
       <rss version="2.0" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"> 
        <channel>
        <title>ऑनलाईन रिपोर्टर....नातं विश्वासाचं...!</title>
        <atom:link href="http://theonlinereporter.com/RSS/KokanNews" rel="self" type="application/rss+xml"/>
        <link>http://theonlinereporter.com</link>
        <description>The Online Reporter, a national news platform of India aimed at disseminating latest updates and information regarding crime, politics, lifestyle, entertainment, society etc. With Online Reporter you can catch up with the latest news, ताज्या मराठी बातम्या , online Live News, Daily News, local news, दैनिक बातम्या , स्थानिक बातम्या , News about India and more. Get latest news headings from Mumbai, Pashchim Maharashtra, Vidarbha, and the nation only at theonlinereporter.com</description>
        <lastBuildDate>Sat, 18 Apr 2026 08:48:39 GMT</lastBuildDate>
        <language>mr-IN</language>
    
        <item>
            <pubDate>Thu, 08 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ Railway: पावसाळ्यासाठी कोकण रेल्वेकडून विशेष अभियान ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Kokan/railway-special-alert-from-konkan-railway-for-this-monsoon</link>
            <description>यंदाचा पाऊस मुसळधार असणार आहे. या मुसळधार पावसाकडे लक्ष देत पावसाळ्यासाठी कोकण रेल्वेकडून विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.कोकण रेल्वेने पावसाळ्यात अनुचित घटना टाळण्यासाठी 673 प्रशिक्षित रेल्वे कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पावसामुळे कोकण रेल्वेवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होऊ नये, यासाठी कोकण रेल्वेकडून कामा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Kokan/2023-06-08/image (88).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[यंदाचा पाऊस मुसळधार असणार आहे. या मुसळधार पावसाकडे लक्ष देत पावसाळ्यासाठी कोकण रेल्वेकडून विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.कोकण रेल्वेने पावसाळ्यात अनुचित घटना टाळण्यासाठी 673 प्रशिक्षित रेल्वे कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पावसामुळे कोकण रेल्वेवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होऊ नये, यासाठी कोकण रेल्वेकडून कामांचे नियोजन करण्यात आले आहे. मुसळधार पावसात लोको पायलटने सुरक्षित वेगाने गाडी चालवावी, अशा सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत. रेल्वे वाहतुकीवरील परिणाम टाळण्यासाठी कोकण रेल्वेकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.

घाटात अतिमुसळधार पावसामुळे दृष्यमानता खालावून होणारे अपघात होऊ नये, याकरिता 40 किमी प्रतितास या सुरक्षित वेगाने गाड्या चालवण्याच्या सूचना सर्व लोको पायलटला कोकण रेल्वे विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत. रेल्वे वाहतुकीच्या सुरक्षा विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियंत्रण कक्ष आणि स्थानकांशी संपर्क ठेवण्यासाठी मोबाइल फोन देण्यात आले आहेत.


मेल-एक्स्प्रेसच्या लोको पायलटला आणि गार्डला वॉकी-टॉकी देण्यात आलेले आहेत. ज्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधता येईल. आपत्कालीन स्थितीत माहिती पुरवण्यासाठी एक किलोमीटर अंतरावर आपत्कालीन संवाद केंद्र (ईएमसी) स्थापित करण्यात आले आहेत. सर्व मुख्य सिग्नल एलईडीमध्ये रूपांतर करण्याचे काम पूर्ण झाल्याने धुक्यांमध्ये सिग्नल अधिक चांगले दिसतील, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आलेली आहे. 

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Kokan/railway-special-alert-from-konkan-railway-for-this-monsoon</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 01 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पेण मळेघरवाडी प्रकरणी आवश्यक चौकशी प्रक्रिया पूर्ण करून जलद गतीने आरोपपत्र दाखल करणार – गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Kokan/Pen-to-file-chargesheet-in-Malegharwadi-case-after-completing-necessary-inquiry-process---Minister-of-State-for-Home-Affairs</link>
            <description>अलिबाग, जि.रायगड दि. 1 (जिमाका) :- पेण मळेघरवाडी प्रकरणामध्ये आवश्यक ती चौकशी करून, जास्तीत जास्त पुरावे गोळा करून लवकरात लवकर परिपूर्ण आरोपपत्र दाखल केले जाईल, जेणेकरून आरोपीस जास्तीत जास्त कडक शिक्षा होईल, असे प्रतिपादन राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे केले.

आज सकाळी त्यांनी पेण येथे पीड</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Kokan/2021-01-01/shambhurajdesai.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अलिबाग, जि.रायगड दि. 1 (जिमाका) :- पेण मळेघरवाडी प्रकरणामध्ये आवश्यक ती चौकशी करून, जास्तीत जास्त पुरावे गोळा करून लवकरात लवकर परिपूर्ण आरोपपत्र दाखल केले जाईल, जेणेकरून आरोपीस जास्तीत जास्त कडक शिक्षा होईल, असे प्रतिपादन राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे केले.

आज सकाळी त्यांनी पेण येथे पीडित बालिकेच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी गृह (ग्रामीण), वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई हे पीडित बालिकेच्या कुटुंबियांच्या घरी आले असता ते बोलत होते.

यावेळी आमदार महेंद्र दळवी, पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार,आदिवासी प्रकल्प अधिकारी श्रीमती अहिरराव,पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव,पेण तहसिलदार अरुणा जाधव उपस्थित होते.

यावेळी गृह (ग्रामीण), वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, पेण मळेघरवाडी येथील घटना ही निश्चितच अत्यंत दुर्दैवी  घटना आहे. या प्रकरणाचा तपास काटेकोरपणे पूर्ण करुन लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात येणार असून या खटल्यासाठी प्रख्यात ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तर पीडितेच्या कुटुंबियांना या घटनेतून सावरण्यासाठी शासनाच्या मनोधैर्य योजना व दक्षता समितीच्या माध्यमातून पीडित बालिकेच्या कुटुंबाला तात्काळ मदत करण्याचे त्याचबरोबर पीडित कुटुंबाच्या राहत्या घराची परिस्थिती पाहून ते घर शासनाच्या योजनेतून परिपूर्ण बांधून देण्याची आवश्यक ती कार्यवाही त्वरित करावी, असे त्यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना निर्देश दिले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Kokan/Pen-to-file-chargesheet-in-Malegharwadi-case-after-completing-necessary-inquiry-process---Minister-of-State-for-Home-Affairs</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 31 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सर्वसामान्य जनतेच्या प्रवासाचे मुख्य साधन असलेल्या लालपरीला अधिक सक्षम करणार – परिवहनमंत्री अनिल परब ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Kokan/Lalpari-the-main-mode-of-public-transport-will-be-made-more-capable---Transport-Minister-Anil-Parab</link>
            <description>सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) :- गाव, वाड्या, वस्त्या यांना शहराशी जोडणारी. सर्वसामान्य जनतेच्या प्रवासाचे मुख्य साधन असलेली, प्रामाणिक सेवा देणाऱ्या परिवहन महामंडळाच्या लालपरी एसटी बस सेवेला अधिक सक्षम करणार असल्याचे प्रतिपादन, परिवहनमंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी आज केले.

कुडाळ येथील नूतन बसस्थानकाचे ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन परिवहनमंत्री अनिल परब यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, परिवहन महामंडळाच्या मुंबई प्रदेश कार्यकारी अभियंता विद्या भि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Kokan/2020-12-31/anilparb.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) :- गाव, वाड्या, वस्त्या यांना शहराशी जोडणारी. सर्वसामान्य जनतेच्या प्रवासाचे मुख्य साधन असलेली, प्रामाणिक सेवा देणाऱ्या परिवहन महामंडळाच्या लालपरी एसटी बस सेवेला अधिक सक्षम करणार असल्याचे प्रतिपादन, परिवहनमंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी आज केले.

कुडाळ येथील नूतन बसस्थानकाचे ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन परिवहनमंत्री अनिल परब यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, परिवहन महामंडळाच्या मुंबई प्रदेश कार्यकारी अभियंता विद्या भिलारकर, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे ऑनलाईन जोडले गेले होते. प्रत्यक्ष उद्घाटन कार्यक्रमात आमदार वैभव नाईक, कुडाळ नगरपंचायतीचे नगराध्यक्ष ओंकार तेली. गटविकास अधिकारी मोहन भोई, जि.प. सदस्य अमरसिंह सावंत, सिंधुदुर्ग एस.टी. विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ, डेपो मॅनेजर सुजित डोंगरे, महेश सावंत, काका कुडाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कुडाळ बसस्थानक 1971 पासून कार्यरत आहे. जिल्ह्यातील प्रमुख बसस्थानकापैकी एक असे हे बस स्थानक आहे. बरीच वर्षे या स्थानकामध्ये प्रवाशांसाठी अद्ययावत इमारत असावी, अशी जनतेची मागणी होती. आज ती मागणी पूर्ण करण्यात यश आले आहे. असे सांगून परिवहनमंत्री अनिल परब म्हणाले, कुडाळच्या बसस्थानकातील उर्वरित कामेही लवकरच पूर्ण करण्यात येतील. कोरोनाच्या महामारीमुळे कुडाळ स्थानकाचे उद्घाटन व लोकार्पण झाले नव्हते ते आज माझ्या हस्ते झाले. त्यामुळे प्रवाशांची अधिक चांगली सोय झाली यांचा मला आनंद आहे.

आमदार वैभव नाईक यावेळी म्हणाले, कुडाळ शहरामध्ये अद्ययावत बसस्थानक ही या शहराची गरज होती. सुमारे 1 कोटी 40 लाख रुपये खर्च करुन हे बस स्थानक उभारण्यात आले आहे. या नवीन बसस्थानकामुळे प्रवाशांची अत्यंत चांगली सोय झाली आहे. नवीन बसस्थानकामुळे कुडाळ शहराच्या सौंदर्यातही भर पडली आहे. कुडाळ स्थानकासमोरील रस्ता करण्यासाठी 20 लाखांची तरतूद करण्यात आली असून हे कामही लवकरच पूर्ण होईल. त्याचबरोबर कुडाळ शहरातील विविध विकास कामांसाठी भरीव निधीची तरतूदही करण्यात येईल, असे ते शेवटी म्हणाले.

याप्रसंगी सिंधुदुर्ग एस.टी विभाग नियंत्रण प्रकाश रसाळ, कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली, अमित सावंत यांची समयोचित भाषणे झाली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. परिवहनमंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने बसस्थानकाचे उद्घाटन करण्यात आले तर प्रत्यक्ष आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.

यावेळी कुडाळ शहरातील नगरसेवक, पंचक्रोशीतील विविध गावचे सरपंच, एस.टी.महामंडळातील अधिकारी-कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Kokan/Lalpari-the-main-mode-of-public-transport-will-be-made-more-capable---Transport-Minister-Anil-Parab</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 28 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पंचतारांकित पर्यटन केंद्राद्वारे कोकणातील पर्यटनाला मिळणार चालना ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Kokan/Tourism-in-Konkan-will-get-a-boost-through-a-five-star-tourist-center</link>
            <description>मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा वेळागर येथील जमीन हस्तांतरण करण्याबाबत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि हॉटेल ताज यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या सामंजस्य करारावर गुरुवारी स्वाक्षरी करण्यात आली.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडील शासन निर्णयानुसार शिरोडा वेळागर येथे पंचतारांकित पर्यटन केंद्र उभारण्याकरिता मे. इंडियन हॉटेल्स प्रा. लि. (ताज ग्रुप) यांना संपादीत केलेली व शासकीय जमीन मिळून एकूण ५४.४० हेक्टर जमीन ९० वर्षासाठी भाडेपट्ट्याने देण्याकरिता भाडेकरार करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. शासन निर्णयाच्या अनुषंगाने आज महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व मे. इंडियन हॉटेल प्रा. लि. (ताज ग्रुप) यांच्यामध्ये लीज डीड व सब लीज डीड हे दोन करार करण्यात आले.

बाजूच्या गोवा राज्यात अनेक पंचतारांकित प्रकल्प, हॉटेल्स, रिसॉर्ट अस्तित्वात आहे. मे. इंडियन हॉटेल प्रा.लि.(ताज ग्रुप) ही एक नामांकित संस्था असून त्यांच्यामार्फत कोकणामध्ये प्रथमच पंचतारांकित प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मे. इंडियन हॉटेल प्रा.लि. (ताज ग्रुप) हे पहिल्या टप्पात 100 कोटी रुपयांची गुंतवणूक कर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Kokan/2020-08-28/kokanparytan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा वेळागर येथील जमीन हस्तांतरण करण्याबाबत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि हॉटेल ताज यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या सामंजस्य करारावर गुरुवारी स्वाक्षरी करण्यात आली.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडील शासन निर्णयानुसार शिरोडा वेळागर येथे पंचतारांकित पर्यटन केंद्र उभारण्याकरिता मे. इंडियन हॉटेल्स प्रा. लि. (ताज ग्रुप) यांना संपादीत केलेली व शासकीय जमीन मिळून एकूण ५४.४० हेक्टर जमीन ९० वर्षासाठी भाडेपट्ट्याने देण्याकरिता भाडेकरार करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. शासन निर्णयाच्या अनुषंगाने आज महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व मे. इंडियन हॉटेल प्रा. लि. (ताज ग्रुप) यांच्यामध्ये लीज डीड व सब लीज डीड हे दोन करार करण्यात आले.

बाजूच्या गोवा राज्यात अनेक पंचतारांकित प्रकल्प, हॉटेल्स, रिसॉर्ट अस्तित्वात आहे. मे. इंडियन हॉटेल प्रा.लि.(ताज ग्रुप) ही एक नामांकित संस्था असून त्यांच्यामार्फत कोकणामध्ये प्रथमच पंचतारांकित प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मे. इंडियन हॉटेल प्रा.लि. (ताज ग्रुप) हे पहिल्या टप्पात 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. या प्रकल्पामुळे सिंधुदूर्ग जिल्ह्यात देशी व परदेशी पर्यटक आकर्षित होतील. तसेच यामुळे रोजगार निर्मिती व सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेस चालना मिळेल.

याबरोबरच ताडोबा परिसरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभाग आणि थ्रायव्हींग हॉटेल्स प्रा. लि. यांच्यामध्येही यावेळी सामंजस्य करार करण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले, ताडोबातील वाघ, राज्यातील विविध समुद्रकिनारे, जंगल, गडकिल्ले हे राज्याचे भांडवल आहे. आपण जगासमोर हे चांगल्या पद्धतीने मांडले पाहिजे. पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढणे आवश्यक असून त्यासाठी राज्य शासनामार्फत प्रोत्साहन दिले जाईल. पर्यटनाला उद्योगाचा दर्जा देणे ही अभिनव कल्पना आहे. लॉकडाऊनच्या काळात पर्यटन बंद असले तरी कोरोनाचे संकट संपल्यानंतर या व्यवसायाला निश्चितच चालना मिळेल. ताज हॉटेलने कोकणात पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक केल्याने कोकणातील वैभवाची जगाला ओळख होईल. राज्याच्या इतर भागातही अशा विविध प्रकल्पांना शासनामार्फत संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे ते म्हणाले.


उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पर्यटन हे सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र आहे. त्यामुळे राज्यात पर्यटन विकासासाठी शासनामार्फत संपूर्ण सहकार्य केले जाईल. कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आज झालेल्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून चांगली सुरुवात झाली आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यात यावा. तसेच या प्रकल्पासाठी ज्यांनी जमिनी दिल्या त्यांना प्रशिक्षण देऊन रोजगार देण्यात यावा. राज्यातील कोस्टल रोडसाठी केंद्राकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करु. तसेच पर्यटनाला उद्योगाचा दर्जा देण्याचा विचार सुरु आहे. त्यासाठी प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे, असे ते म्हणाले.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, पुढील ६ महिन्यात राज्याच्या जीडीपीमध्ये पर्यटन क्षेत्राचा वाटा अधिकाधिक राहील यासाठी प्रयत्न करु. पर्यटन विभागामार्फत यासाठी विविध संकल्पना राबविण्यात येत असून कोरोना संकटानंतर राज्यातील पर्यटनाला चालना देण्याच्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेसअंतर्गत हॉटेल व्यवसायासाठी परवानग्यांची संख्या कमीतकमी करण्याचा प्रयत्न आहे. एमटीडीसी आणि ताज हॉटेलच्या समन्वयातून कोकणात साकारत असलेल्या पर्यटन प्रकल्पातून कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, असे ते म्हणाले.


पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, झालेल्या या सामंजस्य करारातून कोकणातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल. ताज हॉटेलच्या या गुंतवणुकीमुळे देश आणि विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने कोकणाकडे आकर्षित होतील. कोकणातील समुद्रकिनारे, इथला निसर्ग हा मोठा नैसर्गिक ठेवा आहे. याची माहिती जगापर्यंत पोहोचवून कोकणात पर्यटन विकास आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यासाठी पर्यटन विभाग काम करेल, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार विनायक राऊत, माजी राज्यमंत्री दीपक केसरकर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर – सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, मे. इंडियन हॉटेल प्रा.लि. (ताज ग्रुप) चे कार्यकारी उपाध्यक्ष आणि जनरल कौन्सेल राजेंद्र मिस्रा, वरिष्ठ उपाध्यक्ष बिजल देसाई, थ्रायव्हींग हॉटेल्स प्रा. लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी वरुण जैन आदी मान्यवर उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Kokan/Tourism-in-Konkan-will-get-a-boost-through-a-five-star-tourist-center</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 27 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोंकण विभागीय आयुक्त पदी अण्णासाहेब मिसाळ  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Kokan/Annasaheb-Misal-as-Konkan-Divisional-Commissioner</link>
            <description>नवी मुंबई :

 महाराष्ट्र शासनाने आज काढलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशात कोंकण विभागाच्या विभागीय आयुक्त पदावर अण्णासाहेब मिसाळ यांची बदली करण्यात आली आहे.  
	अण्णासाहेब मिसाळ यांनी कोंकण विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकरला आह</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Kokan/2020-08-27/annamisal.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी मुंबई :

 महाराष्ट्र शासनाने आज काढलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशात कोंकण विभागाच्या विभागीय आयुक्त पदावर अण्णासाहेब मिसाळ यांची बदली करण्यात आली आहे.  
	अण्णासाहेब मिसाळ यांनी कोंकण विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकरला आहे.  मिसाळ हे यापूर्वी नवीमुंबई महानगरपालिका आयुक्त म्हणून कार्यरत होते.  अण्णासाहेब मिसाळ यांचा जन्‍म 13 जून 1961 साली झाला असून त्यांनी मराठवाडा विद्यापीठातून बीएससी (ॲग्रीकल्चर) व एमएसी (ॲग्रीकल्चर) केले आहे. मिसाळ यांनी हेगच्या इन्टिट्यूट ऑफ सोशल स्टडीज कडून डेव्हलपमेंट स्टडीजची पदवी प्राप्त केली आहे.  2004 सालच्या भाप्रसे बॅचमधून अधिकारी झाल्यानंतर उप आयुक्त (महसूल) कोकण विभाग या पदाचा कार्यभार त्यांनी सांभाळला. 2014 ते 2016 या कालावधीत त्यांनी जिल्हाधिकारी धुळे या पदावर उत्कृष्ट काम केले. मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या पदावर ते 2016 ते 2019 या कालावधीत  ते कार्यरत होते.  
बुधवारी मिसाळ यांनी विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कोकण विभागात पर्यटन, पर्यावरण,फलोत्पादन, आणि मत्स्यव्यवसाय याकडे भर असेल असे त्यानी सांगितले . ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Kokan/Annasaheb-Misal-as-Konkan-Divisional-Commissioner</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 09 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शरद पवारांकडून 'निसर्ग' चक्रीवादळानंतरच्या नुकसानीची पाहणी, मदतीचं आश्वासन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Kokan/Sharad-Pawar-inspects-damage-afterNisarga-cyclone-assures-help</link>
            <description>अलिबाग : सरकारने आता केलेली मदत अंतिम नाही. पंचनामे झाल्यावर काय मदत द्यायची हे ठरेल. आवश्यकता लागली तर दिल्लीत जाऊन देखील पाठपुरवठा करु, अशी ग्वाही शरद पवारांनी दिली.चक्रीवादळाने कोकणात मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज रायगडमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. चक्रीवादळामुळे जे नुकसान झालं आहे ते खूप जास्त आहे. यावेळी दुहेरी संकट आहे. कोरोना व्हायरसच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Kokan/2020-06-09/sharadpawarnisarga.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अलिबाग : सरकारने आता केलेली मदत अंतिम नाही. पंचनामे झाल्यावर काय मदत द्यायची हे ठरेल. आवश्यकता लागली तर दिल्लीत जाऊन देखील पाठपुरवठा करु, अशी ग्वाही शरद पवारांनी दिली.चक्रीवादळाने कोकणात मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज रायगडमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. चक्रीवादळामुळे जे नुकसान झालं आहे ते खूप जास्त आहे. यावेळी दुहेरी संकट आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गेल्या अडीच महिन्यापासून व्यवहार ठप्प आहेत, व्यवसाय थांबले आहेत. राज्य सरकारच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे, असं शरद पवारांनी म्हटलं.सरकारने आता केलेली मदत अंतिम नाही. पंचनामे झाल्यावर काय मदत द्यायची हे ठरेल. आधी राज्यात पाठपुरवठा करु आणि आवश्यकता लागली तर दिल्लीत जाऊन देखील पाठपुरवठा करु, अशी ग्वाही शरद पवारांनी दिली. लवकर पंचनामे झाले पाहिजेत. केंद्र सरकारची टीम येऊन पाहणी करणार असल्याचं मी ऐकलं आहे. महाराष्ट्रावरचं हे संकट आहे, त्यामुळे यात पक्ष, राजकारण बघू नये. सगळ्यांनी पुढे येऊन गरजू लोकांना मदत केली पाहिजे, असं आवाहनही शरद पवारांनी केलं.कोकणातील फळबाग शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नारळ, काजू , आंबा, सुपारी या फळबागा येथे आहेत. नारळ, सुपारीची पीकं उद्ध्वस्त झाली आहेत. उद्ध्वस्त झालेल्या नारळ बागा पुन्हा उभ्या राहायला पुढची 10 वर्ष जातील. शेती पूर्ववत करायला मोठा खर्च करावा लागेल. राज्य सरकार आणि केंद्राने मदत करण्यासाठी आवश्यक धोरण ठरवणे गरजेचं आहे. मत्स्य व्यवसायालाही मोठा फटका बसला आहे. आधीच कोरोना आणि वादळामुळे दुहेरी फटका बसल्याने त्यासाठी वेगळं पॅकेज देणं आवश्यक आहे, असं शरद पवारांनी म्हटलं.केंद्र सरकार आणि राज्याला सांगून मदत घ्यावी लागेल. छोटे व्यावसायिक अडचणीत आहेत. पाच ते सहा दिवसाच्या आत वीज पुरवठा सुरळीत करणं आवश्यक आहे. टाटा, रिलायन्स, अदानी यांच्याशी संपर्क साधून त्यांची टीम याठिकाणी आली तर मदत होईल. अदानीमधून काहीजण मदतीला आले, असं जिल्हाधिकारी यांनी सांगितलं. पाणीपुरवठा लवकर सुरू केला पाहिजे, असंही शरद पवार यांनी सांगितलं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Kokan/Sharad-Pawar-inspects-damage-afterNisarga-cyclone-assures-help</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 05 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रायगड जिल्ह्याला 100 कोटींंची तातडीची मदत जाहीर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Kokan/100-crore-emergency-aid-announced-for-Raigad-district</link>
            <description>अलिबाग : निसर्ग चक्रीवादळाचा 3 जूनला कोकणाच्या पश्चिम किनारपट्टीला तडाखा बसला आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्याचा दौरा केला. यावेळेस थळ गावाला भेट दिली आहे. रायगडमधील अनेक गावांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. आज राज्य सरकारकडून रायगड जिल्हयाच्या पुनर्वसनासाठी 100 कोटींची तातडीची मदत जाहीर केली आहे. दरम्यान चक्रीवादळाच्या तडाख्याने श्रीवर्धन, रोहा या भागामध्ये </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Kokan/2020-06-05/cmraigad.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अलिबाग : निसर्ग चक्रीवादळाचा 3 जूनला कोकणाच्या पश्चिम किनारपट्टीला तडाखा बसला आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्याचा दौरा केला. यावेळेस थळ गावाला भेट दिली आहे. रायगडमधील अनेक गावांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. आज राज्य सरकारकडून रायगड जिल्हयाच्या पुनर्वसनासाठी 100 कोटींची तातडीची मदत जाहीर केली आहे. दरम्यान चक्रीवादळाच्या तडाख्याने श्रीवर्धन, रोहा या भागामध्ये अनेक घरांचे छप्पर उडून गेले आहेत. घरांचं मोठं नुकसान झालं आहे. त्याच्या पंचनाम्यासाठी पुढील 4-6 दिवस लागणार आहे. त्यानंतर नुकसान भरपाईचं स्वरूप ठरवलं जाईल, असेही ठाकरे म्हणाले आहे. दरम्यान चक्रीवादळानंतर या भागात वीज पुरवठा, मोबाईल टॉवर यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यासाठी अधिकची कुमक रायगडमध्ये पाठवण्यात येणार आहे.रायगडमधील पंचनामे पाहून नुकसान भरपाईची रक्कम ठरवली जाणार आहे. पंचनाम्याला सुरूवात झाली आहे. यासोबतच भविष्यात चक्रीवादळाचा धोका पाहता काय तयारी करता येऊ शकते? घर बांधण्याची पद्धत कशी असावी? याचा देखील आराखडा बनवण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 3 जूनच्या दुपारी रायगडकरांनी वादळाचा संकट झेललं आहे. वादळादरम्यान या भागात वार्‍याचा वेग सुमारे 120 किमी प्रति तास इतका होता. रायगड सोबतच रत्नागिरी, पुणे या भागतही काही ठिकाणी घरांचे मोठे नुकसान झालं आहे. लहान मोठी झाडं उन्मळून पडली आहेत. त्याच्या साफसफाईची काम सुरू करण्यात आली आहे. जनसामान्यांचंं आयुष्य पूर्ववत होण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील असा विश्वास त्यांनी जनतेला दिले आहे.उद्धव ठाकरे यांच्यासोबत कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे देखील रायगडमध्ये पोहचले होते. यावेळी त्यांनी स्थानिक आमदार आदिती तटकरे देखील उपस्थित होत्या. त्यांनी नुकसानीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Kokan/100-crore-emergency-aid-announced-for-Raigad-district</guid>
        </item>
    
     </channel>
    </rss>
     