
       <rss version="2.0" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"> 
        <channel>
        <title>ऑनलाईन रिपोर्टर....नातं विश्वासाचं...!</title>
        <atom:link href="http://theonlinereporter.com/RSS/Blogs" rel="self" type="application/rss+xml"/>
        <link>http://theonlinereporter.com</link>
        <description>The Online Reporter, a national news platform of India aimed at disseminating latest updates and information regarding crime, politics, lifestyle, entertainment, society etc. With Online Reporter you can catch up with the latest news, ताज्या मराठी बातम्या , online Live News, Daily News, local news, दैनिक बातम्या , स्थानिक बातम्या , News about India and more. Get latest news headings from Mumbai, Pashchim Maharashtra, Vidarbha, and the nation only at theonlinereporter.com</description>
        <lastBuildDate>Sat, 18 Apr 2026 08:47:15 GMT</lastBuildDate>
        <language>mr-IN</language>
    
        <item>
            <pubDate>Sat, 31 Oct 2020 17:45:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ त्या दिवशी तिने केसात फुल गुंफले नव्हते. सर्व देश भ्रमातच... ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Blogs/Didnt-Put-flowers-in-her-hair-on-that-day</link>
            <description>दुरदर्शन हे त्या काळी एकमेव प्रभावी माध्यम म्हणून नुकतच उदयास आले होते. देशभरातील घडमोडी जाणून घेण्यासाठी देशातील नागरिकांना दुरदर्शनवरच अवलंबून राहावे लागत. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी तसेच काही खास होते. सलमा सुल्तान दुरदर्शनवरील प्रभावी निवेदिका होती. सरळ मध्यम बांधा, लांब काळेभोर केस, केसांमध्ये गुलाब, कानात पठाणी झुमके हा तिचा देखणा रूबाब बातम्यामधील र</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/img/blogs/profile/IMG-20201031-009.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[दुरदर्शन हे त्या काळी एकमेव प्रभावी माध्यम म्हणून नुकतच उदयास आले होते. देशभरातील घडमोडी जाणून घेण्यासाठी देशातील नागरिकांना दुरदर्शनवरच अवलंबून राहावे लागत. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी तसेच काही खास होते. सलमा सुल्तान दुरदर्शनवरील प्रभावी निवेदिका होती. सरळ मध्यम बांधा, लांब काळेभोर केस, केसांमध्ये गुलाब, कानात पठाणी झुमके हा तिचा देखणा रूबाब बातम्यामधील रोचकता वाढवायचा.त्या दिवशी तिला संध्याकाळी ७.३० चे बुलेटिन वाचायचे होते. परंतु, बातमी हातात आल्यानंतर १७ वर्षांपासून कणखरपणे बातम्यांना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहचविणारी सलमा त्या दिवशी कंपित झाली होती. देशात अराजकता आणि हिंसा माजवणारी ही बातमी होती. बातमी होती पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या. तिला संपादकाचे आदेश आले की, या बातमीला नेहमीप्रमाणे संयमी स्वरूपात दे. कारण, ही बातमी तिला ब्रेक करायची होती. तिच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या. त्याच परिस्थितीत कॅमेरा समोर आला आणि बुलेटिन सुरू झाले."आज सवेरे नई दिल्ली में, प्रधानमंत्री के निवास स्थान पर श्रीमती गांधी की हत्या करने की ‘कोशिश’ की गई, उन्हें तुरंत ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ़ मेडिकल साइंसेज ले जाया गया. वहां पहुंचते ही डॉक्टरों ने उनका उपचार शुरू कर दिया है."तिने ती बातमी वाचली. अगदी स्थीर व स्थितप्रज्ञ असलेली सलमा त्यावेळी घाबरून आणि गोंधळून गेली होती. विशेष म्हणजे त्या दिवशी तिचा नकाब (चेहरा) ही देशवासियांना काहीतरी अराजकतेचा इशारा देत होता. तिने त्या दिवशी केसात गुलाब गुंफला नव्हता. कानातील झुमकेही दिसत नव्हते. सर्व देशाला बातमी त्यावेळीच कळून चुकली होती. काही तरी अघटित आज घडले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Blogs/Didnt-Put-flowers-in-her-hair-on-that-day</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 29 Oct 2020 11:31:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बाबांचा पॅरेलेसिस अटॅक - अनुभव  आणि संदेश ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Blogs/paralysis-attack---experience-and-message</link>
            <description>एरव्ही सकाळी 5 वाजता उठणारे बाबा तब्बल 7 वाजेपर्यंत बेडवर गाढ झोपेत दिसत होते. दोन-तीनदा हाक देऊनही काहीच प्रतिक्रिया दिसली नाही तेंव्हा त्यांना हळूच हालविले. आता मात्र बाबांनी डावा हात हलविला. त्यांचं तोंड किंचित वाकडं झाल्यासारखे वाटत होते. ते माझ्याकडे असहायपणे बघत होते. माझे बोललेले त्यांना कळत होते पण तोंडावाटे शब्दच निघत नव्हता. उजवा हात आणि पाय अजिबात हालत नव्हता. ‘पॅरेलेसिस अॅटैक’! क्षणार्धात आठवले, हृदयात धडकीच भरली. त्याबद्दल ऐकलं होतं, बघितलं पण होत पण खूद्द आपल्याकडे हे असे होईल हे ध्यानी मनी पण नव्हते.बाबा पूर्ण शुध्दीवर होते, पण त्यांच्या उदास चेहऱ्याकडे बघून नजर भिडवायची हिम्मत होत नव्हती. स्मृति पटलावर चित्रांची मालिका सुरु झाली. 5 वर्षांपूर्वी बाबांनी सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यावर स्वतःला सामाजिक कार्यात वाहून टाकले होते. ब्लड प्रेशर, मधुमेहचे मागच्या काही वर्षांपासून निदान झाल्यानंतर ते औशधोपचार नियमितच घ्यायचे. व्यायामाची विशेष आवड नसली तरी त्यांचे पायी फिरणे बरेच व्हायचे. त्यांना धुम्रपानाची सवय नव्हती. शेजारच्या दत्तू काकांना मागील वर्षी पॅरेलेसिस व्हायच्या आधी बरेच वेळा बाबा त्यांना सिगारेट बंद करायलाही सांगत असत.‘काय कारण असेल बाबांना पॅरेलेसिस होण्याचं’ हा विचार करीत असताना आठवले की कोविडच्या साथीमुळे मागील काही महिन्यापासून रेग्यूलर चेकअपसाठी बाबा त्यांच्या डॉक्टरकडे जाऊ शकले नाही. बीपी, शुगरच्या तपासण्यापण झाल्या नाही. औषध जुनेच ते नेहमीप्रमाणे घेत असतील असा आमचा अंदाज. शेजारच्या दत्तू काकांचे चित्र स्मृति पटलावर उभे राहले. मागील वर्शापासून पॅरेलेसिसमुळे दत्तू काका ना बोलू शकतात ना उभे राहू शकतात. संपूर्ण घर कसे हादरुन गेले आहे त्यांच्या पॅरेलेसिसच्या अटॅकमुळे आलेल्या शारीरिक, मानसिक, आर्थिक बोझामुळे. हे पण आठवले की दत्तू काका पॅरेलेसिस झालेल्या दिवशी तब्बल दिवसभर घरीच होते. ॲडमिट झाल्यावर डॉक्टर घरच्यांना म्हणाले </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/img/blogs/profile/paralysis.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[एरव्ही सकाळी 5 वाजता उठणारे बाबा तब्बल 7 वाजेपर्यंत बेडवर गाढ झोपेत दिसत होते. दोन-तीनदा हाक देऊनही काहीच प्रतिक्रिया दिसली नाही तेंव्हा त्यांना हळूच हालविले. आता मात्र बाबांनी डावा हात हलविला. त्यांचं तोंड किंचित वाकडं झाल्यासारखे वाटत होते. ते माझ्याकडे असहायपणे बघत होते. माझे बोललेले त्यांना कळत होते पण तोंडावाटे शब्दच निघत नव्हता. उजवा हात आणि पाय अजिबात हालत नव्हता. ‘पॅरेलेसिस अॅटैक’! क्षणार्धात आठवले, हृदयात धडकीच भरली. त्याबद्दल ऐकलं होतं, बघितलं पण होत पण खूद्द आपल्याकडे हे असे होईल हे ध्यानी मनी पण नव्हते.बाबा पूर्ण शुध्दीवर होते, पण त्यांच्या उदास चेहऱ्याकडे बघून नजर भिडवायची हिम्मत होत नव्हती. स्मृति पटलावर चित्रांची मालिका सुरु झाली. 5 वर्षांपूर्वी बाबांनी सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यावर स्वतःला सामाजिक कार्यात वाहून टाकले होते. ब्लड प्रेशर, मधुमेहचे मागच्या काही वर्षांपासून निदान झाल्यानंतर ते औशधोपचार नियमितच घ्यायचे. व्यायामाची विशेष आवड नसली तरी त्यांचे पायी फिरणे बरेच व्हायचे. त्यांना धुम्रपानाची सवय नव्हती. शेजारच्या दत्तू काकांना मागील वर्षी पॅरेलेसिस व्हायच्या आधी बरेच वेळा बाबा त्यांना सिगारेट बंद करायलाही सांगत असत.‘काय कारण असेल बाबांना पॅरेलेसिस होण्याचं’ हा विचार करीत असताना आठवले की कोविडच्या साथीमुळे मागील काही महिन्यापासून रेग्यूलर चेकअपसाठी बाबा त्यांच्या डॉक्टरकडे जाऊ शकले नाही. बीपी, शुगरच्या तपासण्यापण झाल्या नाही. औषध जुनेच ते नेहमीप्रमाणे घेत असतील असा आमचा अंदाज. शेजारच्या दत्तू काकांचे चित्र स्मृति पटलावर उभे राहले. मागील वर्शापासून पॅरेलेसिसमुळे दत्तू काका ना बोलू शकतात ना उभे राहू शकतात. संपूर्ण घर कसे हादरुन गेले आहे त्यांच्या पॅरेलेसिसच्या अटॅकमुळे आलेल्या शारीरिक, मानसिक, आर्थिक बोझामुळे. हे पण आठवले की दत्तू काका पॅरेलेसिस झालेल्या दिवशी तब्बल दिवसभर घरीच होते. ॲडमिट झाल्यावर डॉक्टर घरच्यांना म्हणाले पण होते की तुम्ही बराच उशीर केला आणायला. अजून आठवले, एका चॅनलवर मुलाखती दरम्यान ऐकलेले की Be Fast. पॅरेलेसिसच्या धोक्याची लक्षणे Balance, Eyes Face, Arms, Speech, Time. पहिल्या पाच मधील अचानक उद्भवलेला अशक्तपणा, आणि वेळेला, प्रत्येक सेकंदाला किंमत आहे असा त्याचा अर्थ. वेळेवर योग्य ठिकाणी योग्य उपचार झाल्यास पॅरेलेसिस बरा पण होऊ शकतो, हे ऐकलेले आठवले.लागलीच फॅमिली डॉक्टर कुळकर्णींना फोन लावला. स्वतः कोविडमुळे क्वारेन्टाईन असल्यामुळे त्यांनी व्हिझीट बद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या की बाबांना तोंडावाटे काही देऊ नका, एका कडेवर ठेवा आणि त्यांनी स्वतः ॲम्बुलन्सला फोन करुन बाबांना सर्व सोयींनी सुसज्ज, विशेषत: C.T. Scan असलेल्या हॉस्पीटलमध्ये भरती करण्याची व तिथल्या डॉक्टरांना पूर्व सूचना देण्याची व्यवस्था लागलीच केली. अर्ध्या तासातच आम्ही बाबांना घेऊन हॉस्पीटल मध्ये दाखल झालो. पूर्वसूचना दिल्यामुळे न्युरोलॉजिस्ट डॉ विवेक तिथे हजर होते. त्यांनी तपासणी करुन बाबांना लागलीच सी. टी. स्कॅनसाठी हलविलेतासाभराने डॉ. विवेकनी आम्हाला त्यांच्या खोलीत बोलावून मेंदूतील रक्तवाहिनीत मोठा क्लॉट असल्याचे सी.टी.स्कॅन मध्ये दाखविले. त्वरित उपचाराने तो विरघळेल व रिकवरी होण्यास मदत मिळेल, असे पण सांगितले. वेळेवर पोहचल्यामुळे हे शक्य आहे. आपल्या देशात दररोज जवळपास 5000 लोकांना पॅरेलेसिसचा अटॅक येतो, त्यातील काही भाग्यवानच हॉस्पीटलमध्ये वेळेवर पोहोचतात, असे पण ते म्हणाले. त्यांचे अचूक निदान, आत्मविष्वास, रुग्णाबद्दलची आस्था व आमच्याषी व्यक्त झालेली संवेदना एकूण भारावून टाकणारी होती. हॉस्पीटलचे एकूण वातावरण पण दिलासा देणारे असेच होते.मी काऊंटरवर औपचारिकता पूर्ण करावयास गेलो. बाबांच्या वैद्यकीय विम्याची माहिती माझ्या मोबाईलमध्येच असल्यामुळे काहीच अडचण आली नाही. एवढयात बाबांना ICCU मध्ये नेण्यात आले. जातांना बाबा पूर्ण शुध्दीवर होते. आम्ही त्यांना टाटा केल्यावर त्यांनी डावा हाथ हलवून संथ प्रतिसाद दिला. पण त्यांचे मौन बरेच काही बोलत होते.डॉ. .विवेक ICCU मध्ये प्रवेश करते झाले. जातांना आमच्याजवळ येऊन थांबून म्हणाले की बाबांचे ब्लडप्रेशर तसेच शुगर वाढलेले आहे. फॅमिली डॉक्टर कुळकर्णींशी माझे बोलणे झाले आहे व त्यांनी बाबांना असणाऱ्या पोटाच्या त्रासाची व काही औषधीच्या अॅलर्जीबद्दल मला कळविले आहे. त्यानुसार काळजी घेऊन आम्ही सलाईनमधून विशेष औषधीद्वारे मेंदूतील क्लॉट विरघळणाऱ्या उपचाराला सुरुवात करतो आहे. डॉक्टरांचा प्रचंड आत्मविष्वास आम्हाला संजीवनीच होता.रात्रभर बाबा ICCU मध्येच असल्यामुळे आम्हाला तिथे प्रवेश नव्हता. पण सिस्टर आणि रेसिडेंट डॉक्टर वरचेवर येऊन आमच्याशी संवाद साधत होते. रात्रभर माझ्या मनात विचारांचे थैमान सुरु होते. बाबांचे नियमित चेकअप न झाल्यामुळे वाढलेल्या ब्लडप्रेशर व शुगरमुळे गिल्टी फीलींग येत होती. आईनी रात्री घरी गेल्यावर बघितले की बाबांच्या कपाटातील औषधी पण संपुश्टात आल्या होत्या. बाबा औषधे घेतल्या नंतर कॅलेंडरवर मार्क करायचे, दिसून आले की मागील दोन दिवसापासून कॅलेंडरवर मार्किंग पण नव्हती. रात्रभर आत्मवंचनेचा भाव प्रखरपणे जाणवत होता.कशीबशी पहाट उजळली. घरी जाऊन तयार होऊन परत येइस्तोवर दहा वाजले. डॉ. विवेक यांचा ICCU मध्ये राऊंड सुरु होता. मी व आई बाहेर त्यांची वाट बघत होतो. आम्ही आज बाबांना भेटलो नव्हतोच. ‘‘सुधीर, Congratulations. Your father get back his speech, he can talk now, उजवा हाथ व पाय देखील बऱ्यापैकी move होत आहे. It worked. माझ्या आनंदाला सीमाच नव्हती. आईच्या डोळयावाटे अश्रू झळकत होते. डाॅक्टरांना प्रणाम करताच त्यांनी माझ्या खांद्यावर हाथ ठेवला आणि माझी पाठ थोपटत ते म्हणाले. ‘‘You have done it. You brought him in time. आता मला समाधान वाटत होते.मी व आई ICCU मध्ये गेलो. आष्चर्य! बाबा उजव्या हातानी जूस पीत होते. आम्हाला बघताच ‘या’ म्हणाले. त्या एका षब्दाने आम्हाला किती धीर आला व आनंद लाभला हे षब्दानी व्यक्त करु षकत नाही.होता होता अजून तीन दिवस उलटली. एव्हाना बाबांना बेडवरुन उतरवून उभे करण्यात पण आले होते. परवा पासून ते उजवा पाऊल पण पुढे टाकत पण चालतांना त्यांना आधाराची गरज होती. त्यांचे बोलणे बरेचसे पूर्ववत आले होते, एखादा षब्द मधेच अडखळायचा तेवढाच काय तो.आज बाबांना अॅडमिट होऊन पाच दिवस झालेले. कालच डॉ. विवेकनी बाबांना उद्या डिस्चार्ज करु असे सूचित केले होते व आम्हाला सकाळीच यायला सांगितले होते. ठरल्यानुसार बाबांचे डिस्चार्ज कार्ड वगैरे तयार असून हॉस्पीटल तर्फे सर्व औपचारिकता पूर्ण झालेली होती.खोलीत षिरताच बाबा खुर्चीत बसून दोन्ही हातात वर्तमानपत्र धरुन वाचत असल्याचे आम्हाला आढळले. इतक्यात डॉ. .विवेक बाबांना भेटण्यास रुममध्ये आले आणि नवलच, बाबांनी डॉक्टरांशी उजव्या हातानेच कडक handshake पण केले. दोघेही मनसोक्त हसत होते. आता डाॅक्टर आम्हा सगळयांना उद्देशून म्हणाले, ही रिकवरी योग्य उपचार वेळेवर मिळाल्यामळेुच शक्य झाली त्यामुळे तुम्हा सगळयांचे अभिनंदन. काही दिवसासाठी मी फिजिओथेरॉपीस्टला बॅलॅन्स ट्रेनिंगसाठी घरी पाठवीन. लक्षात ठेवा, रुग्णाचा नियमित फॉलोअप, नियमित तपासण्या आणि नियमित उपचार हे तिन्ही महत्त्वाचे आहे. आणि बरेचदा या वयात रुग्णाला स्मृतिभ्रंश पण असतो त्यामुळे औषधे घेण्याचे ते विसरतात म्हणून घरच्या मंडळींनी ती जबाबदारी घेणे आवश्यक आहे . लक्षात ठेवा Precaution is better than cure.डॉक्टरांचा, नर्सिंग स्टाफ व इतर कर्मचारी या सर्वांचे आभार व्यक्त करीत आम्ही समाधानाने हॉस्पीटलमधून निरोप घेतला.(29 ऑक्टोबर ‘‘वर्ल्ड स्ट्रोक डे’’ जागतिक पक्षाघात दिनाच्या निमित्ताने.) ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Blogs/paralysis-attack---experience-and-message</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 01 Oct 2020 09:52:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुलगी होणं सोप्पी नसतं हो...  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Blogs/Being-a-girl-is-not-easy</link>
            <description>मी मनिषा, मुळची हाथरस या गावाची.... ६०० घरांचं माझं गाव... दिल्लीपासून दोनशे किलोमिटर अंतरावर असलेल्या गावात आई, भावासोबत गुण्यागोविंदानं राहत होती... गावात अर्धी घरं ठाकुरांची, १०० घरे ब्राह्माणांची आम्हा दलितांची बोटावर मोजण्याइतकीच घरं... शेतात आई भावासोबत जायचं काम करायचं हा माझा नित्यक्रम... निसर्गाच्या सानिध्यात खेळायला बागडायला लहानपणापासूनच शिकले होते.... शेतात काम करतानाच मी यौवनात प्रवेश केला... मी अवघ्या १९ वर्षात पदार्पण केले होते हो..... आयुष्य जगण्याचा पल्ला बराच लांब होता... पण नियतीचा काही औरच हवे होते... यात इतर मुलींना जसा त्रास होतो ना... तसा त्रास मलापण व्हायचा... मी त्याकडे कधी लक्ष दिले नाही... माझं इथेच चुकलं... त्याकडे जास्त गांभीर्याने लक्ष द्यायला हवे होते... ठाकुर – द</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/img/blogs/profile/IMG-20201001-WA0001.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मी मनिषा, मुळची हाथरस या गावाची.... ६०० घरांचं माझं गाव... दिल्लीपासून दोनशे किलोमिटर अंतरावर असलेल्या गावात आई, भावासोबत गुण्यागोविंदानं राहत होती... गावात अर्धी घरं ठाकुरांची, १०० घरे ब्राह्माणांची आम्हा दलितांची बोटावर मोजण्याइतकीच घरं... शेतात आई भावासोबत जायचं काम करायचं हा माझा नित्यक्रम... निसर्गाच्या सानिध्यात खेळायला बागडायला लहानपणापासूनच शिकले होते.... शेतात काम करतानाच मी यौवनात प्रवेश केला... मी अवघ्या १९ वर्षात पदार्पण केले होते हो..... आयुष्य जगण्याचा पल्ला बराच लांब होता... पण नियतीचा काही औरच हवे होते... यात इतर मुलींना जसा त्रास होतो ना... तसा त्रास मलापण व्हायचा... मी त्याकडे कधी लक्ष दिले नाही... माझं इथेच चुकलं... त्याकडे जास्त गांभीर्याने लक्ष द्यायला हवे होते... ठाकुर – दलित वाद पाचवीलाच पुजलेला...आमच्या घरातही तेच होते... घराशी खानदानी दुश्मनी असलेल्या वादानेच माझा घात केला...१४ सप्टेंबरला मी नेहमी प्रमाणे आई बरोबर शेतात कामाला निघाले होते... आई भाऊ गवताचा भारा कापत होते... मी आईच्या पाठी बसले होते.. तितक्यात ते चार नराधम आले.... गळ्यात ओढणी टाकून फरफटत नेलं हो त्यांनी मला. शेजारच्या बाजरीच्या शेतात आणि केला त्यांनी माझ्या नाजुक देहाचा चुराडा.... त्या चार नराधमांनी दिलेल्या यातनांनी तना मनावर अगणित जखमा झाल्या... माझ्या पाठीचा कणाच अक्षरशः मोडून गेला... मी कुठेही बोलू नये म्हणून माझी जीभ कापून टाकली.... साध खरचटलं तरी अंगाची जळजळ होते.. सहन होत नाही... जरा विचार करा... माझे काय हाल झाले असतील... शेजारच्या शेतामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला माझा देह बघून माझ्या माउलीची अवस्था काय झाली असेल याचा विचार देखील आता करवत नाही... माझं रक्तबंबाळ शरीर ओढणीने झाकलं... ऍम्ब्युलन्समधून मला सुरूवातीला जिल्हा रूग्णालयात भरती केलं.... तिथं प्राथमिक निदान करण्यात आलं.. त्यानंतर मला अलीगढच्या रूग्णालयात भरती केलं... माझा जीवन मरणाशी संघर्ष सुरू होता... अगदी कालपर्यंत मी हरायला तयार नव्हते... पण तिन्ही इस्पितळांनी केलेला संघर्ष व्यर्थ ठरला... माझी झुंज अपयशी ठरली...माझा जीवनप्रवास संपला... माझ्या कुटुंबाला विश्वासात न घेता केलेल्या अंत्यसंस्काराचा फोटा बघाचं... तो साधा फोटा नव्हता... माझ्यासारख्या मुलींना संपविण्याचा विकृत कट होता... मुलगी होणं इतकं सोप्प नसतं हो... सोप्पी नसतं...माझ्यावर अत्याचार झाल्याची बातमी देशभरात वाऱ्यासारखी पसरली. सर्वत्र विरोध होऊ लागला... सोशल मीडियावर हॅशटॅग ट्रेंडिग होऊ लागले... आता माझ्यावर अत्याचार केलेल्या नराधमांना शिक्षा होईलच... परंतु, मुलीनों! उद्या तुमच्यावर जर हा प्रसंग आला तर दोन हात करायला शिका... आपल्या दुबळेपणाचा गैरफायदा घेतात इथले लोकं....मला माहितीये उद्यापासून तुमचं जीवन रूटिन सुरू होईल... कदाचित मी तुम्हाला लक्षात राहणार नाही... स्त्री सक्षमीकरणाची कास धरू बघणाऱ्या देशात महिला केवळ भोगापुरत्या मर्यादित न ठेवता तिच्यातील स्व अस्तित्वाची जाणीव प्रत्येकाच्या मनात असू द्या... स्त्रीयांना केवळ भोगापुरतं मर्यादित न ठेवता त्यांना एक व्यक्ती म्हणून जगण्याचा अधिकार दिला तर राष्ट्र संपन्न होईल... खऱ्या अर्थाने बेटी बचाव, बेटी पढाव चळवळ पूर्णत्वास जाईल.तुमचीमनिषा ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Blogs/Being-a-girl-is-not-easy</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 24 Aug 2020 13:48:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ तो खरचं अस्तित्वात आहे का? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Blogs/Dawood-Really-Exist</link>
            <description>दाऊदशी बोलणारी देशातील एकही व्यक्ती पोलिसांच्या हाती लागत नाही का? त्याचा फोन एकदाही टॅप होऊ शकला नाही का? त्याच्या दोन बहिणी, एका भाऊ, भाचे, पुतणे, असे अनेक जवळचे नातलग मुंबई, पुणे आणि लगतच्या भागात राहतात. त्यांचे फोन टॅप करणे पोलिसांना शक्य झाले नाही का? की तो कधीच, कुणाशीच बोलत नाही? आणि नाही तर का नाही? याचीही कारणे समजायला नकोत का? त्याचा कट्टर दुश्मन, अशी प्रतिमा निर्माण केलेल्या छोटा राजनालही त्याचा नेमका ठावठिकाणा माहीत नसेल का? या आणि अनुषंगिक प्रश्नांची उत्तरे जर नकारार्थी असतील तर त्याचे अस्तित्व तरी मान्य कसे करायचे, हा कळीचा मुद्दा आहे. जगातील अशी कोणती बलाढ्य ताकद त्याचा एवढा सर्वतोपरी बचाव करते आहे ? तो खरेच अस्तित्वात आहे? आख्यायिका आहे? की, देशातील कोणत्याही घातपाती कृत्यांची जबाबदारी निश्चित करण्यासाठीची अस्तित्वात नसलेली ती व्यवस्था आहे? वेळोवेळी निरनिराळ्या बातम्या पेरून ती व्यवस्था ठळक करण्याचा प्रयत्न तर कोणी हेतूत: करीत नाही ना? या प्रश्नांचा शोध महत्त्वाचा ठरेल.नाव : दाऊद हसन इब्राहिम कासकरजन्मतारीख : ३१ डिसेंबर १९५५उंची : पाच फूट सहा इंचपत्ता : ३३ पाकमोडीया स्ट्रीट, मुंबईमूळ पत्ता : मुमके , ता. खेड, रत्नागिरीसध्याचे ठिकाण : फरारी....मुंबईतील संहारक बॉम्बस्फोटांची मालिका, दहशतवादी कारवाया, हत्या, खंडण्या उकळणे यांसारख्या पन्नासहून अधिक गुन्ह्यांत मोस्ट वॉन्टेड असलेल्या दाऊदची ही माहिती पोलिसांकडे नोंद आहे. त्याच्या वर्णनाबरोबरच त्याच्या तत्कालीन खऱ्या खोट्या पासपोर्ट्साचे नंबर्स आहेत, ज्याचा आता काहीच उपयोग नाही. कारण ही सारी माहिती २५ वर्षांपूर्वीची, म्हणजेच १९९०च्या आधीची आहे. गेल्या २५ वर्षंातील त्याचा एकही अधिकृत ताजा फोटो, व्हीडीओ, ध्वन‌फिीत पोलिसांकडे नाही, गुप्तचर यंत्रणांकडेही नसावी.दाऊद पाकिस्तानातच आहे, अशा बातम्या अधूनमधून येत असतात. त्याचे पाकिस्तानातील वास्तव्य, त्याचा तेथील क्लिफ्टन परिसरातील व्हाइट हाऊस नावाचा प्रासादतुल्य बंगला, त्याची कडेकोट सुरक्षा व्यवस्था याची रसभरीत वर्णनेही नेहमीच निरनिराळ्या चॅनेल्सवर दाखवली जातात. लोकही मोठ्या औत्सुक्याने ते पाहत असतात. कारण गेल्या काही वर्षांत या माध्यमांनीच दाऊद या नावाभोवती एकप्रकारचे वलय निर्माण करून ठेवले आहे. दाऊद हा त्यांचा हॉट केक, टीआरपी राखण्याचे साधन बनला आहे. काही खास विषय हाताशी नसला की दाऊद की मेहबूबा, दाऊद का दरबार, दाऊद की प्रॉपर्टी अशा नावाचे कार्यक्रम जुन्या फोटोंच्या, जुनी माहितीच्या आणि जुन्या व्हिडीओजच्या सहाय्याने पेश केले जातात. गेल्या आठवड्यात दाऊद पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला ते त्याच्या वास्तव्याच्या पुराव्यामुळे. तो कराचीमध्ये राहत असलेल्या ठिकाणची टेलिफोन बिले गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहेत, त्याची पत्नी मेहजबीन हिच्याशी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलणे झाले आहे, या आशयाच्या बातम्यांनी झळकल्या. त्याला पाकिस्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/img/blogs/profile/dawood.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[दाऊदशी बोलणारी देशातील एकही व्यक्ती पोलिसांच्या हाती लागत नाही का? त्याचा फोन एकदाही टॅप होऊ शकला नाही का? त्याच्या दोन बहिणी, एका भाऊ, भाचे, पुतणे, असे अनेक जवळचे नातलग मुंबई, पुणे आणि लगतच्या भागात राहतात. त्यांचे फोन टॅप करणे पोलिसांना शक्य झाले नाही का? की तो कधीच, कुणाशीच बोलत नाही? आणि नाही तर का नाही? याचीही कारणे समजायला नकोत का? त्याचा कट्टर दुश्मन, अशी प्रतिमा निर्माण केलेल्या छोटा राजनालही त्याचा नेमका ठावठिकाणा माहीत नसेल का? या आणि अनुषंगिक प्रश्नांची उत्तरे जर नकारार्थी असतील तर त्याचे अस्तित्व तरी मान्य कसे करायचे, हा कळीचा मुद्दा आहे. जगातील अशी कोणती बलाढ्य ताकद त्याचा एवढा सर्वतोपरी बचाव करते आहे ? तो खरेच अस्तित्वात आहे? आख्यायिका आहे? की, देशातील कोणत्याही घातपाती कृत्यांची जबाबदारी निश्चित करण्यासाठीची अस्तित्वात नसलेली ती व्यवस्था आहे? वेळोवेळी निरनिराळ्या बातम्या पेरून ती व्यवस्था ठळक करण्याचा प्रयत्न तर कोणी हेतूत: करीत नाही ना? या प्रश्नांचा शोध महत्त्वाचा ठरेल.नाव : दाऊद हसन इब्राहिम कासकरजन्मतारीख : ३१ डिसेंबर १९५५उंची : पाच फूट सहा इंचपत्ता : ३३ पाकमोडीया स्ट्रीट, मुंबईमूळ पत्ता : मुमके , ता. खेड, रत्नागिरीसध्याचे ठिकाण : फरारी....मुंबईतील संहारक बॉम्बस्फोटांची मालिका, दहशतवादी कारवाया, हत्या, खंडण्या उकळणे यांसारख्या पन्नासहून अधिक गुन्ह्यांत मोस्ट वॉन्टेड असलेल्या दाऊदची ही माहिती पोलिसांकडे नोंद आहे. त्याच्या वर्णनाबरोबरच त्याच्या तत्कालीन खऱ्या खोट्या पासपोर्ट्साचे नंबर्स आहेत, ज्याचा आता काहीच उपयोग नाही. कारण ही सारी माहिती २५ वर्षांपूर्वीची, म्हणजेच १९९०च्या आधीची आहे. गेल्या २५ वर्षंातील त्याचा एकही अधिकृत ताजा फोटो, व्हीडीओ, ध्वन‌फिीत पोलिसांकडे नाही, गुप्तचर यंत्रणांकडेही नसावी.दाऊद पाकिस्तानातच आहे, अशा बातम्या अधूनमधून येत असतात. त्याचे पाकिस्तानातील वास्तव्य, त्याचा तेथील क्लिफ्टन परिसरातील व्हाइट हाऊस नावाचा प्रासादतुल्य बंगला, त्याची कडेकोट सुरक्षा व्यवस्था याची रसभरीत वर्णनेही नेहमीच निरनिराळ्या चॅनेल्सवर दाखवली जातात. लोकही मोठ्या औत्सुक्याने ते पाहत असतात. कारण गेल्या काही वर्षांत या माध्यमांनीच दाऊद या नावाभोवती एकप्रकारचे वलय निर्माण करून ठेवले आहे. दाऊद हा त्यांचा हॉट केक, टीआरपी राखण्याचे साधन बनला आहे. काही खास विषय हाताशी नसला की दाऊद की मेहबूबा, दाऊद का दरबार, दाऊद की प्रॉपर्टी अशा नावाचे कार्यक्रम जुन्या फोटोंच्या, जुनी माहितीच्या आणि जुन्या व्हिडीओजच्या सहाय्याने पेश केले जातात. गेल्या आठवड्यात दाऊद पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला ते त्याच्या वास्तव्याच्या पुराव्यामुळे. तो कराचीमध्ये राहत असलेल्या ठिकाणची टेलिफोन बिले गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहेत, त्याची पत्नी मेहजबीन हिच्याशी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलणे झाले आहे, या आशयाच्या बातम्यांनी झळकल्या. त्याला पाकिस्तानमध्ये घुसून उडवण्याचा डाव आपल्याच काही गुप्तचर अधिकाऱ्यांमुळे उधळला गेल्याचेही वृत्त याच दरम्यान प्रसिद्ध झाले. मुळात ही गोष्ट वीस वर्षांपूर्वीची आहे. मग आत्ता या बातम्या बाहेर येण्याचे प्रयोजन काय? नेमके कोण या बातम्या पेरते आहे? त्यामागील कारण काय? हे तपासून पाहण्याची आवश्यकता आहेअमेरिकेने १५ मे २०१२ ला दाऊदचा विश्वासू साथीदार छोटा शकील व टायगर मेमन यांना दहशतवादी, अमली पदार्थांचे तस्कर असल्याचा आणि दक्षिण आशियाई देशांमध्ये गुन्हेगारी जाळे पसरवल्याचा ठपका ठेवून ब्लॅक लिस्ट केले. त्यांच्याशी अमेरिकन नागरिकांनी आर्थिक अथवा कोणत्याही स्वरूपाचे व्यवहार करू नये, असा आदेश अमेरिकन अर्थ मंत्रालयाने दिला. या दोघांची बँक खाती गोठवून मालमत्तांवर टाच आणण्यात येईल, असे जाहीर केले. त्यातून काय साध्य झाले ही माहिती कधी पुढे आली नाही. अमेरिकन सरकारने त्यापूर्वी दाऊदविरुद्धही अशीच नोटीस जारी केली होती. याच अमेरिकेच्या गुप्तचरांनी ओसामा बिन लादेन याचा चिवटपणे माग काढत पाकिस्तानात घुसून त्याला कंठस्नान घातले हे लक्षात घेतले पाहिजे. लादेननंतर त्यांनी दाऊदभोवतीचा फास आवळत आणल्याचे चित्र निर्माण केले होते. अर्थात, लादेन हा अमेरिकेचा थेट शत्रू होता. त्याने अमेरिकेत विध्वंस घडवून आणला. तसा दाऊद त्यांना थेट डोकेदुखी ठरत नसावा. त्यामुळेच अमेरिका त्याच्याविरुद्ध काही कारवाई करत नसावी, असा तज्ज्ञांचा होरा आहे.दाऊदला दहशतवादी घोषित करून इंटरपोलनेही त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली. पण, त्यापुढे काहीच झाले नाही. भारतासह निरनिराळ्या देशांच्या गुप्तचर यंत्रणा आणि इंटरपोलही दाऊदचा ठावठिकाणा लावण्याबाबत हतबल ठरले आहे. त्यामुळेच, त्याच्या अस्तित्वाबाबत गुप्तचर विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे.दाऊद खऱ्या अर्थाने शक्तिशाली झाला ते ९०च्या दशकात. भारतातून पसार झाल्यानंतर त्याने ‘डी’ कंपनीचे अफाट साम्राज्य जगभर निर्माण केले. तोपर्यंत हाजी मस्तान, करीम लाला, युसुफ पटेल, वरदराजन मुदलीयार, सुकूर नारायण बाखीया या तस्करांचे मुंबापुरीवर वर्चस्व होते. ८०च्या दशकात मस्तानचा चेला म्हणून वेगाने पुढे आलेल्या दाऊदने संघटीत गुन्हेगारीची परिभाषाच बदलून टाकली. टोळीयुद्धातून त्याने आलमजेब आणि अमीरजादा यांच्यासह करीमलालाची सारी पठाण गँग संपवून टाकली. रमा नाईक, अमर नाईक, अरुण गवळी या सर्वांवर मात करून तो मुंबईचा अनभिषिक्त सम्राट बनला. महागडी घड्याळे, विदेशी कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या तस्करीतून पुढे तो ड्रग्जच्या व्यापारात शिरला. बांधकाम क्षेत्रात, व्यापाऱ्यांमध्ये बॉलीवूडमध्ये त्याने दहशत निर्माण केली. हवाला रॅकेट, सोन्याच्या व्यापारात त्याने वर्चस्व निर्माण केले. १९८८नंतर तो कधीच पोलिसांकडून पकडला गेला नाही. त्या काळात मुंबईतील टोळीयुद्ध शिगेला पोचले होते. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त अरविंद इनामदार यांनी संघटीत गुन्हेगारीविरुद्ध कठोर पावले उचलली. ‘बुलेट फॉर बुलेट’ असा पोलिसांचा पवित्रा पाहून भलेभले गुंड भूमिगत झाले. त्यावेळी छोटा राजन, अनिल परब, सुनील सावंत, शरद शेट्टी या मित्रांच्या मदतीने दाऊदने दुबई गाठली. सुरुवातीचा काही काळ डी कंपनीने अरब राष्ट्रांमध्ये बस्तान मांडले. तेथून तो मुंबईतील कारभारावर नजर ठेवून होता.१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर अंडरवर्ल्डची समीकरणे बदलली. रातोरात दाऊदने पाकिस्तानचा आश्रय घेतला. तेथे त्याने अनेक वर्षे वास्तव्य केले. सध्याही त्याचे वास्तव्य तेथे असल्याचे दावे केले जात असले, तरी नैरोबी आणि काही छोट्या आफ्रिकन देशांमध्येही तो अधूनमधून राहायला जातो, अशी गुप्तचर विभागाची माहिती आहे.तीनवेळा हत्येचा प्रयत्नदाऊद विदेशात असताना त्याच्यावर तीनवेळा हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. लंडनमधील स्विस कोर्ट या अतिश्रीमंत परिसरातील राजशेठ या मित्राच्या आलिशान बंगल्यात उन्हाळ्यात तो कुटुंबीयांसमवेत महिनाभर वास्तव्याला जायचा. त्याला तेथे ठार मारण्याचा प्लॅन मुंबईतील दोन गुन्हेगारी टोळ्यांनी रचला होता. १९९० पूर्वीची ही घटना. त्यानुसार दोन्ही टोळ्यांमधील शूटर्स मुंबईहून लंडनला गेले. त्यांनी दाऊद राहत असलेल्या घरासमोरील बंगला भाड्याने घेतला. बुलेटप्रूफ गाडीतून दाऊद फिरायचा. संधी मिळेपर्यंत बरेच दिवस गेले. वाढत्या खर्चामुळे दोन्ही टोळ्यांमध्ये वाद झाले आणि टार्गेट पूर्ण न करताच शूटर्स मायदेशी परतले.साधारणत: पंधरा वर्षांपूर्वी छोटा राजनचा विश्वासू साथीदार फरीद तनाशा, बंटी पांडे आणि त्यांचे साथीदार कराचीमध्ये दाऊदपर्यंत पोहचले होते. तेथील एका मशिदीजवळ ते दबा धरून बसले. हल्ल्याच्या काही वेळ आधी एकजण त्यांना शस्त्रे देणार होता. दाऊद आला. त्याने मशिदीत नमाज पठण करून निघूनही गेला. पण, फरीद आणि त्याच्या साथीदारांपर्यंत अखेरपर्यंत शस्त्रे पोहचलीच नाहीत. त्यामुळे हा प्रयत्न फसला.दाऊदची मुलगी माहरूख हिचा विवाह जुलै २००५ मध्ये पाकिस्तानचा क्रिकेटपटू जावेद मियांदाद याचा मुलगा जुनैद याच्याशी झाला. त्याप्रीत्यर्थ दुबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. तेथे दाऊदला उडवण्याचा प्लॅन छोटा राजनच्या टोळीने आखला होता. कराचीसारखी फसगत होऊ नये म्हणून काटेकोर खबरदारी घेण्यात आली होती. फरीद आणि राजनचा साथीदार विकी मल्होत्रा दुबईत जाणार होते. समारंभाच्या आदल्या दिवशी हे दोघे दिल्लीत होते. मुंबईतील गुन्ह्यांत वॉन्टेड असलेल्या खतरनाक गुन्हेगारांचा ठावठिकाणा मुंबई पोलिसांना मिळाला. पोलिसांच्या पथकाने रातोरात दिल्लीत जाऊन फरीद आणि विकीला बेड्या ठोकल्या. त्यावेळी त्यांच्यासमवेत एक वरिष्ठ गुप्तचर अधिकारी होता. गुप्तचर विभाग आणि पोलिसांच्या समन्वयाभावी दाऊदला संपवण्याचा प्लॅन पुन्हा फसला. राजनच्या कटाची माहिती मिळाल्यावर दाऊदने त्या दोघांना पोलिसांकरवी पकडून सारी हवा काढून घेतली, अशी चर्चा त्यावेळी पोलिस वर्तुळात होती. गेल्या आठवड्यात दाऊदवरील हल्ल्याचा प्लॅन उधळला गेल्याच्या ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या; तो हाच हल्ला होता. त्यात गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्याचा सहभाग दिसून आल्याने त्यावर पांघरून घालता घालता प्रशासनाची भंबेरी उडाली.त्यानंतर ठराविक काही दिवसांनी निरनिराळ्या बातम्यांमुळे दाऊद चर्चेत येत असतो. पण, महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे सध्या उपलब्ध असलेली दाऊदची सारी छायाचित्रे १९८५ पूर्वीची आहेत. पोलिस आणि गुप्तचर विभागाकडे असलेल्या साऱ्या व्हिडीओ क्लिप्स १९९० पूर्वीच्या आहेत. अलिकडेच मिशा नसलेली त्याची छायाचित्रं प्रसिद्ध झाली होती, ती सारी फोटोशॉपची करामत असावी असे पोलिसांना वाटते. मुंबई पोलिसच नव्हे, देशविदेशातील गुप्तचर संघटना, इंटरपोल त्याच्या मागावर आहेत. त्यांच्यापैकी कोणालाही गेल्या २५ वर्षांत दाऊदचे साधे छायाचित्र मिळू शकत नाही, यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. कोणत्याही देशाच्या विमानातळावरील सीसी टीव्ही फुटेजमध्ये तो कधीच कसा चित्रित झाला नाही? त्याची धमकी आल्याची एकही तक्रार गेल्या २० वर्षांत का दाखल झाली नाही? नाही म्हणायला दहा वर्षांपूर्वी एकदा महाराष्ट्रातील दोन गुटखा सम्राटांमध्ये झालेल्या भांडणांमध्ये त्याने कराचीत समझोता घडवून आणल्याचे बोलले जात होते. दोघेही त्याच्याकडे कराचीत गेले होते, अशी पोलिसांत नोंद आहे. तेथे खरेच दाऊद त्या मीटिंगला होता? त्याचा डमी होता की त्याच्यावतीने दुसऱ्याच कोणी ही मिटिंग घडवून आणली? हे शोधून काढायचीही कुणाची इच्छा दिसत नाही. मध्यंतरी, दुबईतील एका बिल्डरला दाऊद धमकावत असल्याची एक ४० मिनिटांची व्हिडीओ क्लिप सोशल मिडीयावर फिरत होती. त्याची खबरदारी घेण्याची पद्धत लक्षात घेता तो कुणा बिल्डरची इतका वेळ समजूत घालेल, हे खरे वाटत नाही. त्याच्याशी बोलणारी देशातील एकही व्यक्ती पोलिसांच्या हाती लागत नाही का? त्याचा फोन एकदाही टॅप होऊ शकला नाही का? त्याच्या दोन बहिणी, एका भाऊ, भाचे, पुतणे, असे अनेक जवळचे नातलग मुंबई, पुणे आणि लगतच्या भागात राहतात. त्यांचे फोन टॅप करणे पोलिसांना शक्य झाले नाही का? की तो कधीच, कुणाशीच बोलत नाही? आणि नाही तर का नाही? याचीही कारणे समजायला नकोत का? त्याचा कट्टर दुश्मन, अशी प्रतिमा निर्माण केलेल्या छोटा राजनालही त्याचा नेमका ठावठिकाणा माहीत नसेल का? या आणि अनुषंगिक प्रश्नांची उत्तरे जर नकारार्थी असतील तर त्याचे अस्तित्व तरी मान्य कसे करायचे, हा कळीचा मुद्दा आहे. जगातील अशी कोणती बलाढ्य ताकद त्याचा एवढा सर्वतोपरी बचाव करते आहे ? तो खरेच अस्तित्वात आहे? आख्यायिका आहे? की, देशातील कोणत्याही घातपाती कृत्यांची जबाबदारी निश्चित करण्यासाठीची अस्तित्वात नसलेली ती व्यवस्था आहे? वेळोवेळी निरनिराळ्या बातम्या पेरून ती व्यवस्था ठळक करण्याचा प्रयत्न तर कोणी हेतूत: करीत नाही ना? या प्रश्नांचा शोध महत्त्वाचा ठरेल. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Blogs/Dawood-Really-Exist</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 18 Aug 2020 15:51:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दंगल..!! दंगल...!! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Blogs/Dangal-Dangal</link>
            <description>वो कहते है ना,जब मामला गरम हो तो चुप रहो, सब शांत हो जाने का इंतजार करो और फिर अपनी बात कहो। मैं भी आज वही कर रही हूँ। थोड़ी शांती के बाद अपनी बात रख रही हूँ। इन दिनों दंगल बहुत चर्चा में है, आप सब समझ ही गए होंगे मेरा इशारा और इरादा क्या है? दंगल शब्द मात्र से ही कितना कुछ साफ हो जाता है। सबसे पहले ये बता दूँ, कि ना मैं मोदी की भक्त हूँ, ना राहुल की बस बात मानवता की है।इसलिए आप से संवाद कर रही हूँ। अभी दो दिन ही हुए है, त्यागी जी को अलविदा कह कर। खेद है, एक अच्छा प्रवक्ता पार्टी ने खोया है ।पूरी घटना कुछ ऐसे है कि, हमेशा की तरह राजीव त्यागी एक चर्चा सत्र का हिस्सा बने। वो अपनी हाजिर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/img/blogs/profile/rajivtyagi.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[वो कहते है ना,जब मामला गरम हो तो चुप रहो, सब शांत हो जाने का इंतजार करो और फिर अपनी बात कहो। मैं भी आज वही कर रही हूँ। थोड़ी शांती के बाद अपनी बात रख रही हूँ। इन दिनों दंगल बहुत चर्चा में है, आप सब समझ ही गए होंगे मेरा इशारा और इरादा क्या है? दंगल शब्द मात्र से ही कितना कुछ साफ हो जाता है। सबसे पहले ये बता दूँ, कि ना मैं मोदी की भक्त हूँ, ना राहुल की बस बात मानवता की है।इसलिए आप से संवाद कर रही हूँ। अभी दो दिन ही हुए है, त्यागी जी को अलविदा कह कर। खेद है, एक अच्छा प्रवक्ता पार्टी ने खोया है ।पूरी घटना कुछ ऐसे है कि, हमेशा की तरह राजीव त्यागी एक चर्चा सत्र का हिस्सा बने। वो अपनी हाजिर जवाबी के लिए मशहूर थे, हर बात का जवाब था उनके पास।दो दिन पहले भी घर से लाइव चर्चा सत्र में उनकी मौजूदगी थी। अचानक तबियत खराब हुईं और कुछ ही देर में वो सत्र उनकी आखरी बातचीत का ,उनकी स्मृति का पल बन गया। जीवन का अंत कब होगा, कैसे होगा, कहा होगा ये आज तक कोई नहीं जान पाया। ये अटल सत्य है।हम सब जानते है फिर भी सवाल पर सवाल है। यहाँ आकर दुख बदले में, कटघरे में, बयानों में आ गया है। जहां तक मुझे जानकारी है, उसके हिसाब से किसी भी चर्चा में आप भाग लेते है,तो आप उस कार्यक्रम का हिस्सा बन जाते है। जब राजीव जी असहज महसूस कर रहे थे तो , उनको अनदेखा क्यों किया? ये एक सवाल है। आप का कर्तव्य होता है, पर वहाँ वो कर्तव्य शुन्य था। ये होना चाहिए था। अफसोस है..बस। दूसरी बात चर्चा सत्र का मतलब क्या है? बुद्धिजीवी के हिसाब से आप किसी विषय पर अपनी बात रखे और अपना मत बता दें। यही होता है, जहाँ तक। लेकिन कब ये चर्चा से बहस , बहस से विवाद और विवाद से व्यक्तिगत मुद्दे विषय बन जाते पता ही नही लगता। चर्चा को सिर्फ चर्चा ही रहने दिया जाना चाहिए। ये सहयोजक पर होता है,उसे कैसे सब को लेकर चलना है। फिर अफसोस है.. यहाँ ये भी नहीं हुआ। ये चर्चा एक निमित है और निमित हमेशा निर्दोष होता है। लेकिन सोचने का विषय ये है कि , क्या अगर बहस व्यक्तिगत नहीं होती तो शायद आज राजीव हमारे बीच में होते। क्या उनकी असहजता को अनदेखा नहीं किया होता तो भी शायद..!! लेकिन इन सब के बीच ये भी बात है कि, टाइम बोलकर नहीं आता, उनका साथ तब तक ही था। बहुत से सवाल है, लेकिन सब मौन है। ये मौन कही ना कही ये कहता है कि, जो हुआ सही नहीं हुआ। बहुत सी बार घरों में भी बहस होती है, जहाँ एक को शांत रहने को कहा जाता है,ताकि ऐसे कोई घटना ना हो जाए कि बाद में पछतावा हो। ये मामला भी कही ऐसा तो नही था। अब बस शेष बात ही है और कुछ नहीं। आप समझदार है लेकिन आप की समझदारी ऐसे मामलों में ही पता चलती है। सिर्फ अच्छे मुकाम ही काफी नहीं है, यहाँ थोड़ी सी मानवता भी जरूरी है।  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Blogs/Dangal-Dangal</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 18 Aug 2020 15:36:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मेरा कुछ सामान …काही गुलजारमय लम्हे ! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Blogs/Mera-kuch-sama--some-glorious-moments</link>
            <description>स्वतःच्या खऱ्या नावाला सार्थ करून दाखवणारे कमीच असतात, नाही ? पण नसतात असे नव्हेच…. सम्पूर्ण सिंह कालरा जन्म १८ ऑगस्ट १९३६ ज्यांना आपण गुलजार नावाने ओळखतो. त्यांचा जन्म अविभाजित भारताच्या पंजाब मधील झेलम जिल्ह्यातील 'दिना' गावचा जे आता पाकिस्तानात आहे. अनेक पुरस्कारांचे, सन्मानांचे मानकरी ….गुलजार यांना मिळालेल्या पुरस्कारांची संख्याही मोठी आहे. पद्गमभूषण पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला आहे. शिवाय तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार व चौदा वेळा फिल्मफेअर पुरस्काराने त्यांना गौरवान्वित करण्यात आले . म्हणूनच म्हणावेसे वाटते, तुम्ही तुमच्या नावाला जागलात गुलझारजी, सार्थ करून दाखवलंत…. तुम्हाला 'दादासाहेब फाळके अवार्ड' जाहीर झाला तो क्षणही किती महत्वाचा होता, प्रत्येकाचंं मन पुन्हा गुलजार गुलजार झालं वातावरण गुलजारमय होऊन ओठ गुणगुणायला लागले होते. तुमचे नाव जरी घेतले तरी प्रत्येकाला त्यांचे त्यांचे ते भारावलेले दिवस आठवतात आणि मन स्वप्नील दुनियेत रममाण होत जातं. एखाद्याची जादू तनामनावर राज्य करतेय 'जाने कीस सदि से'… तुम्हाला ऑस्कर मिळाला त्याचाही आनंद झाला होताच पण आपल्या देशातला हा सर्वोच्च अवार्ड आपल्या आवडत्या कलाकाराला मिळावा यातला आनंद शब्दातीत आहे. मानवी भावभावनांचे स्पंदन त्यांच्या लेखणीतून असे काही उतरते कि सिर्फ एहसास है ये रूह से महसूस करो... प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम ना दो..हमने देखी है उन आंखों कि महेकती खुशबू सुंदर कल्पना आणि सुरेख शब्दांची मेजवानी वर्षानुवर्ष अनुभवून आताशा गुलजार देशाच्या नसानसात भिनले होते</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/img/blogs/profile/gulzar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[स्वतःच्या खऱ्या नावाला सार्थ करून दाखवणारे कमीच असतात, नाही ? पण नसतात असे नव्हेच…. सम्पूर्ण सिंह कालरा जन्म १८ ऑगस्ट १९३६ ज्यांना आपण गुलजार नावाने ओळखतो. त्यांचा जन्म अविभाजित भारताच्या पंजाब मधील झेलम जिल्ह्यातील 'दिना' गावचा जे आता पाकिस्तानात आहे. अनेक पुरस्कारांचे, सन्मानांचे मानकरी ….गुलजार यांना मिळालेल्या पुरस्कारांची संख्याही मोठी आहे. पद्गमभूषण पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला आहे. शिवाय तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार व चौदा वेळा फिल्मफेअर पुरस्काराने त्यांना गौरवान्वित करण्यात आले . म्हणूनच म्हणावेसे वाटते, तुम्ही तुमच्या नावाला जागलात गुलझारजी, सार्थ करून दाखवलंत…. तुम्हाला 'दादासाहेब फाळके अवार्ड' जाहीर झाला तो क्षणही किती महत्वाचा होता, प्रत्येकाचंं मन पुन्हा गुलजार गुलजार झालं वातावरण गुलजारमय होऊन ओठ गुणगुणायला लागले होते. तुमचे नाव जरी घेतले तरी प्रत्येकाला त्यांचे त्यांचे ते भारावलेले दिवस आठवतात आणि मन स्वप्नील दुनियेत रममाण होत जातं. एखाद्याची जादू तनामनावर राज्य करतेय 'जाने कीस सदि से'… तुम्हाला ऑस्कर मिळाला त्याचाही आनंद झाला होताच पण आपल्या देशातला हा सर्वोच्च अवार्ड आपल्या आवडत्या कलाकाराला मिळावा यातला आनंद शब्दातीत आहे. मानवी भावभावनांचे स्पंदन त्यांच्या लेखणीतून असे काही उतरते कि सिर्फ एहसास है ये रूह से महसूस करो... प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम ना दो..हमने देखी है उन आंखों कि महेकती खुशबू सुंदर कल्पना आणि सुरेख शब्दांची मेजवानी वर्षानुवर्ष अनुभवून आताशा गुलजार देशाच्या नसानसात भिनले होते, नाही भिनले आहेत आणि तसेच भिनले राहतील आणि असाच हृदयस्पर्शी मनोरंजनाचा तोहफा देऊन जगणे सोपे सुंदर करण्यास मदत करत राहतील. त्यांच्या शब्दात रंग आहे, गंध आहे, त्यांच्या शब्दांचे बादल बनतात, शब्दांतून तितलियां उडतात, प्रेयसीला ते गुलमोहर संबोधतात तर कधी फुल. गुलजार लिहित नाहीत ते जाणीवा जागृत करतात. एखाद्या व्यक्तीने काय काय करावं प्रत्येकाच्या मर्यादा असतातच हो, पण काहींना विशिष्ट शक्तींच प्राप्त असावी का ? कविता, कथा, दिग्दर्शन, गीत लेखन, गझल आणि हो 'खराशे'सारख्या नाट्यसंहितादेखील लिहाव्या हा चमत्कारच नाहीये का? त्यांनी दिलेला हा प्रचंड मोठा सुंदर खजिना आपल्याला अनेक कठीण मार्गातून मार्गक्रमण करतांना साथ देत आलाय, मरगळलेल्या मनाला पुन्हा फुलवून जगण्यासाठी बाध्य करत आलाय. 'जाने क्या सोचकर नही गुजरा, एक पल रातभर नही गुजरा' , ' दिल धुंडता है फिर वही फुरसत के रात दिन' किंवा मग 'कहीं किसी रोज यूं भी होता, हमारी हालत तुम्हारी होती, जो रात हमने गुजारी मरके वो रात तुमने गुजारी होती बडी वफा से.. प्रत्येकाच्या मनातली अस्वस्थता अशी स्पष्ट शब्दात मांडायचे कसब असू दे किंवा मग साधारण माणसांची काल्पनिक स्वप्न सत्यात उतरवावे असे हृदयस्पर्शी गीत गुलजारची लेखणी तुमच्या आमच्या मनातल्या वाटेने प्रवास करत असावी किंवा मग तुमच्या आमच्या विचारांच्या शाईने भरली जात असावी इतकी ती आपली वाटते. दिल दर्द का टुकड़ा है, पत्थर की डाली सी हैएक अँधा कुवा हैं या, एक बंद गली सी हैएक छोटा लम्हा हैं , जो ख़त्म नहीं होतामैं लाख जलाता हूँ, वो भस्म नहीं होता माचिस फिल्म चे हे गाणे 'छोड़ आए हम वो गलियाँ' एकेकाळी प्रचंड गाजलेले. आजही मनाचा ठाव घेते. आणि अश्या सोडून दिलेल्या अनेक घटना मग आठवत राहतात. त्यांच्या शब्दात जादूच तशी आहे. 'चांद' हि गुलजार साहेबांची लाडकी उपमा त्यांच्या बऱ्याच गीतात तो कुठूनतरी झाकून बघतांना दिसतो, जाणवतो. अनेकांनी तर गुलजार आणि चांद असे समीकरणच असल्याचे संबोधिले आहे. चंद्राशी हे गुलजार चे नाते इतके जवळचे कि चांद म्हणजे लज्जा, चांद म्हणजे दिवा, चांद म्हणजे आत्मीयता आणि चांद म्हणजेच गीत सुद्धा…. 'बदली हटा के चंदा, चुपकेसे झांके चंदा...'जसे 'चांद' शी नाते तसे पाण्याशीही'खामोश सा अफसाना पानी पे लिखा होगा, ना तुमने कहा होगा ना हमने सुना होगा' हे गीत असू दे किंवा मग जगजीत सिंग सारखा मित्र गमावल्यानंतर लिहिलेला शायराना अंदाज. 'आदमी बुलबुला है पानी काऔर पानी की बहती सतह पर टूटता भी है, डूबता भी है,फिर उभरता है, फिर से बहता है,न समंदर निगल सका इसको, न तवारीख़ तोड़ पाई है,वक्त की मौज पर सदा बहता'आहह! काय ते शब्द आणि कसल्या त्या प्रतिमा आणि उपमा फिल्मी गैरफिल्मी गझल, नज्म नाही तर 'कजरारे कजरारे' किंवा 'नमक इश्क का' सारखे आयटम सॉंग अगदी त्यांनी लिहिलेल्या त्या विशिष्ट जाहिराती सुद्धा त्यांनीच लिहाव्यात इतरांचे कामच नाही, काम सोडाच कम्पेरिझनच नाही. प्रत्येक नव्या कामातले नाविन्य आणि स्वतःचे वेगळेपण त्यांनी ठायी ठायी जपले आहे. आणि दिग्दर्शनाबद्दल तरी काय बोलावे एकसे बढकर एक संहिता माचिस, हुतुतू, आंधी, मौसम, अचानक, अंगूर, लेकीन, मेरे अपने, खुशबू, किनारा जेवढी नावं तेवढे विविध विषय तशी हाताळणी आणि म्हणूनच त्यांचा प्रत्येक सिनेमा गर्दी बाहेरचा ठरतो आणि पाहणाऱ्यांच्या आठवणीत जाउन विसावतो. त्यांच कुठलंही गीत नसावं तुम्ही आम्ही ऐकले नाहीये एकदा नाही अनेकदा. काही गाणी तर अजरामर गटातलीच ' मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है' या गाण्याने तर सगळे रेकॉर्ड तोडले असावे इतके ते वाजले आणि गाजले. सगळ्याच पिढीला स्पर्श करणारे.'एक सौ सोलह चांद की रातेएक तुम्हारे कांधे का तील...गिली मेहंदी कि खुशबूझूटमुट के शिकवे कुछ...!'हृषिकेश मुखर्जी, बासू चॅटर्जी, बासू भट्टाचार्य या दिग्दर्शकांपासून ...सलील चौधरी, जयदेव, हेमंत कुमार, खय्याम आणि सर्वांत लाडका त्यांचा 'पंचम' आर. डी. बर्मन...यांच्याशी गीतकार म्हणून जमलेली जोडी...आत्ता तीच केमिस्ट्री नवा संगीतकार ए. आर. रहमान आणि विशाल भारद्वाज सोबतही आहे त्यांची. त्यांच्या शब्दांना वेळेचे, काळाचे बंधन नाही. पिढीशी जुळवून घेण्यासाठी धडपड करावी लागत नाही. त्या शब्दातच एक रुहानी ताकद आहे, पाण्यासारखे सगळ्यात मिसळून जाण्याची जादू आहे.गुलजार साब तुमच्याबद्दल आणखी काय काय बोलावे आणि किती किती, तुम्ही म्हणजे निव्वळ वेड आहात आणि या वेडात जगायची सवय झालीये आताशा. तुम्ही असेच लिहित राहा आणि आमचे आयुष्य अधिक सुखद समृद्ध करत राहा ही सदिच्छा. आमचे जगणे जास्त सोपे अन सुंदर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आम्हाला फार आभिमान आहे तुमचा. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Blogs/Mera-kuch-sama--some-glorious-moments</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 08 Aug 2020 22:05:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आखिर कब तक...? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Blogs/How-long</link>
            <description>अफसोस है,आँखों में आँसू हैं, शोक है, नाराजगी है और शर्मिंदगी के साथ साथ न जाने क्या क्या है..क्योंकि आज फिर एक बार ,एक और निर्भया जिंदगी और मौत का सफर तय कर रही हैं। एक बार फिर दिल दहलाने वाली हैवानियत सामने आईं है। दुष्कर्म और हत्या करने की कोशिश... उफ हद होगी अब तो। निर्भया को कुछ दिन पहले ही न्याय मिला , वो न्याय क्या केवल सिर्फ एक केस के लिए किया गया न्याय था। आखिर कब तक अदालतों में ऐसे ही मामले दर्ज होंगे और मां बाप अपनी बेटी के न्याय के लिए सालो साल इंतजार करते रहेंगे। खेलने की उम्र में कब तक किसी की दरिंदगी का खिलौने बन जायेगी हमारे देश की बेटी। मामला सुन कर रूह कांप जायेगी, पीरागढ़ी में रहने वाली मात्र तेरह साल की </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/img/blogs/profile/aakhirkabtak.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अफसोस है,आँखों में आँसू हैं, शोक है, नाराजगी है और शर्मिंदगी के साथ साथ न जाने क्या क्या है..क्योंकि आज फिर एक बार ,एक और निर्भया जिंदगी और मौत का सफर तय कर रही हैं। एक बार फिर दिल दहलाने वाली हैवानियत सामने आईं है। दुष्कर्म और हत्या करने की कोशिश... उफ हद होगी अब तो। निर्भया को कुछ दिन पहले ही न्याय मिला , वो न्याय क्या केवल सिर्फ एक केस के लिए किया गया न्याय था। आखिर कब तक अदालतों में ऐसे ही मामले दर्ज होंगे और मां बाप अपनी बेटी के न्याय के लिए सालो साल इंतजार करते रहेंगे। खेलने की उम्र में कब तक किसी की दरिंदगी का खिलौने बन जायेगी हमारे देश की बेटी। मामला सुन कर रूह कांप जायेगी, पीरागढ़ी में रहने वाली मात्र तेरह साल की गरीब परिवार की बालिका जिसके साथ दुष्कर्म हुआ,उस समयअपने घर में अकेली थी। उसके माता पिता मजदूरी का काम करने घर से बाहर गए थे। बालिका ने विरोध करने की कोशिश की तो उसके सिर और शरीर के बाकी हिस्सों पर कैंची से वार किया गया। उसे जान से मारने की पूरी कोशिश की गई। नाकामयाबी मिलने पर आरोपी फरार हो गए। गुप्त अंग से रक्त का तेज बहाव। ऐसे हालात में भी बालिक मदद के पड़ोसी के पास गईं। दिल्ली के एम्स में इलाज जारी है और महिला आयोग में मामला दर्ज है। परिवार वालो को पूरा आश्वासन दिया गया है कि अपराधियों को सजा मिलेंगी। इस मामले के बाद बहुत से सवाल मन में आ रहे हैं.. ऐसे मामलों में सजा देने का काम परिवार वालो को क्यों नही दिया जाता। क्यों रेब पीड़ित को अपने साथ हुई घटना का वर्णन बार बार अदालतों में करना पड़ता है, ऐसे मसलो में क्यों तुरंत निर्णय नही लिया जाता। निर्भया मामले के बाद भी आज फिर एक निर्भया अपनी ज़िंदगी से जग क्यों लड़ रही है। ऐसे अपराध के लिए सरकार क्यों कड़ा कानून नही बनाती। दिल्ली, मध्यप्रदेश और राजस्थान में क्यों ऐसे वारदात लगातार होती रहती है। आखिर क्यों..? कुछ मामलों में केस दर्ज नहीं होता तो कुछ में तारीख दम तोड़ देती है। एक तरफ तो कानून कहता है कि, यहाँ इंसाफ मिलेगा पर ये इंसाफ पैसों से क्यों दब जाता है। क्यों एक औरत को उसके साथ हुईं कुकर्म पर बार बार जवाब देना होता है। क्यों एक औरत को उसके साथ जो हुआ उसका बयान मनचलों के सामने देना होता है, और शर्म सार होना पड़ता है। इन सब सवालो के जवाब जिस दिन मिल गए उस दिन समझ लेना देश की हर बेटी अपने घरों में भी सुरक्षित है। देश की हर बेटी की सुरक्षा के लिए कोई न कोई नियम कानून होना ही चाहिए। उनकी चीख अनसुनी नही की जानी चाहिए। बेटी किसी की भी हो, रौनक होती है, अभिमान होती है, शोभा होती है, फिर क्यों उनकी मासूमियत छीन ली जाती है। बेटियों के लिए हम सब को मिलकर लड़ना होगा, उनको उनकी सुरक्षा का कवच देना होगा। आज जंग सिर्फ बेटियों की नही है उसके अभिमान और सुरक्षा की है। जिसका हिस्सा हर पिता और माँ को बनना होगा ताकि फिर कोई बेटी निर्भया ना बन पाए!! ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Blogs/How-long</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 30 Jul 2020 13:18:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अफसोस है...!! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Blogs/afsos-hai</link>
            <description>सुशांत सिंह राजपूत शायद यही कह रहे होंगे , आखिर मैंने प्यार क्यों किया...? जब उनके खुद के प्यार ने उन्हें दुनिया से अलविदा करने को कहा। बहुत ही विचित्रता हैं । प्यार में बचपना सुना था, पागलपन भी सुना था लेकिन पैसो के लिए प्यार कभी नहीं सुना था। अब वो भी देख लिया। फिल्मों की दुनिया की अगर बात करें तो यहाँ प्यार पर ही न जाने कितनी कहानियां बताई गई है। सब एक से बढ़ कर एक मोहब्बत की दास्तां पर वही कलाकार जब रियल लाइफ में प्यार करता हैं, तो वो अपनी फिल्मों से अलग स्टोरी बनना चाहता हैं। जो कल्पना से परे है। ऐसे में कभी रिश्ता शर्मसार होता तो कभी प्यार। यहाँ नाम से मतलब है अच्छे बुरे से कोई फर्क नही पड़ता। कोई प्यार को लेकर चर्चा में है, तो कोई ब्रेकअप को, कोई शादी को लेकर तो कोई तलाक। चर्च</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/img/blogs/profile/sushansingh.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सुशांत सिंह राजपूत शायद यही कह रहे होंगे , आखिर मैंने प्यार क्यों किया...? जब उनके खुद के प्यार ने उन्हें दुनिया से अलविदा करने को कहा। बहुत ही विचित्रता हैं । प्यार में बचपना सुना था, पागलपन भी सुना था लेकिन पैसो के लिए प्यार कभी नहीं सुना था। अब वो भी देख लिया। फिल्मों की दुनिया की अगर बात करें तो यहाँ प्यार पर ही न जाने कितनी कहानियां बताई गई है। सब एक से बढ़ कर एक मोहब्बत की दास्तां पर वही कलाकार जब रियल लाइफ में प्यार करता हैं, तो वो अपनी फिल्मों से अलग स्टोरी बनना चाहता हैं। जो कल्पना से परे है। ऐसे में कभी रिश्ता शर्मसार होता तो कभी प्यार। यहाँ नाम से मतलब है अच्छे बुरे से कोई फर्क नही पड़ता। कोई प्यार को लेकर चर्चा में है, तो कोई ब्रेकअप को, कोई शादी को लेकर तो कोई तलाक। चर्चा हो बस।फिलहाल इन दिनों सुशांत सिंह राजपूत की कहानी हॉट टॉपिक है। प्यार के लिए कुछ भी, कहने वालों में से एक थे सुशांत। पहला प्यार बहुत खास होता है। उसका नया अहसास आवारा बना देता हैं। अंकिता लोखंडे के साथ कुछ ऐसा ही था मानव का किरदार निभाने वाले सुशांत का रिश्ता। पवित्र रिश्ता सीरियल ने इनको बहुत अच्छे मुकाम तक पहुँचाया और दोनों प्यार के बंधन के कैदी बन गए। इनका इश्क़ परवाने चढ़ रहा था, खबरों की सुर्खियों में इनके इश्क़ के चर्चे थे। दोनो एक साथ रहने भी लगे थे। फिर अचानक एक दिन खबर आई कि सुशांत का ब्रेकअप हो गया। क्यों हुआ, क्या हुआ वो तो सुशांत ही जाने। पहले प्यार में ना कामयाब रहे सुशांत ने अब अपना पूरा ध्यान अपने कैरियर पर लगाया। एम. एस. धोनी ने धूम मचा दी। एक बार फिर ये किरदार सुर्खियों में था, बुलंदियों ने दरवाजे पर दस्तक दी और शुरू हुआ नया सफर। अपने पहले प्यार को भूल भी नहीं पाए थे, कि उनकी मुलाकात रिया से हो गई। भाई प्यार तो प्यार है। पहला हो या दूसरा। रिया चक्रवर्ती ने प्यार का खेल भी दिमाग से खेला। प्यार के नाम पर लूट, धोका और मौत दे दी सुशांत को। करोडों का खेल खेल गई रिया। चंदन भी लगाया तो दिमाग से। कंपनी की जिम्मेदारी खुद लेकर। अवसाद भी दिया और डॉक्टर भी। डॉक्टर के साथ मिल कर लुपाछूपी का खेल भी खेला। किसी को कानो कान भनक तक नही लगने दी।पूरा जाल बुना और दुनिया को बताया कि ये मर्डर नहीं आत्महत्या है। किसी ने राजपूत को कायर कहा,किसी ने हारा हुआ कहा। लेकिन जाँच में आखिर सच सामने आ ही गया। गलत कौन है? सुंशांत जिसने बेइंतहा इश्क किया ? या वो पैसे की भूख जिसने जान ले ली। सोचने वाली बात हैं। ये कैसा लालच है पैसो का। क्या प्यार करना गलत है..? अगर है तो आज प्यार पर विश्वास करने वाले ने भी धोका खाया है, आज दोस्ती के रिश्ते ने भी धोका खाया है, आज हर वो रिश्ता शर्मसार हुआ है जो प्यार को बुनियादी बताता है। सुशांत की याद में चौक को नाम दिया गया, उनका निजी आवास मेमोरियल बनेगा। क्या ये सब करने से न्याय मिल जायेगा या सुशान्त वापस आ जायेगा। ना जाने ऐसे कितने सवाल है जो सिर्फ सवाल है। अब तारीख़ पे तारीख़ तय करेगी। असल में गुनाह किस का है प्यार का या प्यार के नाम पर खेल खेलने वालों का। आज हम सब दुखी है, फ़िल्मी दुनिया ने अपना चमकता सितारा खो दिया है। ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Blogs/afsos-hai</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 17 Jul 2020 19:35:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोना अमिताभ वाला..!! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Blogs/Corona-Amitabh-Wala-</link>
            <description>जी हाँ, मैं कोरोना हूँ। वहीं कोरोना जिसने 2020 के प्रारंभ में ही आप के भारत में दस्तक दे दी थी। शुरु -शुरु में मेरा संक्रमण धीमी गति से चल रहा था। आप सब ने पूरी तैयारी की थी मुझसे लड़ने की।जिसमे बहुत हद तक सफलता भी मिली। सब ने अपना पुरा समय अपने घरों में अपने परिवार के साथ बिताया। लॉक डाउन किया गया। धीरे धीरे वो भी अनलॉक हो गया। समय के साथ अब आकड़ो में मेरा जिक्र होने लगा।कहाँ क्या हुआ...कितने लोगों को हुआ...क्या किया जा रहा है..? ये सब भी आंकड़ो में ही बताने लगे।जब तक सब शासन के बनाए नियमों का पालन कर रहे थे, तब तक सारी व्यवस्था ठीक चल रहा था। पहले लोगो को मेरा ख़ौफ हुआ करता था, मुझसे डर लगा करता था। देखते ही देखते वो दिन भी आ गया कि, डर भी रफू चक्कर हो गया।मास्क और </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/img/blogs/profile/corona15220.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[जी हाँ, मैं कोरोना हूँ। वहीं कोरोना जिसने 2020 के प्रारंभ में ही आप के भारत में दस्तक दे दी थी। शुरु -शुरु में मेरा संक्रमण धीमी गति से चल रहा था। आप सब ने पूरी तैयारी की थी मुझसे लड़ने की।जिसमे बहुत हद तक सफलता भी मिली। सब ने अपना पुरा समय अपने घरों में अपने परिवार के साथ बिताया। लॉक डाउन किया गया। धीरे धीरे वो भी अनलॉक हो गया। समय के साथ अब आकड़ो में मेरा जिक्र होने लगा।कहाँ क्या हुआ...कितने लोगों को हुआ...क्या किया जा रहा है..? ये सब भी आंकड़ो में ही बताने लगे।जब तक सब शासन के बनाए नियमों का पालन कर रहे थे, तब तक सारी व्यवस्था ठीक चल रहा था। पहले लोगो को मेरा ख़ौफ हुआ करता था, मुझसे डर लगा करता था। देखते ही देखते वो दिन भी आ गया कि, डर भी रफू चक्कर हो गया।मास्क और सेनिटाइजर ने दूरी बनाने में मदद की। लेकिन , कौन जानता था कि इनकी आड़ लेकर लोग पार्टी ,मौज मस्ती की इंतजाम कर मजे करेगें और नियमों को भी तोड़ मुझे खुद आमंत्रण देगें। मीडिया अख़बार सब जगह जैसे मैं ही छाया था, सुबह की चाय , बात चीत का विषय हर बात में मेरा जिक्र। टाइम बदला मेरी जगह नियमों का उल्लंघन करने वालो ने ली और दबे पाव से मैं हर जगह जा पहुँच।इस बीच लोग मुझे भूलने भी लगे थे, अपने काम से बाहर निकलने लगे थे। सरकार ने सक्ती बरती पर अब कोई सुनने वाला न था। ब्रांड एम्बेसडर अमिताभ जी मानो सब से यही बोल रहे हो, मेरे अंगने में,तुम्हारा क्या काम है..? उनकी तिखी आवाज मुझे डर रही थी जैसे वो मुझे कह रहे हो," अरे दिवानो , मुझे पहचानो , कहा से आया मैं हु कौन? मैं हु डॉन..मैं हूं डॉन.."! उनकी फिल्म का ये गाना मैं भी गुनगुनाने लग गया। और फिल्मों की नगरी में सैर करने लगा। ये नगरी अजब गजब है।यहां सब की दुनिया में मेरे नाम का कोहराम था। दिन गुजरे और एक दिन पूरी दुनिया को मैंने हिला कर रख दिया। मेरा संक्रमण महा नायक अमिताभ बच्चन जी को हो गया। आज से मेरी पहचान बदल गई। मेरे नाम का रूपांतरण हुआ। क्या कहते है आप नामकरण हुआ। अब तक मैं कोरोना ही था पर आज मेरा नाम बदल गया अब मैं अमिताभ वाला कोरोना हो गया। मोदी जी की स्टाइल में कहे तो, मैं भी अब लोकल से वोकल हो गया था। अब तक बहुत लोग संक्रमण से प्रभावित हुए पर महानायक को संक्रमण क्या हुआ, मानो दुनिया हिल गई हों। पल पल की ख़बरों में मुझसे ज्यादा अमिताभ जी का जिक्र हो रहा था। अमिताभ जी की तरह ही आम लोगो को भी ये संक्रमण हुआ , लेकिन मीडिया ने और बाकी सब चैनल ने संक्रमण को इतना महत्व नही दिया ,जितना अमिताभ बच्चन को दिया। कुछ देर तो मैं भी सोच में पड़ गया।ये ऐसा कैसे न्याय है, प्रॉब्लम एक ही पर चिंता किसी एक की। मैं ये नही बोल रहा कि, मैं उनसे नाराज हु या उनकी प्रसन्नता से जल रहा हु। मेरा कहना तो बस यही है कि, मैं सिर्फ कोरोना रहना चाहता हूँ, अमिताभ वाला कोरोना नहीं। संक्रमण संक्रमण होता है इसमें कोई बड़ा छोटा नही होता। बस टाइम किसी को बोल कर नही आता। इसलिए घर में रहे , स्वस्थ रहे, मस्त रहे...।। ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Blogs/Corona-Amitabh-Wala-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 11 Jul 2020 11:16:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मैं विकास दुबे!! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Blogs/I-am-Vikas-Dubey</link>
            <description>यम राज,- अरे, विकास तुम यहाँ? अचानक तुम्हारा समय अभी नही हुआ था। फिर कैसे आ गए?विकास दुबे जोर जोर से हँसने लगता है और बोलता है, महाराज अब आ ही गया हूं तो थोड़ा आराम तो करने दो। बहुत थक गया हूं भाग भाग कर।मैं यहां आना नहीं चाहता था पर आना पड़ा। आपने तो मुझे पहचान लिया पर वहाँ मुझे सब को बताना पड़ा कि , मैं हु विकास दुबे कानपुरवाला। बहुत हँसी आ रही है , महाराज। दुनिया वालो को तो कुछ नही कहा पर यहाँ अब किस का डर है, मुझे बोलने दो।उस लोक में पहले ही कोरोना का आंतक है।लोंगो को अपनी जिंदगियां प्यारी है वो कहा मेरा कुछ बिगाड़ सकते है। 1992 से अब तक कोई मेरा बाल भी नहीं हिला सका फिर वो क्या क</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/img/blogs/profile/vikasdube.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[यम राज,- अरे, विकास तुम यहाँ? अचानक तुम्हारा समय अभी नही हुआ था। फिर कैसे आ गए?विकास दुबे जोर जोर से हँसने लगता है और बोलता है, महाराज अब आ ही गया हूं तो थोड़ा आराम तो करने दो। बहुत थक गया हूं भाग भाग कर।मैं यहां आना नहीं चाहता था पर आना पड़ा। आपने तो मुझे पहचान लिया पर वहाँ मुझे सब को बताना पड़ा कि , मैं हु विकास दुबे कानपुरवाला। बहुत हँसी आ रही है , महाराज। दुनिया वालो को तो कुछ नही कहा पर यहाँ अब किस का डर है, मुझे बोलने दो।उस लोक में पहले ही कोरोना का आंतक है।लोंगो को अपनी जिंदगियां प्यारी है वो कहा मेरा कुछ बिगाड़ सकते है। 1992 से अब तक कोई मेरा बाल भी नहीं हिला सका फिर वो क्या करेंगे। अब आप ही सोच लो , जो लोग मुझसे कापते थे , मेरे डर से मेरा साथ देते थे, वो लोग मुझे कैसे मार सकते हैं।दुनिया की नजर में मैं बहुत बडा गुंडा हू। गुंडा नही गैंगस्टर यही बोलते है वहां मुझे। लेकिन मेरा पुरा साथ भी दिया करते थे।तभी तो इतना होने के बाद भी मैं आराम से महाकाल में सेल्फी ले रहा था। आप मेरे गाँव जा कर देख लो मेरी पत्नी और माँ समाज के विकास के लिए चुनाव लड़ रही है। सब सुखद माहौल है। मैं वहाँ राजा था, नेता कोई भी पार्टी का हो, पर राज मेरा होता था। अब और क्या बोलू, पुलिस भी सलाम करती थी मुझे। वरना क्या मैं इतने दिनों तक आनंद लेता। आप ही बताओ। अब तक कितनो को मौत की नींद सुला चुका हूं, हिसाब नही है और तो और कितने केसेस है वो भी पता नही। ये कम है तो और सुनो, मुझे मरना नही था , पर अगर मैं जिंदा रहता तो बहुत लोगों को मरना पड़ता। उनके राज जो मेरे पास थे। मैं उनका राजदार था तभी तो हम वहां के भगवान थे। (जोर जोर से हँसता है।)यमराज थोड़े परेशान होकर बोले, - तुम कही के भी भगवान क्यों न हो पर यहां किसी की नही चलती ।विकास यमराज से,- जानता हूं, इसलिए तो सब बता रहा हु ना। वहां तो मेरा बोलबाला था, किसी की न चली, लेकिन मैं भूल ही गया था कि मुझे आप को हिसाब देना होगा।हिसाब क्या दूँगा, मेरा लेखाजोखा तो है ही आप के पास । मेरे आने से कितनों की ज़िंदगी भी सवर गई है।मैं मेरे साथ बहुत से राज भी ले आया हूं।अगर वो वहा सब को पता चल जाते तो तारीख़ पर तारीख़ चलती रहती और केस कुछ दिन चलता और फिर ठंडे बस्ते में चलता जाता। कई नेताओं को अपना पद छोड़ना पड़ता और उनकी दुकान बंद हो जाती।पुलिस पर से जनता का विश्वास उठ जाता और न्याय के लिए लोग नही जाते और न जाने क्या क्या होता। अफसोस तो कम है पर खुशी ज्यादा है। जितनो को मारा नही उससे कही ज्यादा का भला कर के आया हु। मेरे मरने से सवाल सिर्फ सवाल बन कर रह गए। जी हां मैं ही विकास दुबे हु,कानपुर वाला!!! ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Blogs/I-am-Vikas-Dubey</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 28 Jun 2020 13:51:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नेपथ्यनरेश नरसिंह राव..... ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Blogs/Nepathyanaresh-Narasimha-Rao</link>
            <description>पंडीत नेहरू व इंदिरा गांधी औद्योगिक भारताचे शिल्पकार आहेत. ज्ञानयुगीन भारताचे शिल्पकार राजीव गांधी आहेत. तर समृद्ध भारताचे जनक माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव म्हटल्या जाते. पक्षाच्या संघटन कार्याचे ओझे कधीही न वाहता सर्वोच्च पद गाठायचे व संधीचे सोने करायचे, या नीतीकाराचे नाव म्हणजे पी.व्ही.नरसिंहराव.तारा स्वप्रकाशित असतो व ग्रह परप्रकाशित असतो. नरसिंहराव हे पंतप्रधान होत पर्यंत ग्रहासारखे वागले व पंतप्रधान झाल्यानंतर एकदम तारा झाले. या ग्रहमालिकेने अनेक चमत्कार दिल्लीत केले. त्यास कारणही असेच होते कारण, ग्लोबल्याझेशन, प्रायव्हेटायझेन, लिबरीयझेशनचे वारे त्यावेळी या नेत्यामुळे देशात वाहू लागले. २१ मे १९९१ ला राजीव गांधींची लिट्टेने हत्या केली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले नरसिंह राव त्यावेळी केंद्रीय औद्योगिक मंत्री होते. देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा पी. व्ही नरसिंहराव यांच्याकडे आली. याच दरम्यान आर्थिक उदारणीकरण लागू करण्याचे संकेत या नेपथ्यनरेश नरसिंहराव यांनी दिले. भारत लायजनिंगमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ज्यादिवशी आर्थिक उदारणीकरणाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार होता त्यावेळी सकाळी पंतप्रधान कार्यालयात भारतातील औद्योगिकरणासंदर्भातील मोठे दस्तावेज सादर करण्यात आले </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/img/blogs/profile/pnarsinarao.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पंडीत नेहरू व इंदिरा गांधी औद्योगिक भारताचे शिल्पकार आहेत. ज्ञानयुगीन भारताचे शिल्पकार राजीव गांधी आहेत. तर समृद्ध भारताचे जनक माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव म्हटल्या जाते. पक्षाच्या संघटन कार्याचे ओझे कधीही न वाहता सर्वोच्च पद गाठायचे व संधीचे सोने करायचे, या नीतीकाराचे नाव म्हणजे पी.व्ही.नरसिंहराव.तारा स्वप्रकाशित असतो व ग्रह परप्रकाशित असतो. नरसिंहराव हे पंतप्रधान होत पर्यंत ग्रहासारखे वागले व पंतप्रधान झाल्यानंतर एकदम तारा झाले. या ग्रहमालिकेने अनेक चमत्कार दिल्लीत केले. त्यास कारणही असेच होते कारण, ग्लोबल्याझेशन, प्रायव्हेटायझेन, लिबरीयझेशनचे वारे त्यावेळी या नेत्यामुळे देशात वाहू लागले. २१ मे १९९१ ला राजीव गांधींची लिट्टेने हत्या केली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले नरसिंह राव त्यावेळी केंद्रीय औद्योगिक मंत्री होते. देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा पी. व्ही नरसिंहराव यांच्याकडे आली. याच दरम्यान आर्थिक उदारणीकरण लागू करण्याचे संकेत या नेपथ्यनरेश नरसिंहराव यांनी दिले. भारत लायजनिंगमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ज्यादिवशी आर्थिक उदारणीकरणाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार होता त्यावेळी सकाळी पंतप्रधान कार्यालयात भारतातील औद्योगिकरणासंदर्भातील मोठे दस्तावेज सादर करण्यात आले होते. कंपन्या व उद्योग क्षेत्रातील सरकारी वर्चस्व कमी करून नियमावली शिथील करण्यात येणार होती. आर्थिक स्वांतत्र्य लागू करण्यात येणार होते. अर्थातच याचे श्रेय जेवढे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना जाते, तेवढेच पी.व्ही. नरसिंहराव यांना देखिल जातं. पी. व्ही.नरसिंहराव यांनी अर्थमंत्री डॉ.मनमोहनसिंग ते हर्षद मेहता यांचा वापर करून भारतीय अर्थशास्त्र ओपन केले व भारताच्या समृद्धीची प्रक्रिया ‘ट्रीगर’ केली.अयोध्या आंदोलनातील बाबरी मश्चिद पाडण्याच्या प्रकरणात पंतप्रधान नरसिंहराव यांचा सहभाग नव्हता हे मानणे म्हणजे वेडेपणाचे लक्षण होय. विश्व हिंदु परिषदेला व संघाला बाबरी मस्जिद प्रकरण हाताळू दिले. त्याबदल्यात भाजपाची अत्यंत महत्त्वाची चार राज्ये गिळकृंत केली.अटलबिहारी वाजपेयींना संघाचा पूर्ण पाठिंबा होता. जगाला हेवा वाटावा असा ज्ञानयुगीन व कार्यक्षम विश्वासू सहकारी त्यांना अडवाणीच्या रूपात भेटला होता. बाहेर स्नेहबंध व आत मुका संघर्ष ही वाजपेयींची खासीयत. एकाच अर्थाची वाक्ये फेकावीत ती वाजपेयींनीच. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांशी मौनव्रताच्या अस्त्राने वाजपेयी नेहमी लढले. पंतप्रधान होताच भारताला अणवस्त्रधारी राष्ट्र केले. २००३ साली भारताचा जीडीपी ग्रोथ रेट सर्वाधिक हा वाजपेयी सरकारने साध्य केला. ८.६ टक्के वृद्धीदराने भारत समृद्धीसाठी अग्रेसर झाला. चरैवेती चरैवेती हा मार्ग अवलंबन करणारे वाजपेयी यांना नरसिंहरावांनी ‘गुरूघंटाल’ असे संबोधले होते. भारताला अणवस्त्रराष्ट्र करण्यामागे व पोखरण येथे अणुस्फोट घडविण्यामागे राव यांची प्रेरणा होती, हे अटल बिहारी वाजपेयींनी नरसिहंराव यांच्या श्रद्धांजली सभेत बोलून दाखवले होते.नरसिंह रावांनी उद्योग खाते आपल्याकडे ठेवले. त्यात आमूलाग्र बदल करता यावा हे त्यामागचे कारण होते. आर्थिक सुधारणांबरोबरच उद्योग खात्याकडेही त्यांनी तातडीने लक्ष दिले. नवीन उद्योगांच्या विकासासाठी, जुन्यांना पुनर्जीवन देण्यासाठी, ते स्पर्धेत टिकण्यासाठी त्यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्याचा रावांनी विडाच उचलला आणि एका झटक्यात ‘लायसन्स राज’ला मूठमाती दिली.सत्तरच्या दशकात आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्री पदावरून नरसिंहराव निवृत्त झाले. पंडीत नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या मर्जीतले असलेले पी. व्ही.नरसिंहराव हे गांधी घराणेतर पहिले पंतप्रधान म्हणून केंद्रात आले. राजकीय कारकिर्दीतून संन्यास घेताना देशाचा मुकूट शिरावर चढण्याचे भाग्य त्यांच्या नशिबी होते. सीताराम केसरीनंतर त्यांच्या राजकीय कारकिर्देला सुरूंग लागला आणि ते अज्ञातवासात गेले. २३ डिसेंबर २००४ ला हृदयविकाराने त्यांची प्राणज्योत मालवली. काँग्रेसच्या यशात खारीचा का होईना पण त्यांचा वाटा लक्षणीय होता. एवढे असूनसुद्धा त्या माणसाचे पार्थिव दिल्लीच्या काँग्रेस मुख्यालयात आणण्यास सोनिया गांधींनी विरोध केला. ज्या माणसाने डॉ. मनमोहनसिंग यांची एक वेगळी ओळख जगाला दाखविली तो व्यक्ती दहा वर्षे पंतप्रधान असताना देखिल पी.व्ही.नरसिंहराव यांना भारतरत्न देऊ शकला नाही, ही खरी शोकांतिका आहे.सामान्य माणसाला किंवा व्यक्तीला नरसिंहराव यांना जाणून घेण्यासाठी आपल्याला काँग्रेसचा चेहरा का बघावा लागतो? काँग्रेसला नरसिंहराव यांच्या कार्याचा विसर का पडला? नरसिंहराव हे भारताचे खरे रत्न नव्हते का? दोन माजी पंतप्रधानांचे (अटल बिहारी वाजपेयी आणि डॉ.मनमोहन सिंग) राजकीय गुरू असून देखील त्यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान देण्याचे धाडस या नेत्यांनी का नाही दाखवले?मी नरसिंहराव यांची कारकिर्द पाहिली नाही. त्यांचा माझा संपर्क कधीही आला नाही. नरसिंह राव पंतप्रधान असताना मी नुकताच जन्मास आलो होतो. माझ्या राजकीय संकूचित व सिमीत राजकारणाच्या अभ्यासानूसार पी.व्ही.नरसिंह राव हे भारतरत्नासाठी पात्र आहे, असे मला वाटते. आज पी.व्ही.नरसिंह राव यांची जयंती त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Blogs/Nepathyanaresh-Narasimha-Rao</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 22 May 2020 14:30:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ काफ़िला चल पडा.... ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Blogs/The-caravan-started-moving</link>
            <description>दीदी रीवा जा रहे हैभैया ५०० किलोमीटर है रीवाकितना किलोमीटर है दीदी५००अब यहां तक आए है दीदी तो आगे भी पहुंच ही जाएंगे, यही रास्ता जाता है नाहैदराबाद से नागपुर ५०० किलोमीटर है. नागपुर वो जैसे तैसे पहुंचे. आगे नागपुर से रीवा और ५०० किलोमीटर. जो उन्हें पता भी नहीं. बस घर जाना है जानते है क्यों उन्हें बताया गया है दीदी लोग बोल रहे है आगे ३ महीने ऐसा ही रहने वाले है, कितने दिन रहेंगे यहां. कितने दिन हो गए अपने परिवार से मिले वो भी परेशान हो रहे है. अब पता नहीं हम वापस इधर आएंगे भी या नहीं.क्रोनॉलजी, थेट्रोलॉजी कोई भी लॉजी हो जरा उसको छोड़िए और उनकी भावनाओं को समझिए.आज अपने सामने एक १९ साल के एक लड़के के आंखो में आंसू आते हुए देखा है. बहुत कोशिश कर रहा था आंसू आंख से गिर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/img/blogs/profile/kafilachalpada.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[दीदी रीवा जा रहे हैभैया ५०० किलोमीटर है रीवाकितना किलोमीटर है दीदी५००अब यहां तक आए है दीदी तो आगे भी पहुंच ही जाएंगे, यही रास्ता जाता है नाहैदराबाद से नागपुर ५०० किलोमीटर है. नागपुर वो जैसे तैसे पहुंचे. आगे नागपुर से रीवा और ५०० किलोमीटर. जो उन्हें पता भी नहीं. बस घर जाना है जानते है क्यों उन्हें बताया गया है दीदी लोग बोल रहे है आगे ३ महीने ऐसा ही रहने वाले है, कितने दिन रहेंगे यहां. कितने दिन हो गए अपने परिवार से मिले वो भी परेशान हो रहे है. अब पता नहीं हम वापस इधर आएंगे भी या नहीं.क्रोनॉलजी, थेट्रोलॉजी कोई भी लॉजी हो जरा उसको छोड़िए और उनकी भावनाओं को समझिए.आज अपने सामने एक १९ साल के एक लड़के के आंखो में आंसू आते हुए देखा है. बहुत कोशिश कर रहा था आंसू आंख से गिर ना जाए. पर आंखे नम हो ही जा रही थी. जैसे ही आंख में आंसू आते तुरंत अपने गमछे से पोछ लेता. आवाज़ बाहर नहीं निकल रही थी. पुलिस वालो ने और मैंने काफी अनुरोध किया बेटा बैठ जा तेरा बैग भी बहुत भारी है उसे नीचे रख दे. बैठ आराम से पानी पी बिस्किट खा ले, थोड़ा आराम करके निकलना.वो सब सुन रहा था पर शायद अपनी कमजोरी हमारे सामने आने नहीं देना चाह रहा था. लडख़ड़ाती आवाज़ में बस जाने की बात कर रहा था.मम्मी पापा कह रहे है गाव आजा इसलिए मैं गांव जा रहा हूंझोली फैलाई है कभी किसीने कभी आपके सामने. आज मेरे सामने मैंने औरतों को झोली फैलाते देखा. किस लिए? बस एक बिस्किट के पैकेट के लिए. एक २० Rs के बिस्किट का पैकेट. आंखे झुख गई थी शर्म से. बूढों को बच्चो को दोनों हाथ फैलाते देखा बस एक बिस्किट के लिए. फिर भी मुस्कुराते हुए देखा उन्हें. बच्चे के हाथ में बिस्किट दिया और पता नहीं क्या खुशी मिली उसे खिलखिलाने लग गया.दीदी पानी है क्याभैया माफ कीजिए पानी नहीं रखाकोई बात नहीं दीदी आगे मिल ही जाएगा.जहां आपको हिदायत दी जा रही है ज्यादा से ज्यादा पानी पीने की उनके लिए इस कड़ी धूप में समय पे पीने के लिए पानी भी नहीं.अगर आपको फिर भी लगता है ये लोग पागल है, ज़िद्दी है, किसी कि बिना सुने मनमानी कर रहे है. तो आपको फिर से सोचने कि जरूरत है. आपको ये और संक्रमण ना फैला दे इसकी चिंता है. मैं रोज़ बैंक जाने के लिए घर से बाहर निकलती हूं और यकीन मानिए शहरी लोग की हरकतें कई शर्मनाक है जिनसे सिगरेट की तलब नहीं रुक सकती वो इन्हें दोषी करार देने में व्यस्त है.गांव में रहने वाले मा बाप अपने बच्चे के लिए उतने ही चिंतित है जितना शहर के लोग होते है अपने बच्चे को लेकर. शहर के लोग तो फिर भी फोन कॉल, वीडियो कॉल से जुड़े रहते है शायद पल पल की खबर भी रखते है. इनके पास वो सहूलियत भी नहीं.ये हमारे जैसे पॉवर बैंक लेकर नहीं घूम रहे है जो कहीं भी फोन चार्ज हो जाए. इनके फोन बंद है किसी से बात नहीं हो पा रही. घर वालो को नहीं पता कब पहुचेंगे कैसे पहुंचेंगे. वो बैठे होंगे इंतजार में. बच्चे घर आएंगे.ये कहानी टीवी के पर्दे से निकालकर नहीं लाई है. ये आंखो देखी है. टीवी के लॉजी से बाहर भावनाए पहुंचाने की एक कोशिश बस. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Blogs/The-caravan-started-moving</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 14 May 2020 13:51:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राष्ट्रवादी भूलथापा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Blogs/Nationalist-delusion</link>
            <description>राष्ट्रवादाच्या नावावर भूलथापा चालू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाँकडाऊन-४ची घोषणा केली. तेव्हा आत्मनिर्भरतेचं नवे खुळ आणलं. त्यासाठी चार एल सांगितले. त्यात लेबर, लाँ, लँड आणि लिक्विडिटी आहे. या माध्यमातून निर्माण झालेल्या संधींच्या लाभावर बरेच काही बोलले. त्यांचे हे निर्णय जागतिकीरण व खासगिकरणाच्या दबावाखाली आहेत. नोटबंदीने सरकार आर्थिक अडचणीत आले. उरलीसुरली कसर कोरोनाने काढली. जेव्हा सरकारचे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त वाढते. तेव्हा सरकारची पत खालावते. नवे कर्ज घेण्यात अडचणी येतात. जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अटी लादते. नेहरू सरकारच्या कार्यकाळात मिश्र अर्थव्यवस्थेला प्राधान्य होते. त्यामुळे खासगी उद्योगांसोबत सार्वजनिक उद्योग वाढले. त्यातील काहींचा अभिमानाने ' नवरत्न ' असा उल्लेख केला जात होता. आर्थिक कारणांमुळे मोदी सरकारच्या काळात या उपक्रमांचे कवडीमोलात खासगीकरण सुरू आहे. त्याचा लाभ धनिकांना आहे. अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत. दुर्बलांचे आरक्षण संपते. नोकरीच्या नव्या संधी राहत नाहीत. यास राष्ट्रवाद म्हणावे ? लोकांच्या पोटावर मारून येणारा राष्ट्रवाद मूठभरांचा आहे. ही आत्मनिर्भरता बहुसंख्याकांची नाही.या आत्मनिर्भरतेच्या नावाखाली श्रम कायदे रद्द करणार.आठ तासाऎवजी १२ तास काम. कंपनी मजूराला केव्हाही काढू शकेल. कंपनीला हवी असणारी जमिन सरकार देणार. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेणार. भूमी कायदे बाजूला ठेवणार. सरकार कंपनीला सवलती देणार. अनेक लाभ देणार. त्या माध्यमातून लाभाची अप्रत्यक्ष हमी देणार म्हणजे जोखीम (लिक्विडिटी) संपविणार. याशिवाय बँकेचे कर्ज बुडविले किंवा देश सोडून पळाल्यास थकित कर्ज माफ करण्याचे शेवटचे अस्त्र(भात्यातील बाण) कायम आहे. इतक्या सर्व लाचारींपेक्षा सार्वजनिक उपक्रम बरे. कायदे गुंडाळण्याचे काम उत्तर प्रदेश, गुजरात व मध्यप्रदेश सरकारने सुरू केले. त्याचा फटका शेतकरी व मजुरांना बसणार.गुंतवणुकीचे स्वप्न..या आत्मनिर्भरतेसाठी सांगण्यात येते. कोरोनाने चीन बदनाम झाले. त्यामुळे तेथील गुंतवणूक अनेक देश काढून घेणार. ती गुंतवणूक भारतात येणार. असे स्वप्न दाखविले ज</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/img/blogs/profile/nmo.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राष्ट्रवादाच्या नावावर भूलथापा चालू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाँकडाऊन-४ची घोषणा केली. तेव्हा आत्मनिर्भरतेचं नवे खुळ आणलं. त्यासाठी चार एल सांगितले. त्यात लेबर, लाँ, लँड आणि लिक्विडिटी आहे. या माध्यमातून निर्माण झालेल्या संधींच्या लाभावर बरेच काही बोलले. त्यांचे हे निर्णय जागतिकीरण व खासगिकरणाच्या दबावाखाली आहेत. नोटबंदीने सरकार आर्थिक अडचणीत आले. उरलीसुरली कसर कोरोनाने काढली. जेव्हा सरकारचे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त वाढते. तेव्हा सरकारची पत खालावते. नवे कर्ज घेण्यात अडचणी येतात. जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अटी लादते. नेहरू सरकारच्या कार्यकाळात मिश्र अर्थव्यवस्थेला प्राधान्य होते. त्यामुळे खासगी उद्योगांसोबत सार्वजनिक उद्योग वाढले. त्यातील काहींचा अभिमानाने ' नवरत्न ' असा उल्लेख केला जात होता. आर्थिक कारणांमुळे मोदी सरकारच्या काळात या उपक्रमांचे कवडीमोलात खासगीकरण सुरू आहे. त्याचा लाभ धनिकांना आहे. अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत. दुर्बलांचे आरक्षण संपते. नोकरीच्या नव्या संधी राहत नाहीत. यास राष्ट्रवाद म्हणावे ? लोकांच्या पोटावर मारून येणारा राष्ट्रवाद मूठभरांचा आहे. ही आत्मनिर्भरता बहुसंख्याकांची नाही.या आत्मनिर्भरतेच्या नावाखाली श्रम कायदे रद्द करणार.आठ तासाऎवजी १२ तास काम. कंपनी मजूराला केव्हाही काढू शकेल. कंपनीला हवी असणारी जमिन सरकार देणार. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेणार. भूमी कायदे बाजूला ठेवणार. सरकार कंपनीला सवलती देणार. अनेक लाभ देणार. त्या माध्यमातून लाभाची अप्रत्यक्ष हमी देणार म्हणजे जोखीम (लिक्विडिटी) संपविणार. याशिवाय बँकेचे कर्ज बुडविले किंवा देश सोडून पळाल्यास थकित कर्ज माफ करण्याचे शेवटचे अस्त्र(भात्यातील बाण) कायम आहे. इतक्या सर्व लाचारींपेक्षा सार्वजनिक उपक्रम बरे. कायदे गुंडाळण्याचे काम उत्तर प्रदेश, गुजरात व मध्यप्रदेश सरकारने सुरू केले. त्याचा फटका शेतकरी व मजुरांना बसणार.गुंतवणुकीचे स्वप्न..या आत्मनिर्भरतेसाठी सांगण्यात येते. कोरोनाने चीन बदनाम झाले. त्यामुळे तेथील गुंतवणूक अनेक देश काढून घेणार. ती गुंतवणूक भारतात येणार. असे स्वप्न दाखविले जात आहे. त्यासाठी कायदे शिथिल करण्याचा उदपव्याप . हे विदेशी गुंतवणुकीसाठी की देशी भांडवलदारांसाठी हे लवकरच कळेल. तेव्हा आत्मनिर्भरतेचे कवच टराटर फाटलेले असेल. मेक इंन इंडिया, स्किल इंडिया व इतर फसव्या घोषणा अशाच हरवल्या आहेत. स्वदेशीचा जप करणाऱ्या सरकारने आता ' लोकल ' नवा शब्दप्रयोग आणला. यासाठी कोरोनाच्या पीपीई किट उत्पादनाचे उदाहरण दिले. या किटचे देशात अगोदरही उत्पादन होत होते. त्यांची निर्यातही होत होती. विरोधी पक्षांनी निर्यातीवर आक्षेप घेतला. त्यानंतर ४ एप्रिल-२०२० रोजी किट व औषधी निर्यात बंदीचे आदेश निघाले. पंतप्रधान प्रवासी मजुरांना दिलासा देणारी घोषणा करतील अशी अपेक्षा होती. तशी काही घोषणा झाली नाही. त्यांची तप, त्याग, कष्ट या शब्दांनी बोळावणा केली. शब्दांनी पोट भरत नाही. पण जेव्हा काही करावयाचे नसते. तेव्हा शब्दांचा मुलामा, राष्ट्रवादाचे डोज दिले जातात.शेतकऱ्यांची मुलें..प्रवासी मजुरांना कोणतेही पँकेज नाही. ६०० कोरेना रूग्ण असताना रेल्वे सोडल्या नाही. ७५ हजारापर्यंत रूग्ण वाढल्यानंतर आता रेल्वे सोडण्यात येत आहेत. हा उरफटा निर्णय म्हणावा लागेल. तिकीट मजुरांना काढावे लागते. त्यामुळे बहुसंख्य मजूर पायी गाववापसी करीत आहेत. देशभर प्रवासी मजुरांचे हाल सुरू आहेत. त्याने भारत सरकारची चौफेर कोंडी झाली. हे मजूर विविध राज्यातील भूमिपुत्र आहेत. शेतकऱ्यांची मुलं आहेतं. नोकरी मिळेल या आशेने शहरात आले. त्यानंतर ते परत गेले नाहीत. मिळेल ते काम करू लागले. संसारही थाटला. फाटक्या संसारातही ते समाधानी होते. आशावादी होते. मुंबईत धारावी ही मोठी झोपडपट्टी . तेथील तरूणांनी गायिलेले रँम्प लोकप्रिय आहे. ' आयेगा अपना भी दिन आयेगा..' हे स्वप्न सर्व मजुरांचे होते. कोरोनाने त्या स्वप्नांच्या चिंधड्या उडविल्या. तो स्थिरावला नाही. त्याची रोजीरोटी गेली. उपासमारीचे संकट ओढावले. रोजगार नाही. दुसरीकडे कोरोनाचा धोका. ते हवालदिल झाले. त्याला गाव आठवले. शहरेच जीवावर उठली. या भीतीने कसातरी महिना काढला. सरकार मदतीला येईल असे वाटले. तो काही आला नाही. तेव्हा संसार संसार करीत मुलाबाळांसह पायी निघाले. प्रवासातील त्यांच्या कहाण्यांनी जग बधीर झाले. देशाची लक्तरे बाहेर दिसली.नापिकी वाढलीशेतीवर भार वाढला. वाटण्या वाढल्या. शेतीचे तुकडे झाले. ओलिताच्या सोयी नाहीत. ओला, सुका दुष्काळ पडू लागला. नापिकी वाढली. त्याने ग्रामीण अर्थचक्र बिघडले. गावखेड्यांत राहणारा बहुसंख्य बहुजन समाज. शेती हा त्याचा मुख्य व्यवसाय. गरजा मर्यादित. तो थोडाफार शिकला. त्याने आपल्या मुलांनाही शाळेत टाकले. ती मुलं शिकू लागली. पहिली पिढी शिकली. त्यापैकी काहींनी नोकऱ्या पटकाविल्या. त्यानंतर शिकलेली ही दुसरी पिढी . ही पिढी नोकरीच्या शोधात शहराकडे वळली. सहज नोकरी मिळणाऱ्या मोठ्या शहरांकडे हे लोंढे वळले. यात परप्रांतियांचा भरणा जास्त आहे. कोरोना संकट ओढावल्याने त्या सर्वांच्या समस्या वाढल्या. कमाई बंद. घरभाडे वसुलीचा तकादा. जवळ असलेला पैसाअडका संपला. उपास पडू लागले. वरून शहरातच कोरोनाचे थैमान. त्यामुळे मृत्यू धोका वाढला. शेवटचा उपाय म्हणून पायी जाण्याचा मार्ग निवडला. लाखों मजुरांच्या घरवापसीने शेतीवरील भार आणखी वाढणार. आयोग शोभेचे ...देशाच्या सुखसोयी उभारणीत मजुरांचे मोठे योगदान. संकटाच्या समयी यापैकी काही कामी आले नाही. सरकारनेही कानाडोळा केला. नाईलाज झाल्याने मजूर गावाकडे पायी निघाले. काही जण ११०० किलोमीटर पायी चालत जात आहेत. पाय रक्तबंबाळ झाले. अनेकांनी रस्त्यांत प्राण सोडले. २० च्यावर अपघात झाले. रेल्वेनेही चिरडले. काहींनी सायकलने गाव गाठले. सात व नऊ महिन्याच्या गरोदरही पायी प्रवास करतांना आढळल्या. काही रस्त्यांत प्रसवल्या. तासभर विश्राम करून पुन्हा पायी प्रवास करणाऱ्या माता आढळल्या. म्हाताऱ्या आईवडिलांना खाद्यांवर घेवून पायी चालणारे लेक दिसले. जग मातृदिन साजरा करीत असताना अनेक माता मुलांना अंगा खाद्यांवर घेवून पायी चालताना आढळल्या. लहान मुलें पायी चालत आहेत. कोवळे पाय रक्ताळले. तरी रडत , लंगडत चालत आहेत. हे चित्र वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांनी टिपले. ते चित्र झळकले. तरी त्यांची दखल नाही. हे बघून खरंच या देशात काही आयोग आहेत काय? मानवी मुल्यांची जोपासना ज्यांचे कर्तव्य आहे. अशी मानवाधिकार आयोग नावाची संस्था आहे . मानवी मुल्य पायीदळी तुडविली जात असताना आयोग दिसले नाही.ओली बांळतीण पायी चालते. शेकडो गरोदर माता हजारो किलोमीटर पायी चालतात. काही महिलांना रस्त्यांच्या कडेला प्रसववेदना होतात. रस्त्याच्या कडेला बांळतपण उरकतात. त्यात नाशिकवरून सतन्याकडे निघालेली महिला ५ मे रोजी रोजी रस्त्याच्या कडेला थांबते. बाळाला जन्म देते. तासभर विश्राम करते. नवजात बाळाला घेवून पुन्हा पायी चालू लागते. या प्रसंगांना काही वृत्तपत्रांनी वाचा फोडल्या. जे जगाला दिसते. ते महिला आयोगाला दिसू नये. महिलांच्या दु:खात मदतीला धावणार नसेल. दोषी यंत्रणेला जाब विचारत नसेल. उपाययोजना करण्यास सरकारला भाग पाडत नसेल . किमान सरकारला पत्र पाठवून लक्ष घाला. एवढे सूचविण्याचे कामही महिला आयोग करीत नसेल तर या आयोगाचे काम तरी काय असा प्रश्न पडतो.लहान मुलें शेकडो किलोमीटर पायी चालत आहेत.त्यांचे कोमल पाय रक्ताळले. त्यामुळे रंडत ,लंगडत चालतानाचे दृश्य दिसली. त्याची दखल बाल आयोगाने घेतल्याचे कुठे दिसले नाही. आयोगावर असलेल्या सदस्यांनी गरिबांचे प्रश्न म्हणून दुर्लक्ष केले की तक्रार नाही म्हणून गप्प बसले .कारण काही असले तरी ते गंभीर आहे. एकूणच कर्तव्यात चुक कशी झाली . हा चिंतनाचा व चर्चेचाही विषय आहे. बैलांना टोचल्याने रक्त लागते. यासाठी कारवाई होते. बैलांच्या शर्यंती बंद केल्या. शर्यंती आयोजक व मालकांवर कारवाई केली जाते. इकडे जगण्याच्या शर्यतीत मुलं, महिला, माणसं रक्तबंबाळ झाली. त्याची सरकार दखल घेत नाही. कोणाकडे या विषयाची प्राथमिकता नाही. गजब देश. गजब माणसं. आता तरी प्रवाशांचे तांडे थांबावेत. मजुरांच्या वेदना लवकर संपाव्यात . त्यांना सरकारने भरपाई द्यावी. मजुरांना न्याय देणारे कायदे हवेत. स्वार्थी शोषण करणारे कायदे नकोत. असंघटित मजुरांना वाऱ्यावर सोडू नये.संघटितांनी त्या विरूध्द आवाज उचलावा.एवढीच अपेक्षा. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Blogs/Nationalist-delusion</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 11 May 2020 13:48:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मरणाची `पाळी` ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Blogs/The-MC-Period-of-death</link>
            <description>पापी पोटाचा प्रश्न फार मोठा असतो, इतका मोठा कि जन्मभर पाठ सोडत नाही. टीचभर पोट भरायला माणूस आयुष्यभर खस्ता खातो पोट भरत राहावं म्हणून अक्ख्या शरीराचीच हेळसांड करीत राहतो. त्यात ती स्त्री असेल आणि कुटुंबातल्या चार माणसांची, लेकराबाळांची पोटं भरण्याची जबाबदारीही तिच्यावर असेल तर जीवाचे हाल विचारूच नका. घरातल्या चिल्यापिल्यांचे पोट भरायला कधी ती उपाशी राहते, एका कापडावर महिने काढते, हाताला येईल ती कामं करते आणि वेळ आलीच तर या सर्वांच्या पलीकडे जाऊन पोटच्या गोळ्याला पोसायला पोटचा एखादा हिस्साच कापून फेकून देते.योगायोगाने सावित्रीबाई फुले यांची जयंती गेल्या आठवड्यात देशभर साजरी केली गेली. स्वतः हाल-अपेष्टा साहून स्त्रियांना शिक्षणाची दारे उघडे करून रीती-परंपरेच्या पार प्रस्थापित सामाजिक अन्यायी रूढींना नाकारत स्वयंसिद्ध होण्याचा धडा त्या माउलीने दिला होता.. दुसरीकडे त्याच आठवड्यात मराठवाड्यातील ९००० ऊस कामगार स्त्रियांनी पाळीच्या दिवसात रोजगार मिळत राहावा म्हणून अल्पवयात गर्भाशयच काढून टाकले या खळबळजनक बातमीने पुन्हा उचल खाल्ली.... ही काय अवस्था आहे ना, भारत जगात महासत्ता बनायला निघाला आहे.. महाराष्ट्र स्वतःला पुरोगामी म्हणवून घेतो परंतु आजही महिलेला तिच्या शरीरापलीकडे माणूस म्हणून पाहून तिच्याच कष्टाच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/img/blogs/profile/Image-2020-05-10.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पापी पोटाचा प्रश्न फार मोठा असतो, इतका मोठा कि जन्मभर पाठ सोडत नाही. टीचभर पोट भरायला माणूस आयुष्यभर खस्ता खातो पोट भरत राहावं म्हणून अक्ख्या शरीराचीच हेळसांड करीत राहतो. त्यात ती स्त्री असेल आणि कुटुंबातल्या चार माणसांची, लेकराबाळांची पोटं भरण्याची जबाबदारीही तिच्यावर असेल तर जीवाचे हाल विचारूच नका. घरातल्या चिल्यापिल्यांचे पोट भरायला कधी ती उपाशी राहते, एका कापडावर महिने काढते, हाताला येईल ती कामं करते आणि वेळ आलीच तर या सर्वांच्या पलीकडे जाऊन पोटच्या गोळ्याला पोसायला पोटचा एखादा हिस्साच कापून फेकून देते.योगायोगाने सावित्रीबाई फुले यांची जयंती गेल्या आठवड्यात देशभर साजरी केली गेली. स्वतः हाल-अपेष्टा साहून स्त्रियांना शिक्षणाची दारे उघडे करून रीती-परंपरेच्या पार प्रस्थापित सामाजिक अन्यायी रूढींना नाकारत स्वयंसिद्ध होण्याचा धडा त्या माउलीने दिला होता.. दुसरीकडे त्याच आठवड्यात मराठवाड्यातील ९००० ऊस कामगार स्त्रियांनी पाळीच्या दिवसात रोजगार मिळत राहावा म्हणून अल्पवयात गर्भाशयच काढून टाकले या खळबळजनक बातमीने पुन्हा उचल खाल्ली.... ही काय अवस्था आहे ना, भारत जगात महासत्ता बनायला निघाला आहे.. महाराष्ट्र स्वतःला पुरोगामी म्हणवून घेतो परंतु आजही महिलेला तिच्या शरीरापलीकडे माणूस म्हणून पाहून तिच्याच कष्टाचं मोल द्यायला कचरतो, भेदभाव करतो, तिचं लैंगिक शोषण होतं, तिच्या आरोग्यासाठी, सन्मानाने जगण्यासाठी एक अक्ख राष्ट्र मिळूनही सुरक्षित व्यवस्था निर्माण करू शकत नाही ही अत्यंत लाजिरवाणी, दुःखद बाब नाहीये का ? या प्रश्नावर राज्याचे महिला व बाल विकास मंत्री नितीन राऊत यांनी २४ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सविस्तर पत्र लिहिले आणि गेली अनेक महिने काळाच्या अंधारात गुडूप झालेला हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.मराठवाड्यातील काही जिल्हे अतिदुर्गम आहेत, रोजगार मिळवण्यासाठी या भागातील लोक अनेकदा स्थलांतर करतात. पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या राज्यात त्यांना मागणी असते. ऊस तोडणीचा ऑक्टोबर ते मार्च असा सहा महिन्याचा हंगाम या प्रांतातील मुख्य रोजगाराचे साधन आहे. दसऱ्यानंतरच्या काळात ऊस तोडणीच्या कामावर लाखो मजूर लागलेले असतात. नवरा-बायको दोघांनाही जोडीने काम करावे लागते ह्या दाम्पत्य जोडीला कोयता असे म्हणतात, २२८ रुपये टन याप्रमाणे त्यांना ऊस तोडणीचे पैसे दिले जातात... जास्तीत जास्त टन ऊसतोडणी होऊन जास्त रोजगार मिळवण्यासाठी प्रत्येक जोडी जिवतोडून काम करीत असते. कारण या हंगामात होणारी कमाई हीच त्यांची वर्षभराची कमाई असते. यात बाईचा खाडा झाला कि एकट्या पुरुषाला काम मिळत नाही त्यामुळे दोघांचीही रोजी बुडते. खाडा होण्याचे मुख्य कारण मासिक पाळी हे असते. पाळी आली कामावर येऊ नका असे मुकादम सांगतो.. दर महिन्याला हे परवडण्यासारखे नाही म्हणून या महिलांनी किंवा त्यांच्या कुटुंबांनीच यावर तोडगा शोधून काढला. गर्भाशयच काढून टाकण्याचा तोडगा. आता गर्भाशयच नसणाऱ्या बायकांना मुकादम खास शोधून कामावर ठेवू लागला आणि काम मिळवण्याच्या गरजेपोटी अधिकाधिक महिला त्यांच्या शरीराचे मुख्य अंगच म्हणजे गर्भाशय काढून टाकू लागल्या. गेली काही वर्ष हे महिलांच्या बाबतीत हे दृष्ट चक्रच बनत गेलं आहे. ठराविक वेळेत काम पूर्ण करून देणे गरजेचे असते म्हणून कामगारांची टोळीही पाळी येणाऱ्या महिलांना स्वीकारत नाही. या सगळ्या परिस्थितीला लक्षात घेऊन नाईलाजास्तव कुटुंबाला हा निर्णय घ्यावा लागतो. गर्भाशय काढून टाकण्यासाठी लागणारे पैसे पुन्हा मुकादम कडूनच आगाऊ घेतली जातात आणि नंतर जास्तीचे काम करवून घेऊन ते वसूल केले जाते. फक्त हीच समस्या आहे असे नव्हे घरदार सोडून रोजंदारीवर आलेल्या या स्त्रिया उघड्यावरच झोपड्या, टेन्ट बांधून राहतात ह्यांच्या सुरक्षेबाबत, आरोग्याबाबत काळजी घेणारी कोणतीही यंत्रणा कोणतीही सोय नसल्याने २० ते ४० वर्षे वय असणाऱ्या या तरुण महिलांमध्ये आताशा अनेक रोगांचा प्रादुर्भाव होऊन त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागले आहेत.महिलांना कोंडीत पकडण्याचे अनेक मार्ग आहेत. तिला दुय्यम स्थान देण्याच्या असंख्य प्रथा आहेत. त्यातली एक परंपरा आहे पाळी आलेल्या महिलेला बाजूला बसवणे...या एका चुकीच्या रुढीपायी, तिच्या येणाऱ्या पाळीकडे समस्या म्हणून पाहायच्या मानसिकतेमुळे अनेक समस्या जन्मतात आणि त्याचे परिणाम पुन्हा पुन्हा महिलांनाच भोगावे लागतात. गर्भाशय काढून घेणाऱ्या महिलांची संख्या ९००० हुन अधिक होत चालली आहे, यात वैद्यकीय विभागाच्या व्यवसायीकरणाचा मुद्दा सुद्धा गांभीर्याने घेतला जायला हवा. या समस्येकडे कुणाचे तरी लक्ष वेधले गेले आहे आणि त्यांनी राजकीय स्तरावर हा मुद्दा उपस्थित करून समस्येला वाचा फोडली आहे हि समाधानाची बाब आहे...परंतु जेव्हा या समस्येसाठी प्रत्यक्षात उपाययोजना होऊ लागेल तेव्हाच जगाच्या अर्ध्या लोकसंख्येच्या निदान मूलभूत गरजांसाठी समाजाच्या मनात संवेदनशीलता आहे हे सिद्ध करता येणार आहे.रजस्वलेचा जो विटाळ | त्याचा आळोन जाला गाळ |त्या गाळाचेंच केवळ | शरीर हें ||समर्थ म्हणतात पाळी येत असलेली स्त्री जर अशुद्ध असेल तर त्याच विटाळातून निर्माण झालेले सारे सजीव, सारा संसारच अशुद्ध आहे तेव्हा ज्यातून या सृष्टीचीच निर्मिती झाली आहे त्या रजस्वलेचा मान प्रत्येकाने राखायला हवा .. असेच त्यांना उद्धृत करायचे होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Blogs/The-MC-Period-of-death</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 11 May 2020 11:01:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नाथाभाऊ बोलून टाका, `पक्ष गेला उडत ...` ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Blogs/Nathabhau-speak-up-about-party-</link>
            <description>विधानसभा निवडणुकीत ठरवून उमेदवारी नाकारणे, कन्येला तोंड देखली उमेदवारी देऊन नंतर पराभव घडवून आणणे, लागोपाठ झालेल्या आरोपांची चौकशी करुन एकही अहवाल जाहीर न करणे, पक्षाच्या राज्य व जिल्हा सभांमध्ये सन्मानाने सहभाग न देणे अशा मानभंगांच्या अनेक प्रसंगांचे कडू घोट एकनाथराव खडसे यांनी रिचवले आहेत. तरीही विधान परिषदेवर उमेदवारीची आशा बाळगून खडसे रांगेत उभे होते. अखेर उमेदवारी मिळाली नाही. नाथाभाऊंचा संयमाचा बांध पुन्हा फुटला आणि ते बोलले.सध्या दारुच्या रांगेत उभे राहणारे दारुडे, बुंगारी वा मद्यपी नाथाभाऊंपेक्षा जास्त नशिबवान आहेत. घरातल्यांचे शिव्याशाप, समाजाची कुचेष्टा आणि पोलिसांचे दंडुके खाऊन रांगेतल्या मंडळींना एखाद-दुसरी बाटली मिळून जात आहे. गेल्या ३/४ दिवसात बाटली मिळाली नाही म्हणून कोणाला त्रागा करताना पाहिलेले नाही. परंतू पक्षाच्या रांगेत निष्ठेने उभे राहून पक्षाकडून सन्मान मिळत नसल्याबद्दल गेल्या ४ वर्षांत अनेकवेळा नाथाभाऊंना आगतिक होताना पाहिले आहे. हे क्लेषकारक आहे.विधान परिषदेसाठी भाजपने जे चार उमेदवार दिले आहेत त्यांची पक्षाविषयी निष्ठा आणि एकूणच कार्य यावर नाथाभाऊंनी जाहीरपणे भाष्य केले आहे. नाथाभाऊ अस</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/img/blogs/profile/eknath-khadse-blog.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[विधानसभा निवडणुकीत ठरवून उमेदवारी नाकारणे, कन्येला तोंड देखली उमेदवारी देऊन नंतर पराभव घडवून आणणे, लागोपाठ झालेल्या आरोपांची चौकशी करुन एकही अहवाल जाहीर न करणे, पक्षाच्या राज्य व जिल्हा सभांमध्ये सन्मानाने सहभाग न देणे अशा मानभंगांच्या अनेक प्रसंगांचे कडू घोट एकनाथराव खडसे यांनी रिचवले आहेत. तरीही विधान परिषदेवर उमेदवारीची आशा बाळगून खडसे रांगेत उभे होते. अखेर उमेदवारी मिळाली नाही. नाथाभाऊंचा संयमाचा बांध पुन्हा फुटला आणि ते बोलले.सध्या दारुच्या रांगेत उभे राहणारे दारुडे, बुंगारी वा मद्यपी नाथाभाऊंपेक्षा जास्त नशिबवान आहेत. घरातल्यांचे शिव्याशाप, समाजाची कुचेष्टा आणि पोलिसांचे दंडुके खाऊन रांगेतल्या मंडळींना एखाद-दुसरी बाटली मिळून जात आहे. गेल्या ३/४ दिवसात बाटली मिळाली नाही म्हणून कोणाला त्रागा करताना पाहिलेले नाही. परंतू पक्षाच्या रांगेत निष्ठेने उभे राहून पक्षाकडून सन्मान मिळत नसल्याबद्दल गेल्या ४ वर्षांत अनेकवेळा नाथाभाऊंना आगतिक होताना पाहिले आहे. हे क्लेषकारक आहे.विधान परिषदेसाठी भाजपने जे चार उमेदवार दिले आहेत त्यांची पक्षाविषयी निष्ठा आणि एकूणच कार्य यावर नाथाभाऊंनी जाहीरपणे भाष्य केले आहे. नाथाभाऊ असेही म्हणाले की, 'संभाव्य उमेदवार म्हणून माझी व इतर तिघांची शिफारस दिल्लीकडे गेली होती.' पण तेथून भलतीच नावे आली. अर्थात हे अपेक्षित होतेच. विधानसभा निवडणुकीत दिल्लीतील ज्यांनी खडसेंचे नाव कापले त्यांनीच विधान परिषदेसाठी उमेदवार दिले आहेत. मग नाथाभाऊंना कशाचा आधारावर उमेदवारी मिळणार होती ? राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होत असताना नाथाभाऊ फुलांचे बुके घेऊन कुठे कुठे फिरत होते ? नाथाभाऊंची वक्तव्ये काय होती ? याचा काही तरी लेखाजोखा दिल्लीत असेल ना ? अशा स्थितीत नाथाभाऊंनी दिल्लीतील यादीत स्वतःचे नाव येण्याची अपेक्षा करणे हा गैरसमजाचाच भाग होता.विधानसभा निवडणूक रणधुमाळीत थेट खडसेंनी नाही मात्र त्यांच्या कट्टर समर्थकांनी खामगाव, अमळनेर, यावल अशा काही मतदार संघात भाजप विरोधात काम केल्याचे अहवाल गेले आहेत. मुक्ताईनगर मतदार संघात भाजपच्या कोणी कोणी विरोधात काम केले याचा अहवाल खडसेंनी दिला आहे. निवडणूक निकालानंतरही खडसे यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या सलग भेटी घेतल्या. तेव्हाच काही तरी धडाकेबाज निर्णय घेऊन खडसेंनी पवार यांचे घड्याळ हातावर बांधायला होते. पण अशा भेटींबाबत खडसेंनी माध्यमांसमोर कच खाऊ भूमिका घेतली. पवार यांची भेट झाली नाही असा पवित्रा खडसेंनी घेतला. जेव्हा पवार म्हणाले, `एकनाथ खडसे हे मला भेटले होते. त्यांच्याशी माझी चर्चाही झाली. पण त्यांचे समाधान करण्याएवढी साधनसामुग्री सध्या तरी माझ्याकडे नाही.` तेव्हा खडसेंची गोची झाली. याशिवाय स्व. गोपिनाथ मुंडे यांच्या जन्मदिनी परळी येथे गोपीनाथ गडावर झालेल्या जाहीर मेळाव्यात खडसेंनी राज्यातील नेतृत्वावर तोफ डागली होती. तेव्हा खडसे म्हणाले होते, `पंकजांचे सांगत नाही पण माझा भरवसा नाही.` अशा प्रकारच्या घटना-घडामोडींचे पाणी गेल्या काही महिन्यात वाहून गेले आहे.पक्षविरोधी कारवायांचे अहवाल नेहमी तयार होत असतात. सर्वांचेच अहवाल पक्षनेते स्वीकारतात. पण कार्यवाही कशावर करायची ? हे दिल्लीतील पक्षनेतेच ठरवतात. याचे उत्तम उदाहरण शरद पवार यांच्याबाबतीत घडले आहे. लोकसभेची सन १९९८ मध्ये मध्यावधी निवडणूक झाली. निकालानंतर पवार लोकसभेत काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते झाले. पण जेव्हा सत्तेच्या नेतृत्वाची म्हणजे पंतप्रधानपदाची संधी काँग्रेसकडे चालून आली तेव्हा पवार यांना डावलून पक्षाच्या अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी पुढे सरसावल्या. पवार यांच्या विरोधात दिल्लीत होणाऱ्या कानाफुसीमुळे संधी हिरावली गेली. महाराष्ट्राचे नुकसान झाले. खडसेंचेही असेच झाले. भाजपने विरोधी पक्षनेतापद दिले पण सन २०१४ मुख्यमंत्रीपद मिळायची संधी आली तेव्हा खडसेंना डावलले गेले. प्रदेशाध्यक्ष असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळाली. संधी हुकल्यानंतर पवार, संगमा व अन्वर यांनी नंतर सोनिया यांचे विदेशीपण हुडकून काढले. संधी हुकल्यानंतर खडसे यांनीही फडणवीस यांचे `बच्चापण` वारंवारा शोधले. पवार आजही नियोजित पंतप्रधान आहेत. खडसेही नियोजित मुख्यमंत्री राहिले.खडसेंची सध्या भाजपत असलेली स्थिती वाईटच आहे. शत्रूवर सुद्धा ही वेळ येऊ नये. `जेथे फुले वेचली तेथे गोवरी थापायची वेळ` येऊ नये. अजून किती बेआबरू व्हायचे ? एक तरी घरी बसून निवृत्ती स्वीकारावी किंवा ठणकाऊन सांगावे, `पक्ष गेला उडत.` शायर गालिबसाहेब यांच्या एका शेर मधून खडसेंची अवस्था चपखलपणे समोर येते ...हज़ारों ख़्वाहिशें ऐसी कि, हर ख़्वाहिश पे दम निकलेबहुत निकले मेरे अरमान, लेकिन फिर भी कम निकलेडरे क्यों मेरा क़ातिल, क्या रहेगा उसकी गर्दन परवो ख़ूँ, जो चश्मे-तर से उम्र यूँ दम-ब-दम निकलेनिकलना ख़ुल्द से आदम का सुनते आये थे लेकिनबहुत बेआबरू हो कर तेरे कूचे से हम निकले ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Blogs/Nathabhau-speak-up-about-party-</guid>
        </item>
    
     </channel>
    </rss>
     