
       <rss version="2.0" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"> 
        <channel>
        <title>ऑनलाईन रिपोर्टर....नातं विश्वासाचं...!</title>
        <atom:link href="http://theonlinereporter.com/RSS/LifestyleNews" rel="self" type="application/rss+xml"/>
        <link>http://theonlinereporter.com</link>
        <description>The Online Reporter, a national news platform of India aimed at disseminating latest updates and information regarding crime, politics, lifestyle, entertainment, society etc. With Online Reporter you can catch up with the latest news, ताज्या मराठी बातम्या , online Live News, Daily News, local news, दैनिक बातम्या , स्थानिक बातम्या , News about India and more. Get latest news headings from Mumbai, Pashchim Maharashtra, Vidarbha, and the nation only at theonlinereporter.com</description>
        <lastBuildDate>Sat, 18 Apr 2026 08:48:47 GMT</lastBuildDate>
        <language>mr-IN</language>
    
        <item>
            <pubDate>Thu, 15 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मासिक पाळीमध्ये होतात प्रचंड वेदना? मग 'या' रामबाण घरगुती उपायांनी मिळू शकतो आराम! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/LifeStyle/Heavy-pain-during-menstruation-Then-these-home-remedies-can-provide-relief</link>
            <description>महिलांसाठी मासिक पाळी खूप वेदनादायक असते. यादरम्यान मूड बदलणे, चिडचिड होणे, हात-पाय दुखणे, कंबरदुखी, पाठदुखी असे प्रकार सर्रास होतात. अशा परिस्थितीत महिलांनाही खूप अस्वस्थ वाटते. मासिक पाळीत क्रॅम्प्स आल्याने अनेक वेळा महिलांना दैनंदिन काम करता येत नाही. या काळात वेदना कमी करण्यासाठी अनेक महिला पेनकिलरही घेतात.

पेनकिलरचा वापर करण्याऐवजी, वेदना कमी करण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक पद्धती देखील वापरून पाहू शकता. येथे व</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/LifeStyle/2023-06-15/3 news.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[महिलांसाठी मासिक पाळी खूप वेदनादायक असते. यादरम्यान मूड बदलणे, चिडचिड होणे, हात-पाय दुखणे, कंबरदुखी, पाठदुखी असे प्रकार सर्रास होतात. अशा परिस्थितीत महिलांनाही खूप अस्वस्थ वाटते. मासिक पाळीत क्रॅम्प्स आल्याने अनेक वेळा महिलांना दैनंदिन काम करता येत नाही. या काळात वेदना कमी करण्यासाठी अनेक महिला पेनकिलरही घेतात.

पेनकिलरचा वापर करण्याऐवजी, वेदना कमी करण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक पद्धती देखील वापरून पाहू शकता. येथे वनौषधींचे तीन प्रकार सांगितले आहेत. मासिक पाळीच्या वेदनांसाठी तुम्ही या औषधी वनस्पती देखील घेऊ शकता. या औषधी वनस्पती वेदनाशामक म्हणून काम करतील.

आले

आल्याच्या वापरामुळे चहाची चव वाढते. आल्याचा वापर अनेक प्रकारच्या पदार्थांमध्येही केला जातो. आले हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. मासिक पाळी दरम्यान तुम्ही आले देखील घेऊ शकता. हे तुम्हाला वेदनापासून आराम देण्याचे काम करेल. आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात. तसेच सूज कमी करण्याचे काम करते. मासिक पाळीत तुम्ही एक कप आल्याचा चहा पिऊ शकता. हे तुम्हाला वेदनापासून आराम देण्याचे काम करेल.

ओवा

मासिक पाळी दरम्यान ओवा घेणे देखील खूप फायदेशीर आहे.ओव्यामध्ये कॅल्शियम, लोह आणि व्हिटॅमिन बी असते. त्यात मॅग्नेशियम देखील असते. ओव्यामध्ये अनेक औषधी गुणधर्मही आहेत. यामध्ये असलेले गुणधर्म पीरियड्स ब्लोटिंगपासूनही आराम देतात. मासिक पाळी नियमित करण्यासाठी ओवा खूप फायदेशीर आहे. ओवा मासिक पाळीच्या वेदनापासून आराम देण्याचे काम करते.

बडीशेप

बडीशेपमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. खाल्ल्यानंतरही अनेकजण माउथ फ्रेशनर म्हणून बडीशेप खातात. बडीशेप तुमच्या स्नायूंनाही आराम देते. कधीकधी पीरियड्स कॅम्प सहन करणे खूप कठीण होते.

या प्रकरणात, आपण एका कप पाण्यात बडीशेप उकळू शकता. हे पेय तुम्ही दिवसातून २ ते ३ वेळा मध घालून पिऊ शकता. हे मासिक पाळी नियमित करते. बडीशेप पिण्याने पाळीच्या दुखण्यापासूनही आराम मिळतो.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/LifeStyle/Heavy-pain-during-menstruation-Then-these-home-remedies-can-provide-relief</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 12 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जिवंत मासा घशात सोडून दमा बरा होणार... तीन वर्षांच्या खंडानंतर दम्यावरील रामबाण उपाय 'फिश प्रसादम'ला हैदराबादमध्ये सुरुवात ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/LifeStyle/Asthma-will-be-cured-by-leaving-live-fish-in-throat</link>
            <description>दम्याचा आजार असणाऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या हैदराबादच्या 'फिश प्रसादम' (Fish Prasadam) अर्थात दम्यावरील घरगुती तयार केलेल्या औषधाच्या वाटपाला आजपासून सुरूवात झाली आहे. दरवर्षी मृग नक्षत्र (Mrigasira Karti) सुरू झाल्यानंतर दोन दिवस या माशाच्या तोंडाला लावण्यात आलेल्या औषधाचं वाटप करण्यात येतं. जिवंत माशाच्या तोंडाला विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात आलेलं औषध लावण्यात येतं आणि तो मासा रुग्णाच्या घशात सोडण्यात येतो. हैदराबादच्या बाथिनी कुटुंबाकडून (Bathini Family) हे औषध दमाग्रस्तांना देण्यात</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/LifeStyle/2023-06-12/Fish Prasadam for Asthma Cure (6).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[दम्याचा आजार असणाऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या हैदराबादच्या 'फिश प्रसादम' (Fish Prasadam) अर्थात दम्यावरील घरगुती तयार केलेल्या औषधाच्या वाटपाला आजपासून सुरूवात झाली आहे. दरवर्षी मृग नक्षत्र (Mrigasira Karti) सुरू झाल्यानंतर दोन दिवस या माशाच्या तोंडाला लावण्यात आलेल्या औषधाचं वाटप करण्यात येतं. जिवंत माशाच्या तोंडाला विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात आलेलं औषध लावण्यात येतं आणि तो मासा रुग्णाच्या घशात सोडण्यात येतो. हैदराबादच्या बाथिनी कुटुंबाकडून (Bathini Family) हे औषध दमाग्रस्तांना देण्यात येतं. या वर्षी शुक्रवार 9 जून आणि शनिवारी 10 जून रोजी या औषधाचं वाटप करण्यात येणार आहे.

कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांपासून या औषधाचं ( Hyderabad Fish Prasadam) वाटप करण्यात आलं होतं. यंदा मात्र मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यानंतर या फिश प्रसादमचं वाटप सुरू झालं आहे. देशभरातून लाखो दमाग्रस्त रुग्ण हे औषध घेण्यासाठी हैदराबादमध्ये येतात. तसेच हा उपचार घेण्यासाठी काही परदेशी नागरिक आणि एनआरआयही हैदराबादमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे. हैदराबामधील नामपल्ली एक्झिबिशन ग्राऊंडवर हा उपचार दिला जात आहे.

तेलंगणाचे पशुसंवर्धन मंत्री तलासनी श्रीनिवास यादव यांच्या हस्ते 'फिश प्रसादम' चे वितरण सुरू करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी तेलंगणा सरकारने सर्व व्यवस्था केली आहे. या वर्षी जवळपास सहा लाख रुग्ण हा उपचार घेण्यासाठी येतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

हैदराबादच्या बाथिनी कुटुंबाकडून हा उपचार दिला जातोय. यासाठी विशिष्ठ प्रकारचे औषध तयार करण्यात येतं आणि ज्याला दम्याचा त्रास आहे त्याला दिलं जातं. बाथिनी कुटुंबातील व्यक्ती जिवंत माशाच्या तोंडाला ते औषध लावते आणि दमाग्रस्त व्यक्तीच्या थेट घशात तो मासा सोडला जातो. यासाठी 'मरेल' या प्रकारचा मासा वापरण्यात येतो.

बाथिनी हरिनाथ गौड कुटुंबीयांकडून दिल्या जाणाऱ्या 'फिश प्रसादम'वर लोकांचा खूप विश्वास आहे. गेल्या 190 वर्षांहून अधिक काळापासून बाथिनी कुटुंबाकडून दरवर्षी 'मृगसिरा कार्थी'च्या दिवशी 'फिश प्रसादम' चे वाटप केलं जातं.

'फिश प्रसादम'च्या औषधी गुणधर्मांवर अनेक शास्त्रज्ञ, तर्कवादी आणि इतरांनी अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र दरवर्षी हजारो लोक हा फिश प्रसादम घेण्यासाठी शहरात येतात.



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/LifeStyle/Asthma-will-be-cured-by-leaving-live-fish-in-throat</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 12 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ केस गळतीमुळे टक्कल पडलंय? भराभर केस वाढण्यासाठी जावेद हबीबचा सल्ला; रोज हे तेल वापरा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/LifeStyle/Bald-due-to-hair-loss-Javed-Habibs-Advice-for-Fuller-Hair-Growth</link>
            <description>गळणाऱ्या केसांची समस्या घराघरांतील महिलांना उद्भवते. पुरूषांनाही कधी कधी या समस्येचा सामना करावा लागतो. केस सतत गळल्यानं टक्कल पडू लागते. (How to Stop Hair Fall) केसांवर केमिकल्सयुक्त तेल, शॅम्पूचा वापर करण्यापेक्षा काही घरगुती उपाय</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/LifeStyle/2023-06-12/news 2...webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[गळणाऱ्या केसांची समस्या घराघरांतील महिलांना उद्भवते. पुरूषांनाही कधी कधी या समस्येचा सामना करावा लागतो. केस सतत गळल्यानं टक्कल पडू लागते. (How to Stop Hair Fall) केसांवर केमिकल्सयुक्त तेल, शॅम्पूचा वापर करण्यापेक्षा काही घरगुती उपाय केले तर चांगले परीणाम दिसून येतील.


हेअर एक्सपर्ट जावेद हबीब (Jawed Habib) यांनी केस गळणं कमी करण्यासाठी सोपा घरगुती उपाय सुचवला आहे. यामुळे केस गळण्याची समस्या टाळण्यास मदत होईल. याशिवाय केसांची वाढही चांगली होईल. (Hair Care Tips)


जावेद हबीब यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ते कांद्याचा रस (Onion Juice) मिसळताना दिसत आहे. कांद्याचा रस गळणाऱ्या केसांचा त्रास कमी करतो. जावेद यांच्या म्हणण्यानुसार, कांद्याच्या रसानं तुम्ही गळणाऱ्या केसांची समस्या दूर कर शकता. हा रस नवीन केस येण्यासाठी खूप प्रभावी ठरतो. हा रस थेट केसांवर किंवा टाळूवर वापरता येतो. बोटांनी डोक्यावर कांद्याचं तेल किंवा रस लावू शकता किंवा ते कापसाच्या मदतीने देखील लावता येते
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/LifeStyle/Bald-due-to-hair-loss-Javed-Habibs-Advice-for-Fuller-Hair-Growth</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 08 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘या’ ५ राशी स्वतःची चूक असूनही दुसऱ्यांनाच दोषी ठरवतात? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/LifeStyle/5-zodiac-signs-blame-others-for-their-own-fault</link>
            <description>ऑफिसमध्ये, कुटुंबात अनेकदा अशी काही मंडळी असतात जी तुम्हाला त्यांच्या वागण्यातून अप्रत्यक्षपणे खूप मनस्ताप देत असतात. या लोकांच्या हेतूमध्ये दोष नसला तरी स्वभाव काही वेळा इतरांची डोकेदुखी वाढवणारा ठरू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीनुसार व्यक्तीची स्वभाव वैशिष्ट्य सुद्धा निरनिराळी असतात. राशीवर ज्या ग्रहाचा प्रभाव असतो त्यानुसार वागणुकीत विशेष फरक अधोरेखित करता येऊ शकतात. नावानुसार, मूलांकानुसार व राशीनुसार तुम्हीही एखाद्या व्यक्तीच्या विशिष्ट स्वभावामागील अर्थ समजून घेऊ शकता, जेणेकरून स्वतःच्या मनाला शांत ठेवण्यासाठी अशा मंडळींशी कसे वागावे हे आपल्याला समजून घेता येऊ शकते. आज आपण अशा काही राशी पाहणार आहोत ज्या अनेकदा स्वतःची चूक असतानाही मान्य न करण्यासाठी ओळखल्या जातात, इतरांना दोष देण्याच्या या स्वभावाची काय कारणे असू शकतात हे सुद्धा जाणून घेऊया…

‘या’</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/LifeStyle/2023-06-08/OIP.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ऑफिसमध्ये, कुटुंबात अनेकदा अशी काही मंडळी असतात जी तुम्हाला त्यांच्या वागण्यातून अप्रत्यक्षपणे खूप मनस्ताप देत असतात. या लोकांच्या हेतूमध्ये दोष नसला तरी स्वभाव काही वेळा इतरांची डोकेदुखी वाढवणारा ठरू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीनुसार व्यक्तीची स्वभाव वैशिष्ट्य सुद्धा निरनिराळी असतात. राशीवर ज्या ग्रहाचा प्रभाव असतो त्यानुसार वागणुकीत विशेष फरक अधोरेखित करता येऊ शकतात. नावानुसार, मूलांकानुसार व राशीनुसार तुम्हीही एखाद्या व्यक्तीच्या विशिष्ट स्वभावामागील अर्थ समजून घेऊ शकता, जेणेकरून स्वतःच्या मनाला शांत ठेवण्यासाठी अशा मंडळींशी कसे वागावे हे आपल्याला समजून घेता येऊ शकते. आज आपण अशा काही राशी पाहणार आहोत ज्या अनेकदा स्वतःची चूक असतानाही मान्य न करण्यासाठी ओळखल्या जातात, इतरांना दोष देण्याच्या या स्वभावाची काय कारणे असू शकतात हे सुद्धा जाणून घेऊया…

‘या’ ५ राशी स्वतःची चूक असूनही दुसऱ्यांनाच दोषी ठरवतात

कन्या (Virgo Zodiac)
या राशीची मंडळी ही जन्मतःच प्रत्येक गोष्टींमध्ये परफेक्शनिस्ट बनण्यासाठी इच्छुक असू शकतात. अनेकदा याच स्पर्धेत त्यांची भावनिक बाजू काहीशी दडवून ठेवली जाते. एखाद्याचा राग आल्यास ही मंडळी त्यांच्याशी पुन्हा संवाद साधण्यासाठी खूप वेळ घेऊ शकतात. त्यांनी काही वेळा स्वतःला सर्वश्रेष्ठ बनवण्यासाठी इतकी मेहनत घेतलेली असते की त्यांना आपल्यावर इतरांनी केलेली टीका म्हणजे मेहनतीचा अपमान वाटू शकतो. म्हणूनच ते काही घटनांमध्ये चूक असूनही त्यांना समोरच्याचं बोलणं टीका वाटण्याची शक्यता अधिक असते.

सिंह (Leo Zodiac)
नावाप्रमाणेच सिंह राशीची मंडळी मानी व राजेशाही जीवन जगण्याची इच्छा मनी बाळगतात. त्यांना अनेकदा चूक दाखवून देणाऱ्याचा राग येऊ शकतो त्यामुळे ते चूक माहीत असूनही मान्य करणे टाळू शकतात. या मंडळींना इतरांसमोर आपण दुबळे पडू अशी भीती असू शकते ज्यामुळे ते आपला मान राखून ठेवण्यासाठी स्वतःचा दोष इतरांच्या माथ्यावर मारू शकतात.

वृश्चिक (Scorpio Zodiac)
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आपण चुकू शकतो यावर अनेकदा विश्वासच बसत नाही. अशा व्यक्ती राग सोडूनही देत नाहीत ज्यामुळे वाद वाढू शकतात. वृश्चिक राशीच्या व्यक्ती या संयमी असल्याने त्या थेट आपली चूक मान्य करत नसल्या तरी इतरांना दोष देण्याचे प्रमाण खूप कमी असू शकते. उलट अशा व्यक्ती टीकाकाराला शब्दात पकडण्यासाठी वाट पाहून मग पलटवार करण्याची संधी शोधण्याचे प्रमाण अधिक असू शकते.

मेष (Aries Zodiac)
मेष राशीच्या मंडळींना चारचौघात केलेला अपमान अजिबात सहन करता येऊ शकत नाही. त्यांना चूक दाखवून देण्यासाठी सुद्धा इतरांना शांत व संयमी मोडमध्ये राहणे आवश्यक ठरू शकते. अन्यथा ते चांगल्यासाठी सांगितलेली गोष्ट ही नकारात्मक रित्या मनात साठवून ठेवू शकतात. त्यांना तुम्ही त्यांचे कौतुक केल्यास किंवा चूक अप्रत्यक्ष लक्षात आणून दिल्यास वाईट वाटण्याचे प्रमाण कमी असू शकते पण थेट वार केल्यास या व्यक्ती लगेच समोरच्यावर दोष टाकून मोकळ्या होऊ शकतात.

कुंभ (Aquarius Zodiac)
संयमाची कमी असल्याने ही रास प्रचंड ज्ञानी असूनही अनेकदा स्वतःला व इतरांना मनस्ताप देऊ शकते. त्यांची अशी धारणा असते की, आपण कधीच खोटे बोलत नाही आणि बहुतांश घटनांमध्ये हे सत्यही असू शकते. पण काही वेळा पुरेशी माहिती नसल्याने त्यांचे अंदाज चुकू शकतात. यावेळी आपण खोट्यात पडू नये म्हणून हे लोक चूक अमान्य करण्याची शक्यता असते. या मंडळी चूक मान्य न करताही प्रश्नाचे उत्तर शोधण्यावर अधिक भर देतात. यामुळे समोरच्याला काहीवेळा कुंभ राशीच्या लोकांचा राग येऊ शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहिती वर साधारण निरीक्षणावर आधारित आहे, यास दावा समजू नये) ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/LifeStyle/5-zodiac-signs-blame-others-for-their-own-fault</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 27 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ उन्हाळ्यात तुमची गाडीही घेऊ शकते पेट, 'या' गोष्टींची काळजी घ्या नाहीतर पडेल महाग ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/LifeStyle/Even-your-car-can-catch-fire-in-summer</link>
            <description>उन्हाळा सुरू झाल्याने देशभरात वाहनांना आग लागण्याच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. दररोज विविध कंपन्यांच्या कारमध्ये आग लागल्याच्या घटना समोर येत असतात. लेटेस्ट एसयूव्हींना आग लागल्याच्या घटनाही समोर येत असतात. अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात चालत्या वाहनांना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. चालत्या गाडीला आग लागल्याच्या घटना घडल्यामुळे अनेकदा अपघातही होऊ शकतात. अनेकदा आधीच गाडीतून धुर येऊ लागल्याने लोकं सावध होऊन गाडीतून बाहेर पडतात. पण हायवेला गाडीने पेट घेतला तर अधिक अडचणी येऊ शकतात, अपघात होण्याची शक्यताही खूप असते. कार पेट घेण्याची बरीच असतात यातील एक कारण म्हणजे इंजिन जास्त तापणं किंवा जास्त गरम होणं हे महत्त्वाचं कारण आहे. चला तर या कारणांसह कोणती काळजी घ्यावी लागेल याबद्दल जाणून घेऊ...


व</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/LifeStyle/2023-05-27/GettyImages-514319425 (1).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[उन्हाळा सुरू झाल्याने देशभरात वाहनांना आग लागण्याच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. दररोज विविध कंपन्यांच्या कारमध्ये आग लागल्याच्या घटना समोर येत असतात. लेटेस्ट एसयूव्हींना आग लागल्याच्या घटनाही समोर येत असतात. अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात चालत्या वाहनांना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. चालत्या गाडीला आग लागल्याच्या घटना घडल्यामुळे अनेकदा अपघातही होऊ शकतात. अनेकदा आधीच गाडीतून धुर येऊ लागल्याने लोकं सावध होऊन गाडीतून बाहेर पडतात. पण हायवेला गाडीने पेट घेतला तर अधिक अडचणी येऊ शकतात, अपघात होण्याची शक्यताही खूप असते. कार पेट घेण्याची बरीच असतात यातील एक कारण म्हणजे इंजिन जास्त तापणं किंवा जास्त गरम होणं हे महत्त्वाचं कारण आहे. चला तर या कारणांसह कोणती काळजी घ्यावी लागेल याबद्दल जाणून घेऊ...


वाहनाला आग लागण्याची अनेक कारणे असू शकतात, जसं की इंधन गळती, शॉर्ट सर्किट किंवा बॅटरीसारख्या गोष्टी चालत्या वाहनात ओव्हरहिट होणं. इंजिन तापलं असताना जर गाडी वेळीच थांबवली नाही तर चालत्या वाहनात आग लागू शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास उपायांबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही भविष्यात इंजिन जास्त गरम झाल्यामुळे होणारी कोणतीही दुर्दैवी घटना टाळू शकता.


इंजिन जास्त तापण्याची किंवा जास्त गरम होण्याची अनेक कारणे आहेत. साधारणपणे, कूलिंग सिस्टमच्या समस्येमुळे कार जास्त गरम होतात. यामुळे इंजिनच्या डब्यातून उष्णता बाहेर पडू देत नाही. याशिवाय अनेकदा इंजिन कूलिंग सिस्टीम किंवा इतर घटकामध्ये कुठेतरी गळती होऊ शकते. इंजिनच्या डब्यात रबर होसेस, गॅस्केट आणि पाण्याचा पंप यांसारखे अनेक घटक असतात, जे कालांतराने झिजतात किंवा खराब होतात. अशा स्थितीत गळती होण्याची शक्यता वाढते. ज्यानंतर इंजिन गरम होऊन कार पेट घेऊ शकते.


याशिवाय आणखीही गोष्टींमुळे कार गरम होऊ शकते, उन्हाळ्याच्या दिवसात जर भर दुपारी आपण वाहतूक केली तर कूलिंग सिस्टमवर खूप दबाव पडतो. पण यासाठी तुम्ही कारच्या ड्रायव्हिंग स्कील्स बदलू शकता. त्यामुळे कार चालवताना काळजी घेऊन अधिक चांगली देखभाल करून तुम्ही कार जास्त गरम होण्याचा धोका टाळू शकता. यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष द्यावे लागेल. त्याबद्दलही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


गाडी चालवताना इंजिन जास्त गरम होत आहे असे तुम्हाला वाटत असेल तर सर्वप्रथम तुम्ही कारचे हीटर चालू करा. तुम्हाला हे थोडं विचित्र वाटेल पण CarID या ऑटो पार्ट्सच्या पोर्टलनुसार असे करणं अधिक फायद्याचं आहे. यामुळे इंजिनची उष्णता ही थेट कारच्या आत जाते, ज्यामुळे इंजिनच्या कूलिंग सिस्टमवरील भार कमी होतो. काही परिस्थितींमध्ये, हे इंजिनच्या डब्यातून ओव्हरहिटिंग दूर करण्यासाठी पुरेसे असू शकते. यासाठी, तुम्हाला कारच्या स्पीडोमीटरमध्ये दिलेला ओव्हरहिटिंग सिग्नल पाहावा लागेल, जर असे करून तापमानाचा प्रकाश बंद झाला, तर तुम्हाला समजेल की कारचं तापमान नॉर्मल झालं आहे.


कार हिट होण्याआधीच काळजी घेतलेली कधीही चांगली. वेळच्या वेळी कारमधलं पाणी चेक करायला हवं. तसंच कारमध्ये अधिकचं पाणी देखील ठेवायला हवं. याशिवाय टॉवेल, हातमोजे ठेवायला हवे. पेट घेतल्यावर टॉवेलने आग विझवता येईल, किंवा बोनेट खोलण्यासाठी हातमोजे वापरु शकतो. वर आम्ही सांगितल्याप्रमाणे हिटर चालू करावा लागत असल्याने हिटर देखील चेक करणं महत्त्वाचं आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/LifeStyle/Even-your-car-can-catch-fire-in-summer</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 27 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आई वडिलांच्या या चुकांमुळे मुलांची फक्त उंची वाढते पण शरीर मात्र बारीकच राहतं ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/LifeStyle/the-height-of-the-children-only-increases-but-the-body-remains-thin</link>
            <description>प्रत्येक आईला तिच्या मुलासाठी सर्वोत्तम आहार आणि पोषण हवे असते. पालक आपल्या मुलाच्या वाढीवर बारकाईने लक्ष ठेवतात. जेव्हा मूल मोठे होते, तेव्हा त्याला पाहून पालकांना सर्वात जास्त आनंद होतो. मात्र, भारतीय पालक दुर्लक्ष करत असलेली एक मोठी समस्या असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. तज्ज्ञांना असे आढळून आले आहे की, मुलांची उंची जरी वाढत असली तरी उंचीनुसार त्यांचे वजन वाढत नसावे आणि हे तुमच्याकडून झालेल्या चुकीमुळे होत आहे ज्याची तुम्हाला जाणीवही नाही.


नॅशनल हेल्थ फॅमिली सर्व्हे (NHFS) ने नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात, तज्ज्ञांनी भारतीय मुलांबद्दल आणि त्यांच्या पोषणाबद्दल काही अतिशय मनोरंजक तथ्ये काढली आहेत. त्यांनी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/LifeStyle/2023-05-27/children-weight-height-chart (1).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[प्रत्येक आईला तिच्या मुलासाठी सर्वोत्तम आहार आणि पोषण हवे असते. पालक आपल्या मुलाच्या वाढीवर बारकाईने लक्ष ठेवतात. जेव्हा मूल मोठे होते, तेव्हा त्याला पाहून पालकांना सर्वात जास्त आनंद होतो. मात्र, भारतीय पालक दुर्लक्ष करत असलेली एक मोठी समस्या असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. तज्ज्ञांना असे आढळून आले आहे की, मुलांची उंची जरी वाढत असली तरी उंचीनुसार त्यांचे वजन वाढत नसावे आणि हे तुमच्याकडून झालेल्या चुकीमुळे होत आहे ज्याची तुम्हाला जाणीवही नाही.


नॅशनल हेल्थ फॅमिली सर्व्हे (NHFS) ने नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात, तज्ज्ञांनी भारतीय मुलांबद्दल आणि त्यांच्या पोषणाबद्दल काही अतिशय मनोरंजक तथ्ये काढली आहेत. त्यांनी असे निरीक्षण केले आहे की, पाच वर्षांखालील बहुतेक मुलांनी त्यांच्या वयानुसार जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) मानकीकरण प्राप्त केले आहे. मात्र, गेल्या दशकभरात त्याच्या वजनात जवळपास कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे 'वेस्टिंग' आणि 'स्टंटिंग' अशी परिस्थिती निर्माण होते.जरी भारतातील पालक आपल्या मुलाच्या आहाराकडे खूप लक्ष देतात, परंतु या प्रकरणात त्यांच्याकडून काही चुका देखील होतात, ज्या पुढे सांगितले जात आहेत.


पहिली दोन वर्षे मुलांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाची असतात. यावेळी जर बाळाला योग्य पोषण मिळाले तर पुढील वाढीच्या टप्प्यात बाळाची उंची वाढण्याची शक्यता आहे पण तो खूप पातळ असेल. दुसरीकडे, मुलाला योग्य आहार दिला नाही, तर त्याचे वजन त्याच्या उंचीनुसार वाढू शकत नाही. पोट खराब होणे, संसर्ग आणि ऍलर्जी या सर्वांचा परिणाम बाळाच्या आहारावर होतो.


भारतात लहान मुलांना जबरदस्तीने खायला दिले जाते. आई नेहमी मुलाच्या ताटात जास्तीत जास्त जेवण देण्याचा प्रयत्न करते. आपण हे समजून घेणे आवश्यक आहे की, आपण बाळाला किती आहार देत आहात याबरोबरच आपण त्याला काय आहार देत आहात हे देखील महत्त्वाचे आहे. अन्न खाल्ल्यानंतर बाळाचे पोट भरणे शक्य आहे, परंतु त्याच्या पोषणाच्या गरजा पूर्ण होतात का? मुलांच्या आहारात अंडी, सुकामेवा, फळे, भाज्या आणि दूध यांचाही समावेश करावा.


मुलांच्या आहारासाठी घरगुती अन्न सर्वोत्तम आहे. कधीकधी वेळेच्या कमतरतेमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे, आम्ही बाळाच्या आरोग्यास हानी पोहोचवणारे पदार्थ आणि संरक्षक पदार्थ असलेले पॅकेज केलेले अन्न खायला देतो.


या सर्वेक्षणात असेही समोर आले आहे की, भारतात पाच वर्षांखालील 58% मुले ऍनिमियाने ग्रस्त आहेत. म्हणजे त्यांच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आहे. यामुळे मुलाची उंची आणि वजन प्रभावित होऊ शकते. याचे एक कारण म्हणजे मुलांच्या आहारात अंडी, कोंबडी, कडधान्ये यासारख्या लोहयुक्त पदार्थांचा अभाव.


टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/LifeStyle/the-height-of-the-children-only-increases-but-the-body-remains-thin</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 15 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कानाची छिद्र मोठे झाले, कान ओघळले? वाचा हा उपाय ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/LifeStyle/Ear-hole-enlarged-ear-discharge-Read-this-solution</link>
            <description>महिलांना नटायला खूप आवडते. पण कामाच्या व्यापात ते इतके गुंतून जातात की, त्यांना स्वतःकडे लक्ष द्यायला जमत नाही. काही महिला कामात बिझी जरी असले तरी, वेळात वेळ काढून स्वतःसाठी खास वेळ काढतात. अनेकांना ड्रेसवर मॅचिंग मेकअप, मॅचिंग कानातले, मॅचिंग ज्वेलरी परिधान करायला आवडते. काही महिला दररोज विविध प्रकारचे कानातले घालतात. जे दिसायला आकर्षक व चेहऱ्यावर शोभून दिसतात. पण दररोज विविध प्रकार</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/LifeStyle/2023-05-15/5f21628c58c24d23612da518.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[महिलांना नटायला खूप आवडते. पण कामाच्या व्यापात ते इतके गुंतून जातात की, त्यांना स्वतःकडे लक्ष द्यायला जमत नाही. काही महिला कामात बिझी जरी असले तरी, वेळात वेळ काढून स्वतःसाठी खास वेळ काढतात. अनेकांना ड्रेसवर मॅचिंग मेकअप, मॅचिंग कानातले, मॅचिंग ज्वेलरी परिधान करायला आवडते. काही महिला दररोज विविध प्रकारचे कानातले घालतात. जे दिसायला आकर्षक व चेहऱ्यावर शोभून दिसतात. पण दररोज विविध प्रकारचे कानातले घातल्याने, कानाची छिद्रे मोठे होण्याची शक्यता वाढते.

कानाची छिद्रे मोठे झाल्यानंतर काय करावं हे सुचत नाही, अशा वेळेस कानातले देखील कानाखाली लोंबतात. तुमच्याही कानाची छिद्रे मोठे झाले असतील, व कानाला टाके लावून घेण्यास घाबरत असाल तर, हा एक घरगुती उपाय करून पाहा. या उपायामुळे नक्कीच आपल्याला मदत होईल.

कानाच्या छिद्रांचा आकार कमी करण्यासाठी, आपण सर्जिकल टेपची मदत घेऊ शकता. ही टेप शस्त्रक्रियेच्या दुकानात म्हणजेच, ज्या मेडिकल स्टोअरमध्ये ऑपरेशनच्या संबंधित सामान मिळतात, त्या ठिकाणी ही टेप मिळेल. ही टेप सामान्य बँडेजिंग टेपपेक्षा थोडी वेगळी असते. त्यावर बारीक छिद्रे दिसतात, ज्यामुळे स्किन हवा घेऊ शकते, त्यात चांगल्या प्रतीचा गोंद देखील लावला जातो. आपण ही टेप लावून त्यावर कानातले घालू शकता.

कानाची छिद्र लहान करण्यासाठी, सर्व प्रथम टेपचा एक लहान भाग कापून घ्या. आपण कानातले घालतो, त्या आकाराप्रमाणे टेप कापून घ्या. हवं असल्यास आपण याचे २ भाग करू शकता. आता कानाच्या दोन्ही बाजूने ही टेप लावा. छिद्रे मोठे असतील तर, मधोमध देखील ही टेप आपण लावू शकता. आता यावर आपण आपल्या आवडीचे कानातले घालू शकता.

यामुळे कानातले लोंबणार नाही, व ते कानात व्यवस्थित बसतील. यासह कानाची छिद्रे देखील आकाराने छोटे दिसतील, ज्यामुळे स्किन सैल दिसणार नाही.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/LifeStyle/Ear-hole-enlarged-ear-discharge-Read-this-solution</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 08 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ उन्हाळी सुट्ट्यांमध्ये असे द्या बळगोपलांना संस्काराचे धडे  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/LifeStyle/during-the-summer-vacations-give-lessons-in-sanskar-to-Balgopals</link>
            <description>उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित होत असतात. त्यानिमित्त नातेवाईक आणि मित्रमंडळी एकत्र येतात. अशा वेळी मुलांच्या हट्टीपणामुळे रंगाचा बेरंग होऊ शकतो. हे टाळण्यासाठी मुलांना काही एटिकेट्स शिकवणे गरजेचे असते.


घरात पाहुण</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/LifeStyle/2023-05-08/school-dh-1080931-1644710331.png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित होत असतात. त्यानिमित्त नातेवाईक आणि मित्रमंडळी एकत्र येतात. अशा वेळी मुलांच्या हट्टीपणामुळे रंगाचा बेरंग होऊ शकतो. हे टाळण्यासाठी मुलांना काही एटिकेट्स शिकवणे गरजेचे असते.


घरात पाहुण्यांचे स्वागत योग्यप्रकारे कसे करायचे हे मुलांना शिकवावे. प्रत्येकाशी हसून बोलण्याचे धडे द्यावेत. 


पाहुण्यांनी दिलेल्या भेटवस्तूचा हसतमुखाने स्वीकार करणे आणि धन्यवाद देणे त्यांना शिकवावे.


पाहुण्यांनी आणलेल्या भेटवस्तूंबाबत लगेचच कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये, भेटवस्तू आवडली नसल्यास नाराजी व्यक्त करू नये, हे त्यांना समजावून सांगावे.


पार्टीसाठी पाहुने म्हणून गेल्यानंतर कसे वागावे याचेही धडे त्यांना द्यावेत.
गिफ्ट देण्यासाठी मुलांना पुढाकार घेऊ द्यावा. यातूनच संवाद सुरू होतो. 


मुले लवकर बोअर झाल्यास त्यांचे मन रमवण्याचा प्रयत्न करावा. कोणतेही सामान वापरण्यापूर्वी यजमानांची अनुमती घ्यायला मुलांना शिकवावे. 


 निघताना यजमानांचा निरोप घेण्यास त्यांना शिकवावे. मोठय़ांना अभिवादन करण्यास सांगितले जावे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/LifeStyle/during-the-summer-vacations-give-lessons-in-sanskar-to-Balgopals</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 05 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ काही क्षणांत घालवू शकता पर्मनंट टॅटू, कोणतीच खूण राहणार नाही ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/LifeStyle/A-permanent-tattoo-can-be-applied-in-a-few-moments--leaving-no-trace</link>
            <description>टॅटू (Tattoo ) हा नेहमीच फॅशनमध्ये असतो. परदेशातून सुरू झालेला ट्रेंड आता भारतातही खूप लोकप्रिय झाला आहे, विशेषतः तरुणांना त्याची खूप आवड दिसते. व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी किंवा चांगला लूक मिळावा यासाठी लोक त्यांच्या आवडीचे टॅटू बनवतात. अनेक लोकांना त्यांच्या मानेवर, मनगटावर, पायांवर, हातावर टॅटू बनवायला आवडते, पण जसजसा वेळ जातो तसतसा काही लोकांना हा टॅटू नकोसा होत जातो आणि काहींना तो लवकरात लवकर (removal of Tattoo ) काढायची इच्छा असते.


अनेक वेळा लोक प्रेमात पडतात आणि आपल्या प्रियकर आणि प्रेयसीचे नाव टॅटूने लिहितात, परंतु दुर्दैवाने ब्रेकअप झाले तर लोकांना तो टॅटू काढून टाकावासा वाटतो. परंतु कायमस्वरूपी टॅटूचा काढणे अशक्य वाटते, पण आजकाल तंत्रज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की आपण कायमस्वरूपी टॅटू</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/LifeStyle/2023-05-05/photo (1).webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[टॅटू (Tattoo ) हा नेहमीच फॅशनमध्ये असतो. परदेशातून सुरू झालेला ट्रेंड आता भारतातही खूप लोकप्रिय झाला आहे, विशेषतः तरुणांना त्याची खूप आवड दिसते. व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी किंवा चांगला लूक मिळावा यासाठी लोक त्यांच्या आवडीचे टॅटू बनवतात. अनेक लोकांना त्यांच्या मानेवर, मनगटावर, पायांवर, हातावर टॅटू बनवायला आवडते, पण जसजसा वेळ जातो तसतसा काही लोकांना हा टॅटू नकोसा होत जातो आणि काहींना तो लवकरात लवकर (removal of Tattoo ) काढायची इच्छा असते.


अनेक वेळा लोक प्रेमात पडतात आणि आपल्या प्रियकर आणि प्रेयसीचे नाव टॅटूने लिहितात, परंतु दुर्दैवाने ब्रेकअप झाले तर लोकांना तो टॅटू काढून टाकावासा वाटतो. परंतु कायमस्वरूपी टॅटूचा काढणे अशक्य वाटते, पण आजकाल तंत्रज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की आपण कायमस्वरूपी टॅटू सुरक्षितपणे आणि प्रभावीपणे काढू शकता. ते कसे हे जाणून घेऊया.


लेझर टॅटू रिमूव्हल ( Laser Tattoo Removal)


लेझर टॅटू रिमूव्हल ही कायमस्वरूपी टॅटू काढण्याची सर्वात सामान्य आणि प्रभावी पद्धत आहे. ही पद्धत त्वचेतील शाईचे कण तोडण्यासाठी उच्च-तीव्रतेच्या लेझर प्रकाशाचा वापर करून कार्य करते, जे नंतर शरीराच्या रोगप्रतिकारक प्रणालीद्वारे शोषले जातात आणि नैसर्गिकरित्या काढून टाकले जातात. यामुळे तुमच्या शरीराला अजिबात नुकसान होत नाही. त्याच वेळी, वेगवेगळ्या रंगांचे टॅटू काढण्यासाठी वेगवेगळ्या लेसरची आवश्यकता असते. टॅटू काढण्यासाठी रुग्णांना अनेक सत्रांमध्ये यावे लागते. लेझर टॅटू काढण्याशी संबंधित जोखीम कमी असतात, त्याचे सर्वात सामान्य दुष्परिणाम म्हणजे तात्पुरती लालसरपणा, सूज आणि फोड येणे हे आहेत. तथापि, हे दुष्परिणाम सामान्यतः सौम्य असतात आणि काही दिवसातच ते स्वतःच कमी होतात.


डर्माब्रेशन ( Dermabrasion)


डर्माब्रेशन ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये त्वचा विशेषज्ञ हे टॅटूची शाई काढून टाकण्यासाठी त्वचेचा वरचा थर काढून टाकतो. हे ओरखडे त्वचेच्या आतील स्तरांवर जाते, ज्यामुळे टॅटूची शाई त्वचेतून बाहेर येते. ही पद्धत लेझर टॅटू काढण्याइतकी प्रभावी नाही आणि ती खूप वेदनादायक असू शकते. डाग पडणे, संसर्ग होणे आणि त्वचेच्या संरचनेत बदल होण्याचा धोकाही जास्त असतो.


सर्जिकल मेथड ( Surgical Removal)


शस्त्रक्रियेद्वारे कायमस्वरूपी टॅटू काढले जाऊ शकतात. यासाठी भूल देऊन त्वचा सुन्न केली जाते. यानंतर सर्जिकल ब्लेडच्या मदतीने टॅटू काढला जातो. सर्जिकल टॅटू काढणे प्रभावी आहे. पण कधी कधी डाग पडतात. ही पद्धत सहसा लहान टॅटूसाठी राखीव असते आणि ती खूप प्रभावी असू शकते, परंतु ती सर्वात धोकादायक पद्धत देखील आहे. डाग पडण्याचा आणि संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो आणि जखम बरी होण्याचा वेळ जास्त असू शकतो.


टॅटू कव्हर अप (Tatto Cover Up)


टॅटू कव्हर हा असाच एक पर्याय आहे जो लोक आजकाल अधिक निवडतात. जेव्हा तुम्हाला टॅटू पूर्णपणे काढायची इच्छा नसेल आणि त्याचे डिझाइन बदलायचे असेल तेव्हा हा पर्याय निवडता येतो. या तंत्रात, लहान टॅटू मोठ्या आकाराच्या डिझायनर टॅटूद्वारे लपवले जातात आणि त्याचे यश पूर्णपणे टॅटू कलाकाराच्या कौशल्यावर अवलंबून असते.


( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/LifeStyle/A-permanent-tattoo-can-be-applied-in-a-few-moments--leaving-no-trace</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 20 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ घरात पाहुणे आलेत,चिंता नको अशी करा त्यांच्यासाठी झटपट तांदळाची खीर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/LifeStyle/Make-this-quick-food-recipe-tandalachi-kheer</link>
            <description>शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांना उन्हाळ्याच्या सुट्टी लागल्या आहेत. त्यामुळे बच्चे कंपनी आपल्या मित्रांबरोबर खेळ खेळण्यात मश्गुल झाले आहेत. अशात जर ही बच्चे कंपनी घरी आली तर त्यांच्यासाठी पौष्टिक आणि चविष्ट अशी गोड डिश बनवून द्या. ती म्हणजे ‘तांदळाची खीर’


तांदळाची खीर हे देशातील लोकप्रिय मिष्टान्न आहे. तांदूळ, सुकामेवा आणि केसर घालून हा गोड</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/LifeStyle/2023-04-20/image (11).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांना उन्हाळ्याच्या सुट्टी लागल्या आहेत. त्यामुळे बच्चे कंपनी आपल्या मित्रांबरोबर खेळ खेळण्यात मश्गुल झाले आहेत. अशात जर ही बच्चे कंपनी घरी आली तर त्यांच्यासाठी पौष्टिक आणि चविष्ट अशी गोड डिश बनवून द्या. ती म्हणजे ‘तांदळाची खीर’


तांदळाची खीर हे देशातील लोकप्रिय मिष्टान्न आहे. तांदूळ, सुकामेवा आणि केसर घालून हा गोड पदार्थ तयार केला जातो. चला तर जाऊन घेऊया त्याला लागणारे साहित्य आणि कृती.. 


साहित्य :
१ लिटर ्रकीम दूध, 
१00 ग्रॅम साखर,
१ वाटी तांदूळ, 
१ मोठा चमचा तूप,
१ छोटा चमचा जायफळ-वेलची पूड,
केशर,
काजू, बदामाचे काप.


कृती : 


एका बाउलमध्ये तांदूळ पाण्यात १० ते १५ मिनिटांसाठी भिजत ठेवा. त्यानंतर ते थोडावेळ उपसून ठेवा. नंतर मिक्सरमध्ये वाटून घ्या. तांदूळ जाडसर स्वरुपात वाटायचे आहेत. एका पॅनमध्ये तूप घालून त्यावर वाटलेले जाडसर तांदूळ गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्या. पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी उकळल्यानंतर त्यात एक लिटर दूध ओता. दूध उकळल्यानंतर त्यात केसर मिक्स करा. दूध सतत ढवळत राहा. जेणे करून ते पॅनला चिकटणार नाही. पाच मिनिटांसाठी दूध उकळू द्या. केसर मिक्स करा. यानंतर भाजलेले तांदूळ दुधामध्ये मिक्स करा. पॅनमधील सामग्री ढवळत राहा. तांदूळ चांगल्या पद्धतीने शिजू द्यावे. दूध घट्ट झाल्यानंतर त्यात साखर मिक्स करा. आता खीरमध्ये काजू-बदाम आणि चवीनुसार जायफळ-वेलची पावडर मिक्स करा. दोन ते तीन मिनिटांसाठी खीर शिजू द्या. खीर तयार झाल्यानंतर गॅस बंद करा. आपली चविष्ट अशी तांदळाची खीर तयार झाली आहे...





 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/LifeStyle/Make-this-quick-food-recipe-tandalachi-kheer</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 17 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ तुमच्या केसांसाठी उत्तम ठरेल हे तेल, केसगळती होईल दूर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/LifeStyle/This-oil-will-be-great-for-your-hair</link>
            <description>केसांची काळजी घेण्यासाठी तेल (oil) एक शक्तिशाली एजंट म्हणून काम करते. यामुळे केसांचे पोषण होते आणि टाळूचे आरोग्य (hair health) चांगले राहते. खरंतर, केसांच्या चांगल्या वाढीसाठी टाळू निरोगी असणे आवश्यक आहे. तज्ञांच्या मते, आपण केसांना जास्तीत जास्त 3 वेळा आणि आठवड्यातून किमान 2 वेळा तेल लावण्याचे रुटीन फॉलो केले पाहिजे. मात्र केसांसाठी नक्की कोणते तेल (hair oil) वापरावे, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो.</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/LifeStyle/2023-04-17/Is-Vegetable-Oil-Good-For-Your-Hair-Banner.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[केसांची काळजी घेण्यासाठी तेल (oil) एक शक्तिशाली एजंट म्हणून काम करते. यामुळे केसांचे पोषण होते आणि टाळूचे आरोग्य (hair health) चांगले राहते. खरंतर, केसांच्या चांगल्या वाढीसाठी टाळू निरोगी असणे आवश्यक आहे. तज्ञांच्या मते, आपण केसांना जास्तीत जास्त 3 वेळा आणि आठवड्यातून किमान 2 वेळा तेल लावण्याचे रुटीन फॉलो केले पाहिजे. मात्र केसांसाठी नक्की कोणते तेल (hair oil) वापरावे, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो.

यासोबतच केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत माहीत नसणे हेही आपले नुकसान करू शकते. केस गळती रोखणाऱ्या सर्वोत्तम तेलांबद्दल जाणून घेऊया.

भृंगराज तेल

केसांना निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी हे आयुर्वेदिक तेल वर्षानुवर्षे वापरले जात आहे. हे केस गळणे कमी करते आणि त्यांची वाढ सुधारते. भृंगराजच्या झाडापासून बनवलेल्या या तेलात फॅटी ॲसिड, खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. जे केसांची मुळे मजबूत करण्याचे काम करतात आणि केसगळती कमी होते.

भोपळ्याच्या बियांचे तेल

भोपळ्याच्या बियांपासून बनवलेल्या तेलामध्ये अँटिऑक्सिडंट्स, खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात, ज्यांचे काम केस गळणे थांबवणे आणि त्यांची लांबी निरोगी करणे देखील आहे. भोपळ्याच्या बियांच्या तेलात अमीनो ॲसिड असते ज्यामुळे केस नैसर्गिकरित्या दाट होतात.

रोजमेरी ऑईल

हे तेल केसांच्या वाढीच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाते. यात वेगळ्या प्रकारचे अमीनो ॲसिड असते जे केस पातळ होण्यापासून रोखते. यामुळे टाळूमध्ये रक्त परिसंचरण अथवा रक्ताभिसरण सुधारते आणि केसांची वाढ देखील चांगली होते.

आर्गन ऑईल

आर्गनच्या झाडापासून बनवलेल्या या तेलात फॅटी ॲसिड, अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई असते. हे तेल पौष्टिक असते आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्मांसाठी ओळखले जाते. अकाली केस पांढरे होण्याची समस्या तुम्हाला भेडसावत असेल तर या तेलामुळे तुम्हाला या त्रासापासूनही आराम मिळू शकतो.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/LifeStyle/This-oil-will-be-great-for-your-hair</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 17 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ उन्हाळ्यात होणाऱ्या त्वचेच्या समस्यांपासून बचावासाठी करा ‘हे’ उपाय ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/LifeStyle/Remedies-to-prevent-summer-skin-problems</link>
            <description>उन्हाळ्यात (hot summer) त्वचेची अधिक काळजी घेणे (skin care) गरजेचे असते. सनबर्नपासून ते मुरुमांपर्यंत त्वचेशी संबंधित अनेक समस्यांचा या ऋतूमध्ये सामना करावा लागू शकतो. उन्हाळ्यात अनेक लोक त्वचेशी संबंधित अनेक समस्यांनी त्रस्त असतात. या समस्या टाळण्यासाठी तुम्ही अनेक पद्धतीही वापरून पाहू शकता. यामुळे उन्हाळ्यातही त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यास मदत होईल. यामुळे तुमची त्वचा हायड्रेटेड (hydrated) राहील. तसेच याच्या मदतीने तुम्ही त्वचेला उन्हापासून वाचवू शकाल.

केमिकलयुक्त सौंदर्य उत्पादने आणि महागड्या उत्पा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/LifeStyle/2023-04-17/large_skin.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[उन्हाळ्यात (hot summer) त्वचेची अधिक काळजी घेणे (skin care) गरजेचे असते. सनबर्नपासून ते मुरुमांपर्यंत त्वचेशी संबंधित अनेक समस्यांचा या ऋतूमध्ये सामना करावा लागू शकतो. उन्हाळ्यात अनेक लोक त्वचेशी संबंधित अनेक समस्यांनी त्रस्त असतात. या समस्या टाळण्यासाठी तुम्ही अनेक पद्धतीही वापरून पाहू शकता. यामुळे उन्हाळ्यातही त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यास मदत होईल. यामुळे तुमची त्वचा हायड्रेटेड (hydrated) राहील. तसेच याच्या मदतीने तुम्ही त्वचेला उन्हापासून वाचवू शकाल.

केमिकलयुक्त सौंदर्य उत्पादने आणि महागड्या उत्पादनांच्या वापराशिवायही तुम्ही तुमची त्वचा निरोगी ठेवू शकता. यामुळे तुमच्या त्वचेचे खोलवर पोषण होईल. उन्हाळ्यात त्वचेच्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या पद्धतींचा अवलंब करू शकता ते जाणून घेऊ या.

सनस्क्रीनचा वापर करा

उन्हाळा असो किंवा हिवाळा , त्वचेसाठी सनस्क्रीन नेहमीच वापरले पाहिजे. सनस्क्रीन हे अतिनील किरणांपासून तुमचे संरक्षण करण्यासाठी कार्य करते. या अतिनील किरणांमुळे त्वचेचा कर्करोग होऊ शकतो. तुम्ही उन्हात बाहेर जात असाल तर दर 2 ते 3 तासांनी सनस्क्रीन नक्कीच वापरा.

हायड्रेटेड रहावे

आपली त्वचा बाहेरून हायड्रेटेड ठेवण्यासोबतच आतूनही त्वचेला हायड्रेट ठेवा. यामुळे तुमची त्वचा निरोगी राहते. त्वचेला हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे आहे. त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यायले पाहिजे. तसेच आहार जास्तीत जास्त द्रव पदार्थांचा समावेश करावा. तसेच काकडी, कलिंगड यासारख्या पदार्थांचेही तुम्ही सेवन करू शकता.

एक्सफोलिएट करावे

त्वचा एक्सफोलिएट करणे खूप महत्वाचे आहे. हे मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा मुलायम राहण्यास मदत होते. त्वचेसाठी तुम्ही होममेड स्क्रब देखील वापरू शकता. यामुळे त्वचेची छिद्र स्वच्छ राहू शकतील.

कठोर रासायनिक उत्पादनांचा वापर करणे टाळावे

कठोर रसायने असलेली उत्पादने त्वचेचे नैसर्गिक तेल काढून घेतात. त्यामुळे त्वचेवर जळजळ होते. त्यामुळे तुमच्या त्वचेला इजा होणार नाही असे पर्याय निवडा. केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स वापरणे टाळावे.

नैसर्गिक उपाय

सनबर्नचा त्रास झाल्यास आराम मिळवण्यासाठी तुम्ही कोरफडीचा वापर करू शकता. त्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो. तसेचा त्वचेचा लालसरपणा आणि सूज दूर होण्यासही मदत मिळते. तसेच तुम्ही कोल्ड कॉम्प्रेस वापरू शकता.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/LifeStyle/Remedies-to-prevent-summer-skin-problems</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 05 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ डिप्रेशन इन चिल्ड्रन अँड एडोलेसेंट्स' ;दर ७ पैकी १ मुलाला 'लो मूड':रिपोर्ट ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/LifeStyle/Depression-in-Children-and-Adolescents</link>
            <description>सर्व मुलांची वागणूक वेगळी असते. मुलांसाठी  रागावणे, वाईट वाटणे, विचित्र वागणे हे सामान्य आहे, परंतु जेव्हा हे दुःख आणि राग आठवडे किंवा त्याहून अधिक काळ टिकतो, तेव्हा ही चिंताजनक गोष्ट असू शकते. जर मुलाला रागाने चिडचिड होत असेल आणि त्याचे वागणे बदलत असेल तर ते नैराश्य असू शकते. पालकांनी त्यांच्या मुलांच्या अशा लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नये. 'लो मूड' म्हणजेच कमजोर मनःस्थिती आणि नैराश्य या अशा समस्या आहेत, ज्याचा मुलांनाही सामना करावा लागतो. या मुलांच्या नैराश्याचे कारण केवळ करिअर आणि घरातील ताणतणाव नसतात. त्यापेक्षा भाव</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/LifeStyle/2023-04-05/childhood-depression.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सर्व मुलांची वागणूक वेगळी असते. मुलांसाठी  रागावणे, वाईट वाटणे, विचित्र वागणे हे सामान्य आहे, परंतु जेव्हा हे दुःख आणि राग आठवडे किंवा त्याहून अधिक काळ टिकतो, तेव्हा ही चिंताजनक गोष्ट असू शकते. जर मुलाला रागाने चिडचिड होत असेल आणि त्याचे वागणे बदलत असेल तर ते नैराश्य असू शकते. पालकांनी त्यांच्या मुलांच्या अशा लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नये. 'लो मूड' म्हणजेच कमजोर मनःस्थिती आणि नैराश्य या अशा समस्या आहेत, ज्याचा मुलांनाही सामना करावा लागतो. या मुलांच्या नैराश्याचे कारण केवळ करिअर आणि घरातील ताणतणाव नसतात. त्यापेक्षा भावनिक सुरक्षिततेचा अभाव, पालकांकडून योग्य लक्ष न मिळणे किंवा शोषण अशी इतरही अनेक कारणे आहेत जी मुलांमध्ये नराश्याचे कारण बनतात.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, 'डिप्रेशन इन चिल्ड्रन अँड एडोलेसेंट्स: अ रिव्ह्यू ऑफ इंडियन स्टडीज' या अहवालानुसार, प्रत्येक 7 पैकी एका भारतीय मुलाला मोटिवेशनचा अभाव, लो मूड आणि नैराश्याच्या सुरुवातीच्या लक्षणांनी ग्रासले आहे आहे. सर्वात वाईट गोष्ट अशी की, सुमारे 97 टक्के प्रकरणांमध्ये पालक याकडे लक्ष देत नाहीत, ज्यामुळे मुलाच्या व्यक्तिमत्त्वावर, वागणुकीवर आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. आपल्या देशातील एकूण लोकसंख्येपैकी 6 टक्के मुले आहेत. यापैकी, 13 ते 15 वर्षे वयोगटातील प्रत्येक 4 मुलांपैकी एक मूल तणावपूर्ण मनःस्थितीतून जात आहे. हे असे वय असते जेव्हा मूल जग, नातेसंबंध, समाज, स्वतःचे-परके, बरोबर-अयोग्य अशा गोष्टी शिकत असते. अशा परिस्थितीत नैराश्यामुळे त्याला योग्य मार्ग मिळाला नाही तर तो भरकटत जाऊ शकतो.

मुलांमधील नैराश्याची लक्षणे :-
निद्रानाश किंवा जास्त झोप येणे, आत्मविश्वासाचा अभाव, काही चांगले घडले तरी आनंद वाटत नाही, रागाने वस्तू फेकणे, मोठ्याने ओरडणे, कुटुंब आणि मित्रांपासून दूर राहणे, स्वतःला इजा करणे, आत्महत्येचे विचार येणे किंवा त्याबद्दल बोलणे

मुलांना नैराश्यापासून कसे वाचवाल?

मुलांशी प्रेमाने वागा, प्रत्येक प्रसंगात तुम्ही त्याच्यासोबत आहात याची जाणीव मुलाला द्या, त्यांना वेळ द्या, त्याच्याशी बोला, खेळ खेळा किंवा त्याला एकत्र फिरायला घेऊन जा, तुमच्या मुलाच्या शिक्षकांना भेटा, त्याच्याबाबत फीडबॅक मिळवा, मुलाला चुकीची शिक्षा दिल्यानंतर आणि शिक्षा संपल्यानंतर त्याच्याशी प्रेमाने वागा, जेव्हा मूल भावनिकदृष्ट्या कठीण परिस्थितीतून जात असेल तेव्हा त्याला धीर द्या आणि त्याला प्रेरणादायी गोष्टी सांगा.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/LifeStyle/Depression-in-Children-and-Adolescents</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 18 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान ला ड्रग्ज प्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/LifeStyle/Nawab-Maliks-son-in-law-Sameer-Khan-remanded-in-judicial-custody-for-14-days</link>
            <description>मुंबई : कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान ला ड्रग्ज प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मुंबईतील एस्प्लानेड कोर्टाने (Esplanade Court) कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Cabinet Minister Nawab Malik) यांचे जावई समीर खान (Sameer Khan) ला ड्रग्ज प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आज समीर खान यांची न्यायालयात हजर होण्यापूर्वी वैद्यकीय तप</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/LifeStyle/2021-01-18/sameerkhan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान ला ड्रग्ज प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मुंबईतील एस्प्लानेड कोर्टाने (Esplanade Court) कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Cabinet Minister Nawab Malik) यांचे जावई समीर खान (Sameer Khan) ला ड्रग्ज प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आज समीर खान यांची न्यायालयात हजर होण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. समीर खानला ड्रग्स प्रकरणात 13 जानेवारी रोजी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती. त्याचा एनसीबी रिमांड आज संपेला होता.

दरम्यान, मुंबईतील 200 किलो ड्रग्स जप्त केल्याप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना चौकशीसाठी बोलावले होते. एनसीबीच्या म्हणण्यानुसार, समीर खान आणि करण सजनानी यांच्यात 20 हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. गूगल पे च्या माध्यमातून करण सजनानी आणि समीर खान यांच्यात 20,000 रुपयांचा व्यवहार झाला. एनसीबीने वर्तवलेल्या अंदाजानुसार, हा व्यवहार ड्रग्ससंदर्भात झाला असावा. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी एनसीबीने समीर खान यापूर्वी समन्स बजावलं होतं.

एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीबीने मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील एका कुरिअरमध्ये गांजा ताब्यात घेतला होता. त्यानंतर खार येथील करण सजनानी यांच्या घरातून देखील गांजा जप्त करण्यात आला. त्यानंतर करण सजनानी, राहिल फर्निचरवाला, शाइस्ता फर्निचरवाला आणि राम कुमार तिवारी यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाच्या अधिक तपासात वांद्रे येथील रहिवासी आणि नवाब मलिक यांचे जावई समीर खानचे नाव पुढे आले. त्यानंतर समीर खानला एनसीबीने चौकशीसाठी बोलावले होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/LifeStyle/Nawab-Maliks-son-in-law-Sameer-Khan-remanded-in-judicial-custody-for-14-days</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 24 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ यंदा आपल्या लाडक्या बाप्पासाठी ‘मोदक’ घरीच करा..  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/LifeStyle/This-year-make-Modak-at-home-for-your-dear-Bappa</link>
            <description>पुष्कर लाभे : गणेशोत्सव म्हटला तर मोदक हे पक्वान्न आपल्या डोळ्यापुढे आलेच. गणपतीला सर्वात जास्त आवडणारा पदार्थ म्हणजे मोदक. ‘मोदक’ या यामध्ये मोद असा शब्द आहे. जो पदार्थ खाऊन आनंद मिळतो त्याला "मोदक" असे म्हटले जाते. गणपतीला हा पदार्थ विशेष प्रिय असल्याचे संदर्भ पुराण साहित्यात सापडतात.
गणेशाच्या प्रतिष्ठापनेनंतर २१ मोदकांचा नैवेद्य गणपतीपुढे दाखवल्या जातो. यंदाच्या कोरोना काळात विविध प्रकारचे मोदक कसे तयार करायचे, हे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. आजच ट्राय करून बघा... 
पारंपरिक पद्धतीमध्ये उकडीचे मोदक आणि तळणीचे मोदक हे दोन प्रकार प्रचलित आहेत. साधारणतः पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात उकडीचे मोदक तयार करतात. विदर्भात मात्र तळणीचे मोदक तयार करतात. याशिवाय अन्य मोदकाचे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-08-24/modak.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुष्कर लाभे : गणेशोत्सव म्हटला तर मोदक हे पक्वान्न आपल्या डोळ्यापुढे आलेच. गणपतीला सर्वात जास्त आवडणारा पदार्थ म्हणजे मोदक. ‘मोदक’ या यामध्ये मोद असा शब्द आहे. जो पदार्थ खाऊन आनंद मिळतो त्याला "मोदक" असे म्हटले जाते. गणपतीला हा पदार्थ विशेष प्रिय असल्याचे संदर्भ पुराण साहित्यात सापडतात.
गणेशाच्या प्रतिष्ठापनेनंतर २१ मोदकांचा नैवेद्य गणपतीपुढे दाखवल्या जातो. यंदाच्या कोरोना काळात विविध प्रकारचे मोदक कसे तयार करायचे, हे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. आजच ट्राय करून बघा... 
पारंपरिक पद्धतीमध्ये उकडीचे मोदक आणि तळणीचे मोदक हे दोन प्रकार प्रचलित आहेत. साधारणतः पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात उकडीचे मोदक तयार करतात. विदर्भात मात्र तळणीचे मोदक तयार करतात. याशिवाय अन्य मोदकाचे प्रकार बघूया... 

१. पनीरचे मोदक : पनीरमध्ये साखर, काजू, किसमिस, वेलची पावडर भरून हे सारण रवा, मैद्याच्या पोळीमध्ये भरून तळून काढावे. हा मोदकाचा प्रकार मला दिल्लीला एका ठिकाणी खायला मिळाला.

२. खव्याचे मोदक : हा प्रकार तसा सगळीकडे दिसतो. यामध्ये खव्यात साखर, केशर घालून, भाजून साच्यात घालून मोदक करतात.

३. बेक केलेले मोदक : खोबरं, किसमिस, खव्याचे सारण मैद्याच्या सप्तपारीमध्ये भरून बेक करावे.

४. गूळ कोहळ्याचे मोदक :  हा प्रकार विदर्भातील आतल्या गावातला. गूळ, लाल कोहळा व तेवढीच कणिक घेऊन एकत्र मळावे. मोदकाचा आकार देऊन मंद आचेवर तळावे.

५. पुरणाचे मोदक :  पुरणाचे सारण मैद्याच्या पारीमध्ये भरून मोदक तळून घेतात किंवा वाफवूनसुद्धा घेतात.

६. फ्रुट मोदक :  वेगवेगळया प्रकारची फळे मिक्स फ्रुट जॅममध्ये मिसळून हे सारण मैद्याच्या पारीमध्ये भरून मंद आचेवर तळून घ्यावे.

७. संदेश मोदक : पनीर, खवा, साखर, केशर, वेलची एकत्र मिक्सरमध्ये वाटून याचे मोदक साच्यामध्ये बनवून वाफवून घ्यावे.

८. मनुकांचे मोदक :  मनुका, काजू एकत्र करून त्यात थोडी दूध पावडर घालून त्याचे मोदक वळावे.

९. तीळगुळाचे मोदक :  गुळाचा पाक तयार करून त्यात भाजलेले तीळ घालावे व हे सारण कणकेच्या पारीमध्ये भरून मंद आचेवर तळावे. किंवा तीळ व गुळाचे जे सारण आहे ते थोडे गरम असतानाच साचामध्ये घालून त्याचे मोदक करावे. हा प्रकार यवतमाळ भागात करतात व तिळी चतुर्थीला याचा नैवेद्य दाखवतात.

१०. खोबरं मैद्याचे मोदक :  हा मोदक प्रकार सर्व ठिकाणी आढळून येतो. रवा, खोबरं, खवा, साखर एकत्र करून हे सारण मैद्याच्या वाटीत भरून मंद आचेवर तळावेत.

११. मैद्याचे उकडीचे मोदक :  मैद्याची पारी लाटून मध्ये कुठलेही गोड सारण भरून त्याचे वेगळ्या आकाराचे मोदक करावे व वाफवून घ्यावे. थोडक्यात मोमोज म्हणजेच मोदकासारखा एक प्रकार. ते ज्याप्रकारे करतात तसाच हा प्रकार करावा.

१२. कॅरामलचे मोदक : पनीर, खवा, काजू, किसमिस, साखर एकत्र करून त्याला मोदकाचा आकार द्यावा. हा मोदक साखरेच्या कॅरामलमध्ये बुडवून थंड करून सव्र्ह करावा.

१३. काजूचे मोदक :  काजू कतलीचे सारण घेऊन या मध्ये खवा, खडीसाखर भरून याला मोदकाचा आकार द्यावा.

१४. फुटाण्यांचे मोदक :  फुटाणे बारीक करून त्यात साखर व तूप घालून चांगले मळावे या पिठाला मोदकाचा आकार द्यावा. हा प्रकार गरम न करता चटकन होणारा प्रकार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/LifeStyle/This-year-make-Modak-at-home-for-your-dear-Bappa</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 22 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आपल्या घरी गणेशाची स्थापना स्वतः करा  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/LifeStyle/Install-Ganesha-in-your-home-yourself</link>
            <description>पुष्कर
सा मध्यव्यापिनी ग्राह्या | दिनद्वये साकल्येन मध्यान्हव्याप्तौ अव्याप्तौ वा |
चतुर्थी गणनाथस्य मातृविद्धा प्रशस्यते |
अस्यां चन्द्रदर्षने मिथ्याभिः दूषणं दोषः ||
चतुर्थी तृतीयायुक्त घेणे प्रशस्त मानले असून चुकून चंद्रदर्शन झाल्यास पुढील दोष परिहार स्यमंतक मन्याच्या श्लोकाचे पठण केले जाते.
सिंहः प्रसेनमवधीत सिंहो जाम्बवता हतः |
सुकुमारक मा रोदिस्तव ह्येष स्यमन्तकः ||” (तिथीतत्त्व)

पार्थिव गणेश मूर्ती
साधारणतः एक वीत वा एक फुट उंचीची व मातीपासून (जलामध्ये विसर्जित होईल अशी माती) निर्माण केलेली असावी. यावर करावयाचे विविध पूजन उपचार हे फुलं / दुर्वा याद्वारे करावेत व एकवीस मोदकांचे वायन दान करावे.

पूजा साहित्य
१)हळदकुंकू पाळे २) फुले, दुर्वा, तुळस, बेल
३) नारळ, फळे ४) विड्याची पाने, सुपारी, चिल्लर नाणी
५) कापसाची वस्त्रे ६) पंचामृत, वायन
७) चौरंग, वाळू, वस्त्र ८) धूप, दीप, निरांजन, नैवेद्य

पूजा विधी
वंदन : घरातील थोरामोठ्यांना तसेच कुलदेवतेस वंदन करून पुजेस बसावे.
आचमन / प्राणायाम : तीन वेळेस पळीने पाणी प्राशन करून चौथ्यांदा सोडावे व प्राणायाम  करावा.
देवतास्मरण : (हात जोडावे)
कुलदेवताभ्यो नमः| ग्रामदेवताभ्यो नमः| एतत् कर्म प्रधान देवताभ्यो नमः| सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः|

संकल्प : (पळीत पाणी घेवून सोडावे)
प्रतिवार्षिक विहितं पार्थिव सिद्धिविनायक देवता प्रीत्यर्थं यथाज्ञानेन यथाशक्ति सहित
प्राणप्रतिष्ठापूर्वकं ध्यान – आवाहनादि षोडशोपचार पूजनं अहं करिष्ये|
तत्रादौ निर्विघ्नता सिध्यर्थं महागणपति स्मरणं शरीर शुध्यर्थं षडङ्गन्यासं पृथ्वी, कलश, शङ्ख, घण्टा पूजनं च करिष्ये |

यानंतर श्रीगणेश पूजन, कलश, पृथ्वी, कलश, शंख, घंटा व दीप पूजन करावे.

श्रीगणेश पूजन :
वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटि समप्रभ |निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा || श्रीगणेशाय नमः ||

पृथ्वी पूजन :
पृथ्वी त्वया धृता लोका देवि त्वं विष्णुना धृता | त्वं च धारय मां देवी पवित्रं कुरु चासनम् || भूम्यै नमः ||

न्यास विधि : “विष्णवे नमः |”, असे १२ वेळा म्हणून डोक्यापासून पायापर्यन्त स्वतःची शरीर शुद्धि करावी.
कलश पूजन :
कलशस्य मुखे विष्णुः कण्ठे रुद्रः समाश्रितः |
मूले तत्रस्थितो ब्रह्मा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/LifeStyle/2020-08-22/ganeshsthpna.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुष्कर
सा मध्यव्यापिनी ग्राह्या | दिनद्वये साकल्येन मध्यान्हव्याप्तौ अव्याप्तौ वा |
चतुर्थी गणनाथस्य मातृविद्धा प्रशस्यते |
अस्यां चन्द्रदर्षने मिथ्याभिः दूषणं दोषः ||
चतुर्थी तृतीयायुक्त घेणे प्रशस्त मानले असून चुकून चंद्रदर्शन झाल्यास पुढील दोष परिहार स्यमंतक मन्याच्या श्लोकाचे पठण केले जाते.
सिंहः प्रसेनमवधीत सिंहो जाम्बवता हतः |
सुकुमारक मा रोदिस्तव ह्येष स्यमन्तकः ||” (तिथीतत्त्व)

पार्थिव गणेश मूर्ती
साधारणतः एक वीत वा एक फुट उंचीची व मातीपासून (जलामध्ये विसर्जित होईल अशी माती) निर्माण केलेली असावी. यावर करावयाचे विविध पूजन उपचार हे फुलं / दुर्वा याद्वारे करावेत व एकवीस मोदकांचे वायन दान करावे.

पूजा साहित्य
१)हळदकुंकू पाळे २) फुले, दुर्वा, तुळस, बेल
३) नारळ, फळे ४) विड्याची पाने, सुपारी, चिल्लर नाणी
५) कापसाची वस्त्रे ६) पंचामृत, वायन
७) चौरंग, वाळू, वस्त्र ८) धूप, दीप, निरांजन, नैवेद्य

पूजा विधी
वंदन : घरातील थोरामोठ्यांना तसेच कुलदेवतेस वंदन करून पुजेस बसावे.
आचमन / प्राणायाम : तीन वेळेस पळीने पाणी प्राशन करून चौथ्यांदा सोडावे व प्राणायाम  करावा.
देवतास्मरण : (हात जोडावे)
कुलदेवताभ्यो नमः| ग्रामदेवताभ्यो नमः| एतत् कर्म प्रधान देवताभ्यो नमः| सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः|

संकल्प : (पळीत पाणी घेवून सोडावे)
प्रतिवार्षिक विहितं पार्थिव सिद्धिविनायक देवता प्रीत्यर्थं यथाज्ञानेन यथाशक्ति सहित
प्राणप्रतिष्ठापूर्वकं ध्यान – आवाहनादि षोडशोपचार पूजनं अहं करिष्ये|
तत्रादौ निर्विघ्नता सिध्यर्थं महागणपति स्मरणं शरीर शुध्यर्थं षडङ्गन्यासं पृथ्वी, कलश, शङ्ख, घण्टा पूजनं च करिष्ये |

यानंतर श्रीगणेश पूजन, कलश, पृथ्वी, कलश, शंख, घंटा व दीप पूजन करावे.

श्रीगणेश पूजन :
वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटि समप्रभ |निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा || श्रीगणेशाय नमः ||

पृथ्वी पूजन :
पृथ्वी त्वया धृता लोका देवि त्वं विष्णुना धृता | त्वं च धारय मां देवी पवित्रं कुरु चासनम् || भूम्यै नमः ||

न्यास विधि : “विष्णवे नमः |”, असे १२ वेळा म्हणून डोक्यापासून पायापर्यन्त स्वतःची शरीर शुद्धि करावी.
कलश पूजन :
कलशस्य मुखे विष्णुः कण्ठे रुद्रः समाश्रितः |
मूले तत्रस्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणाः स्मृताः || कलशाय नमः ||

शङ्ख पूजन :
त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विधृतः करे |
नमितः सर्व देवैश्च पाञ्चजन्य नमोस्तुते || शङ्खाय नमः ||

घण्टा पूजन :
आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु राक्षसाम् |
कुर्वे घण्टारवं तत्र देवताव्हान लक्षणम् || घण्टायै नमः ||

दीप पूजन :
भो दीप ब्रह्म रूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः |
आरोग्यं देहि पुत्रांश्च सर्वान्कामान्प्रयच्छ मे || दीपदेवताभ्यो नमः ||

आत्मशुद्धि: स्वतः वर व पूजा साहित्यावर शंख जल प्रोक्षण करावे.
शङ्खोदकेन पूजाद्रव्याणि संप्रोक्ष्य आत्मानं च प्रोक्षेत् |

प्राणप्रतिष्ठा विधी
श्री पार्थिव गणेशमूर्तीच्या हृदयाला उजव्या हाताने स्पर्श करून म्हणावे,

अस्यैः प्राणाः प्रतिष्ठन्तु अस्यैः प्राणाः क्षरन्तु च | अस्यै देवत्वमर्चायै मा महेतिच कच्चन ||
अस्यां मूर्तौ मम प्राण इह प्राणाः | अस्यां मूर्तौ मम जीव इह स्थितः ||

यानन्तर ‘श्री सिद्धिविनायकाय नमः |’, असे म्हणून देवाच्या डोक्यापासुन पायापर्यंत स्पर्श करावा.
देवाच्या डोळ्यांमधून तुपामध्ये भिजविलेली दुर्वा फिरवावी.
देवाला आरसा दाखवावा आणि गंध, फुलं, बालभोग (तूप-गुळ) अर्पण करावे.
पळीभर पाणी सोडावे, “अनया पूजया श्रीसिद्धिविनायकः प्रीयताम् |”
पूर्वपूजन

ध्यान : हातात अक्षता, बेल, फुले घेवून पुढील श्लोकांनी ध्यान करून अर्पण करावे.
एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं |
पाशान्कुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकम् ||
श्री सिद्धीविनायकाय नमः || ध्यानं समर्पयामि ||

पूर्व उपचार : यानंतर “श्री सिद्धीविनायकाय नमः |” असे प्रत्येकवेळी म्हणून आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, पंचामृतस्नान, गंधोदक स्नान, मांगलिक स्नान, शुद्धोदक स्नान इत्यादी सर्व फुलाने सिंचन करीत करावे.
धूप, दीप, नैवेद्य : यानंतर पुर्वपूजना करिता फुलं वाहून धूप – दीप व उर्वरित पंचामृताचा नैवेद्य दाखवावा.
पुर्वपूजन समारोप : पळीभर पाणी सोडून वाहिलेली फुले (निर्माल्य) काढून अभिषेकाकरिता नवीन फुलं वहावीत.
“अनेन पुर्वाराधनेन श्री सिद्धिविनायकः प्रीयताम् |”
अभिषेक : (फुलाने जलसिंचन करीत अभिषेक करावा.) यावेळी श्रीगणेशस्तुती पर श्री अथर्वशीर्ष पठण करावे.
उत्तर पूजन : पुनः “श्री सिद्धीविनायकाय नमः ||” या श्लोकाने यज्ञोपवीत, कापसाचे वस्त्र, गंध,  अक्षत, फुले, हळद-कुंकू, शेंदूर, गुलाल, बुक्का, अत्तर, अलंकार आदी उपचार अर्पण करावे.
अंग पूजा : हातात अक्षत घेवून देवतेच्या चरणापासून ललाटापर्यंत अवयवांना चौदा ठिकाणी अर्पण कराव्या.
लंबोदराय नमः | – उदरं पूजयामि ||, गौरीसुताय नमः | – स्तनौ पूजयामि ||
गणपायकाय नामः | – हृदयं पूजयामि ||, स्थूलकर्णाय नमः | – कण्ठं पूजयामि ||
स्कन्दाग्रजाय नमः| – स्कन्धौ पूजयामि||, पाशहस्ताय नमः | – हस्तौ पूजयामि ||
गजवक्त्राय नमः | – वक्त्रं पूजयामि ||, विघ्नहर्त्रे नमः | – ललाटं पूजयामि ||
सर्वेश्वराय नमः | – शिरः पूजयामि ||, गणाधिपाय नमः | – सर्वाङ्गं पूजयामि ||

पत्र पूजा : पुढीलप्रमाणे प्रत्येक नाम घेवून पत्री वहाव्यात. (नसल्यास पुष्प वा अक्षत वहावी.)
गणेश्वराय नमः | – पादौ पूजयामि ||, विघ्नराजाय नमः | – जानुनी पूजयामि ||
आखुवाहनाय नमः | – ऊरु पूजयामि ||, हेरंबाय नमः | – कटीं पूजयामि ||
सुमुखाय नमः | – मधुमालती समर्पयामि ||, गणाधिपाय नमः | – बिल्वं समर्प.||
गजाननाय नमः | – श्वेत दुर्वा ||, लंबोदराय नमः | – बोरी ||
हरसूनवे नमः | – धोतरा ||, गजकर्णकाय नमः | – तुलसी ||
वक्रतुण्डाय नमः | – शमी ||, गुहाग्रजाय नमः | – आघाडा ||
एकदन्ताय नमः | – डोरली ||, विकटाय नमः | – कण्हेर ||
कपिलाय नमः | – रुई ||, गजदन्ताय नमः | – अर्जुन ||
विघ्नराजाय नमः | – विष्णुक्रान्ता ||, बटवे नमः | – डाळिम्ब ||
सुराग्रजाय नमः | – देवदार ||, भालचन्द्राय नमः | – मारवा ||
हेरंबाय नमः | – पिंपळ ||, चतुर्भुजाय नमः | – जाई ||
विनायकाय नमः | – केवडा ||, सर्वेश्वराय नमः | – हदगा ||

पुष्प पूजा : चाफा, केवडा, कण्हेर, बकुळ, धोतरा, सुर्यकमळ, कमळ, जास्वंद, मोगरा आदी विविध फुले अर्पण करावी.
यानंतर धूप, दीप, नैवेद्य, विडा – नारळ, दक्षिणा समर्पित करावी.
दुर्वा पूजन : यानंतर पुढील दहा नावांनी गंध, अक्षत (फुल) व दोन दुर्वा वहाव्यात. प्रत्येक नावानंतर “दुर्वायुग्मं समर्पयामि |”, असे म्हणावे.
गणाधिपाय नमः | – दुर्वायुग्मं समर्प. ||, उमापुत्राय नमः | – दुर्वायुग्मं समर्प. ||
अघनाशनाय नमः | – दुर्वायुग्मं समर्प. ||, विनायकाय नमः | – दुर्वायुग्मं समर्प. ||
ईशपुत्राय नमः | – दुर्वायुग्मं समर्प. ||, सर्वसिद्धिप्रदायकाय नमः | – दुर्वायुग्मं समर्प. ||
एकदन्ताय नमः | – दुर्वायुग्मं समर्प. ||, इभवक्त्राय नमः | – दुर्वायुग्मं समर्प. ||
आखुवाहनाय नमः | – दुर्वायुग्मं समर्प. ||, कुमारगुरवे नमः | – दुर्वायुग्मं समर्प. ||

यानंतर २१ वी दुर्वा पुढील श्लोक म्हणून वहावी.
गणाधिप नमस्तेस्तु उमापुत्राघनाशन | एकदन्त भवक्त्रेति तथा मूषकवाहन ||
विनायकेशपुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक | कुमारगुरवे नित्यं पूजनीयः प्रयत्नतः ||
दूर्वामेकां समर्पयामि ||

आरती व मंत्रपुष्प : यानंतर आरती व मंत्रपुष्पांजली, प्रदक्षिणा व नमस्कार अर्पण करावा,
एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि | तन्नो दन्तिः प्रचोदयात् ||
मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि ||

प्रार्थना
विनायक गणेशान सर्व देव नमस्कृत |पार्वती प्रिय विघ्नेश मम विघ्ननिवारय ||

वायनदान : पुढील श्लोक म्हणून वायन दान (लाल वस्त्रात बांधलेले एकवीस मोदक) करावे.
सघृतान् गुडसंमिश्रान् मोदकान् घृतपाचितान् |
वायनं मे गृहाणेदं वरं देहि विनायक ||

समारोप : (पळीभर पाणी सोडावे.) “अनेन यथाज्ञानेन कृत पूजनेन तेन श्रीउमामहेश्वरौ देवताः प्रीयेताम् |”
श्रीगणेश विसर्जन

गणेश विसर्जन करण्यापूर्वी यथोपचार गणेशपूजन करावे तसेच पुढील श्लोक म्हणून गणपतीवर अक्षता वहाव्यात आणि पार्थिव गणेश मूर्ती उत्तरेकडे हलवावी.
यान्तु देवगणाः सर्वे पूजामादाय पार्थिवीम् | इष्टकाम प्रसिध्यर्थं पुनरागमनाय च ||
विसर्जन प्रवाही जलात शक्य नसल्यास उपलब्ध जलात गंगा, फुलं, तुळस वहावी. त्यामध्ये पार्थिव मूर्तीचे विसर्जन करावे व पाणी झाडात प्रवाहित करावे.

संदर्भ व महत्त्व
श्रीगणेश चतुर्थी हा पूर्वापार साजरा करण्यात येणारा महत्त्वाचा भारतीय उत्सव होय, हिला वरद चतुर्थी व शिवा असेही म्हणतात.
गणपती हा विघ्नहर्ता असल्याने प्रत्येक शुभकार्याच्या आरंभी याचे पूजन करतात.
श्रीगणेशाला प्रिय चतुर्थी तिथी ही जागृती, स्वप्न, सुशुप्ती अशा तिन्ही अवस्थांच्या पलीकडील अवस्था दर्शविते.
गणपतीचे महोत्कट विनायक, गुणेश, गणेश व धुम्रकेतू असे चार अवतार झाल्याचे गणेश पुराणात वर्णन येते.
परंपरेनुसार विद्यारंभ, विवाहादी संस्कार, प्रवेश, यात्रा संग्राम व संकटकाल आदी वेळी केलेले गणेश स्मरण / पूजन हे विघ्न दूर करणारे ठरते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/LifeStyle/Install-Ganesha-in-your-home-yourself</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 01 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ लॉकडाऊनमुळे मूड स्विंग्सचा सामना करताय? जाणून घ्या उपाय ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/LifeStyle/Facing-mood-swings-due-to-lockdown-Learn-the-solution</link>
            <description>मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसने हैदोस घातला आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. भारतातही लॉकडाऊन 31  ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे. अशातच अनेक लोक आपल्या घरातच बंद आहेत. त्यामुळे अनेकांना मानसिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तुम्हालाही अचानक राग योतो का?, अचानक खूश होता का?, अचानक राग अनावर होऊन आक्रमक होता? किंवा कोणाला राग आला तर त्याची खिल्ली उडवता का? याव्यतिरिक्त तणाव, कंटाळा, एखादी गोष्ट आठवण्यात त्रास होणं, निर्णय घेण्यास भिती वाटणं, एकाग्रता कमी होणं, अशक्तपणा येणं, चक्कर येणं, श्वास घेण्यास त्रास होणं यांसारख्या स</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/LifeStyle/2020-08-01/moodswing.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसने हैदोस घातला आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. भारतातही लॉकडाऊन 31  ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे. अशातच अनेक लोक आपल्या घरातच बंद आहेत. त्यामुळे अनेकांना मानसिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तुम्हालाही अचानक राग योतो का?, अचानक खूश होता का?, अचानक राग अनावर होऊन आक्रमक होता? किंवा कोणाला राग आला तर त्याची खिल्ली उडवता का? याव्यतिरिक्त तणाव, कंटाळा, एखादी गोष्ट आठवण्यात त्रास होणं, निर्णय घेण्यास भिती वाटणं, एकाग्रता कमी होणं, अशक्तपणा येणं, चक्कर येणं, श्वास घेण्यास त्रास होणं यांसारख्या समस्यांचा सामना करत असाल तर तुम्हीही मूड स्विंग्सचे शिकार झाला आहात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, नक्की मूड स्विंग आहे तरी काय?

लॉकडाऊनमध्ये मूड स्विंगचं मुख्य कारण काय आहे?
मूड स्विंग्स हा एक खूप मोठा फॅक्टर आहे. जो लोकांच्या मानसिक गोष्टिंशी निगडीत आहे. लॉकडाऊन एक असामान्य परिस्थिती आहे. एक अशी घटना जी अचानक झाली असून अप्रत्यक्षपणे आलेली आहे. लॉकडाऊनमुळे आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. संपूर्ण रूटिन बदलून गेलं आहे. अशा परिस्थितीत मूड चेंज होणं किंवा मूड स्विंग्स सारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

मूड स्विंगचा थेट परिणाम आपल्या मनस्थितीवर होत आहे. एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, मानसशास्त्र तज्ज्ञ मनीषा सिंघल यांनी या समस्येपासून सुटका करू घेण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत.
मूड स्विंग्स दूर करण्यासाठी शांत राहा, आपल्या आरोग्याची काळजी घ्या. घरात राहुनही जेवढं शक्य असेल तेवढं तुमचं रूटीन मेन्टेन करण्याचा प्रयत्न करा. अल्कोहोलचं सेवन करणं शक्य तेवढं टाळा. धुम्रपान करू नका. लॉकडाऊनमध्येही आपलं मानसिक आरोग्य जपण्यासाठी काही गोष्टी आहेत, ज्या आपण करू शकतो.

मूड स्विंग कोणताही आजार नसून मानसिक समस्या आहे. परंतु काही असे उपाय आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही मूड स्विंग्सपासून सुटका करून घेऊ शकता. डॉ. नवदीप कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे. जाणून घेऊया त्याबाबत सविस्तर...

मूड स्विग्सपासून सुटका करण्यासाठी तुम्हाला तुमचं रूटिन सेट करावं लागेल. वेळेवर झोपणं, वेळेवर उठणं. आपल्या कुटुंबियांसोबत क्वॉलिटी टाइम स्पेंड करणं अशा गोष्टीही मूड स्विंग्सपासून सुटका करण्यासाठी मदत करतात. आपल्या सर्वांनाच माहित आहे की, व्यायाम केल्याने आपल्या शरीराला फायदे होतात. पण व्यायाम केल्यामुळे आपलं मानसिक आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते.


लॉकडाऊनमध्ये मूड स्विंग्स दूर करण्यासाठी उपाय :

दररोज व्यायाम करा
वेळेत जेवण करा
वेळेत झोपा
स्वतःवर विश्वास ठेवा
जास्त विचार करू नका
कुटुंबासोबत वेळ घालवा
सकारात्मक विचार करा ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/LifeStyle/Facing-mood-swings-due-to-lockdown-Learn-the-solution</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 22 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ एकाच जागी जास्त काळ बसणे आरोग्यास धोका ; कॅन्सर व हद्यरोगाचा धोका ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/LifeStyle/Sitting-in-one-place-for-too-long-is-a-health-riskRisk-of-cancer-and-heart-disease</link>
            <description>मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनेकजण आता घरुन ऑनलाईन काम करत आहेत. ऑफिसमध्ये काम करत असताना कर्मचाऱ्यांसाठी योग्य ती सुविधा उपलब्ध करुन दिली जाते. मात्र घरी ती व्यवस्था उपलब्ध नसते. त्यामुळे अनेकजण तासंतास चुकीच्या पद्धतीने बसून आपलं काम करत असतात. बेडवर किवां सोफ्यावर काम करत बसल्याने अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. जास्त वेळ एकाच स्थितीत बसल्याने आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे.




जास्त वेळ बसण्याचा धोका

काम करताना जास्त वेळ एकाच स्थितीत बसल्याने मान आणि पाठदुखी सामान्य गोष्ट आहे. मात्र या गोष्टीची सवय लागणे घातक आहे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/LifeStyle/2020-07-22/workfromhome.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनेकजण आता घरुन ऑनलाईन काम करत आहेत. ऑफिसमध्ये काम करत असताना कर्मचाऱ्यांसाठी योग्य ती सुविधा उपलब्ध करुन दिली जाते. मात्र घरी ती व्यवस्था उपलब्ध नसते. त्यामुळे अनेकजण तासंतास चुकीच्या पद्धतीने बसून आपलं काम करत असतात. बेडवर किवां सोफ्यावर काम करत बसल्याने अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. जास्त वेळ एकाच स्थितीत बसल्याने आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे.




जास्त वेळ बसण्याचा धोका

काम करताना जास्त वेळ एकाच स्थितीत बसल्याने मान आणि पाठदुखी सामान्य गोष्ट आहे. मात्र या गोष्टीची सवय लागणे घातक आहे. यामुळे कॅन्सर सारख्या गंभीर रोगाचा धोका उद्धभवू शकतो. याशिवाय हृदयविकारच्या समस्यांचीही वाढ होण्याची शक्यता आहे.

मेडिकल जरनल जेएएमए ऑन्कोलॉजीने केलेल्या एका सर्व्हेत चकीत करणारी बाब समोर आली आहे. सर्व्हेनुसार जास्त वेळ बसून राहिल्याने कॅन्सर होण्याची शक्यता आहे. याशिवाय हृदयाचे विकारही होण्याची शक्यता आहे. चार वर्षात 8000 लोकांवर संशोधन करण्यात आलं. लोकांच्या राहणीमानाचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये जास्त वेळ बसल्याने किंवा फिजिकली अॅक्टिव्ह नसणाऱ्या लोकांना कॅन्समुळे मृत्यूचा 82 टक्के धोका आहे. जास्त वेळ बसणाऱ्या लोकांपेक्षा अॅक्टिव्ह असणाऱ्या आणि व्यायाम करणआऱ्या लोकामध्ये हा धोका कमी प्रमाणात आहे. रोज चालणे, जास्तीज जास्त सायकलिंग करणे यासारख्या अॅक्टिव्हिटी करणाऱ्या लोकांना कॅन्सरने मृत्यूचा धोका 31 टक्के आढळलं आहे. त्यामुळे चालणे, व्यायाम करणे गरजेचं आहे.


वर्क फ्रॉम होममुळे आळस वाढला

ऑफिस म्हटलं की फिरणे, व्यायाम करणे, लोकांना भेटणे, गप्पा गोष्टी करणे, प्रवास करणे या सर्व अॅक्टिव्हिटी होतात. मात्र वर्क फ्रॉम होममुळे घरातून बाहेर जाणे बंद झालं आहे. शहरांमध्ये जागा कमी असते, त्यामुळे घरात फिरणे शक्य नसते. त्यामुळे फिजिकल अॅक्टिव्हिटी कमी होते. त्यामुळे शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम, चालणे फिरणे गरजेचं आहे. कारण कॅन्सर आणि आळस याचा परस्पर संबंध आहे. त्यामुळे आळस दूर करणे गरजेचं आहे. रोज व्यायाम आणि फिजिकल अॅक्टिव्हिटीमुळे कॅन्सरसारख्या आजारांपासून बचाव होऊ शकतो.




वर्क फ्रॉम होममध्ये स्वत:ला अॅक्टिव्ह कसं ठेवाल?

 

·         एक तासांहून अधिक वेळ झाला की थोडावेळ उठून चाला, फिरा.

·         पाणी पिण्यासाठी किचनमध्ये स्वत: तासाभराने उठा.

·         एखादा महत्त्वाचा फोन आला तर बसून न बोलता उठा आणि चालत-फिरत बोला.

·         स्वत:ची कामं स्वत: करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा.

·         जेवण काम करण्याच्या ठिकाणी न करता दुसऱ्या ठिकाणी करा. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/LifeStyle/Sitting-in-one-place-for-too-long-is-a-health-riskRisk-of-cancer-and-heart-disease</guid>
        </item>
    
     </channel>
    </rss>
     