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.



परभणी जिल्ह्यात तब्बल १०० हून अधिक अँक्ट्रोसिटी चे गंभीर गुन्हे दाखल आहे. अनेक प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल होवू नये याकरिता पीडितांवर राजकीय तसेच प्रशासकीय स्तरावर दबाव आणला जातो. अशात राजकीय बळावर प्रशासनाच्या वरदहस्ताने होणारे अत्याचार थांबवण्याचे कार्य बसपा करणार आहे, असे अँड.ताजने यांनी स्पष्ट केले. उपेक्षितांना पुन्हा मुख्य प्रवाहाच्या बाहेर लोटणाऱ्यांच्या विरोधात बसपा आक्रमक भू</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Marathwada/1900-01-01/Adv_Tajne.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[गेल्या अनेक दशकांपासून समाजातील प्रस्थांच्या दबावाखाली पिचले गेलेले शोषित,पीडित, उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्याचे मानवतावादी कार्य बहुजन समाज पार्टी करीत आहे. अशात या बांधवांवरील अत्याचार पार्टी कदापिही सहन करणार नाही, असा इशारा बसपाचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी गुरूवारी महाविकास आघाडी सरकारला दिला.परभणी शहरात संवाद यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमातून त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.



परभणी जिल्ह्यात तब्बल १०० हून अधिक अँक्ट्रोसिटी चे गंभीर गुन्हे दाखल आहे. अनेक प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल होवू नये याकरिता पीडितांवर राजकीय तसेच प्रशासकीय स्तरावर दबाव आणला जातो. अशात राजकीय बळावर प्रशासनाच्या वरदहस्ताने होणारे अत्याचार थांबवण्याचे कार्य बसपा करणार आहे, असे अँड.ताजने यांनी स्पष्ट केले. उपेक्षितांना पुन्हा मुख्य प्रवाहाच्या बाहेर लोटणाऱ्यांच्या विरोधात बसपा आक्रमक भूमिका घेणार आहे. पार्टी शोषित, पीडितांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. जिल्ह्यात कुठल्याही ठिकाणी असे प्रकार घडत असल्याचे समोर आल्यास बसपाचा कार्यकर्ता धावून येईल,असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला.



शोषितांवर होणाऱ्या अत्याचारासह शहर,ग्रामीण भागात पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने सर्वसामान्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे.शहरी भागात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत असल्याने सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आले आहे. दलित वस्त्यांमध्ये पावसाच्या पाण्याचा शिरकाव होत असल्याचे रोगराई पसरण्याची टांगती तलवार त्यांच्यावर लटकत आहे.अशात प्रशासनाने या समस्येची योग्य दखल घेतली नाही, तर बसपाकडून आंदोलन केले जाईल, असे ते म्हणाले. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वीज जोडणीचे काम अपुर्ण आहे. ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी त्यामुळे वीज पोहचलेली नाही, अशी खंत अँड.ताजने यांनी व्यक्त केली.



शहरात वाहतूक सिंग्नलची यंत्रणा कार्यान्वित नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पार्किंगची देखील व्यवस्था नसल्याने वाहतूक कोंडी होत असल्याने सर्वसामान्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. शहरातील सर्व महापुरूषांच्या पुतळ्यांचे सुशोभिकरण करावे, अशी मागणी बसपाकडून करण्यात आली आहे. पोलीस यंत्रणेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ग्रामीण तसेच शहरी भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्या रूग्णालयातील क्ष किरण तसेच इतर महत्वाच्या मशीन बंद असल्यामुळे गरीब, गरजू रूग्णांची हेळसांड होत आहे. खासगी रूग्णालयांमध्ये जादाचे पैसे मोजून या रूग्णांना त्यांचा तपासण्या करून घ्यावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे देखील अँड.ताजने म्हणाले.



कार्यक्रमात प्रदेश प्रभारी मा.प्रमोद रैना साहेब यांच्यासह प्रदेश महासचिव दिगंबर डोले, प्रदेश सचिव गंगाधर पोळ, प्रदेश सदस्य भीमराव जोंधळे, झोन प्रभारी देवराव दादा खंदारे, जिल्हा प्रभारी जाफर खान,युवराज सूर्यतळे,राजेंद्र घनसावंत,जिल्हा अध्यक्ष गौतम उजगरे, जिल्हा उपाध्यक्ष अनंता दिपके,

महासचिव मोबिन खान, सचिव राजेश केंदळे, प्रसेनजीत मस्के तसेच जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित होते.



ओबीसींचे राजकीय हक्क बसपात सुरक्षित-रैना

इतर मागासवर्गीयांच्या राजकीय आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने इम्पेरिकल डेटा केंद्र सरकारकडे मागितला होता. पंरतु, केंद्र सरकारने हा डेटा देण्यास नकार दिला आहे. राज्य आणि केंद्र सरकारमधील भांडणात मात्र ओबीसी बांधव भरडले जात आहे. बहुजन समाज पार्टीतच ओबीसींचे राजकीय तसेच इतर आरक्षण सुरक्षित आहे, असा दावा प्रदेश प्रभारी प्रमोद रैना यांनी केला. केंद्रातील भाजप सरकार तसेच राज्यातील महाविकास आघाडी आरक्षण विरोधी आहे. दोघांची एकमेकांसोबत असलेली छुपी यूती सर्वसमाजाकरीता धोक्याची घंटा आहे. अशात या सरकारला धडा शिकवण्यासाठी ओबीसी बांधवांनी बसपाच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावे,असे आवाहन रैना यांनी यानिमित्त केले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Marathwada/-BSP-state-president-Sandeep-Tajne-warns-Mahavikas-government-not-to-tolerate-atrocities-on-exploited,-victims-and-neglected</guid>
        </item>
    
     </channel>
    </rss>
     